Skip to main content

माय मराठी!!

मराठी ही अतिशय हळवी भाषा आहे असं मला नेहमी वाटतं (शिव्या जरी लक्षात घेतल्या तरी). माझ्या आणि कितीतरी हळव्या मराठमोळ्या मनांच्या व्यथा तिने आजवर व्यक्त करण्यास हातभार लावला आहे.

पहीला शब्द मी बोललेला "आदा" (आई) हा होता असं आई म्हणायची...मला हिन्दीतल्या मा, ईंग्रजीतल्या मम्मी..तमिळमधल्या अम्मा..पेक्षा आई हा शब्दच अधिक श्रवणीय वाटतो.आई नंतर बाबा..मामा, आजोबा,आजी..मावशी, काका आणि नंतर व्यवहारीक शब्दं अशी माझी मराठीतील वाटचाल सुरु झाली.

भाषा म्हंटलं की समाजातील प्रत्येक थरातील व्यक्तीचा तिच्यावर प्रभाव पडत असतो.भंडार्यात एका वेगळ्याच प्रकारे मराठी बोलली जाते त्यात हिन्दी तील काही शब्दही वापरले जातात.मी जास्तं काही सांगायला नकोच याबद्दल.पु.लं नी आधिच लिहुन ठेवलेलं आहे.लहानपणी भंडारा, नागपूर ला असल्यामुळे विदर्भातील मराठी भाषाच कानावर पडली.बरेचशे शब्द अजुनही ऐकले की त्याच लहानपणीच्या दिवसांची आठ्वण होते.ही वर्हाडी भाषा बोलण्यात मात्र एक वेगळीच मजा आहे.मी नागपुरला गेले की हमखास "का गं?" च्या ऐवजी " काऊन गं?", " कुठे जातोयस?" च्या ऐवजी"कुठे जाऊन राहीला?" असंच बोलते.वर्हाडी शब्दांची एक स्वतंत्र डिक्शनरी असावी असं मला वाटतं.नाहीतर हे शब्द असेच लोप पावतील..

माझी आई विदर्भातली आणि बाबा मराठ्वाड्याचे असल्याने दोघांचीही बोलीभाषा वेगळी होती.खुप गोड आहे मराठ्वाडी मराठी.मराठ्वाड्यातील काही शब्द मला फ़ार आवडतात. उदा. माय, लेकरु,...आई एखाद्या वेळेला रागावली की बाबा लगेच म्हणत "जाऊ दे लेकरु आहे"..त्यांची माझ्यावरची माया लेकरु या शब्दात एकवटली आहे असे मला वाटे.अजुनही ते कुठे गेली होतीस? असं नं विचारता कुठे गेली होती माय? असं विचारतात. बाबांकडले कुठ्लेही नातेवाईक माय या संबोधनाशिवाय मुलीबाळींना कधीच बोलवत नसावेत.आणि ह्या भाषेचा सगळा गोडवा अश्या शब्दातच आहे...

खान्देशातील मराठीचा आणि माझा फ़ारसा संबंध आला नाही...पुण्याला आल्यावर मात्र थोडीशी सावरुन मराठी बोलायला शिकले..आईशप्पथ!! ;) नाहीतर आम्हा वर्हाडी मानसाले मले तुले ची सवय;)

लहानपणापासुन माझ्या मित्रमैत्रिण मंडळात मराठी भाषिकांचा फ़ार कमी वावर होता.माझ्या बहीणिच्या मित्रमंडळात सगळे जोशी, देशपांडॆ, कुलकर्णी, पाटील असे लोक आणि माझ्या सगळ्या मैत्रिणि म्हणजे खान, पुरी, फ़्रांसिस वगैरे नावाच्या त्यामुळे मराठी भाषिक मित्रमंडळाला मी मुकले असं मला वाटायचं...

कहर म्हणजे पुण्यात शिकायला असतांनाही माझा एकही मित्र किंवा मैत्रिण मराठी नव्हते...तिथे असतांना अस्सल मराठी जेवणाच्या ऐवजी माझ्या दक्षिण भारतातील मित्रांच्या कृपेने मी भरपुर रसम भात चोपला आहे...:) माझी ही हळहळ जाणुनच कदाचित देवाने मला कामानिमित्त मुंबईला(ठाण्याला) पाठ्वले जिथे माझ्या मित्रमैत्रिण मंडळात मराठमोळ्या लोकांची भर व्हायला लागली...आणि मी एकदाचा निश्वास सोडला... दीड वर्षांच्या माझ्या ठाण्यातील वास्तव्यात मला खुप मराठी पुस्तके वाचता आली...मराठी नाटके, गाण्यांच्या महफ़िली अनुभवायची संधी मिळाली...

मुंबईत वावरतांना आणि तिथली टपोरी भाषा वापरतांना मराठीच्या मोठेपणाची दाद द्यावी शी वाटली..इतक्या वर्षापासुन, हजारो बोलीभाषांचा प्रभाव पडुन सुध्दा आपली माय मराठी तितकीच हळवी...तितकीच उदात्त वाटते...ह्यालाच भाषेचं सामर्थ्य म्हंटले असावे नाही का?

आणि म्हणुनच आपण मराठीला माय मराठी म्हणत असु...

