Skip to main content

झोपीलागी जीवा....

आताशा पुन्हा मला "झोप" फारच आवडायला लागली आहे. आताशा "पुन्हा" म्हणण्याचे कारण हे की मला समज आल्यापासूनच मला झोप प्रचंड आवडते पण मध्ये जरा गडबड झाली होती. गेली चार वर्षे मी हवी तितकी झोपली नाही असं मला मनापासून वाटतं(तसं माझ्याव्यतिरिक्त माझ्या घरात कुणालाही वाटत नाही याची मला खात्री आहे ) ;)
तीझोपेचा आई बाबांना आणि मलाही शोध लागला. त्यांच्यामते (माझ्यामते नाही) मी खूप झोपायचे. ८ ते ९ तास साधारण मनुष्याने झोपावे असं विज्ञान सांगतं हे आई बाबांना कोण सांगणार? त्यांच्यामते मला अभ्यासाचं, परीक्षेचं टेन्शनच नाही असं सिद्धं झालं होतं. आणि मला रोज मला हे काय होतंय? असं वाटायला लागलं. खरं पाहिलं तर असं कुठे लिहिलंय की दहावीच्या विद्यार्थ्यांनी कमी झोपावं?? पण हे बाबा रोज मला इतके रागावायचे की मी उठल्याक्षणी आपण आठ तासापेक्षा किती जास्त झोपलो हे मोजायची. :p
, तिला कुठलं तरी टेन्शन आहे म्हणून ती जास्त झोपते" असं Doctor म्हणाले, त्यामुळे मला कुणीही फार झोपते असं म्हटलं की मी सरळ माझ्यावर असलेल्या अतीव ढोंगी टेन्शन ची आठवण करून देत असे. बाबांनी मात्र लगेच त्या Doctor ला मूर्खात काढलं.
बस्स!! पहाटे पहाटे बाबा मला उठवायचे. पण यार ४ वाजता उठणं म्हणजे माझ्या आकलना पालीकडलं होतं. एवढ्या लवकर उठून करायचं काय हा मला प्रश्न पडायचा. मग काय घेऊन बसायची पुस्तक..डुलक्या मारत मारत अभ्यास व्हायचा, त्यांतूनही माझ्यावर बाबांचा डॊळा असायचा, डुलकी लागली की "मुग्धाssss" अश्या बाबांच्या हाकेने मी खडबडून जागी व्हायची.माझ्या डुलकी लागण्याची आणि बाबांनी मला हाक मारायची एकच गाठ कशी पडायची हे मला नं उमगलेलं कोडं आहे.
नाही म्हणायला चांगले ८०% मार्क पडले मला १० वीला. सकाळी नं उठल्यामुळे तुला कमी मार्क्स मिळाले हे बाबांना कायमचं कोलीत हातात मिळालं. आणि ते माझ्या बारावीच्या अभ्यासामागे लागले. बारावीतही "पहाटे उठत जा" ह्याची अविरत पारायणे झाली. मी सकाळी उठलीच पाहिजे म्हणून त्यांनी मला ६.०० वाजताचा रसायनशास्त्राचा क्लास लावून दिला. मास्तरही जरा कडकच होते. पण माझी झोप त्यांहूनही कडक होती.प्राण गेला तरी बेहत्तर पण झोपेची कास मी सोडणार नाही असं वचन दिलं होतं मी स्वतःला ;) त्यानुसार रसायनशास्त्राच्या क्लासात मास्तर ला नं समजू देता झोप कशी मारायची ह्यात मी मास्टरी मिळवली होती. अगदीच प्रामाणिक होण्याची इच्छा झालीच तर पहिल्या रांगेत बसून नं झोपता नोटस घेणे असेही उद्योग केले..पण असले उद्योग लिमिटेड कारण तेच आपलं झोपेची कास सोडणार नाही वालं वचन.. ;)
यनशास्त्राने दगा दिलाच आणि आपल्या अपमानाचा वचपा काढत मला सगळ्यात कमी मार्क बहाल केले. organic chemistry खूप वोलाटाईल असतं म्हणे. म्हणूनच कदाचित असं झालं असावं अशी मीच माझी समजूत काढली रिझल्ट नंतर. हे जे काही झालं त्यात सतत डोळ्यावर विराजमान असलेल्या झोपेचा तीळमात्रही संबंध नाही असं मी बाबा सोडून सगळ्यांना पटवून दिलं होतं. एखाद दुसऱ्या वेळला ४ वाजता उठून प्रामाणिकपणे डुलक्या नं घेता अभ्यास केल्यामुळे बाबाही जरा खूशच होते नाही म्हणायला. त्यामुळे "सकाळी उठली होती यावेळला मी..पण तरीही चांगले मार्क नाही मिळाले बघितलं नं???" असं बाबांना म्हणून मी मोकळी झाले.
