Skip to main content

हुरहुर...

दिवाळी जवळ येतेय आणि माझं माहेरी जाणंही. या वर्षी सगळेच सण नवे नवे होते. नवी जागा, नवीन प्रथा, नवे लोकं आणि नवी हुरहुर सणासुदीच्या दिवसात कधीही नं लागलेली.

सुरुवात झाली ती गणेशोत्सवाने. इथे गणेशोत्सव जरी असला तरी महाराष्ट्राइतक्या प्रमाणावर साजरी केला जात नाही. गणपतीच्या दहा दिवसांत प्रत्येक दिवशी माझं मन तिथल्या आठवणीने खट्टु होत होतं. गणेशचतुर्थीला २१ दुर्वांच्या २१ जुड्यां तोडायला निघालेली माझी स्वारीच माझ्या डोळ्यापुढे आली. ते एक काम मी फ़ार मनोभावे करत असे. बरं फ़क्त २१ च जुड्या नसायच्या त्यात आजीसाठी एक, बाबांसाठी एक, आईसाठी एक अश्या जास्तंच्या ५ जुड्या तोडाव्या लागायच्या. मग अथर्वशीर्षाचे २१ आवर्तनं. आईने केलेला मोदकांचा नैवेद्य. सगळं सगळं डोळ्यापुढे येत होतं प्रत्येक दिवशी. आई गेली आणि ती करत असलेले सणंही गेले. गणपती बाप्पांना मनोमन पुढच्या वर्षी लवकर या म्हंटले आणि आमच्या घरी नक्की या ही स्पेशल रिक्वेस्ट ही केली..

हरतालिका हे मी तिसरीपासुन करत असलेलं व्रत मी याही वर्षी केलं. माझ्या मनाजोगता नवरा दिल्याबद्दल शिवशंकराचे स्पेशल आभार मानले मी यावेळी; )

विदर्भात महालक्ष्म्यांचा सण खुप मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. सुंदर मुखवटे असलेल्या ज्येष्ठा कनिष्ठांना मी यावेळी मी प्रचंड मिस केलं. आईला कुणी विचारलं तिच्या मुलाबाळांबद्दल की ती आमचा उल्लेख ज्येष्ठा कनिष्ठा असा करत असे. आमच्या घरी महालक्ष्म्या मांडत नसु आम्ही, पण आई ओळखीच्या काकुकडे आणि मामांकडॆ जाऊन ओटी भरत असे. मामांकडल्या मुखवट्यांचे घारे डोळे माझ्यासाठी विशेष आकर्षण असायचे आणि अजुनही आहेत. तिथे जाऊन प्रत्यक्षात त्या मूर्ती बघण्याचा आनंद खरंच मी शब्दात मांडु शकत नाही. महालक्ष्मी पर्सोनिफ़ाईड असं म्हणता येईल कदाचित. असा महालक्ष्मी चा सणही विदर्भात आनंदाने साजरा केल्या गेला. मी नव्हते तिथे पण माझं मन मात्र होत्ं तिथेच छ्कुसोबत ओटी भरतांना.

म्हणता म्हणता नवरात्री येऊन ठेपली. आमची कुलदेवता रेणुकादेवी असल्याने आई घरी घट बसवायची आणि ते ९ दिवस ती सुट्टी घ्यायची म्हणुन आम्ही विशेष खुष असायचो..

लहानपणी आजीकडॆ घट बसायचे नाहीत पण बाजुलाच एक देवीचं देऊळ होतं(आहे) आजोबा देवीच्या देवळात सकाळी पुजा करायला जायचे रोज त्यामुळे तिथेच नवरात्र साजरा करायचो आम्ही. रोज सकाळ संध्याकाळ आरत्या आणि प्रसाद. एका नवरात्रात कुमारिका म्हणुन आजीने दिलेला खण आणि त्याचं शिवलेलं परकर पोलकं मला अजुनही आठवतं. अष्टमीचा उपास आणि नवमीच्या पारण्याच्या नैवेद्यानंतर लगेचच दसरा यायचा. लहानपणी आपट्याच्या पानाला सोनेरी रंग लावायचो मी आणि मामा. आणि ती पानं आपल्या आवडत्या स्पेशल व्यक्तींना द्यायचो. सीमोलंघन करायचो आणि घरी येउन लाकडाच्या तलवारीने तांदुळाचा रावण मारायचो. भारी मज्जा होती सगळी.