Comments

Popular posts from this blog

दाक्षिणात्य संस्कृती - कोलम (रांगोळी)

दाक्षिणात्य संस्कृती - कोलम (रांगोळी) या पोस्ट मध्ये खाद्यसंस्कृती बद्दल नं सांगता रांगोळ्या आणि तामिळ नाडू यांच्या असलेल्या घट्ट नात्याबद्दल बोलूया. रांगोळी म्हणजे मला तरी एखाद्या स्त्री ची अभिव्यक्ती वाटते. रांगोळी काढणारा पुरुष जरी असेल तरी त्याच्या मनातल्या तरल भावना त्या रांगोळीत उतरतात. अर्थात नेहेमीच्या रोज काढल्या जाणाऱ्या रांगोळ्या म्हणजे गृहिणीची अभिव्यक्ती का हे मला नाही माहिती. पण अंगण झाडणे, सडा टाकणे, आणि रांगोळी काढणे  माझ्यासाठी एक थेरेपि आहे. आजकाल अपार्टमेंट आणि मोठाल्या इमारतींमुळे अंगण हा भागच नाहीसा झालाय घराचा, पण मागे आम्ही होतो त्या घरी मोठे अंगण होते. तामिळ नाडुत सगळ्या दारासमोर रांगोळी काढल्या जाते. अगदी अपार्टमेंट जरी असेल तरी अपार्टमेंट च्या मोठ्या दारासमोर रांगोळी काढली जातेच. इथल्या गल्ल्यांमध्ये समोरासमोरील घराच्या दारासमोर तर दोन्ही वेळेला रांगोळी काढल्या जाते. सकाळी ६. ०० ते ६.३० च्या दरम्यात सगळ्या स्त्रिया या कामात मग्न दिसतात. पहिले मला फार कुतूहल वाटे. एवढ्या सकाळी उठणे आणि पहिले काम म्हणजे रांगोळी. दिवस कसा  छान सुरु होत असेल असे वाटायचे. लग्न

दलपती - मणी रत्नम चा मास्टरपीस

तामिळ चित्रपटांमध्ये मी सगळ्यात पहिले पाहिलेला चित्रपट म्हणजे दलपती. तामिळ भाषा जरी क्लिष्ट वाटत असली तरी ती सर्वांगसुंदर भाषा आहे. आपण मराठी किंवा इतर भाषिक लोक नेहेमी दक्षिणेकडच्या ४ भाषांची सारख्या वाटतात म्हणून खिल्ली उडवत असतो पण ह्या चारही भाषा कन्नड, तमिळ, तेलगू आणि मल्याळम अतिशय समृद्ध आहेत. चारही भाषांची एक स्वतःची चित्रपट सृष्टी आहे हे महत्वाचे. बाहुबली हे एक उत्तम उदाहरण. बरेच हिंदी चित्रपट, मल्याळम आणि तामिळ चित्रपटांवरून प्रेरित असतात हे सांगणे नं लगे. तर असाच एक १९९०'स मध्ये तयार झालेला चित्रपट दलपती म्हणजे म्होरक्या किंवा प्रमुख किंवा सेनापती.  कर्ण आणि अर्जुन ह्या धर्तीवर आधारित असलेला हा चित्रपट त्याकाळी खूप गाजला होता. मामुटी, रजनीकांत आणि अरविंद स्वामी, शोभना आणि सगळे उत्तम कलाकार. इलैराजा यांचे संगीत आणि संतोष सिवन यांची सिनेमॅटोग्राफी. असे म्हणतात की मणी रत्नम चे सगळे चित्रपट सकाळी चित्रांकित करतात. त्यावेळी अतिशय सुंदर प्रकाश असतो आणि त्याचा पुरेपूर उपयोग ते प्रत्येक शॉट मध्ये करून घेतात. ह्या चित्रपटात ते प्रकर्षाने जाणवते.  मणी रत्नम चे सगळे

दाक्षिणात्य खाद्यसंस्कृती -दोसा

दोसा हा पदार्थ नं आवडणारा माणूस विरळा. माझी आणि दोस्याची ओळख आमच्या शाळेच्या आनंदमेळ्यात झाली होती. एक डोस्याचा स्टॉल होता तिथे, माझ्या बेस्ट फ्रेंड च्या काकी चा. मी नं खाताच गर्दी पाहून मला लक्षात आलं होतं तेव्हा कि काहीतरी स्पेशल आहे दोस्यात. हळूहळू जसे मोठे होत गेलो तसे आई बाबा बाहेर जेवायला घेऊन जायचे, मग खायचे काय तर डोसा, जगत नावाचे नागपूरला खूप प्रसिद्ध हॉटेल होते, अर्थात आता मॉल आणि मोठमोठ्या बिल्डींग्स असलेले नागपूर नव्हते तेव्हा उणीपुरी २ ते ३ फॅमिली रेस्टॉरंट्स. त्यात आर्य भवन एक आणि एक जगत. आई म्हणायची जी वस्तू आपण घरी जास्त करत नाही ती बाहेर खावी. म्हणून मोठ्ठा क्रिस्पि दोसा त्यात बटाट्याची भाजी, सोबत चटण्या. एकदम पोटभर व्हायचा तो मसाला डोसा. मी ९ वी, १० वी त असतांना आई घरीच डोसे करायची. पुढे कॉलेज मध्ये घेल्यावर वगैरे बाहेर खातांना डोसा हा पदार्थ बऱ्याचदा खाल्ल्या जायचा.  आता गेल्या १० वर्षांपासून चेन्नई मध्ये स्थायिक असल्याने, दोसा हा दाक्षिणात्य संस्कृतीचा किती अविभाज्य घटक आहे हे कळून आले. माझ्या घरी डोश्याचे पीठ नाही असा एकही दिवस जात नाही. जसे मराठी घरांत कणिक