Skip to main content

Posts

Showing posts from October, 2009

...

खुप दिवसांनी कुणीतरी रागवलं मला आज..अचानक वाटलं..आपण हे फ़ीलींग विसरुनच गेलो होतो की.. लहानपणी हे करु नकोस, ते करु नकोस पासुन बर्याच गोष्टींसाठी मी रागवणं खाल्लंय...पण आताशा सगळंच काही परफ़ेक्ट करण्याच्या नादात मी कुठलीही चूक केली नाही आणि पर्यायाने कुणी कुणी म्हणुन रागवलं नाही..कसं मिळमिळीत वाटत होतं आत्तापर्यंत असं वाटायला लागलं आणि कुठेतरी त्या रागवणार्या माणसाचे माझ्यातल्या खोडकर मुलीने आभार मानले... आजचं रागावणं स्पेशल या करीता की, दिवाळीच्या सुट्टीचा याच्याशी थेट संबंध आहे...दिवाळीत नवीन ड्रेस, फ़टाके फ़राळ या सोबत कुठल्याही छोट्याश्या खोडीसाठी आवडत्या मामा किंवा मावशी कडुन डोक्यावर पडलेला टप्पू पण माझ्यासाठी स्पेशल असायचा तसंच हे झालं योगायोगाने... लहानपणी कुणीही रागवलं की, लगेच माझे डोळे भरुन यायचे, नाक लाल व्हायचं आणि गोबरे गाल पार उतरुन जायचे. कुणासमोर गेलं अश्या अवतारात की लगेच सगळी विचारपूस होत असे आणि मला खुप अवघडल्यासारखं वाटत असे. मग हे अवघडलेपणच येऊ नये अश्या प्रयत्नात मी चुका करायलाच विसरले...आणि मोठी झाले..आज मात्र माझं बालपण परत येऊन मला मी मोठी झाल्याचं सांगुन गे

नवं घर..नवा पत्ता!

आपणास कळविण्यास आनंद होतोय की, मुग्धाचा "गुलमोहर!!" आता ब्लॉगर च्या नव्या अंगणात फ़ुलणार आहे. वाचकांनी कृपया नव्या पत्त्याची नोंद घ्यावी.. www.mugdhaaajoshi.blogspot.com आजवर जसे तुम्हा सगळ्यांचे भरभरून प्रेम आणि प्रतिसाद मिळालेत तसे इथून पुढेही मिळावेत आणि माझा गुलमोहर सतत फुलत रहावा अशी छोटीशी इच्छा!! -मुग्धा

हुरहुर...

दिवाळी जवळ येतेय आणि माझं माहेरी जाणंही. या वर्षी सगळेच सण नवे नवे होते. नवी जागा, नवीन प्रथा, नवे लोकं आणि नवी हुरहुर सणासुदीच्या दिवसात कधीही नं लागलेली. सुरुवात झाली ती गणेशोत्सवाने. इथे गणेशोत्सव जरी असला तरी महाराष्ट्राइतक्या प्रमाणावर साजरी केला जात नाही. गणपतीच्या दहा दिवसांत प्रत्येक दिवशी माझं मन तिथल्या आठवणीने खट्टु होत होतं. गणेशचतुर्थीला २१ दुर्वांच्या २१ जुड्यां तोडायला निघालेली माझी स्वारीच माझ्या डोळ्यापुढे आली. ते एक काम मी फ़ार मनोभावे करत असे. बरं फ़क्त २१ च जुड्या नसायच्या त्यात आजीसाठी एक, बाबांसाठी एक, आईसाठी एक अश्या जास्तंच्या ५ जुड्या तोडाव्या लागायच्या. मग अथर्वशीर्षाचे २१ आवर्तनं. आईने केलेला मोदकांचा नैवेद्य. सगळं सगळं डोळ्यापुढे येत होतं प्रत्येक दिवशी. आई गेली आणि ती करत असलेले सणंही गेले. गणपती बाप्पांना मनोमन पुढच्या वर्षी लवकर या म्हंटले आणि आमच्या घरी नक्की या ही स्पेशल रिक्वेस्ट ही केली.. हरतालिका हे मी तिसरीपासुन करत असलेलं व्रत मी याही वर्षी केलं. माझ्या मनाजोगता नवरा दिल्याबद्दल शिवशंकराचे स्पेशल आभार मानले मी यावेळी; ) विदर्भात महालक्ष्म्यांचा सण

