Skip to main content

माझे जीवन गाणे..

गाडीत येता येता मी आज कधी नाही ते मस्तं नाट्यगीतं लावली होती...नवरोबांना भाषा जरी कळत नसली तरी माझ्या असल्या काड्यांना ते विरोध करत नाहीत (याचं एकमेव कारण म्हणजे मी रोज़ ऐकत असलेली तमिळ गाणी ;) )
जवळपास अर्धं अंतर पार केलं होतं आलो होतो. समुद्री वादळासारख्या प्रचंड ट्रैफ़िकला तोंड देत देत आमची नौका पुढे जात होती..कुमार गंधर्व "मम आत्मा गमला हा" म्हणत होते. अगदी भर वादळात विजांचा कडकडाट व्हावा तश्या त्यांच्या ताना मला भासत होत्या. बाहेर मस्तंपैकी ढगाळ वातावरण होतं.मधुनच एक एंबुलेंस गेली. ह्या एंबुलेंस नेहमी जेव्हा ट्रैफिक मधुन जातात तेव्हा मला फ़ार टेंशन येत असतं.कोण जाणे त्यातील व्यक्तीला किती त्रास होत असेल आणि इथे एव्ढं ट्रैफिक. साधी त्या एंबुलेंस ला वाट मोकळी करुन देण्याइतकी शिष्टाई लोकांमध्ये नसते.अश्या वागण्याने कुणाचा जीव जाऊ शकतो हे लोकांना कसे कळत नाही ? ती एंबुलेंस इथे २ मिनिटे, तिथे ३ मिनिटे करत करत सिग्नल वरुन पुढे गेली आणि माझा जीव भांड्यात पडला.
एवढं सगळं होईपर्यंत गाण्याचा अंतरा सुरु झाला होता.मागे उभ्या असलेल्या लोकांनी पोंगा वाजवुन वाजवुन आपले अस्तित्व जाणवुन दिले होते. मी उगाचच गाणी लावली असं वाटुन गेलं.एकतर ट्रैफ़िक, त्यातुन अनोळखी भाषेतील गाणी, ते ही नाट्यसंगीत,बिचारा माझा नवरा..;)
तेव्ढ्यात कुणी पराक्रमी माणसाने आमच्या गाडीला आपल्या बाईकने ठोस मारली. आरश्याला जोरदार धक्का मारुन तो माफ़ी नं मागता पुढे जाता झाला ;)..हे तर नेहमीचंच..रस्त्यावर तीन वेगवेगळ्या लेन्स असतांना ह्या दुचाकी वाल्यांना फ़ास्ट लेन मध्ये येऊन काय मजा येते कळत नाही.अग्दी टी.व्ही.एस चैम्प सारखी मंद चालणारी गाडी ही राईटमोस्ट लेन मध्ये चालवणारे महाभागही आहेत. त्यामुळेच कितीदा अपघात होतात. मोठ्या गाड्या अडकतात आणि टैफ़िक जाम होतो.
कहर म्हणजे कितीतरीदा लहान मुलांना घेऊन त्यांचे आईवडील ह्या फ़ास्ट लेन मधुन दुचाकी चालवताना दिसतात. अश्या वेळी अगदी गाडीतुन उतरुन त्यांना थांबवुन असे सांगावेसे वाटते की ही अख्खी डावी लेन तुमच्याच साठी आहे. उजवीकडे येऊन आपले आणि इतरांचे जीवन धोक्यात आणु नये.
गाणं संपता संपता एका सिग्नल शी गाडी थांबली, सिग्नल लागताच भली मोठी बस आम्हाला आडवी झाली..ती आपला पसारा घेऊन जाईपर्यंत पुन्हा लाल दिवा लागला..अजुन ८० सेकंद ताटकळत उभं रहावं लागलं. जर उजवीकडुन वळायचं असेल तर हे बस वाले आधीच का उजवीकडे होत नाहीत कोण जाणे?
एकदा असंच झालं, घरी परततांना सिग्नल वर एका बस ने टाटा इंडिका ला धडक दिली(उजवीकडे वळायची घाई!!). तिच्या समोर आम्ही उभे होतो त्यामुळे आम्हालाही जोरात धक्का बसला. गाडीचं मडगार्ड तुटलं. वरुन ते बस ड्रायव्हर कंडक्टर लगेच "आम्हाला ५००० पगार मिळतो त्यातुन तुम्ही जर तक्रार केली तर आमचे पैसे कापुन घेतील" वगैरे विनवणी करु लागले.
अरे! जर मिळणार्या पैशांची एवढी गरज आहे तर नीट जबाबदारीने गाडी का चालवित नाहीत ही लोकं? उगाच दुसर्याला भुर्दंड!!
एव्हाना वाहतुक जरा सुरळीत व्हायला लागली होती. सारखं वाटत होतं वेळच्या वेळी निघुन या मंडळींमुळे उशीर होतो. मी सकाळी लवकर उठले, लवकर आवरले, येता येता जर टैफ़िकमुळे उशीर झाला तर माझं काय चुकलं असं कुणाला सांगता ही येणार नव्हतं असं माझ्या मनात सगळं सुरु असतांना "माझे जीवन गाणे" लागलं...
व्यथा असो आनंद असु दे..
प्रकाश किंवा तिमीर असु दे..
वाट दिसे अथवा ना दिसुदे...
गात पुढे मी जाणे..
माझे जीवन गाणे...
बस्स!! एवढे ऐकुनच मन शांत झालं आणि पुन्हा सज्ज झाले मी "माझे जीवन गाणे" गायला ;) थोड्याशा मनस्तापानंतर...
गाडीत येता येता मी आज कधी नाही ते मस्तं नाट्यगीतं लावली होती...नवरोबांना भाषा जरी कळत नसली तरी माझ्या असल्या काड्यांना ते विरोध करत नाहीत (याचं एकमेव कारण म्हणजे मी रोज़ ऐकत असलेली तमिळ गाणी ;) )

