Skip to main content

माझे जीवन गाणे..

गाडीत येता येता मी आज कधी नाही ते मस्तं नाट्यगीतं लावली होती...नवरोबांना भाषा जरी कळत नसली तरी माझ्या असल्या काड्यांना ते विरोध करत नाहीत (याचं एकमेव कारण म्हणजे मी रोज़ ऐकत असलेली तमिळ गाणी ;) )
जवळपास अर्धं अंतर पार केलं होतं आलो होतो. समुद्री वादळासारख्या प्रचंड ट्रैफ़िकला तोंड देत देत आमची नौका पुढे जात होती..कुमार गंधर्व "मम आत्मा गमला हा" म्हणत होते. अगदी भर वादळात विजांचा कडकडाट व्हावा तश्या त्यांच्या ताना मला भासत होत्या. बाहेर मस्तंपैकी ढगाळ वातावरण होतं.मधुनच एक एंबुलेंस गेली. ह्या एंबुलेंस नेहमी जेव्हा ट्रैफिक मधुन जातात तेव्हा मला फ़ार टेंशन येत असतं.कोण जाणे त्यातील व्यक्तीला किती त्रास होत असेल आणि इथे एव्ढं ट्रैफिक. साधी त्या एंबुलेंस ला वाट मोकळी करुन देण्याइतकी शिष्टाई लोकांमध्ये नसते.अश्या वागण्याने कुणाचा जीव जाऊ शकतो हे लोकांना कसे कळत नाही ? ती एंबुलेंस इथे २ मिनिटे, तिथे ३ मिनिटे करत करत सिग्नल वरुन पुढे गेली आणि माझा जीव भांड्यात पडला.
एवढं सगळं होईपर्यंत गाण्याचा अंतरा सुरु झाला होता.मागे उभ्या असलेल्या लोकांनी पोंगा वाजवुन वाजवुन आपले अस्तित्व जाणवुन दिले होते. मी उगाचच गाणी लावली असं वाटुन गेलं.एकतर ट्रैफ़िक, त्यातुन अनोळखी भाषेतील गाणी, ते ही नाट्यसंगीत,बिचारा माझा नवरा..;)
तेव्ढ्यात कुणी पराक्रमी माणसाने आमच्या गाडीला आपल्या बाईकने ठोस मारली. आरश्याला जोरदार धक्का मारुन तो माफ़ी नं मागता पुढे जाता झाला ;)..हे तर नेहमीचंच..रस्त्यावर तीन वेगवेगळ्या लेन्स असतांना ह्या दुचाकी वाल्यांना फ़ास्ट लेन मध्ये येऊन काय मजा येते कळत नाही.अग्दी टी.व्ही.एस चैम्प सारखी मंद चालणारी गाडी ही राईटमोस्ट लेन मध्ये चालवणारे महाभागही आहेत. त्यामुळेच कितीदा अपघात होतात. मोठ्या गाड्या अडकतात आणि टैफ़िक जाम होतो.
कहर म्हणजे कितीतरीदा लहान मुलांना घेऊन त्यांचे आईवडील ह्या फ़ास्ट लेन मधुन दुचाकी चालवताना दिसतात. अश्या वेळी अगदी गाडीतुन उतरुन त्यांना थांबवुन असे सांगावेसे वाटते की ही अख्खी डावी लेन तुमच्याच साठी आहे. उजवीकडे येऊन आपले आणि इतरांचे जीवन धोक्यात आणु नये.
गाणं संपता संपता एका सिग्नल शी गाडी थांबली, सिग्नल लागताच भली मोठी बस आम्हाला आडवी झाली..ती आपला पसारा घेऊन जाईपर्यंत पुन्हा लाल दिवा लागला..अजुन ८० सेकंद ताटकळत उभं रहावं लागलं. जर उजवीकडुन वळायचं असेल तर हे बस वाले आधीच का उजवीकडे होत नाहीत कोण जाणे?
एकदा असंच झालं, घरी परततांना सिग्नल वर एका बस ने टाटा इंडिका ला धडक दिली(उजवीकडे वळायची घाई!!). तिच्या समोर आम्ही उभे होतो त्यामुळे आम्हालाही जोरात धक्का बसला. गाडीचं मडगार्ड तुटलं. वरुन ते बस ड्रायव्हर कंडक्टर लगेच "आम्हाला ५००० पगार मिळतो त्यातुन तुम्ही जर तक्रार केली तर आमचे पैसे कापुन घेतील" वगैरे विनवणी करु लागले.
अरे! जर मिळणार्या पैशांची एवढी गरज आहे तर नीट जबाबदारीने गाडी का चालवित नाहीत ही लोकं? उगाच दुसर्याला भुर्दंड!!
एव्हाना वाहतुक जरा सुरळीत व्हायला लागली होती. सारखं वाटत होतं वेळच्या वेळी निघुन या मंडळींमुळे उशीर होतो. मी सकाळी लवकर उठले, लवकर आवरले, येता येता जर टैफ़िकमुळे उशीर झाला तर माझं काय चुकलं असं कुणाला सांगता ही येणार नव्हतं असं माझ्या मनात सगळं सुरु असतांना "माझे जीवन गाणे" लागलं...
व्यथा असो आनंद असु दे..
प्रकाश किंवा तिमीर असु दे..
वाट दिसे अथवा ना दिसुदे...
गात पुढे मी जाणे..
माझे जीवन गाणे...
बस्स!! एवढे ऐकुनच मन शांत झालं आणि पुन्हा सज्ज झाले मी "माझे जीवन गाणे" गायला ;) थोड्याशा मनस्तापानंतर...
गाडीत येता येता मी आज कधी नाही ते मस्तं नाट्यगीतं लावली होती...नवरोबांना भाषा जरी कळत नसली तरी माझ्या असल्या काड्यांना ते विरोध करत नाहीत (याचं एकमेव कारण म्हणजे मी रोज़ ऐकत असलेली तमिळ गाणी ;) )