इकडे नवरात्रात घट बसवत नाहीत पण "कोलु" नावाचा प्रकार असतो. कोलु म्हणजे ३, ५, ७ या पैकी कितीही पायऱ्या तयार करुन त्यावर पुराणातील कथा लहान लहान बाहुल्यांच्या सहाय्याने मांडायच्या. सगळ्या शक्तींचं प्रतिक म्हणुन कलशही ठेवायचा. त्या कोलुमध्ये मांडलेल्या कथा रोज बदलायच्या म्हणजे ९ दिवसाच्या ९ कथा. लहान मुलांना या सगळ्या पौराणिक कथा समजावण्यासाठी कोलुचा उपयोग होतो असं मला शेजारच्या काकुंनी सांगितलं. मला ही पध्दत खुप आवडली. रोज संध्याकाळी कोलु जवळ बसुन श्लोक म्हणायचे आणि सुंडल(दाक्षिणी पध्दतीचे चणे) चा प्रसाद द्यायचा.

या नवरात्रात सगळ्यात जास्तं मला आठवण आली ती आरत्यांची. इथे कुणीच, कुठल्याही देवळात आरती करतांना दिसत नाही. फ़क्तं काहिसं पुट्पुटत कापुर ओवाळतात. असं अख्ख्या आरतीला गुंडाळण्यात इथल्या पंड्यांना काय मजा येते कुणास ठाऊक. एरवी प्रत्येक गोष्टीत डिटेल मध्ये जाणारे दाक्षिणात्य लोक इथेच कसा काय शॉर्टकट मारतात हे मला कळत नाही.

पुढच्या वर्षी कोलु बसवेनच पण त्याच्यासमोर मोठमोठ्याने अंबाबाईची आरती म्हंटल्याशिवाय राहणार नाही हे मात्र मी मनोमन ठरवले.

दिवाळी आठंच दिवसावर येऊन ठेपलीए. यावेळेस आमची पहीली दिवाळी... नवऱ्याबरोबर साजरा होणारा पहीला दीपोत्सव.. माहेरीच साजरा करायचा असल्याने.. सण वजा सगळ्या सणात वाटलेली हुरहुर..