रिऍलिटी शोज

रिऍलिटी शोज आजकाल भारतात चांगल्यापैकी चालतात. मला हे शोज कुठुन सुरु झाले वगैरे माहित नाही पण केवळ उत्सुकतेपायी मी ही काल परवा पासुन "बिग बॉस" बघायला लागले आहे (हे माझं प्रामाणिक कन्फ़ेशन!).काही गोष्टी तश्या अमेरिका किंवा तसल्या विकसित देशातील लोकांनाच शोभुन दिसतात हे माझे मत होऊ लागले आहे हल्ली. या सगळ्या शोज चं एक अवलोकन केलं असता पाश्चात्यांनी त्यांची मनोवृत्ती,कुटुंबसंस्था, राहणीमान, संस्कृती, नवरा बायकोचे मुलांचे एकमेकांसोबत असलेले नाते, शिक्षण पध्दती या सगळ्यां गोष्टी सुधारण्यासाठी कदाचित या शोज चा अवलंब केला असावा असे मला वाटते. आणि त्यानुसार हे जे शोज आहेत त्यामध्ये टी आर पी ह्याच एका मुद्द्याचा विचार नं करता बाकी सगळ्या मनोवृत्ती,कुटुंबसंस्था इ इ गोष्टी अगदी जाणीवपूर्वक नीट हाताळल्या गेल्या आहेत. कदाचित कुटुंब, विवाहसंस्था इ इ गोष्टी टिकवुन ठेवणे ही काळाची गरज आहे असे त्यांना वाटले असावे. टी व्ही हेच लोकांना प्रबोधित करण्याचे साधन आहे म्हणुन हे शोज सुरु केले असावेत. अर्थात मी ह्या सगळयाचा खुप सकारात्मक विचार करतेय पण या निमित्ताने का होईना लोक त्यांच्या नातेसंबंधाबद्द

झोपीलागी जीवा....

आताशा पुन्हा मला "झोप" फारच आवडायला लागली आहे. आताशा "पुन्हा" म्हणण्याचे कारण हे की मला समज आल्यापासूनच मला झोप प्रचंड आवडते पण मध्ये जरा गडबड झाली होती. गेली चार वर्षे मी हवी तितकी झोपली नाही असं मला मनापासून वाटतं(तसं माझ्याव्यतिरिक्त माझ्या घरात कुणालाही वाटत नाही याची मला खात्री आहे ) ;) तीझोपेचा आई बाबांना आणि मलाही शोध लागला. त्यांच्यामते (माझ्यामते नाही) मी खूप झोपायचे. ८ ते ९ तास साधारण मनुष्याने झोपावे असं विज्ञान सांगतं हे आई बाबांना कोण सांगणार? त्यांच्यामते मला अभ्यासाचं, परीक्षेचं टेन्शनच नाही असं सिद्धं झालं होतं. आणि मला रोज मला हे काय होतंय? असं वाटायला लागलं. खरं पाहिलं तर असं कुठे लिहिलंय की दहावीच्या विद्यार्थ्यांनी कमी झोपावं?? पण हे बाबा रोज मला इतके रागावायचे की मी उठल्याक्षणी आपण आठ तासापेक्षा किती जास्त झोपलो हे मोजायची. :p , तिला कुठलं तरी टेन्शन आहे म्हणून ती जास्त झोपते" असं Doctor म्हणाले, त्यामुळे मला कुणीही फार झोपते असं म्हटलं की मी सरळ माझ्यावर असलेल्या अतीव ढोंगी टेन्शन ची आठवण करून देत असे. बाबांनी मात्र लगेच त्या Doctor ला मू