Skip to main content

रिऍलिटी शोज

रिऍलिटी शोज आजकाल भारतात चांगल्यापैकी चालतात. मला हे शोज कुठुन सुरु झाले वगैरे माहित नाही पण केवळ उत्सुकतेपायी मी ही काल परवा पासुन "बिग बॉस" बघायला लागले आहे (हे माझं प्रामाणिक कन्फ़ेशन!).काही गोष्टी तश्या अमेरिका किंवा तसल्या विकसित देशातील लोकांनाच शोभुन दिसतात हे माझे मत होऊ लागले आहे हल्ली.

या सगळ्या शोज चं एक अवलोकन केलं असता पाश्चात्यांनी त्यांची मनोवृत्ती,कुटुंबसंस्था, राहणीमान, संस्कृती, नवरा बायकोचे मुलांचे एकमेकांसोबत असलेले नाते, शिक्षण पध्दती या सगळ्यां गोष्टी सुधारण्यासाठी कदाचित या शोज चा अवलंब केला असावा असे मला वाटते. आणि त्यानुसार हे जे शोज आहेत त्यामध्ये टी आर पी ह्याच एका मुद्द्याचा विचार नं करता बाकी सगळ्या मनोवृत्ती,कुटुंबसंस्था इ इ गोष्टी अगदी जाणीवपूर्वक नीट हाताळल्या गेल्या आहेत. कदाचित कुटुंब, विवाहसंस्था इ इ गोष्टी टिकवुन ठेवणे ही काळाची गरज आहे असे त्यांना वाटले असावे. टी व्ही हेच लोकांना प्रबोधित करण्याचे साधन आहे म्हणुन हे शोज सुरु केले असावेत. अर्थात मी ह्या सगळयाचा खुप सकारात्मक विचार करतेय पण या निमित्ताने का होईना लोक त्यांच्या नातेसंबंधाबद्दल, मनोवृत्तीबद्दल विचार करायला लागतील किंवा लागले असतील . तर एकुण रिऍलिटी शोज हा पाश्चात्य रिऍलिटीच्या दृष्टीकोनातुन विचार केला असता चांगला प्रकार आहे.

जे काही पाश्चात्य देशात चालते ते भारतात तर चाललेच पाहिजे ह्या नियमाचा अवलंब करत आपणही ह्या सगळ्या रिऍलिटी शोज चं तंतोतंत अनुकरण करत आलो आहोत. अगदी "कौन बनेगा करोडपती" पासुन " पती पत्नी और वो" पर्यंत. पण भारतात आणि पाश्चात्य देशात खरंच तंतोतंत अनुकरण करण्याएवढं साम्य आहे का? हा विचार करायला आपण विसरलोय कदाचित. जो कार्यक्रम तिकडे प्रबोधन (चु.भु.दे.घे) करण्यास उपयुक्त ठरु शकतो तोच कार्यक्रम इथेही प्रबोधन करु शकेल का? हा विचार कुणीही केलेला दिसतंच नाहीए. मुळात ह्या शोज चा पर्पज काय आहे? आपण का म्हणुन हे सगळे शोज टी.व्ही वर दाखवतोय याचं कुणी नीट उत्तर देऊ शकेल असं मला वाटत नाही. हे शोज दाखवल्याने वाहिन्यांचं टी.आर.पी रेटींग वाढतं आणि फोन कंपन्यांचा फ़ायदा होतो एवढंच काय ते ध्यानात येतं माझ्या.

भारतातील परिस्थिती चा विचार करता आज अश्या कितीतरी समस्या आ वासुन उभ्या आहेत ज्याबद्दल आपण टि.व्ही द्वारे लोकांपर्यंत पोहचु शकतो. टि.व्ही हे फ़कतं मनोरंजनाचे साधन नं होता त्याद्वारे लोकांना माहीती देता आली, त्यांचे विचार बदलता आले तर किती बरे होईल याचा सगळ्या निष्णात क्रिएटीव्ह डायरेक्टर्स नी विचार केला पाहीजे.