जवळपास अर्धं अंतर पार केलं होतं . समुद्री वादळासारख्या प्रचंड ट्रैफ़िकला तोंड देत देत आमची नौका पुढे जात होती..कुमार गंधर्व "मम आत्मा गमला हा" म्हणत होते. अगदी भर वादळात विजांचा कडकडाट व्हावा तश्या त्यांच्या ताना मला भासत होत्या. बाहेर मस्तंपैकी ढगाळ वातावरण होतं.

मधुनच एक एंबुलेंस गेली. ह्या एंबुलेंस नेहमी जेव्हा ट्रैफिक मधुन जातात तेव्हा मला फ़ार टेंशन येत असतं.कोण जाणे त्यातील व्यक्तीला किती त्रास होत असेल आणि इथे एव्ढं ट्रैफिक. साधी त्या एंबुलेंस ला वाट मोकळी करुन देण्याइतकी शिष्टाई लोकांमध्ये नसते.अश्या वागण्याने कुणाचा जीव जाऊ शकतो हे लोकांना कसे कळत नाही ? ती एंबुलेंस इथे २ मिनिटे, तिथे ३ मिनिटे करत करत सिग्नल वरुन पुढे गेली आणि माझा जीव भांड्यात पडला.

एवढं सगळं होईपर्यंत गाण्याचा अंतरा सुरु झाला होता.मागे उभ्या असलेल्या लोकांनी पोंगा वाजवुन वाजवुन आपले अस्तित्व जाणवुन दिले होते. मी उगाचच गाणी लावली असं वाटुन गेलं.एकतर ट्रैफ़िक, त्यातुन अनोळखी भाषेतील गाणी, ते ही नाट्यसंगीत,बिचारा माझा नवरा..;)

तेव्ढ्यात कुणी पराक्रमी माणसाने आमच्या गाडीला आपल्या बाईकने ठोस मारली. आरश्याला जोरदार धक्का मारुन तो माफ़ी नं मागता पुढे जाता झाला ;)..हे तर नेहमीचंच..रस्त्यावर तीन वेगवेगळ्या लेन्स असतांना ह्या दुचाकी वाल्यांना फ़ास्ट लेन मध्ये येऊन काय मजा येते कळत नाही.अग्दी टी.व्ही.एस चैम्प सारखी मंद चालणारी गाडी ही राईटमोस्ट लेन मध्ये चालवणारे महाभाग आहेत. त्यामुळेच कितीदा अपघात होतात. मोठ्या गाड्या अडकतात आणि टैफ़िक जाम होतो.