जवळपास अर्धं अंतर पार केलं होतं . समुद्री वादळासारख्या प्रचंड ट्रैफ़िकला तोंड देत देत आमची नौका पुढे जात होती..कुमार गंधर्व "मम आत्मा गमला हा" म्हणत होते. अगदी भर वादळात विजांचा कडकडाट व्हावा तश्या त्यांच्या ताना मला भासत होत्या. बाहेर मस्तंपैकी ढगाळ वातावरण होतं.

मधुनच एक एंबुलेंस गेली. ह्या एंबुलेंस नेहमी जेव्हा ट्रैफिक मधुन जातात तेव्हा मला फ़ार टेंशन येत असतं.कोण जाणे त्यातील व्यक्तीला किती त्रास होत असेल आणि इथे एव्ढं ट्रैफिक. साधी त्या एंबुलेंस ला वाट मोकळी करुन देण्याइतकी शिष्टाई लोकांमध्ये नसते.अश्या वागण्याने कुणाचा जीव जाऊ शकतो हे लोकांना कसे कळत नाही ? ती एंबुलेंस इथे २ मिनिटे, तिथे ३ मिनिटे करत करत सिग्नल वरुन पुढे गेली आणि माझा जीव भांड्यात पडला.

एवढं सगळं होईपर्यंत गाण्याचा अंतरा सुरु झाला होता.मागे उभ्या असलेल्या लोकांनी पोंगा वाजवुन वाजवुन आपले अस्तित्व जाणवुन दिले होते. मी उगाचच गाणी लावली असं वाटुन गेलं.एकतर ट्रैफ़िक, त्यातुन अनोळखी भाषेतील गाणी, ते ही नाट्यसंगीत,बिचारा माझा नवरा..;)

तेव्ढ्यात कुणी पराक्रमी माणसाने आमच्या गाडीला आपल्या बाईकने ठोस मारली. आरश्याला जोरदार धक्का मारुन तो माफ़ी नं मागता पुढे जाता झाला ;)..हे तर नेहमीचंच..रस्त्यावर तीन वेगवेगळ्या लेन्स असतांना ह्या दुचाकी वाल्यांना फ़ास्ट लेन मध्ये येऊन काय मजा येते कळत नाही.अग्दी टी.व्ही.एस चैम्प सारखी मंद चालणारी गाडी ही राईटमोस्ट लेन मध्ये चालवणारे महाभाग आहेत. त्यामुळेच कितीदा अपघात होतात. मोठ्या गाड्या अडकतात आणि टैफ़िक जाम होतो.