एखादी मालिका अशी का असु शकत नाही जिथे लोक आपल्या नेत्याला त्यानी केलेल्या कार्याबद्दल प्रश्न विचारु शकतील (आप की अदालत किंवा रुबरु टाईप), एखाद्या सामान्य माणसावर किंवा शेतकर्यांवर असलेलं कर्ज मुक्तीचा एखादा कार्यक्रम का असु शकत नाही? झी मराठीने "हफ़्ता बंद" ही मालिका सुरु करुन खरंच या दृष्टीने पाऊल उचललं आहे असं मला मनापासुन वाटतं. विशेषतः हे सगळे कार्यक्रम जनतेला विचारुनच करावे म्हणजे टी आर पी पण उच्चच राहील.

एखादा असाही कार्यक्रम असु शकेल जिथे वयोवृध्द माणसे आपल्या आठवणी, त्यांच्या आयुष्यात आलेले चांगले क्षण आपल्याला सांगु शकतील. त्यांच्याजवळ आपल्याला समृद्ध करणारे बरेच काही असते असे मला नेहमी वाटत आले आहे. ह्या कार्यक्रमाने त्यांचे दुरावलेले नातेवाईक त्यांच्या जवळ आणण्याचा प्रयत्न पण आपण करु शकतो.

एखाद्या गृहीणीचं तिच्या घराबद्दल कामाबद्दलचं मनोगत, तिला घरच्यांच मिळणारं सहकार्य ह्यावरही एखादा रिऍलिटी शो होऊ शकतो नाही का?

मुळात रिऍलिटी शो मधली रिऍलिटी विसरुन आपण बघतोय तो निव्वळ कुणी तरी आव आणल्याचा शो आहे असं मला वाटते. गरज आहे ती भारतातील वास्तव (रिऍलिटी) जाणायची....आणि आपण भारतीय आहोत ह्याची पुन्हा एकदा स्वतःला जाणीव करुन द्यायची..
जे काही पाश्चात्य देशात चालते ते भारतात तर चाललेच पाहिजे ह्या नियमाचा अवलंब करत आपणही ह्या सगळ्या रिऍलिटी शोज चं तंतोतंत अनुकरण करत आलो आहोत. अगदी "कौन बनेगा करोडपती" पासुन " पती पत्नी और वो" पर्यंत. पण भारतात आणि पाश्चात्य देशात खरंच तंतोतंत अनुकरण करण्याएवढं साम्य आहे का? हा विचार करायला आपण विसरलोय कदाचित. जो कार्यक्रम तिकडे प्रबोधन (चु.भु.दे.घे) करण्यास उपयुक्त ठरु शकतो तोच कार्यक्रम इथेही प्रबोधन करु शकेल का? हा विचार कुणीही केलेला दिसतंच नाहीए. मुळात ह्या शोज चा पर्पज काय आहे? आपण का म्हणुन हे सगळे शोज टी.व्ही वर दाखवतोय याचं कुणी नीट उत्तर देऊ शकेल असं मला वाटत नाही. हे शोज दाखवल्याने वाहिन्यांचं टी.आर.पी रेटींग वाढतं आणि फोन कंपन्यांचा फ़ायदा होतो एवढंच काय ते ध्यानात येतं माझ्या.

मुळात रिऍलिटी शो मधली रिऍलिटी विसरुन आपण बघतोय तो निव्वळ कुणी तरी आव आणल्याचा शो आहे असं मला वाटते. गरज आहे ती भारतातील वास्तव (रिऍलिटी) जाणायची....आणि आपण भारतीय आहोत ह्याची पुन्हा एकदा स्वतःला जाणीव करुन द्यायची..

Comments

  1. मी सध्या 'लक्स परफेक्ट ब्राईड' नावाचा स्टार-प्लस वरचा रिऍलिटी शो बघतो आहे. जाम आवडलाय मला हा कार्यक्रम. एकही भाग बुडवला नाही, एखादा चुकलाच तर दुसऱ्या दिवशी भल्या पहाटे यु-ट्युब वर बघतो. तसा गर्ली आहे कार्यक्रम, पण का कुणास ठाऊक, आवडला मला.

