Skip to main content

इरुवर - तमिळ चित्रपटांचा मेरुमणी



तमिळ सिनेमा हा विषय मी ब्लॉगवर कधीच लिहिलेला नाही. आता १० वर्षे झालीत मद्रास मध्ये आणि बऱ्यापैकी तमिळ पण बोलता येतं, कळतं, म्हणून ठरवले की नेहेमी भाषांतर केलेल्या या नव्या जुन्या चित्रपटाबद्दल लिहावे.

तामिळ ही खूप गोड़ आणि ओघवती भाषा आहे, अर्थात कुठल्याही भाषेसारखीच. पण या भाषेचा जन्म प्राकृत भाषेमुळे झाला. लिपी अतिशय सोपी असली तरी शब्द आणि त्याचे उच्चारण कठीण आहे. थोडे अजूनही कळत नाहीच ;)

काही दिवसांपूर्वीच "इरुवर" चित्रपट पाहिला. इरुवर - म्हणजे दोघे - ऐश्वर्या चा पहिला चित्रपट म्हणून फेमस आहेच पण जयललिता, करुणानिधी आणि एमजीआर या तीन पूर्व मुख्यमंत्र्यांच्या आयुष्यावर बेतलेला हा चित्रपट. मणी रत्नम चं दिग्दर्शन, ए आर रहमान चं संगीत. अजून काय हवे?

मल्याळी अभिनेता मोहनलाल ( एमजीआर), ऐश्वर्या राय ( एमजीआर ची पूर्व पत्नी आणि जयललिता ) च्या भूमिकेत, प्रकाश राज ( करुणानिधी ) च्या भूमिकेत, रेवती आणि तब्बू या करुणानिधींच्या पत्नी. १९५० मधले सेट्स आणि त्याच काळचा प्लॉट.

संतोष सिवन ची सिनेमॅटोग्राफी अप्रतिम आहे. तेव्हा संतोष सिवन अतिशय नवखे असतील पण तरीही खूपच सुंदर चित्रीकरण केले आहे. अगदी वास्तवासारखे.

प्रकाश राज म्हणजे तामिळसेल्वन आणि मोहनलाल म्हणजे आनंदन, त्यांची मैत्री, तामिळसेल्वन ची ओघवती भाषा, कविता आणि जनतेला उद्देशून केलेली भाषणे हे केवळ अनुभवण्यासारखे आहे. एखादा व्यक्ती त्याच्या पात्राशी किती समरस होऊ शकतो याचे उत्तम उदाहरण म्हणजे प्रकाश राज. त्यांनी मोठ्या ताकदीने तामिळ सेल्वन उभा केला आहे. आनंदन म्हणजे एमजीआर, वास्तविकतेत खूप मोठे व्यक्तिमत्व पण मोहनलाल नी खूप छान भूमिका केली आहे. आपला जीवश्च कंठश्च मित्र आपल्या आधी देवाघरी गेल्याचे दुःख, जनतेसमोर नं आणता मनात ठेवून पुढची वाटचाल करणे हे खरंतर किती कठीण आहे, पण तामिळ सेल्वन कसे सगळे सांभाळून घेतो आणि हळूहळू गेलेल्या नेत्याची जागा घेतो हे ही छान दाखवले आहे.

मोठे होण्याकरता तेवढा त्यागही जरुरी आहे, दोन्ही नेत्यांच्या आयुष्यात आलेली वादळे, आणि ती त्यांनी केवढ्या ताकदीने पार केली हे बघतांना अंगावर शहारे येतात. नेतृत्व, भाषेवरचे प्रभुत्व, जनतेवर असलेले प्रेम, आपण करत असलेल्या कामावर श्रध्दा अश्या अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या.

