Skip to main content

दहीवाली...

रस्त्यावरुन जाता जाता दिव्यांची रांग बघताना माझ्या मनात लहानपणापासुन मनात साठवुन ठेवलेले सगळे लोकं नकळत येतात...आणि थोड्या वेळाने अगदी नाहिसे होतात...मग पुन्हा कधितरि असेच आठ्वतात, म्हणुन आज त्यांच्याबद्दल लिहावं वाटतंय...काही लोकं उगाच आठ्वणीत राहतात...त्यापैकीच हे काही...
सगळ्यात पहीली आठ्वण ही आमच्या घरी येणार्या दहीवालीची तिला माझा विशेष लोभ होता.मी लहान असतांना आजीकडे रहायचे...पार सहावीपर्यंत.घरात मामा, मावशी, आजी आजोबा आणि मी असे पाच जणं असायचो. वाड्यात आजोबांचे दोन भाऊ आणि त्यांची मुले असे मिळुन आम्ही १५ जणं रहायचो...माझी आई या सगळ्या भावंडात मोठी असल्याने तिचं सगळ्यांच्या आधी लग्नं झालं...आणि मी झाले.घरी सगळ्या मामा मावश्य़ांपेक्षा लहान असल्याने माझे खुप लाड होत.घरात प्रत्येक येणार्या जाणार्याला माझं खुप कौतुक वाटायचं..दिसायलाही गुट्गुटीत होते(आजही आहे) त्यामुळे लोकांना माझा लोभ येणं साहजिकच होतं. अंगणात बरेच लोकं यायचे...दहीवाली, बोरंवाली, केळंवाली वगैरे..
तर..ही दहीवाली जरा म्हातारी होती.तिचं गाव होतं टवेपार..(भंडारा शहराजवळच आहे हे गाव) .ती तिथुन पायी यायची,डोक्यावर टोपलं घेऊन.१ रु ला पावशेर दही द्यायची...तिच्या टोपल्यात खुप सारं तणीस असायचं..आणि दोन मडके...काळ्या रंगाचे...एकात गोड दही आणि एकात आंबट..दही द्यायला ती शेर(माप) वापरायची...मडक्यातुन दही काढायला वापरायची तुटलेली पळी.
आमच्या घराला छपरी होती..ती अंगणात, छ्परीवरच्या कौलांच्या सावलीच्या बाहेर बसायची..आणि मी सावलीच्या आत."रानादेवी आणा तुमची वाटी" असं तिने म्हंटलं की माझी ठरलेली वाटी मी तिच्या समोर करत असे.त्यात साखर टाकुन खाण्यात काही औरच मजा होती ....मग मध्ये मध्ये ती माझ्यासाठी तिच्या शेतातली बोरं, करवंदं, तुरीच्या शॆंगा असा आव्वा पण आणायची....
दही मोजत असतांना मी कितीतरीदा तिला न्याहाळले आहे...
तिच्या हातात कुठ्ल्यातरी धातुचे कडे असायचे ,अगदी टिपीकल....पायात वहाणा...त्या वहाणांना दोन पटटे आणि एक अंगठा..त्यातुन दिसणारी थकलेली पाऊले...तिची उठा बसायची एक विशिष्ट लकब होती...डोक्यावर टोपले ठेवायला ती कापडाची गुंडाळी वापरत असे..अशीच गुडाळी मी कितीतरीदा करुन डोक्यावर ठेवुन पाहिली आहे... टोपलं उतरवतांना आणि चढवतांना तिला कुणाचा तरी आधार लागायचा....माझी उंची कमी असल्याने मी कधिच तिला मदत करु शकत नव्ह्ते...
तिचं ते हिरवं, जाड काठांचं लुगडं, मोठ्या चंदेरी काठाचं पोलकं...डोक्यावरचा पदर सावरण्याची पद्धत...हातातले कडे.. डोक्यावरचं टोपलं...तिच्या नकळत माझ्याशी बरेच काही बोलुन जात असे....
काल परवाच मामा म्हणाला की "दहीवाल्या आजीबाई वारल्या" तेव्हा आठ्वली...""बाई, दही वं" ही तिची दणदणीत हाक...

Comments

  1. खरंच कांही लोकं खरंच आठवणित रहातात अगदी आयुष्यभरासाठी.
    छान वाटलं वाचायला.. माझ्या लहान पणी एक पिसा बाई म्हणुन दहिवाली यायची ... तिची आठवण झाली आज..