आजकाल माहेरी जाता जाता चेन्नई सोडतांनाही मला कसंतरी वाटायला लागलं आहे. माहेर, माहेरचे सण आणि तिथली सगळी मंडळी यांचं गुणगान गात गात सासर कधी आपलंसं होउन जातं कळतंच नाही. आणि मग कधीमधी माहेरी असतांनाही आपण सासरचं कौतुक करायला लागतो आपल्या नकळत... :)
सुरुवात झाली ती गणेशोत्सवाने. इथे गणेशोत्सव जरी असला तरी महाराष्ट्राइतक्या प्रमाणावर साजरी केला जात नाही. गणपतीच्या दहा दिवसांत प्रत्येक दिवशी माझं मन तिथल्या आठवणीने खट्टु होत होतं. गणेशचतुर्थीला २१ दुर्वांच्या २१ जुड्यां तोडायला निघालेली माझी स्वारीच माझ्या डोळ्यापुढे आली. ते एक काम मी फ़ार मनोभावे करत असे. बरं फ़क्त २१ च जुड्या नसायच्या त्यात आजीसाठी एक, बाबांसाठी एक, आईसाठी एक अश्या जास्तंच्या ५ जुड्या तोडाव्या लागायच्या. मग अथर्वशीर्षाचे २१ आवर्तनं. आईने केलेला मोदकांचा नैवेद्य. सगळं सगळं डोळ्यापुढे येत होतं प्रत्येक दिवशी. आई गेली आणि ती करत असलेले सणंही गेले. गणपती बाप्पांना मनोमन पुढच्या वर्षी लवकर या म्हंटले आणि आमच्या घरी नक्की या ही स्पेशल रिक्वेस्ट ही केली..
हरतालिका हे मी तिसरीपासुन करत असलेलं व्रत मी याही वर्षी केलं. माझ्या मनाजोगता नवरा दिल्याबद्दल शिवशंकराचे स्पेशल आभार मानले मी यावेळी; )
हालक्ष्म्यांचा सण खुप मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. सुंदर मुखवटे असलेल्या ज्येष्ठा कनिष्ठांना मी यावेळी मी प्रचंड मिस केलं. आईला कुणी विचारलं तिच्या मुलाबाळांबद्दल की ती आमचा उल्लेख ज्येष्ठा कनिष्ठा असा करत असे. आमच्या घरी महालक्ष्म्या मांडत नसु आम्ही, पण आई ओळखीच्या काकुकडे आणि मामांकडॆ जाऊन ओटी भरत असे. मामांकडल्या मुखवट्यांचे घारे डोळे माझ्यासाठी विशेष आकर्षण असायचे आणि अजुनही आहेत. तिथे जाऊन प्रत्यक्षात त्या मूर्ती बघण्याचा आनंद खरंच मी शब्दात मांडु शकत नाही. महालक्ष्मी पर्सोनिफ़ाईड असं म्हणता येईल कदाचित. असा महालक्ष्मी चा सणही विदर्भात आनंदाने साजरा केल्या गेला. मी नव्हते तिथे पण माझं मन मात्र होत्ं तिथेच छ्कुसोबत ओटी भरतांना.
म्हणता म्हणता नवरात्री येऊन ठेपली. आमची कुलदेवता रेणुकादेवी असल्याने आई घरी घट बसवायची आणि ते ९ दिवस ती सुट्टी घ्यायची म्हणुन आम्ही विशेष खुष असायचो..
लहानपणी आजीकडॆ घट बसायचे नाहीत पण बाजुलाच एक देवीचं देऊळ होतं(आहे) आजोबा देवीच्या देवळात सकाळी पुजा करायला जायचे रोज त्यामुळे तिथेच नवरात्र साजरा करायचो आम्ही. रोज सकाळ संध्याकाळ आरत्या आणि प्रसाद. एका नवरात्रात कुमारिका म्हणुन आजीने दिलेला खण आणि त्याचं शिवलेलं परकर पोलकं मला अजुनही आठवतं. अष्टमीचा उपास आणि नवमीच्या पारण्याच्या नैवेद्यानंतर लगेचच दसरा यायचा. लहानपणी आपट्याच्या पानाला सोनेरी रंग लावायचो मी आणि मामा. आणि ती पानं आपल्या आवडत्या स्पेशल व्यक्तींना द्यायचो. सीमोलंघन करायचो आणि घरी येउन लाकडाच्या तलवारीने तांदुळाचा रावण मारायचो. भारी मज्जा होती सगळी.