कहर म्हणजे कितीतरीदा लहान मुलांना घेऊन त्यांचे आईवडील ह्या फ़ास्ट लेन मधुन दुचाकी चालवताना दिसतात. अश्या वेळी अगदी गाडीतुन उतरुन त्यांना थांबवुन असे सांगावेसे वाटते की ही अख्खी डावी लेन तुमच्याच साठी आहे. उजवीकडे येऊन आपले आणि इतरांचे जीवन धोक्यात आणु नये.

गाणं संपता संपता एका सिग्नलला गाडी थांबली, हिरवा दिवा लागताच भली मोठी बस आम्हाला आडवी झाली..ती आपला पसारा घेऊन जाईपर्यंत पुन्हा लाल दिवा लागला..अजुन ८० सेकंद ताटकळत उभं रहावं लागलं. जर उजवीकडुन वळायचं असेल तर हे बस वाले आधीच का उजवीकडे होत नाहीत कोण जाणे?

एकदा असंच झालं, घरी परततांना सिग्नल वर एका बस ने टाटा इंडिका ला धडक दिली(उजवीकडे वळायची घाई!!). तिच्या समोर आम्ही उभे होतो त्यामुळे आम्हालाही जोरात धक्का बसला. गाडीचं मडगार्ड तुटलं. वरुन ते बस ड्रायव्हर कंडक्टर लगेच "आम्हाला ५००० पगार मिळतो त्यातुन तुम्ही जर तक्रार केली तर आमचे पैसे कापुन घेतील" वगैरे विनवणी करु लागले. अरे! जर मिळणार्या पैशांची एवढी गरज आहे तर नीट जबाबदारीने गाडी का चालवित नाहीत ही लोकं? उगाच दुसर्याला भुर्दंड!!

एव्हाना वाहतुक जरा सुरळीत व्हायला लागली होती. सारखं वाटत होतं वेळच्या वेळी निघुन या मंडळींमुळे उशीर होतो. मी सकाळी लवकर उठले, लवकर आवरले, येता येता जर टैफ़िकमुळे उशीर झाला तर माझं काय चुकलं असं कुणाला सांगता ही येणार नव्हतं असं माझ्या मनात सगळं सुरु असतांना "माझे जीवन गाणे" लागलं...

व्यथा असो आनंद असु दे..

प्रकाश किंवा तिमीर असु दे..

वाट दिसे अथवा ना दिसुदे...

गात पुढे मी जाणे..

माझे जीवन गाणे...

बस्स!! एवढे ऐकुनच मन शांत झालं आणि पुन्हा सज्ज झाले मी "माझे जीवन गाणे" गायला ;) थोड्याशा मनस्तापानंतर...

Comments

Popular posts from this blog

दे नेवर रिअली केअर्ड अबाउट हिम!!

काल व्हिएच १ चेनेल वर सगळे विडिओज बघितले..आजवर मी त्याचे एक दोन विडिओज च पाहिले होते..जे काही त्याच्याबद्दल माहित होते ते फ़क्त वर्तमानपत्राद्वारे, बातम्यांद्वारे.. सगळे लोकं म्हणतायत त्याप्रमाणे माझी आणि ईंग्रजी गाण्यांची ओळख मायकल च्या गाण्यांनी नाही झाली..मी कदाचित खुप लहान होते जेव्हा त्याचे अल्बम्स रिलिज झाले...पण तो लक्षात राहीला त्याच्या मुंबईच्या वारी ने.. त्याला पाहण्यासाठी आलेल्या चाहत्यांची संख्या पाहुनच तो नक्कीच काहितरी स्पेशल असावा असे मात्र वाटुन गेले.. त्याचं "दे डोन्ट रिअली केअर अबाउट अस" गाणं मात्र लक्षात राहीलं.. काल पाहीलेलं एबीसी हे त्याने वयाच्या ११ व्या वर्षी गायलेलं गाणं तर केवळ अप्रतिम..वयाचं ११ वर्ष जेव्हा मुलं स्टेजवरही जायला घाबरतात, तिथे हा अगदी आरामात परफ़ोर्म करत होता...नाचत होता..अगदी लिलया गात होता... http://www.youtube.com/watch?v=MYx3BR2aJA4&feature=related त्याचं मी काल पाहिलेलं त्याचं प्रत्येक गाणं मला पुन्हा एकदा या कलाकराची नव्याने ओळख करुन देत गेलं.... "Man In The Mirror" : - I'm Gonna Make A Change, For Once In My Li...

