Skip to main content

उत्सव..पावसाचा!

सकाळच्या प्रसन्नतेचा पहिला नैवेद्य घेताना सूर्यनारायण खुष होऊन अजूनच तेजस्वी दिसायला लागले आहेत. ढगांनीही रात्रभर आकाशाच्या अंगणात खेळ खेळून आता निरोप घेतलाय. काही उनाड ढग आहेतच तरी कट्ट्यावर बसलेली टवाळक्या करत.झाडाझाडावरील पक्ष्यांची लगबग सुरू झालीए.
आज पावसाने हजेरी नं लावल्याने सगळेच एकंदरीत खुष आहेत. कावळ्याच्या घरात मात्र अजूनही सगळे झोपलेच आहेत. कावळे काकू येऊन दारासमोर रांगोळी टाकून गेल्या. "आज पाऊस का आला नाही? अजून थोड्या वेळ झोपायला मिळालं असतं ना" असे त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव होते.
नेहमीच घाईत असलेल्या खारुताईंचा मूड मात्र वेगळाच आहे. आज त्यांनी सुट्टी घेतली आहे अर्धी! मुलगी आलीए घरी बाळंतपणाला, तिच्यासाठी घराची डागडुजी करायची आहे म्हणून. नारळे काका काकूंना विचारपूस चाललीए त्यांची घराबाबतीत. नारळेंना तसा या गोष्टींचा बराच अनुभव आहे. कावळे काकूंची मुलगी बाळंत झाली, तेव्हाही ते मदतीला सरसावले होते. शेजारधर्म आजवर त्यांनी अगदॊ चोखपणे पाळलाय. कावळे काकूंचा सल्ला ही बराच मोलाचा ठरतो कारण मोहल्ल्यातील सगळ्य़ांपेक्षा वयाने आणि अनुभवाने त्या मोठ्याच आहेत.
खारूताईचा जावई मोठा कर्तबगार बर्का! एका शेंगदाणा तेलाच्या कंपनीत नुकताच रुजू झाला. त्याला छोट्या खारुची तर फारच काळजी. म्हणूनच खारुताईंवर ही जबाबदारी सोपवून गेलाय आखातात.
मैना कुटुंबात नुकतीच सकाळ झाली. नुकतंच मैना कुटुंब इथे राहायला आलंय. नवपरिणीत जोडपं आहे त्यामुळे त्यांना कसलीही मदत लागली की सगळे लगेच पुढे सरसावतात.
कोकिळा मावशींच्या मुलीला नुकतीच कुणीतरी लग्नाची मागणी घातली. त्यांनी हो ही म्हटलं असं ऐकीवात आहे. पुढे काय होणार? याकडे सगळ्यांचेच डोळे लागलेत, खारुताईंच्या घरच्या लग्नानंतर मोहल्यात होणारं हे दुसरंच लग्नं. कोकीळ कुटुंब तसं मनमोकळं असल्याने सगळ्यांनाच त्यांच्याकडच्या लग्नात मजा करता येणार आहे. सगळेच जण म्हणून वाट बघतायत.
काल परवा मोहल्यात राहायला आलेला धीवर पक्षी सगळ्यांनाच आवडून गेला. तो थोड्याच वेळ आला पण काय तोरा होता त्याचा. नुकताच परदेशातून आला होता त्यामुळे त्याला थकायला झालं होतं. घर शोधत शोधत आला होता बिचारा. नारळे काका काकूंनी त्याला घरात घेऊन त्याची नीट विचारपूस केली. केवढं बरं वाटलं त्याला. परदेशातून आल्यामुळे त्याच्याकडून बऱ्याचं नवीन गोष्टी, नवीन माहिती मिळेल असे वाटून सगळेच खूष होते.
एव्हाना सूर्यनारायणाची अर्धी कालक्रमणा पूर्ण झालीय. दुपारच्या भरगच्च जेवणानंतर अनावर झालेल्या झोपेला मान देऊन ते वामकुक्षीला निघून गेले. मैदान साफ आहे हे पाहून ढगांनी खेळायला सुरुवात केली.
कावळे काकू दोरीवर टांगलेले कपडे काढायला लगेच घराबाहेर आल्या. नारळे काकूंशी गप्पा मारत मारता सरसर येणाऱ्या शिरव्यांनी त्यांना पार भिजवून टाकलं तश्याच त्या आत गेल्या.
दुपारपासून पाऊस सतत सुरू असल्याने खारूताईचा घराच्या डागडुजीचा प्लॅन तसाच बारगळला. मैना कुटुंबही बाजारात जायचे राहून गेले. कावळे काकू नखशिखांत भिजल्यामुळे आजारी पडल्या. कोकीळ कुटुंबही हिरमुसले. आज त्यांच्या मुलीची सोयरीक होणार होती. पावसामुळे सगळेच आपापल्या घरी अडकून पडले.
नारळे काकूंनी मात्र घरीच मस्तं कांद्याची भजी, चहा असा बेत केला. आणि सगळ्यांना बोलावलं. सगळे थोडे थोडॆ भिजत नारळेंकडे आले. बाहेर जोरदार पाऊस, कांद्याची भजी आणि आल्याचा मस्तं चहा हा बेत पाहून सगळ्यांना मनापासून आनंद झाला.
नेहमीप्रमाणेच नारळे काका काकूंनी आपला शेजारधर्म पाळला आणि सगळ्या हिरमुसल्या कुटुंबांना आनंदी करून टाकले. रात्र होईपर्यंत नारळेंकडे मस्तं मैफिल सजली. गप्पा गोष्टी, कोकीळ कुटुंबाची गाणी. पावसाचा एक उत्सवच साजरा केला मोहल्लेकरांनी...; )

