Skip to main content

मोठा पाऊस!!!

पाऊस झाला काल चेन्नईत..ऒफ़िस मधुन निघाले आणि मस्त शिरवा आला... पण काय माहीत जरा उदासच वाटत होती स्वारी...पावसाचे थेंब पडत होते गाडीच्या काचेवर पण ते खुप उदास वाटत होते...एरवी हसता खेळता येणारा पाऊस असा उदास पाहुन माझ्या लहानपणीच्या निखळ निरागस पावसाची आठवण आली...अगदी मनापासुन..
आज पाऊस पडत होता पण वेळेचं, वाहतुकीचं, लोकांचं भान असलेली मी अगदी रुक्षपणे त्याच्याकडॆ बघत होते... कदाचित हेच कारण असावं त्याच्या उदास असण्याचं..
लहानपणी अगदी आमच्यातलाच एक वाटणारा पाऊसही आता मोठा झाल्यासारखा वाटला...माझ्यासारखाच..!!
त्यालाही आज भान असल्या सारंखं वाटत होतं लोकांचं, वेळेचं..म्हणून लगेचंच थांबला...लोकांची गैरसोय होतेय हे बहुदा लक्षात आले असावे त्याच्या;)
लहानपणी किती मज्जा असायची नाही पावसाची...कागदाच्या होड्या आणि चिखलात खेळ....घरी आईने केलेले कांदे भजे...आणि टि.व्ही वरील..एखादा आवडता कार्यक्रम...
आता मात्र ए.सी ऒफ़ीस च्या चार भिंती बाहेरचे पावसाचे अस्तित्व...ऒफ़िसातुन सुटल्यावरच जाणवते...याचं एकमेव कारण म्हणजे काचबंद खिडक्या ...
पावसाचं आणि खिडकीचं ही काही नातं असावं कारण जेव्हा जेव्हा हा पाउस बरसतो तेव्हा तेव्हा खिडकी अजुनच आकर्षक वाटायला लागते..आणि खिडकीतुन बघताना...बरसणारा पाउस अजुनच मोहक वाटायला लागतो...
तसंच काहीतरी नातं पाणीपुरी, भजे, तपरीवरचा गरम चहा या मंडळींचं पावसाशी असावं...पाऊस सुरु असतांना यातील एखाद्या तरी गोष्टीचा आस्वाद घ्यावाच नाहीतर अगदी सुने सुने वाटायला लागते...
लहानपणीचा पावसाची भिजलेल्या मातीशी, कागदाच्या होडयांशी..चिखलाशी..आईच्या रागवण्याशी,फ़ारच गटटी होती..
आजकालचा मोठा पाऊस म्हणजे उनाड झालाय...
मातीचे रस्ते...अंगणे..हे सगळे नाहीशेच होत असल्याने मातीच्या सुवासाशी त्याचं काहीच नातं राहीलं नाहीए...
लहान मुलेही आताशा कागदाच्या होड्या वगैरे बनवत नाहीत..त्यामुळे..कागदाच्या होडीची खुप आठ्वण जरी येत असल तरी होडी मात्र त्याच्या भेटीला सहसा येत नाही....
चहाच्या टपरीशी, पाणीपुरीशी आणि भज्यांशी मात्र त्याची मैत्री टिकुन आहे....कधी कधी तो ही आठ्वत असेल...माझ्या सारखेच त्याचे बालपण....!!!!

Comments

  1. मृदुल मावशीJune 10, 2009 at 4:37 AM

    लिखाण आवडले....विशेषतः लहानपणीच्या पावसाचे वर्णन...
    आपण उदास असलो की पावसाचे उदास वाट्णे स्वाभाविक आहे...

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

इरुवर - तमिळ चित्रपटांचा मेरुमणी

तमिळ सिनेमा हा विषय मी ब्लॉगवर कधीच लिहिलेला नाही. आता १० वर्षे झालीत मद्रास मध्ये आणि बऱ्यापैकी तमिळ पण बोलता येतं, कळतं, म्हणून ठरवले की नेहेमी भाषांतर केलेल्या या नव्या जुन्या चित्रपटाबद्दल लिहावे. तामिळ ही खूप गोड़ आणि ओघवती भाषा आहे, अर्थात कुठल्याही भाषेसारखीच. पण या भाषेचा जन्म प्राकृत भाषेमुळे झाला. लिपी अतिशय सोपी असली तरी शब्द आणि त्याचे उच्चारण कठीण आहे. थोडे अजूनही कळत नाहीच ;) काही दिवसांपूर्वीच "इरुवर" चित्रपट पाहिला. इरुवर - म्हणजे दोघे - ऐश्वर्या चा पहिला चित्रपट म्हणून फेमस आहेच पण जयललिता, करुणानिधी आणि एमजीआर या तीन पूर्व मुख्यमंत्र्यांच्या आयुष्यावर बेतलेला हा चित्रपट. मणी रत्नम चं दिग्दर्शन, ए आर रहमान चं संगीत. अजून काय हवे? मल्याळी अभिनेता मोहनलाल ( एमजीआर), ऐश्वर्या राय ( एमजीआर ची पूर्व पत्नी आणि जयललिता ) च्या भूमिकेत, प्रकाश राज ( करुणानिधी ) च्या भूमिकेत, रेवती आणि तब्बू या करुणानिधींच्या पत्नी. १९५० मधले सेट्स आणि त्याच काळचा प्लॉट. संतोष सिवन ची सिनेमॅटोग्राफी अप्रतिम आहे. तेव्हा संतोष सिवन अतिशय नवखे असतील पण तरीही खूपच सुंदर चित...

