Skip to main content

शबरीमलय!

विजयादशमीच्या आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा!!

दक्षिण भारतात आल्यापासुन प्रत्येक चालीरीतींबद्दल दिसागणिक माझं निरीक्षण सुरु आहे अर्थात पहीलेही होतंच पण आता थोडं जास्तं..त्यानुसार इथल्या काही प्रचलित चालीरीतींबद्दल या आणि पुढील लेखांत लिहीणार आहे.

१० दिवसांपूर्वी "इकडली स्वारी" शबरीमलय ला जाऊन आली. लग्नाआधी जेव्हा पहिल्यांदा शाम म्हणाला की मी शबरीमलय ला जाणार आहे तेव्हा मला तो एक्दम काळ्या वेष्टीत खुप सार्या माळा घातलेल्या अवतारात दिसला आणि मी घाबरुन लगेच त्याला नको जाउ असं म्हणाले. शबरीमला ला जाणारी मी पाहीलेली सगळीच पब्लिक काळ्या लुंग्या घालुन अनवणी पायानेच असायची..त्यांचा तो अवतार बघुन हे अय्यप्पा स्वामी म्हणजे काही सोपं प्रकरण नव्हे असं वाटायचं मला.

पण शाम म्हणाला की काळे कपडे घालायची गरज नाही, भगव्या रंगाचं धोतर घालु शकतो आणि कार्यालयात जातांना नेहमीचे कपडॆ आणि अनवाणी न राहता बुट घालता येतॊ. कुठल्याही नेमात अश्या प्रकारे बदल माझ्यासाठी सुखावह होता.

शबरीमलय ला सहसा समुहाने जातात. त्या समुहाच्या म्होरक्याला "गुरुस्वामी" असे म्हणतात. जे पहील्यांदा जातायत त्यांना "कण्णीसामी" (छोटु स्वामी) म्हणतात. सलग तिसर्या वेळी जाणार्याला "मणिकंठन" असे म्हणतात. ज्या तारखेला जायचे ठरते त्या तारखेच्या १५ दिवस किंवा ४२ दिवस आधी गुरुस्वामी सगळ्या इतर स्वामींना रुद्राक्षाची माळ घालतात. त्या दिवसानंतर स्वामी लोकांनी ब्रम्हचर्याचे पालन करणे अपेक्षित असते. त्यांनी घरी शिजवलेलं शाकाहारी अन्नच खाल्लं पाहीजे असा नियम आहे. जी व्यक्ती स्वयंपाक करणार तिने अंघोळ करुनच स्वयंपाक करावा असे अभिप्रेत असते. याव्यतिरिक्त चटई टाकुन खाली झोपणे, कुणालाही वाईट नं बोलणे हे सगळे नियम पाळायचे असतात. याचा अर्थ सगळी उर्जा एकवटुन या यात्रेला प्रारंभ करायचा असतो.

दोन तर्हेच्या रस्त्यांनी शबरीमलय ला जाता येते. चिन्न पादै (छोटा रस्ता )आणि पेरीय पादै (लांब रस्ता). छोट्या रस्त्याने एका विशिष्ट जागेपासुन २ तासात मलय चढता येतो. मोठ्या रस्त्याने एका विशिष्ट जागेपासुन १२ तासात मलय चढता येतो. छोट्या रस्त्याने जातांना पंबा नावाच्या नदीत स्नान करुनच पुढे जाता येते. येथुन १० - ५० वर्षे वयाच्या स्त्रियांचा प्रवेश निषिध्द आहे. मोठ्या रस्त्याने येतांना एरिमेली ला उतरुन पुढे पंबा पर्यंत येऊन अंघोळ करुन पुढे जाता येते. चेन्नई हुन कोट्टायम ला ट्रेन नी जाऊन, पंबा पर्यंत गाडीने जाता येते. पंबाच्या पुढे मात्र कुठ्ल्याही वाहनानी जाता येत नाही. तिथुन पुढे किर्रर्र जंगल आहे. जंगलातल्या पायवाटा तुडवत "स्वामीये अय्यप्पो" चा गजर करत सगळ्यांना पादक्रमण करायचे असते. चेन्नईहुन जातांना इथल्या एका अय्यप्पा स्वामींच्या मंदिरात जाऊन किंवा घरी पुजा करुन घरी डोक्यावर "इरुमुडी" धारण करायची असते. इरुमुडी म्हणजे पिशवी. या पिशवीत घरातल्या प्रत्येकाने टाकलेले मुठ मुठ तांदुळ, मुरमुरे असतात. अय्यप्पा स्वामीच्या अभिषेका करीता एका नारळात १ वाटी तुप भरुन त्याला सील करुन इरुमुडीत ठेवतात. ही इरुमुडी डोक्यावर सतत ठेउनच हा प्रवास करायचा असतो.