Comments

  1. मुग्धा आज प्रथमच तुज़ा ब्लॉग वाचला.
    छान लिहितेस.
    अजुन छान छान आम्हाला वाचायला मिळण्यासाठी तुला शुभेच्छा ......

    ReplyDelete
  2. अगदी लहानपणी ऐकलेल्या गोष्टींची आठवण झाली :) छानच!!

    ReplyDelete
  3. thank you asmita ji..
    ashich bhet det raha blog la..

    ReplyDelete
  4. thank you sakhi!!
    tujha likhan mala prachanda aavadala...
    keep it up..
    :)

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

दाक्षिणात्य संस्कृती - कोलम (रांगोळी)

दाक्षिणात्य संस्कृती - कोलम (रांगोळी) या पोस्ट मध्ये खाद्यसंस्कृती बद्दल नं सांगता रांगोळ्या आणि तामिळ नाडू यांच्या असलेल्या घट्ट नात्याबद्दल बोलूया. रांगोळी म्हणजे मला तरी एखाद्या स्त्री ची अभिव्यक्ती वाटते. रांगोळी काढणारा पुरुष जरी असेल तरी त्याच्या मनातल्या तरल भावना त्या रांगोळीत उतरतात. अर्थात नेहेमीच्या रोज काढल्या जाणाऱ्या रांगोळ्या म्हणजे गृहिणीची अभिव्यक्ती का हे मला नाही माहिती. पण अंगण झाडणे, सडा टाकणे, आणि रांगोळी काढणे  माझ्यासाठी एक थेरेपि आहे. आजकाल अपार्टमेंट आणि मोठाल्या इमारतींमुळे अंगण हा भागच नाहीसा झालाय घराचा, पण मागे आम्ही होतो त्या घरी मोठे अंगण होते. तामिळ नाडुत सगळ्या दारासमोर रांगोळी काढल्या जाते. अगदी अपार्टमेंट जरी असेल तरी अपार्टमेंट च्या मोठ्या दारासमोर रांगोळी काढली जातेच. इथल्या गल्ल्यांमध्ये समोरासमोरील घराच्या दारासमोर तर दोन्ही वेळेला रांगोळी काढल्या जाते. सकाळी ६. ०० ते ६.३० च्या दरम्यात सगळ्या स्त्रिया या कामात मग्न दिसतात. पहिले मला फार कुतूहल वाटे. एवढ्या सकाळी उठणे आणि पहिले काम म्हणजे रांगोळी. दिवस कसा  छान सुरु होत असेल असे वाटायचे. लग्न

