Skip to main content

सामना...कर्करोगाशी

लिसा रे ला कँसर झाला आणि कँसर ला ग्लॅमर प्राप्त झालं.. :) आहे ही तो रोग तसा..रोगांचा राजा म्हणु शकतो आपण त्याला..हळुचकन कुठलीही चाहुल नं लागता येतो आणि आपली धांदल उडवतो..
आपल्या देशाच्या कॅंसरच्या इतिहासावर एकदा या निमित्त्याने नजर टाकुया..यावरुन लक्षात येईल की कुणालाही म्हणजे अगदी कुणालाही हा रोग होऊ शकतो..माझ्या माहितीप्रमाणे रामकृष्ण परमहंस, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, सिने सॄष्टीतल्या नरगिस दत्त यांसारख्या दिग्गजांना पण या रोगानेच पछाडले होते. माझ्या ओळखिच्या अगदी साळसूद, कुठल्याही प्रकारची वाईट सवय नसलेल्या व्यक्तींनाच या रोगाने ग्रासले होते. लहानपणी दारु पिणार्‍यांना, सिगारेट ओढणार्‍यांनाच कॅंसर होतो अशी माझी ठाम समजुत होती..
१ वर्षापासुन आईला काहीही खाल्लं की तिखट लागत असे..अगदी साधं वरण सुध्दा, तिचं वजन कमी व्हायला लागलं होतं, चिड्चीड वाढली होती...आम्हाला वाटायचं की उपास करते म्हणुन कदाचित वजन कमी होत असावं, आमचे फ़ॅमिली डॉक्ट्र म्हणायचे काही हरकत नाही हो वजन कमी असलं तरी..असंच एके दिवशी जेवता जेवता आईला प्रचंड उलटी झाली डॉ कडे गेले असता त्यांनी ताबडतोब एंडोस्कोपी करायला सांगितली..तो ही फ़ार भयानक प्रकार असतो म्हणाले बाबा..रिपोर्ट आल्यावर कळले की आईला अन्ननलिकेचा कर्करोग झाला आहे..बाबांनी मला सांगितल्यावर माझ्या पायाखालची जमीन खरोखरी सरकली..त्या वाक्प्रचाराचा अर्थ मला तेव्हा अगदी स्पष्ट्पणे कळला...
मी घरात मोठी असल्याने मला धीर ठेवणे अत्यंत आवश्यक होते...तशीच आईजवळ गेले..आई शांतपणे माझ्याकडॆ बघुन मला म्हणाली काय झालंय गं मला? मी हळुचकन सांगितले की अजुन रिपोर्ट आलाच नाहिए गं...बघु काय होतंय ते..एव्हाना तिला ऍडमीट केले होते..सगळ्यांचे उतरलेले चेहरे पाहुन ती अजुनच अस्वस्थ होत होती..शेवटी तिला सांगायचे ठरले आणि सांगितलेही..
ती म्हणाली "अगं तुकडोजी महाराजांना सुध्दा कँसर झाला होता मग माझी काय बिषाद" तिने एवढं ब्रेव्हली घेतलेलं पाहुन मला धीर आला...बाबा आणि छकुही सावरले..पण आमच्यासाठी मात्र आमचं विश्व प्रत्येक दिवसागणिक आमच्यापासुन दूर चाललं होतं...
आत्ता कुठे आमचा आणि तिचा कर्करोगाशी सामना सुरु झाला होता...
तिच्या ट्रीटमेंट साठी मुंबईच्या टाटा मेमोरियल हॉस्पिटलला जायचे ठरले. त्या वर्षी प्रचंड पाऊस होता मुंबईला..लवकर नेलं नाही तर आईलाच काही होऊन बसेल अशी भिती वाटत असे..एकदाचा दिवस आला मुंबईला जायचा..आई, बाबा आणि मी विमानाने जाणार होतो..आम्हा तिघांचीही पहीली वेळ विमानात बसायची..माणुस कसा स्वार्थी असतो नाही?? मी तेव्हाही खिडकीजवळ बसले आईला बसु दिलं नाही..अजुनही मला ही गोष्ट प्रचंड सलते.मी तर अजुन कितीतरीदा विमानात बसली असती पण आई कदाचित कधीच नाही..मी हा विचार तेव्हा केलाच नाही :(
विमान मुंबईला पोहोचले आणि आम्ही माझ्या एका मैत्रिणीकडॆ उतरलो..ठाण्याला..त्या वेळी माझ्या सगळ्या मित्रांची मैत्रिणींची झालेली मदत अगदी अविस्मरणीय आहे...माणुस आधीच रोगाच्या नावानेच इतका भयभीत असतो की त्याला पदोपदी आधाराची गरज असते..नेमकी त्याच वेळेला टॅक्सी ड्रायव्हर पासुन सगळ्यांची झालेली मदत खरंच सुखावुन जाते.
टाटा मेमोरिअलचा पहिला दिवस...
लिसा रे ला कँसर झाला आणि कँसर ला ग्लॅमर प्राप्त झालं.. :) आहे ही तो रोग तसा..रोगांचा राजा म्हणु शकतो आपण त्याला..हळुचकन कुठलीही चाहुल नं लागता येतो आणि आपली धांदल उडवतो..

