Skip to main content

चलते चलते....

ऑफिसला यायला मला नेहमीच १.५ तास लागतॊ...मनावर कधिमधी आलेले मळभ झटकण्याचे काम मी या वेळात करते
.गाडितुन जात असतांना आजुबाजुला असणार्या दुकानाचे, लोकांचे एक चित्र बनत जाते आणि मनावर हळुच्कन उमटतात त्याचे पडसाद...
ऑफिसला यायला मला नेहमीच दीड तास लागतॊ...मनावर कधीमधी आलेले मळभ झटकण्याचे काम मी या वेळात करते.गाडीतुन जात असतांना आजुबाजुला असणार्या दुकानाचे, लोकांचे एक चित्र बनत जाते आणि मनावर हळुचकन उमटतात त्याचे पडसाद...

मॉन्सुनमुळे असणारं ढगाळ वातावरण, रस्त्यावरची वर्दळ खरोखर मनाला भावुन जाते..नारळाच्या झाडांची सकाळची प्रसन्न चर्या मन सुखावुन जाते. मला प्रत्येक नारळाचं झाड एखाद्या युगपुरुषासारखं वाटतं..सगळ्यांना भरभरुन देणारं आणि काही ही मोबदला नं मागणारं..

ढगाआड असल्यामुळे सूर्यदेवांबद्दल उन्हाळ्यात माझ्या मनात असलेला राग आता कमी झालाय :) त्यांनी असेच राहुन स्वतःचा आणि दुसर्यांचा ताप वाढवु नये असं वाटल्याशिवाय राहत नाही..

रस्त्याच्या कडेला असलेल्या हॉटेलातील मोठमोठाले काळे तापलेले तवे, त्याच्यावर पाणि टाकले की येणारा चर्रर्र असा आवाज आणि वाफ़.....वाफ़ ओसरली की तव्यावरुन गोल फिरणारी दोश्याच्या पीठाची वाटी...एखाद्या चहा, कॉफीच्या टपरीवर गिर्‍हाईकाची वाट पाहत असलेली बापुडवाणी इडली...हे सगळं कुठेतरी मनात घर करुन जातं..

प्रत्येक घरासमोर टाकलेला सडा आणि ठिपक्यांना वगळुन काढलेली सुंदर रांगोळी..जणु कटु आठवणींना वगळल्यास आयुष्यात येणारी सुबकता दर्शवते...

गल्लीतल्या एखाद्या देवळासमोरच्या दुकानात असलेले मोगरा- तुळशीचे गजरे मन कितीही खिन्न असले तरी सहज प्रसन्नता आणतात...समोरुन जाणारे एखादे कपाळावर भरपुर विभुती लावलेले, पांढरशुभ्र धोतर (वेष्टी) आणि जानवं घातलेले कृश बांध्याचे आजोबा....त्यांनी आजवर पाळलेल्या शिस्तीचा धडा देवुन जातात....

रस्त्याच्या अगदी मधोमध पोलीसकाका रस्ता ओलांडणार्यांच्या मदतीला धावुन येतात आणि आम्हाला गाडी थांबवावी लागते..बाजुलाच असलेल्या बसमधील गर्दी मात्र पाहवत नाही..बसच्या खिडकीतुन जरा आत डोकावले की दिसतात काही चेहरे..काही माझ्याच सारखे, काही वेगळे...समोरच्या सीट वर डोकं टाकुन पेंगुळलेले,

फोनवर बोलत असलेले, गाणी ऐकत असलेले असंख्य ओळखीचे पण अनोळखी चेहरे...

कापडाच्या, सोन्याच्या दुकांनांत चालु असलेली साफ़ सफ़ाई, पुजा..सबंध दिवस दुकान नीट चालु दे अशी प्रार्थना करणारे धनाढ्य मालक यांच्यावरही नजर जाते..

एव्हाना सगळे रस्ते दुचाकी चारचाकीने तुडुंब भरले असतात.रस्त्यावरचे सिग्नल आपले काम अगदी चोखपणे बजावत असतात..लोकांची मनं त्यांच्या आधीच ऑफिसमधे जाऊन बसलेली असतात...सगळेच वाहतुकीच्या जाळ्यातुन सुटण्याच्या प्रयत्नात..

नकळत दूरवर एक कटाक्ष जातो सोनेरी चकाकणार्या वाळुकडे ...अथांग निळ्या समुद्राकडे....आणि मन नकळत अभिवादन करतं त्याच्या उदात्ततेला.

लगेच आठवतो तो "जगन्नियंता". जो बघतोय ही सगळी घडामोड..इथे प्रत्यक्ष जरी येऊ शकत नसला तरी सगळ्यांना देतो जगण्याची उमेद त्यानी घडवलेल्या प्रत्येक गोष्टीतून..त्यानी घडवलेल्या प्रत्येक माणसाकडुन....