सकाळी उठण्याचा आणि चांगले मार्क मिळण्याचा तीळमात्र ही संबंध नाही हे मला दहावीतच कळून चुकलं होतं. ;)
असल्या क्षुल्लक कारणापायी उगाच कशाला झोपेचं खोबरं करा?? असं वाटून मी उन्हाळ्याच्या सुट्टीत बारावीच्या काळात दुर्लक्षिलेल्या झोपेची भरपाई करण्यास सरसावले.
]भियांत्रिकीची चार वर्षे हॉस्टेल मध्ये गेली. सकाळी ९.०० वाजता क्लासमध्ये हजर असायला लागायचं..मग काय ८.४० पर्यंत झोप. १० मिनिटात अंघोळ आणि ९.०० ला क्लासमध्ये हजर :) असं साधं सोपं समीकरण होतं. त्याला आता कुणाचीही आडकाठी नव्हती. त्यामुळे तो काळ अगदी सुखाचा गेला. रविवारी १० मिनिटे जास्त झोपायला मिळायचं. कारण ९.०० ला मेसमध्ये न्याहारी मिळणं बंद होत असे. सकाळी ८.५० ला उठणे, ब्रश करून मेस मध्ये जाणे, न्याहारीनंतर पुन्हा झोप काढणे नाहीतर अंघोळ करून पुन्हा फ्रेश झोपणे असा नियम असायचा. चार वर्षात मी चुकूनही पहाटे उठली नाही. जो काही अभ्यास केला तो सकाळी ६.०० पासून रात्री ११.०० च्या कालावधीत कारण रात्री ११.०० नंतर माझ्या मेंदूची कवाडे बंद होतात. त्यानंतर कुठलं ही ज्ञानार्जन मला वर्ज्य आहे हे वाचकांनी लक्षात घ्यावे.
पुढल्या शिक्षणासाठी असतानाही थोड्याफार बदलाने हाच टाईमटेबल होता. पण एकूण त्या विद्यार्जनाच्या काळात मी झोपेला माझ्या नेत्राआड कधीच होऊ दिले नाही. अगदी प्रेमात धप्पकन पडल्यावर सुद्धा "मुझे नींद नं आये" असं माझं कधीही झालं नाही. उलट पुण्यासारख्या थंड हवामानाच्या जागी मी झोपेला अगदी योग्य न्याय दिला असेच आजवर मला वाटत आले आहे. माझ्याठायी एकमेकांचे शत्रु असलेले झोप आणि प्रेम हे एकत्र गुण्यागोविंदाने नांदत होते.
पुढे टेन्शन आणि झोप यांचं इन्वर्सली प्रोपोर्शनल ( Doctor च्या म्हणण्यानुसार) तंत्र थोडं डायरेक्टली प्रोपोरशनल व्हायला लागलं. हळुहळु मला झोप येईनाशी झाली. कदाचित झोपेला मी एव्हाना गृहित धरले होते. थोडेदिवसासाठी...
मुंबईत नोकरी लागल्यावर झोपेचं खोबरं झालं. शिफ़्ट्स मुळे झोप व्हायची नाही. आणि मी मग १२ तास-१६ तास अशी लागोपाठ झोपायची.
एवढं सगळं रामायण मला आठवण्याचं कारण म्हणजे कार्यालयात थोड्यावेळाकरीता पावर कट झाला होता...डिजी चा ही काही प्रोब्लेम होता. म्हणून दिली ताणुन...काय मस्तं झोप लागली म्हणून सांगु? खूप दिवसांनंतर झोपुन उठल्यावर अतीव समाधान मिळालं..आताशा भर क्लासमध्ये स्वप्न पडेस्तोवर झोपायचा चांस मिळेनासा झालाय. मोठेपणा वगैरे म्हणतात तो हाच असावा कदाचित ;) हे शल्य मनाला बोचत असतांनाच मिळालेल्या सुवर्णसंधीचं सोनं करायला मिळालं आज.....
चला आता थोडी कॉफी ढोसुन येऊ....
हे सगळं वाचुन तुम्हाला जर झोप आली तर माझ्या झोपसाधनेचं चीज झालं असंच मी समजेन. ;)
आताशा पुन्हा मला "झोप" फारच आवडायला लागली आहे. आताशा "पुन्हा" म्हणण्याचे कारण हे की मला समज आल्यापासूनच मला झोप प्रचंड आवडते पण मध्ये जरा गडबड झाली होती. गेली चार वर्षे मी हवी तितकी झोपली नाही असं मला मनापासून वाटतं(तसं माझ्याव्यतिरिक्त माझ्या घरात कुणालाही वाटत नाही याची मला खात्री आहे ) ;)