दलपती - मणी रत्नम चा मास्टरपीस

तामिळ चित्रपटांमध्ये मी सगळ्यात पहिले पाहिलेला चित्रपट म्हणजे दलपती. तामिळ भाषा जरी क्लिष्ट वाटत असली तरी ती सर्वांगसुंदर भाषा आहे. आपण मराठी किंवा इतर भाषिक लोक नेहेमी दक्षिणेकडच्या ४ भाषांची सारख्या वाटतात म्हणून खिल्ली उडवत असतो पण ह्या चारही भाषा कन्नड, तमिळ, तेलगू आणि मल्याळम अतिशय समृद्ध आहेत. चारही भाषांची एक स्वतःची चित्रपट सृष्टी आहे हे महत्वाचे. बाहुबली हे एक उत्तम उदाहरण. बरेच हिंदी चित्रपट, मल्याळम आणि तामिळ चित्रपटांवरून प्रेरित असतात हे सांगणे नं लगे. तर असाच एक १९९०'स मध्ये तयार झालेला चित्रपट दलपती म्हणजे म्होरक्या किंवा प्रमुख किंवा सेनापती.  कर्ण आणि अर्जुन ह्या धर्तीवर आधारित असलेला हा चित्रपट त्याकाळी खूप गाजला होता. मामुटी, रजनीकांत आणि अरविंद स्वामी, शोभना आणि सगळे उत्तम कलाकार. इलैराजा यांचे संगीत आणि संतोष सिवन यांची सिनेमॅटोग्राफी. असे म्हणतात की मणी रत्नम चे सगळे चित्रपट सकाळी चित्रांकित करतात. त्यावेळी अतिशय सुंदर प्रकाश असतो आणि त्याचा पुरेपूर उपयोग ते प्रत्येक शॉट मध्ये करून घेतात. ह्या चित्रपटात ते प्रकर्षाने जाणवते.  मणी रत्नम चे सगळे

दाक्षिणात्य खाद्यसंस्कृती -दोसा

दोसा हा पदार्थ नं आवडणारा माणूस विरळा. माझी आणि दोस्याची ओळख आमच्या शाळेच्या आनंदमेळ्यात झाली होती. एक डोस्याचा स्टॉल होता तिथे, माझ्या बेस्ट फ्रेंड च्या काकी चा. मी नं खाताच गर्दी पाहून मला लक्षात आलं होतं तेव्हा कि काहीतरी स्पेशल आहे दोस्यात. हळूहळू जसे मोठे होत गेलो तसे आई बाबा बाहेर जेवायला घेऊन जायचे, मग खायचे काय तर डोसा, जगत नावाचे नागपूरला खूप प्रसिद्ध हॉटेल होते, अर्थात आता मॉल आणि मोठमोठ्या बिल्डींग्स असलेले नागपूर नव्हते तेव्हा उणीपुरी २ ते ३ फॅमिली रेस्टॉरंट्स. त्यात आर्य भवन एक आणि एक जगत. आई म्हणायची जी वस्तू आपण घरी जास्त करत नाही ती बाहेर खावी. म्हणून मोठ्ठा क्रिस्पि दोसा त्यात बटाट्याची भाजी, सोबत चटण्या. एकदम पोटभर व्हायचा तो मसाला डोसा. मी ९ वी, १० वी त असतांना आई घरीच डोसे करायची. पुढे कॉलेज मध्ये घेल्यावर वगैरे बाहेर खातांना डोसा हा पदार्थ बऱ्याचदा खाल्ल्या जायचा.  आता गेल्या १० वर्षांपासून चेन्नई मध्ये स्थायिक असल्याने, दोसा हा दाक्षिणात्य संस्कृतीचा किती अविभाज्य घटक आहे हे कळून आले. माझ्या घरी डोश्याचे पीठ नाही असा एकही दिवस जात नाही. जसे मराठी घरांत कणिक