Skip to main content

दलपती - मणी रत्नम चा मास्टरपीस




तामिळ चित्रपटांमध्ये मी सगळ्यात पहिले पाहिलेला चित्रपट म्हणजे दलपती. तामिळ भाषा जरी क्लिष्ट वाटत असली तरी ती सर्वांगसुंदर भाषा आहे. आपण मराठी किंवा इतर भाषिक लोक नेहेमी दक्षिणेकडच्या ४ भाषांची सारख्या वाटतात म्हणून खिल्ली उडवत असतो पण ह्या चारही भाषा कन्नड, तमिळ, तेलगू आणि मल्याळम अतिशय समृद्ध आहेत. चारही भाषांची एक स्वतःची चित्रपट सृष्टी आहे हे महत्वाचे. बाहुबली हे एक उत्तम उदाहरण. बरेच हिंदी चित्रपट, मल्याळम आणि तामिळ चित्रपटांवरून प्रेरित असतात हे सांगणे नं लगे.
तर असाच एक १९९०'स मध्ये तयार झालेला चित्रपट दलपती म्हणजे म्होरक्या किंवा प्रमुख किंवा सेनापती. 

कर्ण आणि अर्जुन ह्या धर्तीवर आधारित असलेला हा चित्रपट त्याकाळी खूप गाजला होता. मामुटी, रजनीकांत आणि अरविंद स्वामी, शोभना आणि सगळे उत्तम कलाकार. इलैराजा यांचे संगीत आणि संतोष सिवन यांची सिनेमॅटोग्राफी. असे म्हणतात की मणी रत्नम चे सगळे चित्रपट सकाळी चित्रांकित करतात. त्यावेळी अतिशय सुंदर प्रकाश असतो आणि त्याचा पुरेपूर उपयोग ते प्रत्येक शॉट मध्ये करून घेतात. ह्या चित्रपटात ते प्रकर्षाने जाणवते. 

मणी रत्नम चे सगळे चित्रपट मला आवडतात कारण म्हणजे प्रत्येक चित्रपटाला एक वेगळी उबदार छटा असते. अगदी आपल्या समोर घडत असलेली गोष्ट आहे असेही बरेचदा वाटून जाते. त्याचं मुख्य कारण म्हणजे सिनेमॅटोग्राफी, चित्रीकरण कसे केले आहे यावर चित्रपटाचा फील अवलंबून असतो. बरेचदा कथानक छान असूनही चित्रीकरणात दम नसल्याने चित्रपट तेवढा परिणामकारक वाटत नाही. मणी रत्नम चे सगळे चित्रपट कुठेतरी एक खोल परिणाम करून जातात. 

दलपती ही अश्याच एका तान्ह्या बाळाची गोष्ट ज्याची आई त्याला पिवळ्या फडक्यात गुंडाळून मालगाडीच्या एका डब्यात टाकून देते. त्याचं नाव पुढे सूर्या आणि तो एका छोट्या गावात एक डॉन म्हणून देवराज नावाच्या मोठ्या डॉन च्या हाताखाली काम करत असतो. 

पुढची कहाणी बघण्यासारखी आहे कुंती, अर्जुन आणि कर्ण म्हणजे सूर्या  तिढा दाखवला आहे. कुंतीची घालमेल तिच्या दोन्ही मुलांकरता असलेलं सारखंच प्रेम आणि तिला लहानपणापासून वाटत असणारी गिल्ट आणि तो भेटल्यावर व्यक्त नं करता येणारं प्रेम हे दाखवणं मोठं कठीण काम, पण मणी रत्नम नी एकदम लीलया उभारले आहेत सगळे सीन्स. 

तमिळ चित्रपटसृष्टी तांत्रिक दृष्टींनी अतिशय पुढारलेली होती आणि आहे. १९९१ मध्ये इतकं छान चित्रीकरण करणे, आणि लोकांनी त्याला स्वीकारणे ह्यातच सगळे काही आले. हिंदी डब केलेला दलपती चालला नाही :(

संगीत आणि इलाईराजा:

सिंफनी चा उपयोग इलैराजा यांच्या संगीतात खूप आधीपासून केल्या गेलेला आहे. मला सुरुवातीपासून त्यांचे गाणे खूप कर्णकर्कश वाटायचे. पण हळूहळू त्यांची बरीच गाणी आवडायला लागली. सिम्फनी चा इतका उत्तम उपयोग मी अजूनपर्यंत कुठे पाहिला नाही ते पण प्रादेशिक भाषेच्या चित्रपटामध्ये. 

एस पी बालसुब्रमनियम, जानकी, स्वर्णलता  यांनी म्हंटलेली गाणी दलपती ला एकदम वरच्या स्तरावर नेऊन पोचवतात. 

माझ्या आवडत्या गाण्यामध्ये 

१. राकम्मा कैय्य तट्ट 
२. सुंदरी 
३. यमुना आटरिले ईर काटरिले 

खूपच श्रवणीय गाणी आहेत ही.