दहावीत माझ्या अतीझोपेचा आई बाबांना आणि मलाही शोध लागला. त्यांच्यामते (माझ्यामते नाही) मी खूप झोपायचे. ८ ते ९ तास साधारण मनुष्याने झोपावे असं विज्ञान सांगतं हे आई बाबांना कोण सांगणार? त्यांच्यामते मला अभ्यासाचं, परीक्षेचं टेन्शनच नाही असं सिद्धं झालं होतं. आणि मला रोज मला हे काय होतंय? असं वाटायला लागलं. खरं पाहिलं तर असं कुठे लिहिलंय की दहावीच्या विद्यार्थ्यांनी कमी झोपावं?? पण हे बाबा रोज मला इतके रागावायचे की मी उठल्याक्षणी आपण आठ तासापेक्षा किती जास्त झोपलो हे मोजायची. :p

माझ्या अतीझोपेमुळे बाबा मला एकदा Doctor कडॆ घेऊन गेले असता"अहो, तिला कुठलं तरी टेन्शन आहे म्हणून ती जास्त झोपते" असं Doctor म्हणाले, त्यामुळे मला कुणीही फार झोपते असं म्हटलं की मी सरळ माझ्यावर असलेल्या अतीव ढोंगी टेन्शन ची आठवण करून देत असे. बाबांनी मात्र लगेच त्या Doctor ला मूर्खात काढलं.

बस्स!! पहाटे पहाटे बाबा मला उठवायचे. पण यार ४ वाजता उठणं म्हणजे माझ्या आकलना पालीकडलं होतं. एवढ्या लवकर उठून करायचं काय हा मला प्रश्न पडायचा. मग काय घेऊन बसायची पुस्तक..डुलक्या मारत मारत अभ्यास व्हायचा, त्यांतूनही माझ्यावर बाबांचा डॊळा असायचा, डुलकी लागली की "मुग्धाssss" अश्या बाबांच्या हाकेने मी खडबडून जागी व्हायची.माझ्या डुलकी लागण्याची आणि बाबांनी मला हाक मारायची एकच गाठ कशी पडायची हे मला नं उमगलेलं कोडं आहे.

नाही म्हणायला चांगले ८०% मार्क पडले मला १० वीला. सकाळी नं उठल्यामुळे तुला कमी मार्क्स मिळाले हे बाबांना कायमचं कोलीत हातात मिळालं. आणि ते माझ्या बारावीच्या अभ्यासामागे लागले. बारावीतही "पहाटे उठत जा" ह्याची अविरत पारायणे झाली. मी सकाळी उठलीच पाहिजे म्हणून त्यांनी मला ६.०० वाजताचा रसायनशास्त्राचा क्लास लावून दिला. मास्तरही जरा कडकच होते. पण माझी झोप त्यांहूनही कडक होती.प्राण गेला तरी बेहत्तर पण झोपेची कास मी सोडणार नाही असं वचन दिलं होतं मी स्वतःला ;) त्यानुसार रसायनशास्त्राच्या क्लासात मास्तर ला नं समजू देता झोप कशी मारायची ह्यात मी मास्टरी मिळवली होती. अगदीच प्रामाणिक होण्याची इच्छा झालीच तर पहिल्या रांगेत बसून नं झोपता नोटस घेणे असेही उद्योग केले..पण असले उद्योग लिमिटेड कारण तेच आपलं झोपेची कास सोडणार नाही वालं वचन.. ;)