अय्यप्पा स्वामींचं जिथे देऊळ आहे त्याला "सन्निधानम" असे म्हणतात. इथे पोचल्यावर देवळात जाण्यासाठी १८ सोन्याच्या पायर्या चढुन जावे लागते. या सोन्याच्या पायर्या चढल्यानंतर मंदीराच्या गाभार्यात प्रत्यक्ष मूर्ती दिसते. ही मुर्ती पंचधातूंची बनलेली असुन यावर तुपाचा अभिषेक केल्यावर ती अजुनच सुंदर दिसते असा प्रत्यक्षदर्शींचा अनुभव आहे.

आजकाल मोबाईल नेटवर्क मुळे जास्तं भिती राहिली नाही. पूर्वी "शबरीमलय" ला जातोय म्हंटलं की लोक घाबरायचे. आजही जिथे हे सगळे लोक वास्तव्य करतात तिथे रात्री फ़टाके लावल्या जातात, हिंस्त्र प्राण्यांपासुन बचाव म्हणुन..

परतल्यावर इरुमुडीतल्या तांदुळाचा "पोंगल" करुन देवाला नैवेद्य दाखवायचा असतो. मला हे सगळे पाहुन विदर्भात लोक महादेवाला जायचे आणि"महादेवाले जातो गा" म्हणुन सांगायचे तेच आठवलं. तेव्हाही लोकं महादेवाहुन परतले की मोठठा उत्सवच साजरा करीत असत. थोड्या फ़ार फ़रकाने प्रथा तीच.....दैवत आणि रुपं वेगवेगळी.. :)

पुढच्या लेखात अय्यप्पा स्वामींबद्दल थोडी माहिती टाकेन.

.

Comments

Popular posts from this blog

दाक्षिणात्य संस्कृती - कोलम (रांगोळी)

दाक्षिणात्य संस्कृती - कोलम (रांगोळी) या पोस्ट मध्ये खाद्यसंस्कृती बद्दल नं सांगता रांगोळ्या आणि तामिळ नाडू यांच्या असलेल्या घट्ट नात्याबद्दल बोलूया. रांगोळी म्हणजे मला तरी एखाद्या स्त्री ची अभिव्यक्ती वाटते. रांगोळी काढणारा पुरुष जरी असेल तरी त्याच्या मनातल्या तरल भावना त्या रांगोळीत उतरतात. अर्थात नेहेमीच्या रोज काढल्या जाणाऱ्या रांगोळ्या म्हणजे गृहिणीची अभिव्यक्ती का हे मला नाही माहिती. पण अंगण झाडणे, सडा टाकणे, आणि रांगोळी काढणे  माझ्यासाठी एक थेरेपि आहे. आजकाल अपार्टमेंट आणि मोठाल्या इमारतींमुळे अंगण हा भागच नाहीसा झालाय घराचा, पण मागे आम्ही होतो त्या घरी मोठे अंगण होते. तामिळ नाडुत सगळ्या दारासमोर रांगोळी काढल्या जाते. अगदी अपार्टमेंट जरी असेल तरी अपार्टमेंट च्या मोठ्या दारासमोर रांगोळी काढली जातेच. इथल्या गल्ल्यांमध्ये समोरासमोरील घराच्या दारासमोर तर दोन्ही वेळेला रांगोळी काढल्या जाते. सकाळी ६. ०० ते ६.३० च्या दरम्यात सगळ्या स्त्रिया या कामात मग्न दिसतात. पहिले मला फार कुतूहल वाटे. एवढ्या सकाळी उठणे आणि पहिले काम म्हणजे रांगोळी. दिवस कसा  छान सुरु होत असेल असे वाटायचे. लग्न

