Skip to main content

उत्सव..पावसाचा!

सकाळच्या प्रसन्नतेचा पहिला नैवेद्य घेताना सूर्यनारायण खुष होऊन अजूनच तेजस्वी दिसायला लागले आहेत. ढगांनीही रात्रभर आकाशाच्या अंगणात खेळ खेळून आता निरोप घेतलाय. काही उनाड ढग आहेतच तरी कट्ट्यावर बसलेली टवाळक्या करत.झाडाझाडावरील पक्ष्यांची लगबग सुरू झालीए.
आज पावसाने हजेरी नं लावल्याने सगळेच एकंदरीत खुष आहेत. कावळ्याच्या घरात मात्र अजूनही सगळे झोपलेच आहेत. कावळे काकू येऊन दारासमोर रांगोळी टाकून गेल्या. "आज पाऊस का आला नाही? अजून थोड्या वेळ झोपायला मिळालं असतं ना" असे त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव होते.
नेहमीच घाईत असलेल्या खारुताईंचा मूड मात्र वेगळाच आहे. आज त्यांनी सुट्टी घेतली आहे अर्धी! मुलगी आलीए घरी बाळंतपणाला, तिच्यासाठी घराची डागडुजी करायची आहे म्हणून. नारळे काका काकूंना विचारपूस चाललीए त्यांची घराबाबतीत. नारळेंना तसा या गोष्टींचा बराच अनुभव आहे. कावळे काकूंची मुलगी बाळंत झाली, तेव्हाही ते मदतीला सरसावले होते. शेजारधर्म आजवर त्यांनी अगदॊ चोखपणे पाळलाय. कावळे काकूंचा सल्ला ही बराच मोलाचा ठरतो कारण मोहल्ल्यातील सगळ्य़ांपेक्षा वयाने आणि अनुभवाने त्या मोठ्याच आहेत.
खारूताईचा जावई मोठा कर्तबगार बर्का! एका शेंगदाणा तेलाच्या कंपनीत नुकताच रुजू झाला. त्याला छोट्या खारुची तर फारच काळजी. म्हणूनच खारुताईंवर ही जबाबदारी सोपवून गेलाय आखातात.
मैना कुटुंबात नुकतीच सकाळ झाली. नुकतंच मैना कुटुंब इथे राहायला आलंय. नवपरिणीत जोडपं आहे त्यामुळे त्यांना कसलीही मदत लागली की सगळे लगेच पुढे सरसावतात.
कोकिळा मावशींच्या मुलीला नुकतीच कुणीतरी लग्नाची मागणी घातली. त्यांनी हो ही म्हटलं असं ऐकीवात आहे. पुढे काय होणार? याकडे सगळ्यांचेच डोळे लागलेत, खारुताईंच्या घरच्या लग्नानंतर मोहल्यात होणारं हे दुसरंच लग्नं. कोकीळ कुटुंब तसं मनमोकळं असल्याने सगळ्यांनाच त्यांच्याकडच्या लग्नात मजा करता येणार आहे. सगळेच जण म्हणून वाट बघतायत.
काल परवा मोहल्यात राहायला आलेला धीवर पक्षी सगळ्यांनाच आवडून गेला. तो थोड्याच वेळ आला पण काय तोरा होता त्याचा. नुकताच परदेशातून आला होता त्यामुळे त्याला थकायला झालं होतं. घर शोधत शोधत आला होता बिचारा. नारळे काका काकूंनी त्याला घरात घेऊन त्याची नीट विचारपूस केली. केवढं बरं वाटलं त्याला. परदेशातून आल्यामुळे त्याच्याकडून बऱ्याचं नवीन गोष्टी, नवीन माहिती मिळेल असे वाटून सगळेच खूष होते.
एव्हाना सूर्यनारायणाची अर्धी कालक्रमणा पूर्ण झालीय. दुपारच्या भरगच्च जेवणानंतर अनावर झालेल्या झोपेला मान देऊन ते वामकुक्षीला निघून गेले. मैदान साफ आहे हे पाहून ढगांनी खेळायला सुरुवात केली.
कावळे काकू दोरीवर टांगलेले कपडे काढायला लगेच घराबाहेर आल्या. नारळे काकूंशी गप्पा मारत मारता सरसर येणाऱ्या शिरव्यांनी त्यांना पार भिजवून टाकलं तश्याच त्या आत गेल्या.
दुपारपासून पाऊस सतत सुरू असल्याने खारूताईचा घराच्या डागडुजीचा प्लॅन तसाच बारगळला. मैना कुटुंबही बाजारात जायचे राहून गेले. कावळे काकू नखशिखांत भिजल्यामुळे आजारी पडल्या. कोकीळ कुटुंबही हिरमुसले. आज त्यांच्या मुलीची सोयरीक होणार होती. पावसामुळे सगळेच आपापल्या घरी अडकून पडले.
नारळे काकूंनी मात्र घरीच मस्तं कांद्याची भजी, चहा असा बेत केला. आणि सगळ्यांना बोलावलं. सगळे थोडे थोडॆ भिजत नारळेंकडे आले. बाहेर जोरदार पाऊस, कांद्याची भजी आणि आल्याचा मस्तं चहा हा बेत पाहून सगळ्यांना मनापासून आनंद झाला.
नेहमीप्रमाणेच नारळे काका काकूंनी आपला शेजारधर्म पाळला आणि सगळ्या हिरमुसल्या कुटुंबांना आनंदी करून टाकले. रात्र होईपर्यंत नारळेंकडे मस्तं मैफिल सजली. गप्पा गोष्टी, कोकीळ कुटुंबाची गाणी. पावसाचा एक उत्सवच साजरा केला मोहल्लेकरांनी...; )