रसायनशास्त्राने दगा दिलाच आणि आपल्या अपमानाचा वचपा काढत मला सगळ्यात कमी मार्क बहाल केले. organic chemistry खूप वोलाटाईल असतं म्हणे. म्हणूनच कदाचित असं झालं असावं अशी मीच माझी समजूत काढली रिझल्ट नंतर. हे जे काही झालं त्यात सतत डोळ्यावर विराजमान असलेल्या झोपेचा तीळमात्रही संबंध नाही असं मी बाबा सोडून सगळ्यांना पटवून दिलं होतं. एखाद दुसऱ्या वेळला ४ वाजता उठून प्रामाणिकपणे डुलक्या नं घेता अभ्यास केल्यामुळे बाबाही जरा खूशच होते नाही म्हणायला. त्यामुळे "सकाळी उठली होती यावेळला मी..पण तरीही चांगले मार्क नाही मिळाले बघितलं नं???" असं बाबांना म्हणून मी मोकळी झाले.

सकाळी उठण्याचा आणि चांगले मार्क मिळण्याचा तीळमात्र ही संबंध नाही हे मला दहावीतच कळून चुकलं होतं. ;)

असल्या क्षुल्लक कारणापायी उगाच कशाला झोपेचं खोबरं करा?? असं वाटून मी उन्हाळ्याच्या सुट्टीत बारावीच्या काळात दुर्लक्षिलेल्या झोपेची भरपाई करण्यास सरसावले.

अभियांत्रिकीची चार वर्षे हॉस्टेल मध्ये गेली. सकाळी ९.०० वाजता क्लासमध्ये हजर असायला लागायचं..मग काय ८.४० पर्यंत झोप. १० मिनिटात अंघोळ आणि ९.०० ला क्लासमध्ये हजर :) असं साधं सोपं समीकरण होतं. त्याला आता कुणाचीही आडकाठी नव्हती. त्यामुळे तो काळ अगदी सुखाचा गेला. रविवारी १० मिनिटे जास्त झोपायला मिळायचं. कारण ९.०० ला मेसमध्ये न्याहारी मिळणं बंद होत असे. सकाळी ८.५० ला उठणे, ब्रश करून मेस मध्ये जाणे, न्याहारीनंतर पुन्हा झोप काढणे नाहीतर अंघोळ करून पुन्हा फ्रेश झोपणे असा नियम असायचा. चार वर्षात मी चुकूनही पहाटे उठली नाही. जो काही अभ्यास केला तो सकाळी ६.०० पासून रात्री ११.०० च्या कालावधीत कारण रात्री ११.०० नंतर माझ्या मेंदूची कवाडे बंद होतात. त्यानंतर कुठलं ही ज्ञानार्जन मला वर्ज्य आहे हे वाचकांनी लक्षात घ्यावे.

पुण्याला पुढल्या शिक्षणासाठी असतानाही थोड्याफार बदलाने हाच टाईमटेबल होता. पण एकूण त्या विद्यार्जनाच्या काळात मी झोपेला माझ्या नेत्राआड कधीच होऊ दिले नाही. अगदी प्रेमात धप्पकन पडल्यावर सुद्धा "मुझे नींद नं आये" असं माझं कधीही झालं नाही. उलट पुण्यासारख्या थंड हवामानाच्या जागी मी झोपेला अगदी योग्य न्याय दिला असेच आजवर मला वाटत आले आहे. माझ्याठायी एकमेकांचे शत्रु असलेले झोप आणि प्रेम हे एकत्र गुण्यागोविंदाने नांदत होते.

पुढे टेन्शन आणि झोप यांचं इन्वर्सली प्रोपोर्शनल ( Doctor च्या म्हणण्यानुसार) तंत्र थोडं डायरेक्टली प्रोपोरशनल व्हायला लागलं. हळुहळु मला झोप येईनाशी झाली. कदाचित झोपेला मी एव्हाना गृहित धरले होते. थोडेदिवसासाठी...

मुंबईत नोकरी लागल्यावर झोपेचं खोबरं झालं. शिफ़्ट्स मुळे झोप व्हायची नाही. आणि मी मग १२ तास-१६ तास अशी लागोपाठ झोपायची.