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

दाक्षिणात्य संस्कृती - कोलम (रांगोळी)

दाक्षिणात्य संस्कृती - कोलम (रांगोळी) या पोस्ट मध्ये खाद्यसंस्कृती बद्दल नं सांगता रांगोळ्या आणि तामिळ नाडू यांच्या असलेल्या घट्ट नात्याबद्दल बोलूया. रांगोळी म्हणजे मला तरी एखाद्या स्त्री ची अभिव्यक्ती वाटते. रांगोळी काढणारा पुरुष जरी असेल तरी त्याच्या मनातल्या तरल भावना त्या रांगोळीत उतरतात. अर्थात नेहेमीच्या रोज काढल्या जाणाऱ्या रांगोळ्या म्हणजे गृहिणीची अभिव्यक्ती का हे मला नाही माहिती. पण अंगण झाडणे, सडा टाकणे, आणि रांगोळी काढणे  माझ्यासाठी एक थेरेपि आहे. आजकाल अपार्टमेंट आणि मोठाल्या इमारतींमुळे अंगण हा भागच नाहीसा झालाय घराचा, पण मागे आम्ही होतो त्या घरी मोठे अंगण होते. तामिळ नाडुत सगळ्या दारासमोर रांगोळी काढल्या जाते. अगदी अपार्टमेंट जरी असेल तरी अपार्टमेंट च्या मोठ्या दारासमोर रांगोळी काढली जातेच. इथल्या गल्ल्यांमध्ये समोरासमोरील घराच्या दारासमोर तर दोन्ही वेळेला रांगोळी काढल्या जाते. सकाळी ६. ०० ते ६.३० च्या दरम्यात सगळ्या स्त्रिया या कामात मग्न दिसतात. पहिले मला फार कुतूहल वाटे. एवढ्या सकाळी उठणे आणि पहिले काम म्हणजे रांगोळी. दिवस कसा  छान सुरु होत असेल असे वाटायचे. लग्न

दलपती - मणी रत्नम चा मास्टरपीस

तामिळ चित्रपटांमध्ये मी सगळ्यात पहिले पाहिलेला चित्रपट म्हणजे दलपती. तामिळ भाषा जरी क्लिष्ट वाटत असली तरी ती सर्वांगसुंदर भाषा आहे. आपण मराठी किंवा इतर भाषिक लोक नेहेमी दक्षिणेकडच्या ४ भाषांची सारख्या वाटतात म्हणून खिल्ली उडवत असतो पण ह्या चारही भाषा कन्नड, तमिळ, तेलगू आणि मल्याळम अतिशय समृद्ध आहेत. चारही भाषांची एक स्वतःची चित्रपट सृष्टी आहे हे महत्वाचे. बाहुबली हे एक उत्तम उदाहरण. बरेच हिंदी चित्रपट, मल्याळम आणि तामिळ चित्रपटांवरून प्रेरित असतात हे सांगणे नं लगे. तर असाच एक १९९०'स मध्ये तयार झालेला चित्रपट दलपती म्हणजे म्होरक्या किंवा प्रमुख किंवा सेनापती.  कर्ण आणि अर्जुन ह्या धर्तीवर आधारित असलेला हा चित्रपट त्याकाळी खूप गाजला होता. मामुटी, रजनीकांत आणि अरविंद स्वामी, शोभना आणि सगळे उत्तम कलाकार. इलैराजा यांचे संगीत आणि संतोष सिवन यांची सिनेमॅटोग्राफी. असे म्हणतात की मणी रत्नम चे सगळे चित्रपट सकाळी चित्रांकित करतात. त्यावेळी अतिशय सुंदर प्रकाश असतो आणि त्याचा पुरेपूर उपयोग ते प्रत्येक शॉट मध्ये करून घेतात. ह्या चित्रपटात ते प्रकर्षाने जाणवते.  मणी रत्नम चे सगळे

दाक्षिणात्य खाद्यसंस्कृती -दोसा

दोसा हा पदार्थ नं आवडणारा माणूस विरळा. माझी आणि दोस्याची ओळख आमच्या शाळेच्या आनंदमेळ्यात झाली होती. एक डोस्याचा स्टॉल होता तिथे, माझ्या बेस्ट फ्रेंड च्या काकी चा. मी नं खाताच गर्दी पाहून मला लक्षात आलं होतं तेव्हा कि काहीतरी स्पेशल आहे दोस्यात. हळूहळू जसे मोठे होत गेलो तसे आई बाबा बाहेर जेवायला घेऊन जायचे, मग खायचे काय तर डोसा, जगत नावाचे नागपूरला खूप प्रसिद्ध हॉटेल होते, अर्थात आता मॉल आणि मोठमोठ्या बिल्डींग्स असलेले नागपूर नव्हते तेव्हा उणीपुरी २ ते ३ फॅमिली रेस्टॉरंट्स. त्यात आर्य भवन एक आणि एक जगत. आई म्हणायची जी वस्तू आपण घरी जास्त करत नाही ती बाहेर खावी. म्हणून मोठ्ठा क्रिस्पि दोसा त्यात बटाट्याची भाजी, सोबत चटण्या. एकदम पोटभर व्हायचा तो मसाला डोसा. मी ९ वी, १० वी त असतांना आई घरीच डोसे करायची. पुढे कॉलेज मध्ये घेल्यावर वगैरे बाहेर खातांना डोसा हा पदार्थ बऱ्याचदा खाल्ल्या जायचा.  आता गेल्या १० वर्षांपासून चेन्नई मध्ये स्थायिक असल्याने, दोसा हा दाक्षिणात्य संस्कृतीचा किती अविभाज्य घटक आहे हे कळून आले. माझ्या घरी डोश्याचे पीठ नाही असा एकही दिवस जात नाही. जसे मराठी घरांत कणिक