आपल्या देशाच्या कॅंसरच्या इतिहासावर एकदा या निमित्त्याने नजर टाकुया..यावरुन लक्षात येईल की कुणालाही म्हणजे अगदी कुणालाही हा रोग होऊ शकतो..माझ्या माहितीप्रमाणे रामकृष्ण परमहंस, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, सिने सॄष्टीतल्या नरगिस दत्त यांसारख्या दिग्गजांना पण या रोगानेच पछाडले होते. माझ्या ओळखिच्या अगदी साळसूद, कुठल्याही प्रकारची वाईट सवय नसलेल्या व्यक्तींनाच या रोगाने ग्रासले होते. लहानपणी दारु पिणार्‍यांना, सिगारेट ओढणार्‍यांनाच कॅंसर होतो अशी माझी ठाम समजुत होती..

१ वर्षापासुन आईला काहीही खाल्लं की तिखट लागत असे..अगदी साधं वरण सुध्दा, तिचं वजन कमी व्हायला लागलं होतं, चिड्चीड वाढली होती...आम्हाला वाटायचं की उपास करते म्हणुन कदाचित वजन कमी होत असावं, आमचे फ़ॅमिली डॉक्ट्र म्हणायचे काही हरकत नाही हो वजन कमी असलं तरी..असंच एके दिवशी जेवता जेवता आईला प्रचंड उलटी झाली डॉ कडे गेले असता त्यांनी ताबडतोब एंडोस्कोपी करायला सांगितली..तो ही फ़ार भयानक प्रकार असतो म्हणाले बाबा..रिपोर्ट आल्यावर कळले की आईला अन्ननलिकेचा कर्करोग झाला आहे..बाबांनी मला सांगितल्यावर माझ्या पायाखालची जमीन खरोखरी सरकली..त्या वाक्प्रचाराचा अर्थ मला तेव्हा अगदी स्पष्ट्पणे कळला...

मी घरात मोठी असल्याने मला धीर ठेवणे अत्यंत आवश्यक होते...तशीच आईजवळ गेले..आई शांतपणे माझ्याकडॆ बघुन मला म्हणाली काय झालंय गं मला? मी हळुचकन सांगितले की अजुन रिपोर्ट आलाच नाहिए गं...बघु काय होतंय ते..एव्हाना तिला ऍडमीट केले होते..सगळ्यांचे उतरलेले चेहरे पाहुन ती अजुनच अस्वस्थ होत होती..शेवटी तिला सांगायचे ठरले आणि सांगितलेही..

ती म्हणाली "अगं तुकडोजी महाराजांना सुध्दा कँसर झाला होता मग माझी काय बिषाद" तिने एवढं ब्रेव्हली घेतलेलं पाहुन मला धीर आला...बाबा आणि छकुही सावरले..पण आमच्यासाठी मात्र आमचं विश्व प्रत्येक दिवसागणिक आमच्यापासुन दूर चाललं होतं...

आत्ता कुठे आमचा आणि तिचा कर्करोगाशी सामना सुरु झाला होता...

