Skip to main content

मराठी पाऊल पडते पुढे?

काल सा रे ग म प चा एपिसोड बघितला... सगळ्याची गाणी छान झाली...मला अमृताचं "गुणी बाळ असा" गाणं आवडलं..ते तिने गायले म्हणुन नव्हे तर मुळ गाणंच छान आहे..
मधुराचं "ही वाट दूर जाते"... छानं च गायली...पण आताशा हे सा रे ग म प ही बोअर व्हायला लागलं आहे...
गाणी म्हणण्याचा कार्यक्रम मग त्यात जुजबी माहीती न देता परीक्षकाच्या खुर्चीवर बसलेली मंडळी उगाचच्या गोष्टीवर का बोलतात हे मल न उलगडलेले कोडे आहे.. मलाही प्रत्येक गाण्याच्या मागे असलेल्या गमतीजमती माहीती करुन घ्यायला आवडते पण मग त्यासाठी एखादा वेगळा कार्यक्रम असावा (इतिहास..गाण्याचा) वगैरे नावचा डोळा मारा
खरंतर आता सगळेच प्रोग्राम्स, सगळ्याच मालिका अगदी रटाळ वाटतात विशेषतः झी मराठीवरच्या..अगदी बोटावर मोजण्याइतकेच प्रोग्राम्स..मालिका तर सगळ्याच प्रेडिक्टेबल..सकाळच्या घाईत कुणाला वेळ आहे "गुड मॉर्निंग महाराष्ट्र" बघायला...कुठलीही छान गाणी जर लावलीत तर गृहीणी...कामावर जाणारी लोकं सगळेच काम करता करता गाणी ऐकु शकतात..जेव्हापासुन हे चैनल सुरु झाले आहे तेव्हापासुन गुड मॊर्निंग महाराष्ट्र सुरु आहे पण त्यात काहीही बदल नाही...आणि हे तरी ठीक...ई टि व्ही वाल्यांनी तर कहरच केला..सकाळ्च्या वेळेला कुणी घर सजावटीच्या वस्तु कश्या तयार कराव्यात हे बघेल का? हे सगळे पाहुन माझ्या नवरेबुवांना हसु आवरणे कठीण जाते..
सुर ताल आता जख्ख म्हातारे झाले आहे त्याऐवजी कुठ्ल्या दुसर्या कार्यक्रमचे आयोजन का केले जात नाही? हे तर कळतच नाही..यांच्याकडे प्रतिभावंत लोकांची कमी आहे की नक्की काय प्रॉब्लेम आहे हे माहीती नाही...मुळात प्रेक्षकाची काय गरज आहे हे कुणालाही कळत नाही..
अरे जर स्टार प्लस चैनल वर रटाळ मालिका चालु आहेत तर मराठी चॅनल वाल्यांनो तुम्हीतरी तुमचा स्तर टिकवा...आणि प्रेक्षकांना काही तरी नवीन द्या..जुन्या दर्जेदार मालिका आठवल्या तर असं वाटतं की काळाच्या ओघात मराठी माणुस आपली प्रतिभा गमावुन बसलाय की काय?
अगदी मोजता येतील इतकेच चित्रपट...त्यातील सुमार गाणी..सगळे संगीत दिग्दर्शक कुठे गेलेत काय माहीती?...(सारेगमप मधे परिक्षक म्हणुन डोळा मारा)
महाराष्ट्रातील संगीत म्हणजे काहीच कुटुंबांची मक्तेदारी नव्हे हे लोकांना कधी कळणार कोण जाणे ..माझ्यामते सगळ्याच जुन्या नव्या गायकांनी या कलेला योग्य तोच न्याय दिला आहे...आणि जसा सकाळी उगवलेला सुर्य संध्याकाळी मावळतोच..तसेच कलाकाराचे आहे..
प्रत्यक्ष कलाकाराला त्याच्या कारकिर्दीबद्दल एवढे अप्रुप नसावे...आपणच सारे त्याचं भांडवल करतो असं मला वाटतं...जितके गाण्याचे कार्यक्रम आहेत तितके कवी सम्मेलनं, संगीत दिग्दर्शनाची प्रतियोगिता का असत नाही...प्रतिभेला चालना,मोठं व्यासपीठ कोण मिळवुन देणार? ही आजची गरज आहे...नाहीतर आपण आयुष्यभर "मराठी पाऊल पडते पुढे" आळवत बसु...आणि बाकीच्या प्रांतातील लोकं मात्र कित्येक पावलांनी मराठी माणसापेक्षा पुढे असतील..

Comments

  1. आजच एका ब्लॉग वर वाचलं की कार्तिकीला आता हिंदी सारेगमप मधे डायरेक्ट एंट्री मिळाली आहे. मी स्वतः तर टिव्ही कधिच पहात नाही. फक्त सुर ताल आणि सारेगमप मात्र पहातो.
    चांगली सुरुवात आहे. पुढिल लिखाणासाठी शुभेच्छा..