ऐश्वर्याचा हा पहिला चित्रपट, थोडी नवखी वाटतेही ती पण तिचा वावर हवा हवासा वाटतो हे मात्र खरे. रेवती आणि तब्बू यांनी अप्रतिम अभिनय केलाय. मला रेवती खूप आवडली, तिच्या भूमिकेला खूप फुटेज नाही मिळाले पण तरीही मस्त अभिनय केलाय, नवर्याच्या लार्जर दॅन लाईफ प्रतिमेला सांभाळून सगळे घर ताकदीने उभे करणारी रेवती मनाला भावून जाते. तेच आपल्या प्रिय व्यक्तीच्या खांद्याला खांदा लावून, तेवढ्याच ताकदीने त्याच्यासोबत लढणाऱ्या तब्बूची पण कमाल वाटते. आजच्या फेमिनिसम च्या काळात ह्या बायकांनी एकाच व्यक्तीसोबत कसा संसार केला ते ही एकदम आयडियल असा..हे कोडेच आहे.

गौतमी आनंदन ची बायको असते आणि ऐश्वर्या पहिली बायको. सगळी नाती अतिशय कॉम्पलेक्स अशी पण तरीही प्रत्येकाच्या भूमिकेला दाद द्यावी वाटते.

नरमुगये हे गाणं ए आर रहमान चं मास्टरपीस आहे. माझं आवडतं गाणं..

उन्नोड नान इरुंध ओव्वोरु मणिथुलियूम
मरणंपडकईलियूम मरकाध कणमणीये   ( हे ऐकायलाच हवे )

आपल्या  प्रेयसी करता याएवढी उत्कट कविता मी आजवर ऐकली नाही.

नुकत्याच एका कार्यक्रमात अरविंद स्वामी  (रोजा चित्रपटाचा हिरो ) नी म्हंटलेल्या ह्या चार ओळी मनात घर करून आहेत. इथे लिंक देतेय :)

https://youtu.be/v7l5Pr4ufPY

मला चित्रपट खूप लवकर संपल्यासारखा वाटला. It kept me longing for something more. बहुदा यातच चित्रपटाचे यश आहे.

कुठे बघता येईल? - ऍमेझॉन प्राईम वर :) सबटायटल्स सकट






Comments

Popular posts from this blog

दाक्षिणात्य संस्कृती - कोलम (रांगोळी)

दाक्षिणात्य संस्कृती - कोलम (रांगोळी) या पोस्ट मध्ये खाद्यसंस्कृती बद्दल नं सांगता रांगोळ्या आणि तामिळ नाडू यांच्या असलेल्या घट्ट नात्याबद्दल बोलूया. रांगोळी म्हणजे मला तरी एखाद्या स्त्री ची अभिव्यक्ती वाटते. रांगोळी काढणारा पुरुष जरी असेल तरी त्याच्या मनातल्या तरल भावना त्या रांगोळीत उतरतात. अर्थात नेहेमीच्या रोज काढल्या जाणाऱ्या रांगोळ्या म्हणजे गृहिणीची अभिव्यक्ती का हे मला नाही माहिती. पण अंगण झाडणे, सडा टाकणे, आणि रांगोळी काढणे  माझ्यासाठी एक थेरेपि आहे. आजकाल अपार्टमेंट आणि मोठाल्या इमारतींमुळे अंगण हा भागच नाहीसा झालाय घराचा, पण मागे आम्ही होतो त्या घरी मोठे अंगण होते. तामिळ नाडुत सगळ्या दारासमोर रांगोळी काढल्या जाते. अगदी अपार्टमेंट जरी असेल तरी अपार्टमेंट च्या मोठ्या दारासमोर रांगोळी काढली जातेच. इथल्या गल्ल्यांमध्ये समोरासमोरील घराच्या दारासमोर तर दोन्ही वेळेला रांगोळी काढल्या जाते. सकाळी ६. ०० ते ६.३० च्या दरम्यात सगळ्या स्त्रिया या कामात मग्न दिसतात. पहिले मला फार कुतूहल वाटे. एवढ्या सकाळी उठणे आणि पहिले काम म्हणजे रांगोळी. दिवस कसा  छान सुरु होत असेल असे वाटायचे. लग्न

