Skip to main content

रोडट्रिप!

रोडट्रीप: 
चेन्नई - आंबूर 

हे वर्ष अतिशय व्यस्त असे काही सुरु झाले, जानेवारी मध्ये माझा कथक चा प्रोग्रॅम होता त्याची प्रॅक्टिस, मग मॅरेथॉन पोस्टपोन होत होत अगदी प्रोग्रॅम च्या आजू बाजूलाच ठरली होती.. हे सगळे होते ना होते तेच माझ्या नणंदेचं लग्न आणि नंतर माझ्या बहिणीची डिलिव्हरी. डिलिव्हरी नुकतीच संपते आणि ती थोडी सेटल होते ना होते तोवर आमचे शिफ्टिंग चे सुरु झाले.. त्यात जवळपास १ आठवडा गेला. मी आणि कृष्णवी दोघींनी ठरवलेच होते की जश्या सुट्ट्या लागल्या तसे कुठेतरी जायचेच. कदाचित हीच अगदी बरोबर वेळ होती बाहेर निघायची आणि थोडा आराम करायची. एका दिवसात प्रोग्रॅम ठरला आणि आम्ही निघालो रोडट्रीप ला. पहिली रोड ट्रिप!  दरवर्षी कृष्णवी लहान म्हणून आम्ही जवळच्या ठिकाणी जाऊन परत येत असू. पण ह्यावेळी तिनेच आग्रह धरला की बाबा दूर जाऊया. आम्ही दोघेही जीआयएस प्रोफेशनल्स असल्याने एक १० वर्षांपूर्वी कॉफ़ी, चहा एस्टेट्स चा सर्वे केला होता, आणि कूर्ग हे ठिकाण तेव्हा आम्हाला फार आवडलं होतं. विशेष म्हणजे तेव्हा तिथे राहण्याचा बंदोबस्त एका ब्रिटिशकालीन  बंगल्यात केला होता. २०१० मधेही गेलो होतो कूर्ग ला पण ती ट्रिप मडिकेरी, थंलकावेरी वगैरे प्रेक्षणीय स्थळे बघण्यात गेली. काही नं ठरवता निघण्यात फार मजा असते, यावेळी एवढंच माहिती होते की कूर्ग ला जायचे.. 
पहिला स्टॉप ओव्हर होता होसूर.. 
पण खूप उशीरा निघाल्याने आंबुर ला थांबलो.. आंबूर बिर्याणी साठी अतिशय प्रसिद्ध आहे. आंबूर ची जिरगसंबा तांदुळाची केलेली बिर्याणी म्हणजे बिर्याणी प्रेमींसाठी पर्वणी. कृष्णवी आणि तिचे बाबा या दोघांनाही बिर्याणी म्हणजे जीव की प्राण. पण आंबूर ला पोचेस्तोवर  ११. ३० वाजून गेले होते.. स्टार बिर्याणी हे हायवे वरचे रेस्टॉरंट आहे, आम्ही रात्री पोहोचलो म्हणून थोडेच लोक होते, पण एरवी खूप गर्दी असते . 
स्टार बिर्याणी 
दुकानदाराने जरा कुणकुण करतंच बिर्याणी च्या ऑर्डर्स घेतल्या. मी नॉन व्हेज खात नसल्याने मला त्या हॉटेल च्या वातावरणाखेरीज काहीच बघण्यासारखे नव्हते :( पण... 
हॉटेल च्या अगदी बाजूलाच लेदर च्या बॅग्स, जोडे, चपला आणि बाकी वस्तूंची २ दुकाने होती. विशेष म्हणजे अश्या बॅग्स मी मुंबई आणि पुण्याव्यतिरिक्त कुठे बघितल्या नव्हत्या. जाऊन बघितले तर मी एकदम उडालेच. मलबेरी, जिमी चू, अश्या नामवंत कंपनीस च्या बॅग्स अगदी परवडेबल किमतीत विकायला होत्या. मला फार आश्चर्य वाटले, कारण नुकतीच कोणीतरी मलबेरी ची बॅग १.५ लाखाला घेतली असे ऐकले होते ती ही चायना वरून आणलेली. १. ५ लाख एखाद्या पर्स साठी म्हणजे काहींच्या काहीच असे माझे प्रामाणिक मत आहे. असावी एखादी छान बॅग पण एवढी महाग...मग इथे मलबेरी पाहून मला खुप अप्रूप वाटले. दुकानदार हिंदी भाषिक होते, ते म्हणाले की जगभरात असलेले मोठे मोठे ब्रॅण्ड्स इथूनच लेदर घेऊन जातात आणि काही काही इथूनच बॅग्स बनवून घेऊन जातात. मलबेरी, जिमी चू हे त्यातले एक. आंबूर ला लेदर फॅक्टरीस आहेत. पुर्वी चेन्नई च्या क्रोम्पेट या जागी लेदर च्या फॅक्टरीस होत्या ज्या राणीपेट आणि आंबूर अश्या ठिकाणी हलवल्या गेल्या. माझ्या बहिणीच्या सासऱयांचा लेदर च्या केमिकल्स चा बिसिनेस आहे आणि त्यांची आंबूरलाच  फॅक्टरी आहे हे ही मला त्याच दिवशी कळाले ;) 
आपल्या देशातून बहुतेक सगळ्या देशांना लेदर चा पुरवठा होतो आणि आपण ब्रँड च्या मागे हजारो रुपये त्यामागे खर्च करतो. गो ग्लोबल थिंक लोकल ही संकल्पना अमलात आणायला हवी हे प्रकर्षाने जाणवले. आंबुर वरून होसूर ला येईस्तोवर पहाट झाली होती, होसूर मध्ये सकाळचा ब्रेकफास्ट एक्दम तामिळ पद्धतीचा होता. आमच्या डोसा प्रिय जनतेचे पोट आणि मन भरल्यावर तिथून पुढची मजल गाठायचे ठरले. पुढील मजल होती, मांड्या, चेन्नपटना आणि म्हैसूर...म्हैसूर ला थांबलो नाही, बायपास केले, पण मांड्या, चेन्न पटना हा भाग अतिशय सुंदर आहे . 
होसूर मधले claresta हॉटेल  