एवढं सगळं रामायण मला आठवण्याचं कारण म्हणजे कार्यालयात थोड्यावेळाकरीता पावर कट झाला होता...डिजी चा ही काही प्रोब्लेम होता. म्हणून दिली ताणुन...काय मस्तं झोप लागली म्हणून सांगु? खूप दिवसांनंतर झोपुन उठल्यावर अतीव समाधान मिळालं..आताशा भर क्लासमध्ये स्वप्न पडेस्तोवर झोपायचा चांस मिळेनासा झालाय. मोठेपणा वगैरे म्हणतात तो हाच असावा कदाचित ;) हे शल्य मनाला बोचत असतांनाच मिळालेल्या सुवर्णसंधीचं सोनं करायला मिळालं आज.....

चला आता थोडी कॉफी ढोसुन येऊ....

हे सगळं वाचुन तुम्हाला जर झोप आली तर माझ्या झोपसाधनेचं चीज झालं असंच मी समजेन. ;)

Comments

  1. अग बाई हे असं काही माझ्या नवऱ्याने वाचलं तर आमचे पुन्हा ’त्याचे झोपणे’ याविषयावर भांडण होइल....तु मस्त लिहीलयेस!!!माझा नवरा असाच केव्हाही, कुठेही आणि कितीही वेळ झोपू शकतो आणि उठल्यावर आज काही मनासारखी झोप झाली नाही गड्या म्हणतो!!!
    यावर मी पण एक पोस्ट टाकलीये...’झोप’ या नावाने वेळ मिळाला तर बघ.....

    ReplyDelete
  2. झोपाळु व्यक्तींमध्ये तुझ्या नवर्याची भर ;)
    नक्की वाचते..बहुदा वाचलाही असेल तुझा लेख...

    ReplyDelete
  3. मार्च महिन्याच्या मी टाकलेल्या पोस्टमधे आहे बघ ती पोस्ट,खरं सांगते तुला कमाल झोपाळू माणसाशी संसार चाललाय माझा.....दर सुट्टीला भांडण होते आमचे त्याच्या दुपारच्या झोपेमुळॆ......

    ReplyDelete
  4. झोप! जगातला सगळ्यात आनंदी सोहळा! मी पण झोपेच्या बाबतीत बरीच सुदैवी आहे! कुठेही, कशीही, कधीही झोप येते मला!

    ReplyDelete
  5. मस्त आहे झोप प्रकरण. आमच्या इथे माझी कावळ्याची झोप असते. रात्री उशिरा जरी झोपलो तरी सकाळी ५ वाजता उठतो मी रोज. सौ.चं पण झोपेशी खुपच सख्य. फक्त रविवार मिळतो तिला. आणि मी सकाळी उठुन किचनमधे चहासाठी खुड्बुड सुरु केली की तिला जाग येते आणि मग माझा उध्दार.. एक दिवस मिळतो, तेवढं पण सुखानी झोपु देत नाही... वगैरे वगैरे... सगळे प्रसंग डोळ्यापुढे उभे केले आहेत.
    तुमच्याच प्रमाणे माझी धाकटी बहिण झोपाळु. आमच्या घरी एक पोपट होता ( २४ वर्षं) . बडिल रोज सकाळी तिला म्हणायचे संध्या उठ.. ती आपली डोक्यावरुन पांघरुण घेउन झोपायची. शेवटी आमच्या घरचा पोपट पण म्हणायला शिकला.एकदा वडिलांनी म्हंटलं संध्या उठ, की मग तो पोपट जप सुरु करायचा.. संध्या उठ चा. पण ती पठ्ठी कधी उठली नाही. :)

    ReplyDelete
  6. मुग्धा, एकदम मस्त झालेय तुझे ’ झोप ’ प्रकरण. मीही तुझ्यात सामील. कधीही, कुठेही मी झोपू शकते. कदाचित ही १७ वर्षे लोकल प्रवासाची देणगी असेल. लोकलमध्ये तर मधल्या पॆसेजमध्ये खच्चून भरलेल्या गाडीतही मी उभ्या उभ्या गाढ झोपत असे. अग पाठीला पाठ लागलेली असल्यावर पडायचीही भिती नाही ना ग:D. बाकी परिक्षा आणि अनावर झोप व आईचा ओरडा यांनी माझी पाठ काही सोडली नाही. मात्र पॊवरकटमुळे का होईना पण चक्क तू ऒफिसमध्येही झोपून घेतलेस हे भाग्य मात्र मला कधी लाभले नाही.:(

    ReplyDelete
  7. tujhi post vachun mala hi "majhi zop" ya vishayavara lihavasa vatata aahe, anyways zop yayala lagliye mala aataa :-)

    ReplyDelete
  8. तुमचं झोप प्रकरण वाचून लहानपणीचा किस्सा आठवला. माझ्या शेजारी ’गुड्डी’ नावाची मुलगी रहात असे. एकदा घरी एकटी असताना ती दुपारी जी गाढ झोपली ती उठेचना! दरवाज्यावरच्या व्हेंटिलेटरमधून आत पाणी टाकलं तिच्या बिछान्यावर, तेव्हा जागी झाली. वर नाजूक हसून म्हणाली, "आज बहोत गहरी निंद लगी थी।" सगळ्या बिल्डींगला तो किस्सा आठवडाभर पुरून उरला होता.