तिच्या ट्रीटमेंट साठी मुंबईच्या टाटा मेमोरियल हॉस्पिटलला जायचे ठरले. त्या वर्षी प्रचंड पाऊस होता मुंबईला..लवकर नेलं नाही तर आईलाच काही होऊन बसेल अशी भिती वाटत असे..एकदाचा दिवस आला मुंबईला जायचा..आई, बाबा आणि मी विमानाने जाणार होतो..आम्हा तिघांचीही पहीली वेळ विमानात बसायची..माणुस कसा स्वार्थी असतो नाही?? मी तेव्हाही खिडकीजवळ बसले आईला बसु दिलं नाही..अजुनही मला ही गोष्ट प्रचंड सलते.मी तर अजुन कितीतरीदा विमानात बसली असती पण आई कदाचित कधीच नाही..मी हा विचार तेव्हा केलाच नाही :(

विमान मुंबईला पोहोचले आणि आम्ही माझ्या एका मैत्रिणीकडॆ उतरलो..ठाण्याला..त्या वेळी माझ्या सगळ्या मित्रांची मैत्रिणींची झालेली मदत अगदी अविस्मरणीय आहे...माणुस आधीच रोगाच्या नावानेच इतका भयभीत असतो की त्याला पदोपदी आधाराची गरज असते..नेमकी त्याच वेळेला टॅक्सी ड्रायव्हर पासुन सगळ्यांची झालेली मदत खरंच सुखावुन जाते.

टाटा मेमोरिअलचा पहिला दिवस...

क्रमश:

Comments

  1. kasetarich jhale.. Vichitr Hurhur lagoon rahate..kramash lihoo naka please.. Continuous liha..

    ReplyDelete
  2. आधिच्या हलक्याफूलक्या पोस्टनंतर किती गंभीर विषय घेतलास गं.......एरवी क्रमश: पाहिलं की लवकर लिहा पुढचा भाग वगैरे लिहीतो आपण पण तुझ्या या पोस्टला काय लिहू गं?
    माझी आजीही याच कॅन्सरने गेलीये....माझ्या जन्माच्या दोन महिने आधी.......बाबांचे वय अवघे २३ होते तेव्हा..... आजही ते मला पहातात तेव्हा म्हणतात की माझी आईच परत आलीये....थोडावेळ सुन्न गेला बघ....
    तन्वी

    ReplyDelete
  3. मुळात हे सगळं लिहिण्याचा उद्देश कुणालाही वाईट वाटावं असं नाहिए..पण ते वाटणारंच हे ही मला माहित आहे...
    आपण आयुष्याला इतकं टेकन फ़ॉर ग्रांटेड घेतो कि एखाद्या अश्याच बेसावध क्षणी नियती संधी साधुन घेते..आणि आपल्याला वेळंच देत नाही काही करायला...
    म्हणुन मी नेहमी सगळ्यांना सांगत असते..आईची, बायकोची काळजी घ्या...स्वतःची तर घ्याच घ्या...तेवढंच आहे शेवटी आपल्या हातात..मृत्यु तर आहेच पुढे वाढलेला..
    काल परवा लिसा ला कमेंट टाकली..की तुला कदाचित माहिती आहे की तुझं आयुष्य १० वर्षच आहे अजुन...आम्हाला पण तेवढंच माहित आहे गं..हाय काय आणि नाय काय..कँसर वगैरे काय निमित्त..असंच मी आईलाही सांगत असायचे..

    ReplyDelete
  4. absolutely right you are..I have no courage to buy your this thought..
    Not knowing is much better than knowing..let it be 10 years or 100

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

दाक्षिणात्य संस्कृती - कोलम (रांगोळी)

दाक्षिणात्य संस्कृती - कोलम (रांगोळी) या पोस्ट मध्ये खाद्यसंस्कृती बद्दल नं सांगता रांगोळ्या आणि तामिळ नाडू यांच्या असलेल्या घट्ट नात्याबद्दल बोलूया. रांगोळी म्हणजे मला तरी एखाद्या स्त्री ची अभिव्यक्ती वाटते. रांगोळी काढणारा पुरुष जरी असेल तरी त्याच्या मनातल्या तरल भावना त्या रांगोळीत उतरतात. अर्थात नेहेमीच्या रोज काढल्या जाणाऱ्या रांगोळ्या म्हणजे गृहिणीची अभिव्यक्ती का हे मला नाही माहिती. पण अंगण झाडणे, सडा टाकणे, आणि रांगोळी काढणे  माझ्यासाठी एक थेरेपि आहे. आजकाल अपार्टमेंट आणि मोठाल्या इमारतींमुळे अंगण हा भागच नाहीसा झालाय घराचा, पण मागे आम्ही होतो त्या घरी मोठे अंगण होते. तामिळ नाडुत सगळ्या दारासमोर रांगोळी काढल्या जाते. अगदी अपार्टमेंट जरी असेल तरी अपार्टमेंट च्या मोठ्या दारासमोर रांगोळी काढली जातेच. इथल्या गल्ल्यांमध्ये समोरासमोरील घराच्या दारासमोर तर दोन्ही वेळेला रांगोळी काढल्या जाते. सकाळी ६. ०० ते ६.३० च्या दरम्यात सगळ्या स्त्रिया या कामात मग्न दिसतात. पहिले मला फार कुतूहल वाटे. एवढ्या सकाळी उठणे आणि पहिले काम म्हणजे रांगोळी. दिवस कसा  छान सुरु होत असेल असे वाटायचे. लग्न