मांड्या या शहराच्या रस्त्यावरची झाडे 

रस्त्यावरच्या हिरव्यागार वृक्षांनी मला प्रसन्न तर वाटलेच पण कर्नाटक शासनाने प्रत्येक वृक्ष जपून रस्ते आणि बाकीचे बांधकाम केले आहे ह्याचे पण कौतुक वाटले. 

Comments

Popular posts from this blog

दलपती - मणी रत्नम चा मास्टरपीस

तामिळ चित्रपटांमध्ये मी सगळ्यात पहिले पाहिलेला चित्रपट म्हणजे दलपती. तामिळ भाषा जरी क्लिष्ट वाटत असली तरी ती सर्वांगसुंदर भाषा आहे. आपण मराठी किंवा इतर भाषिक लोक नेहेमी दक्षिणेकडच्या ४ भाषांची सारख्या वाटतात म्हणून खिल्ली उडवत असतो पण ह्या चारही भाषा कन्नड, तमिळ, तेलगू आणि मल्याळम अतिशय समृद्ध आहेत. चारही भाषांची एक स्वतःची चित्रपट सृष्टी आहे हे महत्वाचे. बाहुबली हे एक उत्तम उदाहरण. बरेच हिंदी चित्रपट, मल्याळम आणि तामिळ चित्रपटांवरून प्रेरित असतात हे सांगणे नं लगे. तर असाच एक १९९०'स मध्ये तयार झालेला चित्रपट दलपती म्हणजे म्होरक्या किंवा प्रमुख किंवा सेनापती.  कर्ण आणि अर्जुन ह्या धर्तीवर आधारित असलेला हा चित्रपट त्याकाळी खूप गाजला होता. मामुटी, रजनीकांत आणि अरविंद स्वामी, शोभना आणि सगळे उत्तम कलाकार. इलैराजा यांचे संगीत आणि संतोष सिवन यांची सिनेमॅटोग्राफी. असे म्हणतात की मणी रत्नम चे सगळे चित्रपट सकाळी चित्रांकित करतात. त्यावेळी अतिशय सुंदर प्रकाश असतो आणि त्याचा पुरेपूर उपयोग ते प्रत्येक शॉट मध्ये करून घेतात. ह्या चित्रपटात ते प्रकर्षाने जाणवते.  मणी रत्नम चे ...