    ReplyDelete
  2. मिळालीए नं तुला पर्फ़ेक्ट ब्राईड मग आता काय बघतोय??
    बादवे, काही रीशो अगदीच फ़ालतू असतात रे..पती पत्नी और वो बघ एकदा...पुन्हा कधीही बघणार नाहीस..:)

    ReplyDelete
  3. "रिऍलिटी शो"बद्दल मी पूर्वी एक लेख लिहिला होत - http://pumanohar.blogspot.com/2008/06/blog-post_29.html

    अर्थात, तुमच्या लेखाचा आशय वेगळा आहे.
    तुम्ही मांडलेले मुद्देही महत्त्वाचे आहेत. दुर्दैवाने आपल्याकडे पाश्चात्यांचं अंधानुकरण करणं कधी बंद होईल हे आज तरी स्वप्नवत् वाटतं. :(

    ReplyDelete
  4. हाभारतात द्रौपदी वस्त्रहरण झालं, इथे कलोपासनेचं वस्त्रहरण होतंय>> agadi sahamat..
    छान लिहिलंत तुम्ही..
    मी काय किंवा तुम्ही काय या विषयाबद्दल फ़कत आपली तळमळ व्यक्त करु शकतो..बाकी काही करु शकत नाही ह्याची मला जास्तं खंत आहे..
    माझ्या blog ला भेट दिल्याबद्दल धन्यवाद..

    ReplyDelete
  5. तुम्ही मांडलेले विचार खूप चांगले आहेत. टी.व्ही. चॅनल वाल्यांनी आता तुमच्या ब्लॉगसारखे ब्लॉग वाचायला सुरूवात करावी. त्यांना नवीन आणि विधायक कल्पना मिळतील. दोनच दिवसांपूर्वी मी सुद्धा टी.व्ही पहाण्यास सुरूवात केली पण अजून डिस्कव्हरी आणि नॅट जिओ पलिकडे जास्त सरकता आलेलं नाही.

    ReplyDelete
  6. कुठल्याही गोष्टीचे अतिशय चीप पध्दतीने अंधानुकरण करायचे आणि लोकांच्या माथी मारायचे. टिव्ही वाल्यांना आजकाल कशाचाच धरबंद उरलेला नाही. ’ अडोस पडोस ’ ’कच्ची धूप’ ’बुनियाद’ ’ आप की अदालत ’ ’प्रतिभा आणि प्रतिमा ’ अजूनही खूप चांगल्या सिरीयल्स होत्या, असे आज का नाही बर काढत? का निर्मितीचा बाजच बदलला आहे? लोकांची अभिरूची जर या अशा मूठभर लोकांमुळे बदलू शकते हे मला मूळीच पटत नाही. मग हे मिडीयावाले अशा अंत्यत हीन दर्जाच्या गोष्टी का आपल्या माथी मारत आहेत कोण जाणे. आपल्या समाजजीवन पध्दती व आपली मनोधारणा यांना पुरक गोष्टी दाखवायला हव्यात ना. तुझे म्हणणे एकदम बरोबर, ज्याने बाहेरील देशात प्रबोधन होऊ शकेल त्याने आपल्याकडेही ते होऊ शकेलच का? हा विचार कोणी करतच नाहीत. ’ रजनी ’ ही सिरीयल नंतर नंतर थोडी भडक झाली तरीही निदान त्यांचा मूळ दृष्टीकोन चांगला होता. मी संपूर्णपणे सहमत आहे तुझ्या मतांशी.
    लेख आवडला.

    ReplyDelete
  7. Mugdha, Aple lekh farach chan asatat, vachavayas avadate....
    Your webpage doesnot load widgets or there is any problem with the wordpress,
    It is because previously when i saw ur page it looks differant. But now it feedback in differant manner? why? Yesterday also the massage box comes before your posts and not to the left side bar....
    However
    Asech lekh lihit raha...
    chan

    ReplyDelete
  8. आपण फ़क्तं असं काही लिहुन आपली तळमळ व्यक्तं करु शकतो अजुन काही नाही.."डिस्कव्हरी आणि नॅट जिओ " च बघा अजुन काही बघण्यासारखे नाही.
    प्रतिसादाबद्दल खुप खुप धन्यवाद!