दलपती - मणी रत्नम चा मास्टरपीस

तामिळ चित्रपटांमध्ये मी सगळ्यात पहिले पाहिलेला चित्रपट म्हणजे दलपती. तामिळ भाषा जरी क्लिष्ट वाटत असली तरी ती सर्वांगसुंदर भाषा आहे. आपण मराठी किंवा इतर भाषिक लोक नेहेमी दक्षिणेकडच्या ४ भाषांची सारख्या वाटतात म्हणून खिल्ली उडवत असतो पण ह्या चारही भाषा कन्नड, तमिळ, तेलगू आणि मल्याळम अतिशय समृद्ध आहेत. चारही भाषांची एक स्वतःची चित्रपट सृष्टी आहे हे महत्वाचे. बाहुबली हे एक उत्तम उदाहरण. बरेच हिंदी चित्रपट, मल्याळम आणि तामिळ चित्रपटांवरून प्रेरित असतात हे सांगणे नं लगे. तर असाच एक १९९०'स मध्ये तयार झालेला चित्रपट दलपती म्हणजे म्होरक्या किंवा प्रमुख किंवा सेनापती.  कर्ण आणि अर्जुन ह्या धर्तीवर आधारित असलेला हा चित्रपट त्याकाळी खूप गाजला होता. मामुटी, रजनीकांत आणि अरविंद स्वामी, शोभना आणि सगळे उत्तम कलाकार. इलैराजा यांचे संगीत आणि संतोष सिवन यांची सिनेमॅटोग्राफी. असे म्हणतात की मणी रत्नम चे सगळे चित्रपट सकाळी चित्रांकित करतात. त्यावेळी अतिशय सुंदर प्रकाश असतो आणि त्याचा पुरेपूर उपयोग ते प्रत्येक शॉट मध्ये करून घेतात. ह्या चित्रपटात ते प्रकर्षाने जाणवते.  मणी रत्नम चे सगळे

दाक्षिणात्य खाद्यसंस्कृती -दोसा

दोसा हा पदार्थ नं आवडणारा माणूस विरळा. माझी आणि दोस्याची ओळख आमच्या शाळेच्या आनंदमेळ्यात झाली होती. एक डोस्याचा स्टॉल होता तिथे, माझ्या बेस्ट फ्रेंड च्या काकी चा. मी नं खाताच गर्दी पाहून मला लक्षात आलं होतं तेव्हा कि काहीतरी स्पेशल आहे दोस्यात. हळूहळू जसे मोठे होत गेलो तसे आई बाबा बाहेर जेवायला घेऊन जायचे, मग खायचे काय तर डोसा, जगत नावाचे नागपूरला खूप प्रसिद्ध हॉटेल होते, अर्थात आता मॉल आणि मोठमोठ्या बिल्डींग्स असलेले नागपूर नव्हते तेव्हा उणीपुरी २ ते ३ फॅमिली रेस्टॉरंट्स. त्यात आर्य भवन एक आणि एक जगत. आई म्हणायची जी वस्तू आपण घरी जास्त करत नाही ती बाहेर खावी. म्हणून मोठ्ठा क्रिस्पि दोसा त्यात बटाट्याची भाजी, सोबत चटण्या. एकदम पोटभर व्हायचा तो मसाला डोसा. मी ९ वी, १० वी त असतांना आई घरीच डोसे करायची. पुढे कॉलेज मध्ये घेल्यावर वगैरे बाहेर खातांना डोसा हा पदार्थ बऱ्याचदा खाल्ल्या जायचा.  आता गेल्या १० वर्षांपासून चेन्नई मध्ये स्थायिक असल्याने, दोसा हा दाक्षिणात्य संस्कृतीचा किती अविभाज्य घटक आहे हे कळून आले. माझ्या घरी डोश्याचे पीठ नाही असा एकही दिवस जात नाही. जसे मराठी घरांत कणिक