अजुन एक वर्ष तुझ्याशिवाय ..

प्रिय आईस, २००९ संपायला अजुन १ दिवस बाकी आहे आणि सगळे विचारतायत कसं साजरा करणार? तू पण असंच म्हणायचीस..की अगं ३१ डिसेंबर कुठल्याही वर्षाला एकदाच येतो..तो त्या वर्षाचा शेवटचा दिवस म्हणुन त्या वर्षाला आनंदाने निरोप द्यायचा..पण १ जानेवारीला सकाळी लवकर उठुन दिवस साजरा करायचा..हम्म!! तुझं सांगणं नेहमीच पटायचं आणि आजही पटतं..मोठ्ठं झाल्यावर सुध्दा.. हे अजुन एक वर्ष तुझ्याशिवाय गेलं..म्हणजे तुझ्या जिवंत अस्तित्वाशिवाय.. तू पुढच्या प्रवासाला लागली असशीलच गं पण तरीपण मला तुझा वावर अजुनही जाणवतो अपवाद फ़क्तं मी दिवाळीत बेसनाचे लाडु केले तेव्हाचा...मला काहीच सांगितलं नाहीस आणि ते लाडु खुपच खराब झाले...थोड्या वेळ मीच घाबरले होते की का तू असल्याचं जाणवत नाहिए? पण नंतरचा प्रत्येक दिवस तुझ्या असण्याची हमी देतच होता... बरेच बदल झालेत यावर्षी...माझं लग्न झालं हा सगळ्यात मोठा बदल...लग्न झाल्यावर बाबांना आणि मला तुझ्या आठवणीने खुप भरुन आलं. छकु नेहमीसारखीच शांत होती..सगळ्यांनाच जाणवली तुझी कमतरता पण कुणी आम्हाला वाईट वाटेल म्हणुन बोलुन दाखवलं नाही..चंचल मावशीने "माय मरो मावशी जगो" ही म्हण स...

इरुवर - तमिळ चित्रपटांचा मेरुमणी

तमिळ सिनेमा हा विषय मी ब्लॉगवर कधीच लिहिलेला नाही. आता १० वर्षे झालीत मद्रास मध्ये आणि बऱ्यापैकी तमिळ पण बोलता येतं, कळतं, म्हणून ठरवले की नेहेमी भाषांतर केलेल्या या नव्या जुन्या चित्रपटाबद्दल लिहावे. तामिळ ही खूप गोड़ आणि ओघवती भाषा आहे, अर्थात कुठल्याही भाषेसारखीच. पण या भाषेचा जन्म प्राकृत भाषेमुळे झाला. लिपी अतिशय सोपी असली तरी शब्द आणि त्याचे उच्चारण कठीण आहे. थोडे अजूनही कळत नाहीच ;) काही दिवसांपूर्वीच "इरुवर" चित्रपट पाहिला. इरुवर - म्हणजे दोघे - ऐश्वर्या चा पहिला चित्रपट म्हणून फेमस आहेच पण जयललिता, करुणानिधी आणि एमजीआर या तीन पूर्व मुख्यमंत्र्यांच्या आयुष्यावर बेतलेला हा चित्रपट. मणी रत्नम चं दिग्दर्शन, ए आर रहमान चं संगीत. अजून काय हवे? मल्याळी अभिनेता मोहनलाल ( एमजीआर), ऐश्वर्या राय ( एमजीआर ची पूर्व पत्नी आणि जयललिता ) च्या भूमिकेत, प्रकाश राज ( करुणानिधी ) च्या भूमिकेत, रेवती आणि तब्बू या करुणानिधींच्या पत्नी. १९५० मधले सेट्स आणि त्याच काळचा प्लॉट. संतोष सिवन ची सिनेमॅटोग्राफी अप्रतिम आहे. तेव्हा संतोष सिवन अतिशय नवखे असतील पण तरीही खूपच सुंदर चित...