दलपती - मणी रत्नम चा मास्टरपीस

तामिळ चित्रपटांमध्ये मी सगळ्यात पहिले पाहिलेला चित्रपट म्हणजे दलपती. तामिळ भाषा जरी क्लिष्ट वाटत असली तरी ती सर्वांगसुंदर भाषा आहे. आपण मराठी किंवा इतर भाषिक लोक नेहेमी दक्षिणेकडच्या ४ भाषांची सारख्या वाटतात म्हणून खिल्ली उडवत असतो पण ह्या चारही भाषा कन्नड, तमिळ, तेलगू आणि मल्याळम अतिशय समृद्ध आहेत. चारही भाषांची एक स्वतःची चित्रपट सृष्टी आहे हे महत्वाचे. बाहुबली हे एक उत्तम उदाहरण. बरेच हिंदी चित्रपट, मल्याळम आणि तामिळ चित्रपटांवरून प्रेरित असतात हे सांगणे नं लगे. तर असाच एक १९९०'स मध्ये तयार झालेला चित्रपट दलपती म्हणजे म्होरक्या किंवा प्रमुख किंवा सेनापती.  कर्ण आणि अर्जुन ह्या धर्तीवर आधारित असलेला हा चित्रपट त्याकाळी खूप गाजला होता. मामुटी, रजनीकांत आणि अरविंद स्वामी, शोभना आणि सगळे उत्तम कलाकार. इलैराजा यांचे संगीत आणि संतोष सिवन यांची सिनेमॅटोग्राफी. असे म्हणतात की मणी रत्नम चे सगळे चित्रपट सकाळी चित्रांकित करतात. त्यावेळी अतिशय सुंदर प्रकाश असतो आणि त्याचा पुरेपूर उपयोग ते प्रत्येक शॉट मध्ये करून घेतात. ह्या चित्रपटात ते प्रकर्षाने जाणवते.  मणी रत्नम चे सगळे

दाक्षिणात्य खाद्यसंस्कृती -दोसा

दोसा हा पदार्थ नं आवडणारा माणूस विरळा. माझी आणि दोस्याची ओळख आमच्या शाळेच्या आनंदमेळ्यात झाली होती. एक डोस्याचा स्टॉल होता तिथे, माझ्या बेस्ट फ्रेंड च्या काकी चा. मी नं खाताच गर्दी पाहून मला लक्षात आलं होतं तेव्हा कि काहीतरी स्पेशल आहे दोस्यात. हळूहळू जसे मोठे होत गेलो तसे आई बाबा बाहेर जेवायला घेऊन जायचे, मग खायचे काय तर डोसा, जगत नावाचे नागपूरला खूप प्रसिद्ध हॉटेल होते, अर्थात आता मॉल आणि मोठमोठ्या बिल्डींग्स असलेले नागपूर नव्हते तेव्हा उणीपुरी २ ते ३ फॅमिली रेस्टॉरंट्स. त्यात आर्य भवन एक आणि एक जगत. आई म्हणायची जी वस्तू आपण घरी जास्त करत नाही ती बाहेर खावी. म्हणून मोठ्ठा क्रिस्पि दोसा त्यात बटाट्याची भाजी, सोबत चटण्या. एकदम पोटभर व्हायचा तो मसाला डोसा. मी ९ वी, १० वी त असतांना आई घरीच डोसे करायची. पुढे कॉलेज मध्ये घेल्यावर वगैरे बाहेर खातांना डोसा हा पदार्थ बऱ्याचदा खाल्ल्या जायचा.  आता गेल्या १० वर्षांपासून चेन्नई मध्ये स्थायिक असल्याने, दोसा हा दाक्षिणात्य संस्कृतीचा किती अविभाज्य घटक आहे हे कळून आले. माझ्या घरी डोश्याचे पीठ नाही असा एकही दिवस जात नाही. जसे मराठी घरांत कणिक