कहर म्हणजे कितीतरीदा लहान मुलांना घेऊन त्यांचे आईवडील ह्या फ़ास्ट लेन मधुन दुचाकी चालवताना दिसतात. अश्या वेळी अगदी गाडीतुन उतरुन त्यांना थांबवुन असे सांगावेसे वाटते की ही अख्खी डावी लेन तुमच्याच साठी आहे. उजवीकडे येऊन आपले आणि इतरांचे जीवन धोक्यात आणु नये.

गाणं संपता संपता एका सिग्नलला गाडी थांबली, हिरवा दिवा लागताच भली मोठी बस आम्हाला आडवी झाली..ती आपला पसारा घेऊन जाईपर्यंत पुन्हा लाल दिवा लागला..अजुन ८० सेकंद ताटकळत उभं रहावं लागलं. जर उजवीकडुन वळायचं असेल तर हे बस वाले आधीच का उजवीकडे होत नाहीत कोण जाणे?

एकदा असंच झालं, घरी परततांना सिग्नल वर एका बस ने टाटा इंडिका ला धडक दिली(उजवीकडे वळायची घाई!!). तिच्या समोर आम्ही उभे होतो त्यामुळे आम्हालाही जोरात धक्का बसला. गाडीचं मडगार्ड तुटलं. वरुन ते बस ड्रायव्हर कंडक्टर लगेच "आम्हाला ५००० पगार मिळतो त्यातुन तुम्ही जर तक्रार केली तर आमचे पैसे कापुन घेतील" वगैरे विनवणी करु लागले. अरे! जर मिळणार्या पैशांची एवढी गरज आहे तर नीट जबाबदारीने गाडी का चालवित नाहीत ही लोकं? उगाच दुसर्याला भुर्दंड!!

एव्हाना वाहतुक जरा सुरळीत व्हायला लागली होती. सारखं वाटत होतं वेळच्या वेळी निघुन या मंडळींमुळे उशीर होतो. मी सकाळी लवकर उठले, लवकर आवरले, येता येता जर टैफ़िकमुळे उशीर झाला तर माझं काय चुकलं असं कुणाला सांगता ही येणार नव्हतं असं माझ्या मनात सगळं सुरु असतांना "माझे जीवन गाणे" लागलं...

व्यथा असो आनंद असु दे..

प्रकाश किंवा तिमीर असु दे..

वाट दिसे अथवा ना दिसुदे...

गात पुढे मी जाणे..

माझे जीवन गाणे...

बस्स!! एवढे ऐकुनच मन शांत झालं आणि पुन्हा सज्ज झाले मी "माझे जीवन गाणे" गायला ;) थोड्याशा मनस्तापानंतर...

Comments

Popular posts from this blog

दाक्षिणात्य संस्कृती - कोलम (रांगोळी)

दाक्षिणात्य संस्कृती - कोलम (रांगोळी) या पोस्ट मध्ये खाद्यसंस्कृती बद्दल नं सांगता रांगोळ्या आणि तामिळ नाडू यांच्या असलेल्या घट्ट नात्याबद्दल बोलूया. रांगोळी म्हणजे मला तरी एखाद्या स्त्री ची अभिव्यक्ती वाटते. रांगोळी काढणारा पुरुष जरी असेल तरी त्याच्या मनातल्या तरल भावना त्या रांगोळीत उतरतात. अर्थात नेहेमीच्या रोज काढल्या जाणाऱ्या रांगोळ्या म्हणजे गृहिणीची अभिव्यक्ती का हे मला नाही माहिती. पण अंगण झाडणे, सडा टाकणे, आणि रांगोळी काढणे  माझ्यासाठी एक थेरेपि आहे. आजकाल अपार्टमेंट आणि मोठाल्या इमारतींमुळे अंगण हा भागच नाहीसा झालाय घराचा, पण मागे आम्ही होतो त्या घरी मोठे अंगण होते. तामिळ नाडुत सगळ्या दारासमोर रांगोळी काढल्या जाते. अगदी अपार्टमेंट जरी असेल तरी अपार्टमेंट च्या मोठ्या दारासमोर रांगोळी काढली जातेच. इथल्या गल्ल्यांमध्ये समोरासमोरील घराच्या दारासमोर तर दोन्ही वेळेला रांगोळी काढल्या जाते. सकाळी ६. ०० ते ६.३० च्या दरम्यात सगळ्या स्त्रिया या कामात मग्न दिसतात. पहिले मला फार कुतूहल वाटे. एवढ्या सकाळी उठणे आणि पहिले काम म्हणजे रांगोळी. दिवस कसा  छान सुरु होत असेल असे वाटायचे. लग्न