    ReplyDelete
  9. जमाना झोपाळु लोगोंका दुश्मन होता है असं मला आजवर वाटत आलं आहे. तुमच्या सौं ना आणि बहीणीला ही असंच वाटत असणार नक्की.
    प्रतिसादाकरीता आभार... :)

    ReplyDelete
  10. धन्स भाग्यश्री. चला ओळखीच्या झोपाळु व्यक्तींमध्ये तुझी एक भर :)
    या लोकल झोपेमुळे मी एकदा पुढ्ल्या स्टेशन वर पोचता पोचता राहिले.
    आधीच मुंबईत नवीन त्यात हे असे उद्योग..नशीब वेळेवर उठली :)
    घरी तर सतत ओरडा खाल्ला आहे मी तुझ्यासारखा..अजुनही बाबा रागवतात.

    ReplyDelete
  11. लवकर लिहीते व्हा!! झोप आली ना लेख वाचुन..माझ्या निद्रासाधनेचं चीज झालं म्हणायचं ;)

    ReplyDelete
  12. मी नाईट शिफ़्ट्स करतांना असा घॊळ होईल याची माझ्या रुममेट्स ना खात्री होती म्हणुनच आम्हा सगळ्यांकडॆ वेगळ्या चाव्या होत्या. आणि आतुन कडी लावायची नाही हा नियम होता ;)
    नाहीतर मी ही अशीच उठायचे “आज बहोत गहरी निंद लगी थी।” म्हणुन :)
    प्रतिसादाकरता धन्यवाद..!!

    ReplyDelete
  13. मुग्धा,
    झोपेला आमच्या पर्यंत छानच पोच्व्लेस.
    अनुजा

    ReplyDelete
  14. thank you anuja!!

    ReplyDelete
  15. झोप आली तर माझ्या झोपसाधनेचं चीज झालं >>>hahahaha aali aahe pan ajun khooooooop kaam aahe :(

    tu kadhee aai baabna gharabaher aakhee raatr daar vaajvt thevlys ka??

    mi thevly! 2da :)

    ReplyDelete
  16. nahi ajun asa kahi jhala nahi..:)

    ReplyDelete
  17. Awesome !!
    Now read my post exactly on this subject !!!
    How similar......
    http://vikrantdeshmukh.blogspot.com/2010/01/revisited.html

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

दाक्षिणात्य संस्कृती - कोलम (रांगोळी)

दाक्षिणात्य संस्कृती - कोलम (रांगोळी) या पोस्ट मध्ये खाद्यसंस्कृती बद्दल नं सांगता रांगोळ्या आणि तामिळ नाडू यांच्या असलेल्या घट्ट नात्याबद्दल बोलूया. रांगोळी म्हणजे मला तरी एखाद्या स्त्री ची अभिव्यक्ती वाटते. रांगोळी काढणारा पुरुष जरी असेल तरी त्याच्या मनातल्या तरल भावना त्या रांगोळीत उतरतात. अर्थात नेहेमीच्या रोज काढल्या जाणाऱ्या रांगोळ्या म्हणजे गृहिणीची अभिव्यक्ती का हे मला नाही माहिती. पण अंगण झाडणे, सडा टाकणे, आणि रांगोळी काढणे  माझ्यासाठी एक थेरेपि आहे. आजकाल अपार्टमेंट आणि मोठाल्या इमारतींमुळे अंगण हा भागच नाहीसा झालाय घराचा, पण मागे आम्ही होतो त्या घरी मोठे अंगण होते. तामिळ नाडुत सगळ्या दारासमोर रांगोळी काढल्या जाते. अगदी अपार्टमेंट जरी असेल तरी अपार्टमेंट च्या मोठ्या दारासमोर रांगोळी काढली जातेच. इथल्या गल्ल्यांमध्ये समोरासमोरील घराच्या दारासमोर तर दोन्ही वेळेला रांगोळी काढल्या जाते. सकाळी ६. ०० ते ६.३० च्या दरम्यात सगळ्या स्त्रिया या कामात मग्न दिसतात. पहिले मला फार कुतूहल वाटे. एवढ्या सकाळी उठणे आणि पहिले काम म्हणजे रांगोळी. दिवस कसा  छान सुरु होत असेल असे वाटायचे. लग्न