अजुन एक वर्ष तुझ्याशिवाय ..

प्रिय आईस, २००९ संपायला अजुन १ दिवस बाकी आहे आणि सगळे विचारतायत कसं साजरा करणार? तू पण असंच म्हणायचीस..की अगं ३१ डिसेंबर कुठल्याही वर्षाला एकदाच येतो..तो त्या वर्षाचा शेवटचा दिवस म्हणुन त्या वर्षाला आनंदाने निरोप द्यायचा..पण १ जानेवारीला सकाळी लवकर उठुन दिवस साजरा करायचा..हम्म!! तुझं सांगणं नेहमीच पटायचं आणि आजही पटतं..मोठ्ठं झाल्यावर सुध्दा.. हे अजुन एक वर्ष तुझ्याशिवाय गेलं..म्हणजे तुझ्या जिवंत अस्तित्वाशिवाय.. तू पुढच्या प्रवासाला लागली असशीलच गं पण तरीपण मला तुझा वावर अजुनही जाणवतो अपवाद फ़क्तं मी दिवाळीत बेसनाचे लाडु केले तेव्हाचा...मला काहीच सांगितलं नाहीस आणि ते लाडु खुपच खराब झाले...थोड्या वेळ मीच घाबरले होते की का तू असल्याचं जाणवत नाहिए? पण नंतरचा प्रत्येक दिवस तुझ्या असण्याची हमी देतच होता... बरेच बदल झालेत यावर्षी...माझं लग्न झालं हा सगळ्यात मोठा बदल...लग्न झाल्यावर बाबांना आणि मला तुझ्या आठवणीने खुप भरुन आलं. छकु नेहमीसारखीच शांत होती..सगळ्यांनाच जाणवली तुझी कमतरता पण कुणी आम्हाला वाईट वाटेल म्हणुन बोलुन दाखवलं नाही..चंचल मावशीने "माय मरो मावशी जगो" ही म्हण स...

दलपती - मणी रत्नम चा मास्टरपीस

तामिळ चित्रपटांमध्ये मी सगळ्यात पहिले पाहिलेला चित्रपट म्हणजे दलपती. तामिळ भाषा जरी क्लिष्ट वाटत असली तरी ती सर्वांगसुंदर भाषा आहे. आपण मराठी किंवा इतर भाषिक लोक नेहेमी दक्षिणेकडच्या ४ भाषांची सारख्या वाटतात म्हणून खिल्ली उडवत असतो पण ह्या चारही भाषा कन्नड, तमिळ, तेलगू आणि मल्याळम अतिशय समृद्ध आहेत. चारही भाषांची एक स्वतःची चित्रपट सृष्टी आहे हे महत्वाचे. बाहुबली हे एक उत्तम उदाहरण. बरेच हिंदी चित्रपट, मल्याळम आणि तामिळ चित्रपटांवरून प्रेरित असतात हे सांगणे नं लगे. तर असाच एक १९९०'स मध्ये तयार झालेला चित्रपट दलपती म्हणजे म्होरक्या किंवा प्रमुख किंवा सेनापती.  कर्ण आणि अर्जुन ह्या धर्तीवर आधारित असलेला हा चित्रपट त्याकाळी खूप गाजला होता. मामुटी, रजनीकांत आणि अरविंद स्वामी, शोभना आणि सगळे उत्तम कलाकार. इलैराजा यांचे संगीत आणि संतोष सिवन यांची सिनेमॅटोग्राफी. असे म्हणतात की मणी रत्नम चे सगळे चित्रपट सकाळी चित्रांकित करतात. त्यावेळी अतिशय सुंदर प्रकाश असतो आणि त्याचा पुरेपूर उपयोग ते प्रत्येक शॉट मध्ये करून घेतात. ह्या चित्रपटात ते प्रकर्षाने जाणवते.  मणी रत्नम चे ...