दलपती - मणी रत्नम चा मास्टरपीस

तामिळ चित्रपटांमध्ये मी सगळ्यात पहिले पाहिलेला चित्रपट म्हणजे दलपती. तामिळ भाषा जरी क्लिष्ट वाटत असली तरी ती सर्वांगसुंदर भाषा आहे. आपण मराठी किंवा इतर भाषिक लोक नेहेमी दक्षिणेकडच्या ४ भाषांची सारख्या वाटतात म्हणून खिल्ली उडवत असतो पण ह्या चारही भाषा कन्नड, तमिळ, तेलगू आणि मल्याळम अतिशय समृद्ध आहेत. चारही भाषांची एक स्वतःची चित्रपट सृष्टी आहे हे महत्वाचे. बाहुबली हे एक उत्तम उदाहरण. बरेच हिंदी चित्रपट, मल्याळम आणि तामिळ चित्रपटांवरून प्रेरित असतात हे सांगणे नं लगे. तर असाच एक १९९०'स मध्ये तयार झालेला चित्रपट दलपती म्हणजे म्होरक्या किंवा प्रमुख किंवा सेनापती.  कर्ण आणि अर्जुन ह्या धर्तीवर आधारित असलेला हा चित्रपट त्याकाळी खूप गाजला होता. मामुटी, रजनीकांत आणि अरविंद स्वामी, शोभना आणि सगळे उत्तम कलाकार. इलैराजा यांचे संगीत आणि संतोष सिवन यांची सिनेमॅटोग्राफी. असे म्हणतात की मणी रत्नम चे सगळे चित्रपट सकाळी चित्रांकित करतात. त्यावेळी अतिशय सुंदर प्रकाश असतो आणि त्याचा पुरेपूर उपयोग ते प्रत्येक शॉट मध्ये करून घेतात. ह्या चित्रपटात ते प्रकर्षाने जाणवते.  मणी रत्नम चे सगळे

दाक्षिणात्य खाद्यसंस्कृती -दोसा

दोसा हा पदार्थ नं आवडणारा माणूस विरळा. माझी आणि दोस्याची ओळख आमच्या शाळेच्या आनंदमेळ्यात झाली होती. एक डोस्याचा स्टॉल होता तिथे, माझ्या बेस्ट फ्रेंड च्या काकी चा. मी नं खाताच गर्दी पाहून मला लक्षात आलं होतं तेव्हा कि काहीतरी स्पेशल आहे दोस्यात. हळूहळू जसे मोठे होत गेलो तसे आई बाबा बाहेर जेवायला घेऊन जायचे, मग खायचे काय तर डोसा, जगत नावाचे नागपूरला खूप प्रसिद्ध हॉटेल होते, अर्थात आता मॉल आणि मोठमोठ्या बिल्डींग्स असलेले नागपूर नव्हते तेव्हा उणीपुरी २ ते ३ फॅमिली रेस्टॉरंट्स. त्यात आर्य भवन एक आणि एक जगत. आई म्हणायची जी वस्तू आपण घरी जास्त करत नाही ती बाहेर खावी. म्हणून मोठ्ठा क्रिस्पि दोसा त्यात बटाट्याची भाजी, सोबत चटण्या. एकदम पोटभर व्हायचा तो मसाला डोसा. मी ९ वी, १० वी त असतांना आई घरीच डोसे करायची. पुढे कॉलेज मध्ये घेल्यावर वगैरे बाहेर खातांना डोसा हा पदार्थ बऱ्याचदा खाल्ल्या जायचा.  आता गेल्या १० वर्षांपासून चेन्नई मध्ये स्थायिक असल्याने, दोसा हा दाक्षिणात्य संस्कृतीचा किती अविभाज्य घटक आहे हे कळून आले. माझ्या घरी डोश्याचे पीठ नाही असा एकही दिवस जात नाही. जसे मराठी घरांत कणिक