दलपती - मणी रत्नम चा मास्टरपीस

तामिळ चित्रपटांमध्ये मी सगळ्यात पहिले पाहिलेला चित्रपट म्हणजे दलपती. तामिळ भाषा जरी क्लिष्ट वाटत असली तरी ती सर्वांगसुंदर भाषा आहे. आपण मराठी किंवा इतर भाषिक लोक नेहेमी दक्षिणेकडच्या ४ भाषांची सारख्या वाटतात म्हणून खिल्ली उडवत असतो पण ह्या चारही भाषा कन्नड, तमिळ, तेलगू आणि मल्याळम अतिशय समृद्ध आहेत. चारही भाषांची एक स्वतःची चित्रपट सृष्टी आहे हे महत्वाचे. बाहुबली हे एक उत्तम उदाहरण. बरेच हिंदी चित्रपट, मल्याळम आणि तामिळ चित्रपटांवरून प्रेरित असतात हे सांगणे नं लगे. तर असाच एक १९९०'स मध्ये तयार झालेला चित्रपट दलपती म्हणजे म्होरक्या किंवा प्रमुख किंवा सेनापती.  कर्ण आणि अर्जुन ह्या धर्तीवर आधारित असलेला हा चित्रपट त्याकाळी खूप गाजला होता. मामुटी, रजनीकांत आणि अरविंद स्वामी, शोभना आणि सगळे उत्तम कलाकार. इलैराजा यांचे संगीत आणि संतोष सिवन यांची सिनेमॅटोग्राफी. असे म्हणतात की मणी रत्नम चे सगळे चित्रपट सकाळी चित्रांकित करतात. त्यावेळी अतिशय सुंदर प्रकाश असतो आणि त्याचा पुरेपूर उपयोग ते प्रत्येक शॉट मध्ये करून घेतात. ह्या चित्रपटात ते प्रकर्षाने जाणवते.  मणी रत्नम चे सगळे

दाक्षिणात्य खाद्यसंस्कृती -दोसा

दोसा हा पदार्थ नं आवडणारा माणूस विरळा. माझी आणि दोस्याची ओळख आमच्या शाळेच्या आनंदमेळ्यात झाली होती. एक डोस्याचा स्टॉल होता तिथे, माझ्या बेस्ट फ्रेंड च्या काकी चा. मी नं खाताच गर्दी पाहून मला लक्षात आलं होतं तेव्हा कि काहीतरी स्पेशल आहे दोस्यात. हळूहळू जसे मोठे होत गेलो तसे आई बाबा बाहेर जेवायला घेऊन जायचे, मग खायचे काय तर डोसा, जगत नावाचे नागपूरला खूप प्रसिद्ध हॉटेल होते, अर्थात आता मॉल आणि मोठमोठ्या बिल्डींग्स असलेले नागपूर नव्हते तेव्हा उणीपुरी २ ते ३ फॅमिली रेस्टॉरंट्स. त्यात आर्य भवन एक आणि एक जगत. आई म्हणायची जी वस्तू आपण घरी जास्त करत नाही ती बाहेर खावी. म्हणून मोठ्ठा क्रिस्पि दोसा त्यात बटाट्याची भाजी, सोबत चटण्या. एकदम पोटभर व्हायचा तो मसाला डोसा. मी ९ वी, १० वी त असतांना आई घरीच डोसे करायची. पुढे कॉलेज मध्ये घेल्यावर वगैरे बाहेर खातांना डोसा हा पदार्थ बऱ्याचदा खाल्ल्या जायचा.  आता गेल्या १० वर्षांपासून चेन्नई मध्ये स्थायिक असल्याने, दोसा हा दाक्षिणात्य संस्कृतीचा किती अविभाज्य घटक आहे हे कळून आले. माझ्या घरी डोश्याचे पीठ नाही असा एकही दिवस जात नाही. जसे मराठी घरांत कणिक