इकडे नवरात्रात घट बसवत नाहीत पण "कोलु" नावाचा प्रकार असतो. कोलु म्हणजे ३, ५, ७ या पैकी कितीही पायऱ्या तयार करुन त्यावर पुराणातील कथा लहान लहान बाहुल्यांच्या सहाय्याने मांडायच्या. सगळ्या शक्तींचं प्रतिक म्हणुन कलशही ठेवायचा. त्या कोलुमध्ये मांडलेल्या कथा रोज बदलायच्या म्हणजे ९ दिवसाच्या ९ कथा. लहान मुलांना या सगळ्या पौराणिक कथा समजावण्यासाठी कोलुचा उपयोग होतो असं मला शेजारच्या काकुंनी सांगितलं. मला ही पध्दत खुप आवडली. रोज संध्याकाळी कोलु जवळ बसुन श्लोक म्हणायचे आणि सुंडल(दाक्षिणी पध्दतीचे चणे) चा प्रसाद द्यायचा.
या नवरात्रात सगळ्यात जास्तं मला आठवण आली ती आरत्यांची. इथे कुणीच, कुठल्याही देवळात आरती करतांना दिसत नाही. फ़क्तं काहिसं पुट्पुटत कापुर ओवाळतात. असं अख्ख्या आरतीला गुंडाळण्यात इथल्या पंड्यांना काय मजा येते कुणास ठाऊक. एरवी प्रत्येक गोष्टीत डिटेल मध्ये जाणारे दाक्षिणात्य लोक इथेच कसा काय शॉर्टकट मारतात हे मला कळत नाही.
पुढच्या वर्षी कोलु बसवेनच पण त्याच्यासमोर मोठमोठ्याने अंबाबाईची आरती म्हंटल्याशिवाय राहणार नाही हे मात्र मी मनोमन ठरवले.
दिवाळी आठंच दिवसावर येऊन ठेपलीए. यावेळेस आमची पहीली दिवाळी... नवऱ्याबरोबर साजरा होणारा पहीला दीपोत्सव.. माहेरीच साजरा करायचा असल्याने.. सण वजा सगळ्या सणात वाटलेली हुरहुर..
आजकाल माहेरी जाता जाता चेन्नई सोडतांनाही मला कसंतरी वाटायला लागलं आहे. माहेर, माहेरचे सण आणि तिथली सगळी मंडळी यांचं गुणगान गात गात सासर कधी आपलंसं होउन जातं कळतंच नाही. आणि मग कधीमधी माहेरी असतांनाही आपण सासरचं कौतुक करायला लागतो आपल्या नकळत... :दिवाळी जवळ येतेय आणि माझं माहेरी जाणंही. या वर्षी सगळेच सण नवे नवे होते. नवी जागा, नवीन प्रथा, नवे लोकं आणि नवी हुरहुर सणासुदीच्या दिवसात कधीही नं लागलेली.
सुरुवात झाली ती गणेशोत्सवाने. इथे गणेशोत्सव जरी असला तरी महाराष्ट्राइतक्या प्रमाणावर साजरी केला जात नाही. गणपतीच्या दहा दिवसांत प्रत्येक दिवशी माझं मन तिथल्या आठवणीने खट्टु होत होतं. गणेशचतुर्थीला २१ दुर्वांच्या २१ जुड्यां तोडायला निघालेली माझी स्वारीच माझ्या डोळ्यापुढे आली. ते एक काम मी फ़ार मनोभावे करत असे. बरं फ़क्त २१ च जुड्या नसायच्या त्यात आजीसाठी एक, बाबांसाठी एक, आईसाठी एक अश्या जास्तंच्या ५ जुड्या तोडाव्या लागायच्या. मग अथर्वशीर्षाचे २१ आवर्तनं. आईने केलेला मोदकांचा नैवेद्य. सगळं सगळं डोळ्यापुढे येत होतं प्रत्येक दिवशी. आई गेली आणि ती करत असलेले सणंही गेले. गणपती बाप्पांना मनोमन पुढच्या वर्षी लवकर या म्हंटले आणि आमच्या घरी नक्की या ही स्पेशल रिक्वेस्ट ही केली..
हरतालिका हे मी तिसरीपासुन करत असलेलं व्रत मी याही वर्षी केलं. माझ्या मनाजोगता नवरा दिल्याबद्दल शिवशंकराचे स्पेशल आभार मानले मी यावेळी; )
