Skip to main content

मंगळागौर...(भाग २)

माझ्या मंगळागौरी बद्दल नवर्याचा उत्साह बघुन मला नवलच वाटलं. त्याचं मला सगळीकडे घेऊन जाणं, पार्किंग वगैरे ची कुरबूर नं करता छोट्या छोट्या दुकानात खरेदी करु देणं..बापरे! माझ्यासाठी हे तर एक आश्चर्यच होतं. घरी जाता जाता अगदी अत्यावश्यक गोष्टींसाठी सुद्धा नं थांबणारे आम्ही मंगळागौरी च्या साहित्यासाठी ठायी ठायी थांबलो म्हणजे शिवशंकरानेच कृपा केली म्हणायची ;)

सोमवारी शिवामूठ होती. आमच्या ऒफ़िसच्या बाजुलाच शंकराचं भलंमोठं आणि प्रसिध्द मंदीर आहे तिथेच मी जायचं ठरवलं, संध्याकाळी ऒफ़िस झाल्यावर मंदीरात गेले. नेहमी सगळेच म्हणतात की कुठेही जातांना कुणालातरी सोबत घेऊन जात जा..

पण मला मात्र एकटंच फ़िरायला आवडतं..बोलतांना चुका झाल्याशिवाय मजा येत नाही. वाट चुकणे वगैरे सारखे प्रकार झाले नाहीत तर नोर्मल असल्यासारखे वाटत नाही. म्हणुनच मी कुणालाही बरोबर नं घेता मंदीरात गेले. आत गेल्यावर तिकीट खिडकीत बसलेल्या माणसाला सांगितले की मला तांदूळ वहायचे आहेत देवाला कसे वाहू? त्याला राईस म्हणजे काय कळेचना...प्रत्यक्ष दाखवल्यावर तो म्हणाला "अरसी?" ओ हो..सरळ जा आणि उजवीकडे वळ..मी तशी जायला लागले..

उजवीकडॆ वळल्यावर पुन्हा एका माणसाला विचारले की "अरसी कुठे वाहू देवाला?" (ह्या वेळी अरसी म्हणजे तांदुळ त्याला माहित असावे असं मी गृहीत धरलं)..एका मिनीटानंतर तो म्हणाला "ओह राईस?" इकडे वहा...मला मनातल्या मनात हसायला आले..;)

शिवामूठ झाल्यावर देवळाच्या बाहेर आले. आणि वेगवेगळ्या प्रकारचे भरपूर गजरे घेतले. बेलाचा पण हारच घेतला(तसाच मिळतो इथे)...

मग जवळच्याच दुकानात जाऊन सगळं पुजेचं साहित्य घेतलं. याबाबतीत मात्र मी दाक्षिणात्य लोकांची दाद देते..पुजेतल्या अथ पासुन इती पर्यंत त्या दुकानात उपलब्ध होतं. पुस्तकांच्या सेक्शन मधे "गुरुचरित्र" तेही चक्क मराठीत पाहुन तर मला सुखद धक्काच बसला..एव्हाना नवरोबा आले होते..त्यांनी मला झालेलं आश्चर्य पाहुन लगेचच "मग मिळतं इथं सगळं..तु आपली उगाचच हे नाही ते नाही करत असतेस”...मी सर्वखाणे चित. :)

आता प्रश्न होता चौरंगाचा..शोधता शोधता स्टूल सारखा मिळाला एक चौरंग...त्यावरच मी धन्य जाहले...सुकं खोबरं पण बरंच शोधलं आणि मिळालं एकदाचं!

घरी जाऊन सगळं व्यवस्थित लावायचं काम पण नवरोबांनीच केलं. तेवढंच मला बरं वाटलं..

सकाळी उठुन पुजा केली, धाकधुक वाटत होती पुरण करतांना पण मस्तं झालं.. छानपैकी फुलांची आरास केली..आणि देवाला मनापासुन नमस्कार केला....

माझी तशी एकटी करण्याची पहिलीच पुजा. हा सगळा अनुभवच खुप काही शिकवुन गेला...
मनाला अजुन बळकट करुन गेला..म्हणुनच कदाचित जुनी माणसं ही व्रतवैकल्ये करत असावीत..

मनाला अजुन बळकट करुन गेला..म्हणुनच कदाचित जुनी माणसं ही व्रतवैकल्ये करत असावीत..