ती आणि तो

आजुबाजुच्या घडामोडींकडे त्रयस्थपणे बघता बघता काही गोष्टी मात्र मनात राहुन जातात. अश्याच काही लोकांबद्दल ..त्यांच्यावर आलेल्या प्रसंगाबद्दल केलेल्या नोंदी... ती आणि तो "ती" एक २७ वर्षांची निखळ निरागस मुलगी. दुसर्यांना मदत करण्याची तिची प्रवृत्ती मला फ़ार आवडत असे. घरची अतिशय लाडकी. गेल्या ७ वर्षांपासुन तिचं त्याच्या वर प्रेम होतं. मुलगा ही छान, मुंबई सारख्या शहरात व्यवस्थित स्थायिक झालेला. काहीही कमी नव्ह्तं.. प्रेमाच्या आणा भाका घेऊन झाल्या. सगळीकडे हिंडुन फिरुन झालं..सगळ्यांना कल्पना होतीच त्यांच्या प्रेमाची. फ़क्तं एकच गोष्ट होती खटकण्यासारखी..ती म्हणजे दोघेही एका जातीचे नव्ह्ते. दोघांच्या घरुन ह्या गोष्टीवर प्रचंड विरोध होईल हे सर्वश्रुत होते. हळुहळु तिला मोठीमोठी स्थळं येऊ लागली. दोघा तिघांनी तर मागणीच घातली होती.आई बाबाही तिला लग्नाचा आग्रह करु लागले होते. आणि ती त्याला लग्न करण्यास आग्रह करु लागली. तिने हे सगळे घरी सांगितल्यावर तिला खुप बोलणी खावी लागली होती. त्याच्या प्रेमाखातर हे ही सहन करु असे तिला वाटायचे. तिला वाटायचे आपल्यासारखेच त्यानेही घरी सांगावे आणि त्या दोघा...

इरुवर - तमिळ चित्रपटांचा मेरुमणी

तमिळ सिनेमा हा विषय मी ब्लॉगवर कधीच लिहिलेला नाही. आता १० वर्षे झालीत मद्रास मध्ये आणि बऱ्यापैकी तमिळ पण बोलता येतं, कळतं, म्हणून ठरवले की नेहेमी भाषांतर केलेल्या या नव्या जुन्या चित्रपटाबद्दल लिहावे. तामिळ ही खूप गोड़ आणि ओघवती भाषा आहे, अर्थात कुठल्याही भाषेसारखीच. पण या भाषेचा जन्म प्राकृत भाषेमुळे झाला. लिपी अतिशय सोपी असली तरी शब्द आणि त्याचे उच्चारण कठीण आहे. थोडे अजूनही कळत नाहीच ;) काही दिवसांपूर्वीच "इरुवर" चित्रपट पाहिला. इरुवर - म्हणजे दोघे - ऐश्वर्या चा पहिला चित्रपट म्हणून फेमस आहेच पण जयललिता, करुणानिधी आणि एमजीआर या तीन पूर्व मुख्यमंत्र्यांच्या आयुष्यावर बेतलेला हा चित्रपट. मणी रत्नम चं दिग्दर्शन, ए आर रहमान चं संगीत. अजून काय हवे? मल्याळी अभिनेता मोहनलाल ( एमजीआर), ऐश्वर्या राय ( एमजीआर ची पूर्व पत्नी आणि जयललिता ) च्या भूमिकेत, प्रकाश राज ( करुणानिधी ) च्या भूमिकेत, रेवती आणि तब्बू या करुणानिधींच्या पत्नी. १९५० मधले सेट्स आणि त्याच काळचा प्लॉट. संतोष सिवन ची सिनेमॅटोग्राफी अप्रतिम आहे. तेव्हा संतोष सिवन अतिशय नवखे असतील पण तरीही खूपच सुंदर चित...