विदर्भात महालक्ष्म्यांचा सण खुप मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. सुंदर मुखवटे असलेल्या ज्येष्ठा कनिष्ठांना मी यावेळी मी प्रचंड मिस केलं. आईला कुणी विचारलं तिच्या मुलाबाळांबद्दल की ती आमचा उल्लेख ज्येष्ठा कनिष्ठा असा करत असे. आमच्या घरी महालक्ष्म्या मांडत नसु आम्ही, पण आई ओळखीच्या काकुकडे आणि मामांकडॆ जाऊन ओटी भरत असे. मामांकडल्या मुखवट्यांचे घारे डोळे माझ्यासाठी विशेष आकर्षण असायचे आणि अजुनही आहेत. तिथे जाऊन प्रत्यक्षात त्या मूर्ती बघण्याचा आनंद खरंच मी शब्दात मांडु शकत नाही. महालक्ष्मी पर्सोनिफ़ाईड असं म्हणता येईल कदाचित. असा महालक्ष्मी चा सणही विदर्भात आनंदाने साजरा केल्या गेला. मी नव्हते तिथे पण माझं मन मात्र होत्ं तिथेच छ्कुसोबत ओटी भरतांना.
म्हणता म्हणता नवरात्री येऊन ठेपली. आमची कुलदेवता रेणुकादेवी असल्याने आई घरी घट बसवायची आणि ते ९ दिवस ती सुट्टी घ्यायची म्हणुन आम्ही विशेष खुष असायचो..
लहानपणी आजीकडॆ घट बसायचे नाहीत पण बाजुलाच एक देवीचं देऊळ होतं(आहे) आजोबा देवीच्या देवळात सकाळी पुजा करायला जायचे रोज त्यामुळे तिथेच नवरात्र साजरा करायचो आम्ही. रोज सकाळ संध्याकाळ आरत्या आणि प्रसाद. एका नवरात्रात कुमारिका म्हणुन आजीने दिलेला खण आणि त्याचं शिवलेलं परकर पोलकं मला अजुनही आठवतं. अष्टमीचा उपास आणि नवमीच्या पारण्याच्या नैवेद्यानंतर लगेचच दसरा यायचा. लहानपणी आपट्याच्या पानाला सोनेरी रंग लावायचो मी आणि मामा. आणि ती पानं आपल्या आवडत्या स्पेशल व्यक्तींना द्यायचो. सीमोलंघन करायचो आणि घरी येउन लाकडाच्या तलवारीने तांदुळाचा रावण मारायचो. भारी मज्जा होती सगळी.
इकडे नवरात्रात घट बसवत नाहीत पण "कोलु" नावाचा प्रकार असतो. कोलु म्हणजे ३, ५, ७ या पैकी कितीही पायऱ्या तयार करुन त्यावर पुराणातील कथा लहान लहान बाहुल्यांच्या सहाय्याने मांडायच्या. सगळ्या शक्तींचं प्रतिक म्हणुन कलशही ठेवायचा. त्या कोलुमध्ये मांडलेल्या कथा रोज बदलायच्या म्हणजे ९ दिवसाच्या ९ कथा. लहान मुलांना या सगळ्या पौराणिक कथा समजावण्यासाठी कोलुचा उपयोग होतो असं मला शेजारच्या काकुंनी सांगितलं. मला ही पध्दत खुप आवडली. रोज संध्याकाळी कोलु जवळ बसुन श्लोक म्हणायचे आणि सुंडल(दाक्षिणी पध्दतीचे चणे) चा प्रसाद द्यायचा.
या नवरात्रात सगळ्यात जास्तं मला आठवण आली ती आरत्यांची. इथे कुणीच, कुठल्याही देवळात आरती करतांना दिसत नाही. फ़क्तं काहिसं पुट्पुटत कापुर ओवाळतात. असं अख्ख्या आरतीला गुंडाळण्यात इथल्या पंड्यांना काय मजा येते कुणास ठाऊक. एरवी प्रत्येक गोष्टीत डिटेल मध्ये जाणारे दाक्षिणात्य लोक इथेच कसा काय शॉर्टकट मारतात हे मला कळत नाही.
पुढच्या वर्षी कोलु बसवेनच पण त्याच्यासमोर मोठमोठ्याने अंबाबाईची आरती म्हंटल्याशिवाय राहणार नाही हे मात्र मी मनोमन ठरवले.
दिवाळी आठंच दिवसावर येऊन ठेपलीए. यावेळेस आमची पहीली दिवाळी... नवऱ्याबरोबर साजरा होणारा पहीला दीपोत्सव.. माहेरीच साजरा करायचा असल्याने.. सण वजा सगळ्या सणात वाटलेली हुरहुर..
आजकाल माहेरी जाता जाता चेन्नई सोडतांनाही मला कसंतरी वाटायला लागलं आहे. माहेर, माहेरचे सण आणि तिथली सगळी मंडळी यांचं गुणगान गात गात सासर कधी आपलंसं होउन जातं कळतंच नाही. आणि मग कधीमधी माहेरी असतांनाही आपण सासरचं कौतुक करायला लागतो आपल्या नकळत... :)

