Skip to main content

तुझे आहे तुजपाशी...

येतो असा एखादा क्षण जेव्हा तुम्ही स्वतःला खूप भाग्यवान समजता, असं बर्याच वेळा होतं माझ्याबाबतीत.
सकाळ पासून मूड जरा खराबच असतो, सकाळचा पहीला चहाही नीट केल्या जात नाही, देवालाही कसाबसाच नमस्कार होतो. ऒफ़िसला जायला पावलं घरातून बाहेर पडता पडत नाहीत. रस्त्याला लागल्यावरही आजुबाजुला फ़कत बघ्यासारखं बघणं सुरु असतं अगदी तटस्थपणे. काम खुप असलं तरी करायची तसुभरही इच्छा होत नाही. मग येतो एखादा ओळखीचा फोन आणि होतात गप्पा.
"माझा आज मूड ठिक नाहीए गं." नेहमीच्या स्वरात मी सुरु होते.
"का? काय झालं मूड ठीक नसायला?" तिकडचा आवाज म्हणतो..
मी सांगते मग माझी सगळी व्यथा अगदी अथ पासून इती पर्यंत. आज बाई आली नाही पासुन, एवढ्या दूर येण्याजाण्याचा आता मला आता कंटाळा आलाय इथपर्यंत.
आतापर्यंत शांत आणि आपलासा वाटणारा आवाज आता जरा बदलायला लागतो.
"तुला नं सवय झाली आहे, सगळं चांगलं असतांना चिंतेत रहायची..आजी, आई या सगळयांना लग्नं झाल्यावर किती कामं करायला लागायची माहिती आहे नं तुला?" इथपासुन तिकडचा आवाज मला गृहिणींना रोजच किती खपावं लागतं वगैरे सांगतो...
मी आपली मान डोलावते.
"त्यामानाने तुला तर काहीच त्रास नाही." आणि माझ्या डोक्यात लख्ख प्रकाश पडतॊ..अरे हो! खरंच आहे की. मी तर खुप मजेत आहे त्यामानाने.
मग लगेचच तिकडचा आवाज मुंबईच्या लोकल प्रवाश्यांचं उदाहरण देतो..आणि मला खरंच पटतं की मी उगाचच अंतराचा बाऊ करतेय..एकदा जवळ शिफ़्ट झालं तर हे अंतरही मिस करायला होईल कदाचित..
कसं असतं नं ?
तुमच्या जवळ असलेल्या भाग्याची सतत कुणीतरी जाणीव करुन द्यायला लागते नाहीतर आपण असेच भरकटत राहतो...वाईट वाटुन घेत राहतो उगाचंच...
येतो असा एखादा क्षण जेव्हा तुम्ही स्वतःला खूप भाग्यवान समजता, असं बर्याच वेळा होतं माझ्याबाबतीत.

सकाळ पासून मूड जरा खराबच असतो, सकाळचा पहीला चहाही नीट केल्या जात नाही, देवालाही कसाबसाच नमस्कार होतो. ऒफ़िसला जायला पावलं घरातून बाहेर पडता पडत नाहीत. रस्त्याला लागल्यावरही आजुबाजुला फ़कत बघ्यासारखं बघणं सुरु असतं अगदी तटस्थपणे. काम खुप असलं तरी करायची तसुभरही इच्छा होत नाही. मग येतो एखादा ओळखीचा फोन आणि होतात गप्पा.

"माझा आज मूड ठिक नाहीए गं." नेहमीच्या स्वरात मी सुरु होते..

"का? काय झालं मूड ठीक नसायला?" तिकडचा आवाज म्हणतो..

मी सांगते मग माझी सगळी व्यथा अगदी अथ पासून इती पर्यंत. आज बाई आली नाही पासुन, एवढ्या दूर येण्याजाण्याचा आता मला आता कंटाळा आलाय इथपर्यंत.

आतापर्यंत शांत आणि आपलासा वाटणारा आवाज आता जरा बदलायला लागतो.

"तुला नं सवय झाली आहे, सगळं चांगलं असतांना चिंतेत रहायची..आजी, आई या सगळयांना लग्नं झाल्यावर किती कामं करायला लागायची माहिती आहे नं तुला?" इथपासुन तिकडचा आवाज गृहिणींना रोजच किती खपावं लागतं वगैरे सांगतो...मी आपली मान डोलावते.

"त्यामानाने तुला तर काहीच त्रास नाही." आणि माझ्या डोक्यात लख्ख प्रकाश पडतॊ..अरे हो! खरंच आहे की. मी तर खुप मजेत आहे त्यामानाने.

मग लगेचच तिकडचा आवाज मुंबईच्या लोकल प्रवाश्यांचं उदाहरण देतो..आणि मला खरंच पटतं की मी उगाचच अंतराचा बाऊ करतेय..एकदा जवळ शिफ़्ट झालं तर हे अंतरही मिस करायला होईल कदाचित..

कसं असतं नं ?

तुमच्या जवळ असलेल्या भाग्याची सतत कुणीतरी जाणीव करुन द्यायला लागते नाहीतर आपण असेच भरकटत राहतो...वाईट वाटुन घेत राहतो उगाचंच...