    ReplyDelete
  9. धन्यवाद भाग्यश्री..
    बर्याच मालिका ज्या खुप सेन्सिबल होत्या. नुक्कड्, सैलाब, स्पर्श, सर्कस, हम लोग, तलाश आणि अजुनही कितीतरी.
    हाताबाहेर गेलंय सगळं आता असं वाटत राहतं सारखं.
    ह्या अश्या रिऍलिटी शोज मध्येच भाग घेउन आपले पोट भरणार्या सेलिब्रिटिज ची संख्या वाढायला लागली आहे आता. एखाद्या सिनेमात काम करा आणि ह्या सगळया रिऍलिटी शोज मध्ये एका मागुन एक भाग घ्या. बस्स सगळ्या वर्षाचा खर्च भागतो नाही का?
    असो..

    ReplyDelete
  10. धन्यवाद परेश,
    मी माझ्या blog चं थिम बदलत असते त्यामुळे असा problem होऊ शकतो कदाचित. आता सुधारलीए चुक. अजुनही नीट नसेल दिसत तर नक्की सांगा.
    अशीच भेट देत रहा..

    ReplyDelete
  11. Disagree, Animal Planet, Travel & Living are also too good IMHO

    ReplyDelete
  12. राखीने निराशा केली. कित्ती आवडली होती मला ती आणि तो 'इलेश पारुजानवाला' 'राखी का स्वयंवर' मध्ये, इथे किती पकवतात पण.

    अगदीच सगळे शो बकवास असतात अश्यातला भाग नाही, पोगो वरचा 'होल इन द वॉल' बरा आहे.

    सगळ्यात पहिला रिऍलिटी शो..'स्नेक्स ऍन्ड लॅडर' झि-टिव्ही वरचा पण ज़क्कास होता. 'अब मिलते है ब्रेक के बाद' ची कन्स्पेट तेथुनच तर सुरु झाली, AXN वरचा 'अमेझींग रेस' कध्धीच बघीतला नसशील तर बघत जा, धम्माल-मस्त शो आहे बघ.

    ReplyDelete
  13. सगळेच बकवास असतात असं म्हणत नाहिए मी...राखी प्रकरण तर माझ्या आकलना पलिकडे आहे..
    सांपसिढी..मस्तंच होता शो...जरा असं काही सेंसिबल दाखवावं हीच एकमेव इच्छा!!! ;)

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

दाक्षिणात्य संस्कृती - कोलम (रांगोळी)

दाक्षिणात्य संस्कृती - कोलम (रांगोळी) या पोस्ट मध्ये खाद्यसंस्कृती बद्दल नं सांगता रांगोळ्या आणि तामिळ नाडू यांच्या असलेल्या घट्ट नात्याबद्दल बोलूया. रांगोळी म्हणजे मला तरी एखाद्या स्त्री ची अभिव्यक्ती वाटते. रांगोळी काढणारा पुरुष जरी असेल तरी त्याच्या मनातल्या तरल भावना त्या रांगोळीत उतरतात. अर्थात नेहेमीच्या रोज काढल्या जाणाऱ्या रांगोळ्या म्हणजे गृहिणीची अभिव्यक्ती का हे मला नाही माहिती. पण अंगण झाडणे, सडा टाकणे, आणि रांगोळी काढणे  माझ्यासाठी एक थेरेपि आहे. आजकाल अपार्टमेंट आणि मोठाल्या इमारतींमुळे अंगण हा भागच नाहीसा झालाय घराचा, पण मागे आम्ही होतो त्या घरी मोठे अंगण होते. तामिळ नाडुत सगळ्या दारासमोर रांगोळी काढल्या जाते. अगदी अपार्टमेंट जरी असेल तरी अपार्टमेंट च्या मोठ्या दारासमोर रांगोळी काढली जातेच. इथल्या गल्ल्यांमध्ये समोरासमोरील घराच्या दारासमोर तर दोन्ही वेळेला रांगोळी काढल्या जाते. सकाळी ६. ०० ते ६.३० च्या दरम्यात सगळ्या स्त्रिया या कामात मग्न दिसतात. पहिले मला फार कुतूहल वाटे. एवढ्या सकाळी उठणे आणि पहिले काम म्हणजे रांगोळी. दिवस कसा  छान सुरु होत असेल असे वाटायचे. लग्न