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

दाक्षिणात्य संस्कृती - कोलम (रांगोळी)

दाक्षिणात्य संस्कृती - कोलम (रांगोळी) या पोस्ट मध्ये खाद्यसंस्कृती बद्दल नं सांगता रांगोळ्या आणि तामिळ नाडू यांच्या असलेल्या घट्ट नात्याबद्दल बोलूया. रांगोळी म्हणजे मला तरी एखाद्या स्त्री ची अभिव्यक्ती वाटते. रांगोळी काढणारा पुरुष जरी असेल तरी त्याच्या मनातल्या तरल भावना त्या रांगोळीत उतरतात. अर्थात नेहेमीच्या रोज काढल्या जाणाऱ्या रांगोळ्या म्हणजे गृहिणीची अभिव्यक्ती का हे मला नाही माहिती. पण अंगण झाडणे, सडा टाकणे, आणि रांगोळी काढणे  माझ्यासाठी एक थेरेपि आहे. आजकाल अपार्टमेंट आणि मोठाल्या इमारतींमुळे अंगण हा भागच नाहीसा झालाय घराचा, पण मागे आम्ही होतो त्या घरी मोठे अंगण होते. तामिळ नाडुत सगळ्या दारासमोर रांगोळी काढल्या जाते. अगदी अपार्टमेंट जरी असेल तरी अपार्टमेंट च्या मोठ्या दारासमोर रांगोळी काढली जातेच. इथल्या गल्ल्यांमध्ये समोरासमोरील घराच्या दारासमोर तर दोन्ही वेळेला रांगोळी काढल्या जाते. सकाळी ६. ०० ते ६.३० च्या दरम्यात सगळ्या स्त्रिया या कामात मग्न दिसतात. पहिले मला फार कुतूहल वाटे. एवढ्या सकाळी उठणे आणि पहिले काम म्हणजे रांगोळी. दिवस कसा  छान सुरु होत असेल असे वाटायचे. लग्न

दलपती - मणी रत्नम चा मास्टरपीस

तामिळ चित्रपटांमध्ये मी सगळ्यात पहिले पाहिलेला चित्रपट म्हणजे दलपती. तामिळ भाषा जरी क्लिष्ट वाटत असली तरी ती सर्वांगसुंदर भाषा आहे. आपण मराठी किंवा इतर भाषिक लोक नेहेमी दक्षिणेकडच्या ४ भाषांची सारख्या वाटतात म्हणून खिल्ली उडवत असतो पण ह्या चारही भाषा कन्नड, तमिळ, तेलगू आणि मल्याळम अतिशय समृद्ध आहेत. चारही भाषांची एक स्वतःची चित्रपट सृष्टी आहे हे महत्वाचे. बाहुबली हे एक उत्तम उदाहरण. बरेच हिंदी चित्रपट, मल्याळम आणि तामिळ चित्रपटांवरून प्रेरित असतात हे सांगणे नं लगे. तर असाच एक १९९०'स मध्ये तयार झालेला चित्रपट दलपती म्हणजे म्होरक्या किंवा प्रमुख किंवा सेनापती.  कर्ण आणि अर्जुन ह्या धर्तीवर आधारित असलेला हा चित्रपट त्याकाळी खूप गाजला होता. मामुटी, रजनीकांत आणि अरविंद स्वामी, शोभना आणि सगळे उत्तम कलाकार. इलैराजा यांचे संगीत आणि संतोष सिवन यांची सिनेमॅटोग्राफी. असे म्हणतात की मणी रत्नम चे सगळे चित्रपट सकाळी चित्रांकित करतात. त्यावेळी अतिशय सुंदर प्रकाश असतो आणि त्याचा पुरेपूर उपयोग ते प्रत्येक शॉट मध्ये करून घेतात. ह्या चित्रपटात ते प्रकर्षाने जाणवते.  मणी रत्नम चे सगळे

दाक्षिणात्य खाद्यसंस्कृती -दोसा

दोसा हा पदार्थ नं आवडणारा माणूस विरळा. माझी आणि दोस्याची ओळख आमच्या शाळेच्या आनंदमेळ्यात झाली होती. एक डोस्याचा स्टॉल होता तिथे, माझ्या बेस्ट फ्रेंड च्या काकी चा. मी नं खाताच गर्दी पाहून मला लक्षात आलं होतं तेव्हा कि काहीतरी स्पेशल आहे दोस्यात. हळूहळू जसे मोठे होत गेलो तसे आई बाबा बाहेर जेवायला घेऊन जायचे, मग खायचे काय तर डोसा, जगत नावाचे नागपूरला खूप प्रसिद्ध हॉटेल होते, अर्थात आता मॉल आणि मोठमोठ्या बिल्डींग्स असलेले नागपूर नव्हते तेव्हा उणीपुरी २ ते ३ फॅमिली रेस्टॉरंट्स. त्यात आर्य भवन एक आणि एक जगत. आई म्हणायची जी वस्तू आपण घरी जास्त करत नाही ती बाहेर खावी. म्हणून मोठ्ठा क्रिस्पि दोसा त्यात बटाट्याची भाजी, सोबत चटण्या. एकदम पोटभर व्हायचा तो मसाला डोसा. मी ९ वी, १० वी त असतांना आई घरीच डोसे करायची. पुढे कॉलेज मध्ये घेल्यावर वगैरे बाहेर खातांना डोसा हा पदार्थ बऱ्याचदा खाल्ल्या जायचा.  आता गेल्या १० वर्षांपासून चेन्नई मध्ये स्थायिक असल्याने, दोसा हा दाक्षिणात्य संस्कृतीचा किती अविभाज्य घटक आहे हे कळून आले. माझ्या घरी डोश्याचे पीठ नाही असा एकही दिवस जात नाही. जसे मराठी घरांत कणिक