Comments

  1. chennai madhye hi ganeshtosav sajaraa hoto ? mala kharach mahit navta

    ReplyDelete
  2. छान झालाय गं लेख... तुझा लेख वाचता वाचता मी पण मनाने माहेरी एक चक्कर मारुन आले...

    ReplyDelete
  3. Chan jhaalay lekh....maaher chi aathavan kadhatana aapan kadhi sasarache houn jato kalat nahi....agadi kharay!!!

    ReplyDelete
  4. चला, लेखाचा उद्देश साध्य झाला म्हणायचा :)

    ReplyDelete
  5. हो गणपती उत्सव चेन्नईत पण साजरा करतात. नवरात्री सुद्धा...

    ReplyDelete
  6. धन्यवाद तन्वी....अशीच भेट देत रहा......

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

दाक्षिणात्य संस्कृती - कोलम (रांगोळी)

दाक्षिणात्य संस्कृती - कोलम (रांगोळी) या पोस्ट मध्ये खाद्यसंस्कृती बद्दल नं सांगता रांगोळ्या आणि तामिळ नाडू यांच्या असलेल्या घट्ट नात्याबद्दल बोलूया. रांगोळी म्हणजे मला तरी एखाद्या स्त्री ची अभिव्यक्ती वाटते. रांगोळी काढणारा पुरुष जरी असेल तरी त्याच्या मनातल्या तरल भावना त्या रांगोळीत उतरतात. अर्थात नेहेमीच्या रोज काढल्या जाणाऱ्या रांगोळ्या म्हणजे गृहिणीची अभिव्यक्ती का हे मला नाही माहिती. पण अंगण झाडणे, सडा टाकणे, आणि रांगोळी काढणे  माझ्यासाठी एक थेरेपि आहे. आजकाल अपार्टमेंट आणि मोठाल्या इमारतींमुळे अंगण हा भागच नाहीसा झालाय घराचा, पण मागे आम्ही होतो त्या घरी मोठे अंगण होते. तामिळ नाडुत सगळ्या दारासमोर रांगोळी काढल्या जाते. अगदी अपार्टमेंट जरी असेल तरी अपार्टमेंट च्या मोठ्या दारासमोर रांगोळी काढली जातेच. इथल्या गल्ल्यांमध्ये समोरासमोरील घराच्या दारासमोर तर दोन्ही वेळेला रांगोळी काढल्या जाते. सकाळी ६. ०० ते ६.३० च्या दरम्यात सगळ्या स्त्रिया या कामात मग्न दिसतात. पहिले मला फार कुतूहल वाटे. एवढ्या सकाळी उठणे आणि पहिले काम म्हणजे रांगोळी. दिवस कसा  छान सुरु होत असेल असे वाटायचे. लग्न