दलपती - मणी रत्नम चा मास्टरपीस

तामिळ चित्रपटांमध्ये मी सगळ्यात पहिले पाहिलेला चित्रपट म्हणजे दलपती. तामिळ भाषा जरी क्लिष्ट वाटत असली तरी ती सर्वांगसुंदर भाषा आहे. आपण मराठी किंवा इतर भाषिक लोक नेहेमी दक्षिणेकडच्या ४ भाषांची सारख्या वाटतात म्हणून खिल्ली उडवत असतो पण ह्या चारही भाषा कन्नड, तमिळ, तेलगू आणि मल्याळम अतिशय समृद्ध आहेत. चारही भाषांची एक स्वतःची चित्रपट सृष्टी आहे हे महत्वाचे. बाहुबली हे एक उत्तम उदाहरण. बरेच हिंदी चित्रपट, मल्याळम आणि तामिळ चित्रपटांवरून प्रेरित असतात हे सांगणे नं लगे. तर असाच एक १९९०'स मध्ये तयार झालेला चित्रपट दलपती म्हणजे म्होरक्या किंवा प्रमुख किंवा सेनापती.  कर्ण आणि अर्जुन ह्या धर्तीवर आधारित असलेला हा चित्रपट त्याकाळी खूप गाजला होता. मामुटी, रजनीकांत आणि अरविंद स्वामी, शोभना आणि सगळे उत्तम कलाकार. इलैराजा यांचे संगीत आणि संतोष सिवन यांची सिनेमॅटोग्राफी. असे म्हणतात की मणी रत्नम चे सगळे चित्रपट सकाळी चित्रांकित करतात. त्यावेळी अतिशय सुंदर प्रकाश असतो आणि त्याचा पुरेपूर उपयोग ते प्रत्येक शॉट मध्ये करून घेतात. ह्या चित्रपटात ते प्रकर्षाने जाणवते.  मणी रत्नम चे सगळे

दाक्षिणात्य खाद्यसंस्कृती -दोसा

दोसा हा पदार्थ नं आवडणारा माणूस विरळा. माझी आणि दोस्याची ओळख आमच्या शाळेच्या आनंदमेळ्यात झाली होती. एक डोस्याचा स्टॉल होता तिथे, माझ्या बेस्ट फ्रेंड च्या काकी चा. मी नं खाताच गर्दी पाहून मला लक्षात आलं होतं तेव्हा कि काहीतरी स्पेशल आहे दोस्यात. हळूहळू जसे मोठे होत गेलो तसे आई बाबा बाहेर जेवायला घेऊन जायचे, मग खायचे काय तर डोसा, जगत नावाचे नागपूरला खूप प्रसिद्ध हॉटेल होते, अर्थात आता मॉल आणि मोठमोठ्या बिल्डींग्स असलेले नागपूर नव्हते तेव्हा उणीपुरी २ ते ३ फॅमिली रेस्टॉरंट्स. त्यात आर्य भवन एक आणि एक जगत. आई म्हणायची जी वस्तू आपण घरी जास्त करत नाही ती बाहेर खावी. म्हणून मोठ्ठा क्रिस्पि दोसा त्यात बटाट्याची भाजी, सोबत चटण्या. एकदम पोटभर व्हायचा तो मसाला डोसा. मी ९ वी, १० वी त असतांना आई घरीच डोसे करायची. पुढे कॉलेज मध्ये घेल्यावर वगैरे बाहेर खातांना डोसा हा पदार्थ बऱ्याचदा खाल्ल्या जायचा.  आता गेल्या १० वर्षांपासून चेन्नई मध्ये स्थायिक असल्याने, दोसा हा दाक्षिणात्य संस्कृतीचा किती अविभाज्य घटक आहे हे कळून आले. माझ्या घरी डोश्याचे पीठ नाही असा एकही दिवस जात नाही. जसे मराठी घरांत कणिक