Comments

  1. मुग्धा आज प्रथमच तुज़ा ब्लॉग वाचला.
    छान लिहितेस.
    अजुन छान छान आम्हाला वाचायला मिळण्यासाठी तुला शुभेच्छा ......

    ReplyDelete
  2. अगदी लहानपणी ऐकलेल्या गोष्टींची आठवण झाली :) छानच!!

    ReplyDelete
  3. thank you asmita ji..
    ashich bhet det raha blog la..

    ReplyDelete
  4. thank you sakhi!!
    tujha likhan mala prachanda aavadala...
    keep it up..
    :)

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

दे नेवर रिअली केअर्ड अबाउट हिम!!

काल व्हिएच १ चेनेल वर सगळे विडिओज बघितले..आजवर मी त्याचे एक दोन विडिओज च पाहिले होते..जे काही त्याच्याबद्दल माहित होते ते फ़क्त वर्तमानपत्राद्वारे, बातम्यांद्वारे.. सगळे लोकं म्हणतायत त्याप्रमाणे माझी आणि ईंग्रजी गाण्यांची ओळख मायकल च्या गाण्यांनी नाही झाली..मी कदाचित खुप लहान होते जेव्हा त्याचे अल्बम्स रिलिज झाले...पण तो लक्षात राहीला त्याच्या मुंबईच्या वारी ने.. त्याला पाहण्यासाठी आलेल्या चाहत्यांची संख्या पाहुनच तो नक्कीच काहितरी स्पेशल असावा असे मात्र वाटुन गेले.. त्याचं "दे डोन्ट रिअली केअर अबाउट अस" गाणं मात्र लक्षात राहीलं.. काल पाहीलेलं एबीसी हे त्याने वयाच्या ११ व्या वर्षी गायलेलं गाणं तर केवळ अप्रतिम..वयाचं ११ वर्ष जेव्हा मुलं स्टेजवरही जायला घाबरतात, तिथे हा अगदी आरामात परफ़ोर्म करत होता...नाचत होता..अगदी लिलया गात होता... http://www.youtube.com/watch?v=MYx3BR2aJA4&feature=related त्याचं मी काल पाहिलेलं त्याचं प्रत्येक गाणं मला पुन्हा एकदा या कलाकराची नव्याने ओळख करुन देत गेलं.... "Man In The Mirror" : - I'm Gonna Make A Change, For Once In My Li...