Comments

Popular posts from this blog

दाक्षिणात्य संस्कृती - कोलम (रांगोळी)

दाक्षिणात्य संस्कृती - कोलम (रांगोळी) या पोस्ट मध्ये खाद्यसंस्कृती बद्दल नं सांगता रांगोळ्या आणि तामिळ नाडू यांच्या असलेल्या घट्ट नात्याबद्दल बोलूया. रांगोळी म्हणजे मला तरी एखाद्या स्त्री ची अभिव्यक्ती वाटते. रांगोळी काढणारा पुरुष जरी असेल तरी त्याच्या मनातल्या तरल भावना त्या रांगोळीत उतरतात. अर्थात नेहेमीच्या रोज काढल्या जाणाऱ्या रांगोळ्या म्हणजे गृहिणीची अभिव्यक्ती का हे मला नाही माहिती. पण अंगण झाडणे, सडा टाकणे, आणि रांगोळी काढणे  माझ्यासाठी एक थेरेपि आहे. आजकाल अपार्टमेंट आणि मोठाल्या इमारतींमुळे अंगण हा भागच नाहीसा झालाय घराचा, पण मागे आम्ही होतो त्या घरी मोठे अंगण होते. तामिळ नाडुत सगळ्या दारासमोर रांगोळी काढल्या जाते. अगदी अपार्टमेंट जरी असेल तरी अपार्टमेंट च्या मोठ्या दारासमोर रांगोळी काढली जातेच. इथल्या गल्ल्यांमध्ये समोरासमोरील घराच्या दारासमोर तर दोन्ही वेळेला रांगोळी काढल्या जाते. सकाळी ६. ०० ते ६.३० च्या दरम्यात सगळ्या स्त्रिया या कामात मग्न दिसतात. पहिले मला फार कुतूहल वाटे. एवढ्या सकाळी उठणे आणि पहिले काम म्हणजे रांगोळी. दिवस कसा  छान सुरु होत असेल असे वाटायचे. लग्न

दलपती - मणी रत्नम चा मास्टरपीस

तामिळ चित्रपटांमध्ये मी सगळ्यात पहिले पाहिलेला चित्रपट म्हणजे दलपती. तामिळ भाषा जरी क्लिष्ट वाटत असली तरी ती सर्वांगसुंदर भाषा आहे. आपण मराठी किंवा इतर भाषिक लोक नेहेमी दक्षिणेकडच्या ४ भाषांची सारख्या वाटतात म्हणून खिल्ली उडवत असतो पण ह्या चारही भाषा कन्नड, तमिळ, तेलगू आणि मल्याळम अतिशय समृद्ध आहेत. चारही भाषांची एक स्वतःची चित्रपट सृष्टी आहे हे महत्वाचे. बाहुबली हे एक उत्तम उदाहरण. बरेच हिंदी चित्रपट, मल्याळम आणि तामिळ चित्रपटांवरून प्रेरित असतात हे सांगणे नं लगे. तर असाच एक १९९०'स मध्ये तयार झालेला चित्रपट दलपती म्हणजे म्होरक्या किंवा प्रमुख किंवा सेनापती.  कर्ण आणि अर्जुन ह्या धर्तीवर आधारित असलेला हा चित्रपट त्याकाळी खूप गाजला होता. मामुटी, रजनीकांत आणि अरविंद स्वामी, शोभना आणि सगळे उत्तम कलाकार. इलैराजा यांचे संगीत आणि संतोष सिवन यांची सिनेमॅटोग्राफी. असे म्हणतात की मणी रत्नम चे सगळे चित्रपट सकाळी चित्रांकित करतात. त्यावेळी अतिशय सुंदर प्रकाश असतो आणि त्याचा पुरेपूर उपयोग ते प्रत्येक शॉट मध्ये करून घेतात. ह्या चित्रपटात ते प्रकर्षाने जाणवते.  मणी रत्नम चे सगळे

दाक्षिणात्य खाद्यसंस्कृती -दोसा

दोसा हा पदार्थ नं आवडणारा माणूस विरळा. माझी आणि दोस्याची ओळख आमच्या शाळेच्या आनंदमेळ्यात झाली होती. एक डोस्याचा स्टॉल होता तिथे, माझ्या बेस्ट फ्रेंड च्या काकी चा. मी नं खाताच गर्दी पाहून मला लक्षात आलं होतं तेव्हा कि काहीतरी स्पेशल आहे दोस्यात. हळूहळू जसे मोठे होत गेलो तसे आई बाबा बाहेर जेवायला घेऊन जायचे, मग खायचे काय तर डोसा, जगत नावाचे नागपूरला खूप प्रसिद्ध हॉटेल होते, अर्थात आता मॉल आणि मोठमोठ्या बिल्डींग्स असलेले नागपूर नव्हते तेव्हा उणीपुरी २ ते ३ फॅमिली रेस्टॉरंट्स. त्यात आर्य भवन एक आणि एक जगत. आई म्हणायची जी वस्तू आपण घरी जास्त करत नाही ती बाहेर खावी. म्हणून मोठ्ठा क्रिस्पि दोसा त्यात बटाट्याची भाजी, सोबत चटण्या. एकदम पोटभर व्हायचा तो मसाला डोसा. मी ९ वी, १० वी त असतांना आई घरीच डोसे करायची. पुढे कॉलेज मध्ये घेल्यावर वगैरे बाहेर खातांना डोसा हा पदार्थ बऱ्याचदा खाल्ल्या जायचा.  आता गेल्या १० वर्षांपासून चेन्नई मध्ये स्थायिक असल्याने, दोसा हा दाक्षिणात्य संस्कृतीचा किती अविभाज्य घटक आहे हे कळून आले. माझ्या घरी डोश्याचे पीठ नाही असा एकही दिवस जात नाही. जसे मराठी घरांत कणिक