Comments

Popular posts from this blog

दलपती - मणी रत्नम चा मास्टरपीस

तामिळ चित्रपटांमध्ये मी सगळ्यात पहिले पाहिलेला चित्रपट म्हणजे दलपती. तामिळ भाषा जरी क्लिष्ट वाटत असली तरी ती सर्वांगसुंदर भाषा आहे. आपण मराठी किंवा इतर भाषिक लोक नेहेमी दक्षिणेकडच्या ४ भाषांची सारख्या वाटतात म्हणून खिल्ली उडवत असतो पण ह्या चारही भाषा कन्नड, तमिळ, तेलगू आणि मल्याळम अतिशय समृद्ध आहेत. चारही भाषांची एक स्वतःची चित्रपट सृष्टी आहे हे महत्वाचे. बाहुबली हे एक उत्तम उदाहरण. बरेच हिंदी चित्रपट, मल्याळम आणि तामिळ चित्रपटांवरून प्रेरित असतात हे सांगणे नं लगे. तर असाच एक १९९०'स मध्ये तयार झालेला चित्रपट दलपती म्हणजे म्होरक्या किंवा प्रमुख किंवा सेनापती.  कर्ण आणि अर्जुन ह्या धर्तीवर आधारित असलेला हा चित्रपट त्याकाळी खूप गाजला होता. मामुटी, रजनीकांत आणि अरविंद स्वामी, शोभना आणि सगळे उत्तम कलाकार. इलैराजा यांचे संगीत आणि संतोष सिवन यांची सिनेमॅटोग्राफी. असे म्हणतात की मणी रत्नम चे सगळे चित्रपट सकाळी चित्रांकित करतात. त्यावेळी अतिशय सुंदर प्रकाश असतो आणि त्याचा पुरेपूर उपयोग ते प्रत्येक शॉट मध्ये करून घेतात. ह्या चित्रपटात ते प्रकर्षाने जाणवते.  मणी रत्नम चे ...

ती आणि तो

आजुबाजुच्या घडामोडींकडे त्रयस्थपणे बघता बघता काही गोष्टी मात्र मनात राहुन जातात. अश्याच काही लोकांबद्दल ..त्यांच्यावर आलेल्या प्रसंगाबद्दल केलेल्या नोंदी... ती आणि तो "ती" एक २७ वर्षांची निखळ निरागस मुलगी. दुसर्यांना मदत करण्याची तिची प्रवृत्ती मला फ़ार आवडत असे. घरची अतिशय लाडकी. गेल्या ७ वर्षांपासुन तिचं त्याच्या वर प्रेम होतं. मुलगा ही छान, मुंबई सारख्या शहरात व्यवस्थित स्थायिक झालेला. काहीही कमी नव्ह्तं.. प्रेमाच्या आणा भाका घेऊन झाल्या. सगळीकडे हिंडुन फिरुन झालं..सगळ्यांना कल्पना होतीच त्यांच्या प्रेमाची. फ़क्तं एकच गोष्ट होती खटकण्यासारखी..ती म्हणजे दोघेही एका जातीचे नव्ह्ते. दोघांच्या घरुन ह्या गोष्टीवर प्रचंड विरोध होईल हे सर्वश्रुत होते. हळुहळु तिला मोठीमोठी स्थळं येऊ लागली. दोघा तिघांनी तर मागणीच घातली होती.आई बाबाही तिला लग्नाचा आग्रह करु लागले होते. आणि ती त्याला लग्न करण्यास आग्रह करु लागली. तिने हे सगळे घरी सांगितल्यावर तिला खुप बोलणी खावी लागली होती. त्याच्या प्रेमाखातर हे ही सहन करु असे तिला वाटायचे. तिला वाटायचे आपल्यासारखेच त्यानेही घरी सांगावे आणि त्या दोघा...

इरुवर - तमिळ चित्रपटांचा मेरुमणी

तमिळ सिनेमा हा विषय मी ब्लॉगवर कधीच लिहिलेला नाही. आता १० वर्षे झालीत मद्रास मध्ये आणि बऱ्यापैकी तमिळ पण बोलता येतं, कळतं, म्हणून ठरवले की नेहेमी भाषांतर केलेल्या या नव्या जुन्या चित्रपटाबद्दल लिहावे. तामिळ ही खूप गोड़ आणि ओघवती भाषा आहे, अर्थात कुठल्याही भाषेसारखीच. पण या भाषेचा जन्म प्राकृत भाषेमुळे झाला. लिपी अतिशय सोपी असली तरी शब्द आणि त्याचे उच्चारण कठीण आहे. थोडे अजूनही कळत नाहीच ;) काही दिवसांपूर्वीच "इरुवर" चित्रपट पाहिला. इरुवर - म्हणजे दोघे - ऐश्वर्या चा पहिला चित्रपट म्हणून फेमस आहेच पण जयललिता, करुणानिधी आणि एमजीआर या तीन पूर्व मुख्यमंत्र्यांच्या आयुष्यावर बेतलेला हा चित्रपट. मणी रत्नम चं दिग्दर्शन, ए आर रहमान चं संगीत. अजून काय हवे? मल्याळी अभिनेता मोहनलाल ( एमजीआर), ऐश्वर्या राय ( एमजीआर ची पूर्व पत्नी आणि जयललिता ) च्या भूमिकेत, प्रकाश राज ( करुणानिधी ) च्या भूमिकेत, रेवती आणि तब्बू या करुणानिधींच्या पत्नी. १९५० मधले सेट्स आणि त्याच काळचा प्लॉट. संतोष सिवन ची सिनेमॅटोग्राफी अप्रतिम आहे. तेव्हा संतोष सिवन अतिशय नवखे असतील पण तरीही खूपच सुंदर चित...