इरुवर - तमिळ चित्रपटांचा मेरुमणी

तमिळ सिनेमा हा विषय मी ब्लॉगवर कधीच लिहिलेला नाही. आता १० वर्षे झालीत मद्रास मध्ये आणि बऱ्यापैकी तमिळ पण बोलता येतं, कळतं, म्हणून ठरवले की नेहेमी भाषांतर केलेल्या या नव्या जुन्या चित्रपटाबद्दल लिहावे. तामिळ ही खूप गोड़ आणि ओघवती भाषा आहे, अर्थात कुठल्याही भाषेसारखीच. पण या भाषेचा जन्म प्राकृत भाषेमुळे झाला. लिपी अतिशय सोपी असली तरी शब्द आणि त्याचे उच्चारण कठीण आहे. थोडे अजूनही कळत नाहीच ;) काही दिवसांपूर्वीच "इरुवर" चित्रपट पाहिला. इरुवर - म्हणजे दोघे - ऐश्वर्या चा पहिला चित्रपट म्हणून फेमस आहेच पण जयललिता, करुणानिधी आणि एमजीआर या तीन पूर्व मुख्यमंत्र्यांच्या आयुष्यावर बेतलेला हा चित्रपट. मणी रत्नम चं दिग्दर्शन, ए आर रहमान चं संगीत. अजून काय हवे? मल्याळी अभिनेता मोहनलाल ( एमजीआर), ऐश्वर्या राय ( एमजीआर ची पूर्व पत्नी आणि जयललिता ) च्या भूमिकेत, प्रकाश राज ( करुणानिधी ) च्या भूमिकेत, रेवती आणि तब्बू या करुणानिधींच्या पत्नी. १९५० मधले सेट्स आणि त्याच काळचा प्लॉट. संतोष सिवन ची सिनेमॅटोग्राफी अप्रतिम आहे. तेव्हा संतोष सिवन अतिशय नवखे असतील पण तरीही खूपच सुंदर चित...

अजुन एक वर्ष तुझ्याशिवाय ..

प्रिय आईस, २००९ संपायला अजुन १ दिवस बाकी आहे आणि सगळे विचारतायत कसं साजरा करणार? तू पण असंच म्हणायचीस..की अगं ३१ डिसेंबर कुठल्याही वर्षाला एकदाच येतो..तो त्या वर्षाचा शेवटचा दिवस म्हणुन त्या वर्षाला आनंदाने निरोप द्यायचा..पण १ जानेवारीला सकाळी लवकर उठुन दिवस साजरा करायचा..हम्म!! तुझं सांगणं नेहमीच पटायचं आणि आजही पटतं..मोठ्ठं झाल्यावर सुध्दा.. हे अजुन एक वर्ष तुझ्याशिवाय गेलं..म्हणजे तुझ्या जिवंत अस्तित्वाशिवाय.. तू पुढच्या प्रवासाला लागली असशीलच गं पण तरीपण मला तुझा वावर अजुनही जाणवतो अपवाद फ़क्तं मी दिवाळीत बेसनाचे लाडु केले तेव्हाचा...मला काहीच सांगितलं नाहीस आणि ते लाडु खुपच खराब झाले...थोड्या वेळ मीच घाबरले होते की का तू असल्याचं जाणवत नाहिए? पण नंतरचा प्रत्येक दिवस तुझ्या असण्याची हमी देतच होता... बरेच बदल झालेत यावर्षी...माझं लग्न झालं हा सगळ्यात मोठा बदल...लग्न झाल्यावर बाबांना आणि मला तुझ्या आठवणीने खुप भरुन आलं. छकु नेहमीसारखीच शांत होती..सगळ्यांनाच जाणवली तुझी कमतरता पण कुणी आम्हाला वाईट वाटेल म्हणुन बोलुन दाखवलं नाही..चंचल मावशीने "माय मरो मावशी जगो" ही म्हण स...