दलपती - मणी रत्नम चा मास्टरपीस

तामिळ चित्रपटांमध्ये मी सगळ्यात पहिले पाहिलेला चित्रपट म्हणजे दलपती. तामिळ भाषा जरी क्लिष्ट वाटत असली तरी ती सर्वांगसुंदर भाषा आहे. आपण मराठी किंवा इतर भाषिक लोक नेहेमी दक्षिणेकडच्या ४ भाषांची सारख्या वाटतात म्हणून खिल्ली उडवत असतो पण ह्या चारही भाषा कन्नड, तमिळ, तेलगू आणि मल्याळम अतिशय समृद्ध आहेत. चारही भाषांची एक स्वतःची चित्रपट सृष्टी आहे हे महत्वाचे. बाहुबली हे एक उत्तम उदाहरण. बरेच हिंदी चित्रपट, मल्याळम आणि तामिळ चित्रपटांवरून प्रेरित असतात हे सांगणे नं लगे. तर असाच एक १९९०'स मध्ये तयार झालेला चित्रपट दलपती म्हणजे म्होरक्या किंवा प्रमुख किंवा सेनापती.  कर्ण आणि अर्जुन ह्या धर्तीवर आधारित असलेला हा चित्रपट त्याकाळी खूप गाजला होता. मामुटी, रजनीकांत आणि अरविंद स्वामी, शोभना आणि सगळे उत्तम कलाकार. इलैराजा यांचे संगीत आणि संतोष सिवन यांची सिनेमॅटोग्राफी. असे म्हणतात की मणी रत्नम चे सगळे चित्रपट सकाळी चित्रांकित करतात. त्यावेळी अतिशय सुंदर प्रकाश असतो आणि त्याचा पुरेपूर उपयोग ते प्रत्येक शॉट मध्ये करून घेतात. ह्या चित्रपटात ते प्रकर्षाने जाणवते.  मणी रत्नम चे सगळे

दाक्षिणात्य खाद्यसंस्कृती -दोसा

दोसा हा पदार्थ नं आवडणारा माणूस विरळा. माझी आणि दोस्याची ओळख आमच्या शाळेच्या आनंदमेळ्यात झाली होती. एक डोस्याचा स्टॉल होता तिथे, माझ्या बेस्ट फ्रेंड च्या काकी चा. मी नं खाताच गर्दी पाहून मला लक्षात आलं होतं तेव्हा कि काहीतरी स्पेशल आहे दोस्यात. हळूहळू जसे मोठे होत गेलो तसे आई बाबा बाहेर जेवायला घेऊन जायचे, मग खायचे काय तर डोसा, जगत नावाचे नागपूरला खूप प्रसिद्ध हॉटेल होते, अर्थात आता मॉल आणि मोठमोठ्या बिल्डींग्स असलेले नागपूर नव्हते तेव्हा उणीपुरी २ ते ३ फॅमिली रेस्टॉरंट्स. त्यात आर्य भवन एक आणि एक जगत. आई म्हणायची जी वस्तू आपण घरी जास्त करत नाही ती बाहेर खावी. म्हणून मोठ्ठा क्रिस्पि दोसा त्यात बटाट्याची भाजी, सोबत चटण्या. एकदम पोटभर व्हायचा तो मसाला डोसा. मी ९ वी, १० वी त असतांना आई घरीच डोसे करायची. पुढे कॉलेज मध्ये घेल्यावर वगैरे बाहेर खातांना डोसा हा पदार्थ बऱ्याचदा खाल्ल्या जायचा.  आता गेल्या १० वर्षांपासून चेन्नई मध्ये स्थायिक असल्याने, दोसा हा दाक्षिणात्य संस्कृतीचा किती अविभाज्य घटक आहे हे कळून आले. माझ्या घरी डोश्याचे पीठ नाही असा एकही दिवस जात नाही. जसे मराठी घरांत कणिक