    ReplyDelete
  2. hiloo mai

    gone through the blog and found that u r well in wriing in marathi and pouring exactly what u fill or ur expression. it is rarely been seen in math people.

    why u h,ve discontinued chat on that day

    blog is good.

    bravo

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

दलपती - मणी रत्नम चा मास्टरपीस

तामिळ चित्रपटांमध्ये मी सगळ्यात पहिले पाहिलेला चित्रपट म्हणजे दलपती. तामिळ भाषा जरी क्लिष्ट वाटत असली तरी ती सर्वांगसुंदर भाषा आहे. आपण मराठी किंवा इतर भाषिक लोक नेहेमी दक्षिणेकडच्या ४ भाषांची सारख्या वाटतात म्हणून खिल्ली उडवत असतो पण ह्या चारही भाषा कन्नड, तमिळ, तेलगू आणि मल्याळम अतिशय समृद्ध आहेत. चारही भाषांची एक स्वतःची चित्रपट सृष्टी आहे हे महत्वाचे. बाहुबली हे एक उत्तम उदाहरण. बरेच हिंदी चित्रपट, मल्याळम आणि तामिळ चित्रपटांवरून प्रेरित असतात हे सांगणे नं लगे. तर असाच एक १९९०'स मध्ये तयार झालेला चित्रपट दलपती म्हणजे म्होरक्या किंवा प्रमुख किंवा सेनापती.  कर्ण आणि अर्जुन ह्या धर्तीवर आधारित असलेला हा चित्रपट त्याकाळी खूप गाजला होता. मामुटी, रजनीकांत आणि अरविंद स्वामी, शोभना आणि सगळे उत्तम कलाकार. इलैराजा यांचे संगीत आणि संतोष सिवन यांची सिनेमॅटोग्राफी. असे म्हणतात की मणी रत्नम चे सगळे चित्रपट सकाळी चित्रांकित करतात. त्यावेळी अतिशय सुंदर प्रकाश असतो आणि त्याचा पुरेपूर उपयोग ते प्रत्येक शॉट मध्ये करून घेतात. ह्या चित्रपटात ते प्रकर्षाने जाणवते.  मणी रत्नम चे ...

इरुवर - तमिळ चित्रपटांचा मेरुमणी

तमिळ सिनेमा हा विषय मी ब्लॉगवर कधीच लिहिलेला नाही. आता १० वर्षे झालीत मद्रास मध्ये आणि बऱ्यापैकी तमिळ पण बोलता येतं, कळतं, म्हणून ठरवले की नेहेमी भाषांतर केलेल्या या नव्या जुन्या चित्रपटाबद्दल लिहावे. तामिळ ही खूप गोड़ आणि ओघवती भाषा आहे, अर्थात कुठल्याही भाषेसारखीच. पण या भाषेचा जन्म प्राकृत भाषेमुळे झाला. लिपी अतिशय सोपी असली तरी शब्द आणि त्याचे उच्चारण कठीण आहे. थोडे अजूनही कळत नाहीच ;) काही दिवसांपूर्वीच "इरुवर" चित्रपट पाहिला. इरुवर - म्हणजे दोघे - ऐश्वर्या चा पहिला चित्रपट म्हणून फेमस आहेच पण जयललिता, करुणानिधी आणि एमजीआर या तीन पूर्व मुख्यमंत्र्यांच्या आयुष्यावर बेतलेला हा चित्रपट. मणी रत्नम चं दिग्दर्शन, ए आर रहमान चं संगीत. अजून काय हवे? मल्याळी अभिनेता मोहनलाल ( एमजीआर), ऐश्वर्या राय ( एमजीआर ची पूर्व पत्नी आणि जयललिता ) च्या भूमिकेत, प्रकाश राज ( करुणानिधी ) च्या भूमिकेत, रेवती आणि तब्बू या करुणानिधींच्या पत्नी. १९५० मधले सेट्स आणि त्याच काळचा प्लॉट. संतोष सिवन ची सिनेमॅटोग्राफी अप्रतिम आहे. तेव्हा संतोष सिवन अतिशय नवखे असतील पण तरीही खूपच सुंदर चित...

ती आणि तो

आजुबाजुच्या घडामोडींकडे त्रयस्थपणे बघता बघता काही गोष्टी मात्र मनात राहुन जातात. अश्याच काही लोकांबद्दल ..त्यांच्यावर आलेल्या प्रसंगाबद्दल केलेल्या नोंदी... ती आणि तो "ती" एक २७ वर्षांची निखळ निरागस मुलगी. दुसर्यांना मदत करण्याची तिची प्रवृत्ती मला फ़ार आवडत असे. घरची अतिशय लाडकी. गेल्या ७ वर्षांपासुन तिचं त्याच्या वर प्रेम होतं. मुलगा ही छान, मुंबई सारख्या शहरात व्यवस्थित स्थायिक झालेला. काहीही कमी नव्ह्तं.. प्रेमाच्या आणा भाका घेऊन झाल्या. सगळीकडे हिंडुन फिरुन झालं..सगळ्यांना कल्पना होतीच त्यांच्या प्रेमाची. फ़क्तं एकच गोष्ट होती खटकण्यासारखी..ती म्हणजे दोघेही एका जातीचे नव्ह्ते. दोघांच्या घरुन ह्या गोष्टीवर प्रचंड विरोध होईल हे सर्वश्रुत होते. हळुहळु तिला मोठीमोठी स्थळं येऊ लागली. दोघा तिघांनी तर मागणीच घातली होती.आई बाबाही तिला लग्नाचा आग्रह करु लागले होते. आणि ती त्याला लग्न करण्यास आग्रह करु लागली. तिने हे सगळे घरी सांगितल्यावर तिला खुप बोलणी खावी लागली होती. त्याच्या प्रेमाखातर हे ही सहन करु असे तिला वाटायचे. तिला वाटायचे आपल्यासारखेच त्यानेही घरी सांगावे आणि त्या दोघा...