दलपती - मणी रत्नम चा मास्टरपीस

तामिळ चित्रपटांमध्ये मी सगळ्यात पहिले पाहिलेला चित्रपट म्हणजे दलपती. तामिळ भाषा जरी क्लिष्ट वाटत असली तरी ती सर्वांगसुंदर भाषा आहे. आपण मराठी किंवा इतर भाषिक लोक नेहेमी दक्षिणेकडच्या ४ भाषांची सारख्या वाटतात म्हणून खिल्ली उडवत असतो पण ह्या चारही भाषा कन्नड, तमिळ, तेलगू आणि मल्याळम अतिशय समृद्ध आहेत. चारही भाषांची एक स्वतःची चित्रपट सृष्टी आहे हे महत्वाचे. बाहुबली हे एक उत्तम उदाहरण. बरेच हिंदी चित्रपट, मल्याळम आणि तामिळ चित्रपटांवरून प्रेरित असतात हे सांगणे नं लगे. तर असाच एक १९९०'स मध्ये तयार झालेला चित्रपट दलपती म्हणजे म्होरक्या किंवा प्रमुख किंवा सेनापती.  कर्ण आणि अर्जुन ह्या धर्तीवर आधारित असलेला हा चित्रपट त्याकाळी खूप गाजला होता. मामुटी, रजनीकांत आणि अरविंद स्वामी, शोभना आणि सगळे उत्तम कलाकार. इलैराजा यांचे संगीत आणि संतोष सिवन यांची सिनेमॅटोग्राफी. असे म्हणतात की मणी रत्नम चे सगळे चित्रपट सकाळी चित्रांकित करतात. त्यावेळी अतिशय सुंदर प्रकाश असतो आणि त्याचा पुरेपूर उपयोग ते प्रत्येक शॉट मध्ये करून घेतात. ह्या चित्रपटात ते प्रकर्षाने जाणवते.  मणी रत्नम चे सगळे

दाक्षिणात्य खाद्यसंस्कृती -दोसा

दोसा हा पदार्थ नं आवडणारा माणूस विरळा. माझी आणि दोस्याची ओळख आमच्या शाळेच्या आनंदमेळ्यात झाली होती. एक डोस्याचा स्टॉल होता तिथे, माझ्या बेस्ट फ्रेंड च्या काकी चा. मी नं खाताच गर्दी पाहून मला लक्षात आलं होतं तेव्हा कि काहीतरी स्पेशल आहे दोस्यात. हळूहळू जसे मोठे होत गेलो तसे आई बाबा बाहेर जेवायला घेऊन जायचे, मग खायचे काय तर डोसा, जगत नावाचे नागपूरला खूप प्रसिद्ध हॉटेल होते, अर्थात आता मॉल आणि मोठमोठ्या बिल्डींग्स असलेले नागपूर नव्हते तेव्हा उणीपुरी २ ते ३ फॅमिली रेस्टॉरंट्स. त्यात आर्य भवन एक आणि एक जगत. आई म्हणायची जी वस्तू आपण घरी जास्त करत नाही ती बाहेर खावी. म्हणून मोठ्ठा क्रिस्पि दोसा त्यात बटाट्याची भाजी, सोबत चटण्या. एकदम पोटभर व्हायचा तो मसाला डोसा. मी ९ वी, १० वी त असतांना आई घरीच डोसे करायची. पुढे कॉलेज मध्ये घेल्यावर वगैरे बाहेर खातांना डोसा हा पदार्थ बऱ्याचदा खाल्ल्या जायचा.  आता गेल्या १० वर्षांपासून चेन्नई मध्ये स्थायिक असल्याने, दोसा हा दाक्षिणात्य संस्कृतीचा किती अविभाज्य घटक आहे हे कळून आले. माझ्या घरी डोश्याचे पीठ नाही असा एकही दिवस जात नाही. जसे मराठी घरांत कणिक