 राकम्मा कैय्य तट्ट


अप्रतिम चित्रीकरण, समाजातल्या दोन अतिशय भिन्न गटांमध्ये असलेला विरोधाभास रजनी आणि शोभना यांच्या अभिनयात अगदी दिसून येतो. एका अगदी झोपडपट्टीत राहणारा सूर्या, गावात असलेल्या एका छोट्या प्रोग्रॅम मध्ये कोणत्याश्या पोरीसोबत रात्रभर नाचताना गातांना, तिथेच पहाट झाल्या झाल्या एका उच्चभ्रू घरातील भरतनाट्यम आणि संगीतात प्रवीण असणारी शोभना येतांना रजनी चे हाव भाव सगळं सांगून जातात.
हे गाणं बी बी सी च्या २००२ च्या सर्वे मध्ये सगळ्यात लोकप्रिय गाणं म्हणून नामांकित झालं आहे

मला या बँड चं  व्हर्जन पण आवडतं

https://www.youtube.com/watch?v=-ytwTa44pbY


नेहेमीच खूप काही शिकण्यासारखं आणि आत्मसात करण्यासारखं आहे ह्या चित्रपटात पण. आपली तयारी हवी. चित्रपटासारख्या ताकदीच्या माध्यमातून खूप आधीपासूनच इकडे खूप वेगळ्या विषयांवर चित्रपट आले आहेत. पुढच्या भागात कमल हसन, रजनी च्या अवल अपडीदान ह्या चित्रपटावर लिहेन. 













Comments

Popular posts from this blog

इरुवर - तमिळ चित्रपटांचा मेरुमणी

तमिळ सिनेमा हा विषय मी ब्लॉगवर कधीच लिहिलेला नाही. आता १० वर्षे झालीत मद्रास मध्ये आणि बऱ्यापैकी तमिळ पण बोलता येतं, कळतं, म्हणून ठरवले की नेहेमी भाषांतर केलेल्या या नव्या जुन्या चित्रपटाबद्दल लिहावे. तामिळ ही खूप गोड़ आणि ओघवती भाषा आहे, अर्थात कुठल्याही भाषेसारखीच. पण या भाषेचा जन्म प्राकृत भाषेमुळे झाला. लिपी अतिशय सोपी असली तरी शब्द आणि त्याचे उच्चारण कठीण आहे. थोडे अजूनही कळत नाहीच ;) काही दिवसांपूर्वीच "इरुवर" चित्रपट पाहिला. इरुवर - म्हणजे दोघे - ऐश्वर्या चा पहिला चित्रपट म्हणून फेमस आहेच पण जयललिता, करुणानिधी आणि एमजीआर या तीन पूर्व मुख्यमंत्र्यांच्या आयुष्यावर बेतलेला हा चित्रपट. मणी रत्नम चं दिग्दर्शन, ए आर रहमान चं संगीत. अजून काय हवे? मल्याळी अभिनेता मोहनलाल ( एमजीआर), ऐश्वर्या राय ( एमजीआर ची पूर्व पत्नी आणि जयललिता ) च्या भूमिकेत, प्रकाश राज ( करुणानिधी ) च्या भूमिकेत, रेवती आणि तब्बू या करुणानिधींच्या पत्नी. १९५० मधले सेट्स आणि त्याच काळचा प्लॉट. संतोष सिवन ची सिनेमॅटोग्राफी अप्रतिम आहे. तेव्हा संतोष सिवन अतिशय नवखे असतील पण तरीही खूपच सुंदर चित...

ती आणि तो

आजुबाजुच्या घडामोडींकडे त्रयस्थपणे बघता बघता काही गोष्टी मात्र मनात राहुन जातात. अश्याच काही लोकांबद्दल ..त्यांच्यावर आलेल्या प्रसंगाबद्दल केलेल्या नोंदी... ती आणि तो "ती" एक २७ वर्षांची निखळ निरागस मुलगी. दुसर्यांना मदत करण्याची तिची प्रवृत्ती मला फ़ार आवडत असे. घरची अतिशय लाडकी. गेल्या ७ वर्षांपासुन तिचं त्याच्या वर प्रेम होतं. मुलगा ही छान, मुंबई सारख्या शहरात व्यवस्थित स्थायिक झालेला. काहीही कमी नव्ह्तं.. प्रेमाच्या आणा भाका घेऊन झाल्या. सगळीकडे हिंडुन फिरुन झालं..सगळ्यांना कल्पना होतीच त्यांच्या प्रेमाची. फ़क्तं एकच गोष्ट होती खटकण्यासारखी..ती म्हणजे दोघेही एका जातीचे नव्ह्ते. दोघांच्या घरुन ह्या गोष्टीवर प्रचंड विरोध होईल हे सर्वश्रुत होते. हळुहळु तिला मोठीमोठी स्थळं येऊ लागली. दोघा तिघांनी तर मागणीच घातली होती.आई बाबाही तिला लग्नाचा आग्रह करु लागले होते. आणि ती त्याला लग्न करण्यास आग्रह करु लागली. तिने हे सगळे घरी सांगितल्यावर तिला खुप बोलणी खावी लागली होती. त्याच्या प्रेमाखातर हे ही सहन करु असे तिला वाटायचे. तिला वाटायचे आपल्यासारखेच त्यानेही घरी सांगावे आणि त्या दोघा...