Skip to main content

मराठी पाऊल पडते पुढे?

काल सा रे ग म प चा एपिसोड बघितला... सगळ्याची गाणी छान झाली...मला अमृताचं "गुणी बाळ असा" गाणं आवडलं..ते तिने गायले म्हणुन नव्हे तर मुळ गाणंच छान आहे..
मधुराचं "ही वाट दूर जाते"... छानं च गायली...पण आताशा हे सा रे ग म प ही बोअर व्हायला लागलं आहे...
गाणी म्हणण्याचा कार्यक्रम मग त्यात जुजबी माहीती न देता परीक्षकाच्या खुर्चीवर बसलेली मंडळी उगाचच्या गोष्टीवर का बोलतात हे मल न उलगडलेले कोडे आहे.. मलाही प्रत्येक गाण्याच्या मागे असलेल्या गमतीजमती माहीती करुन घ्यायला आवडते पण मग त्यासाठी एखादा वेगळा कार्यक्रम असावा (इतिहास..गाण्याचा) वगैरे नावचा डोळा मारा
खरंतर आता सगळेच प्रोग्राम्स, सगळ्याच मालिका अगदी रटाळ वाटतात विशेषतः झी मराठीवरच्या..अगदी बोटावर मोजण्याइतकेच प्रोग्राम्स..मालिका तर सगळ्याच प्रेडिक्टेबल..सकाळच्या घाईत कुणाला वेळ आहे "गुड मॉर्निंग महाराष्ट्र" बघायला...कुठलीही छान गाणी जर लावलीत तर गृहीणी...कामावर जाणारी लोकं सगळेच काम करता करता गाणी ऐकु शकतात..जेव्हापासुन हे चैनल सुरु झाले आहे तेव्हापासुन गुड मॊर्निंग महाराष्ट्र सुरु आहे पण त्यात काहीही बदल नाही...आणि हे तरी ठीक...ई टि व्ही वाल्यांनी तर कहरच केला..सकाळ्च्या वेळेला कुणी घर सजावटीच्या वस्तु कश्या तयार कराव्यात हे बघेल का? हे सगळे पाहुन माझ्या नवरेबुवांना हसु आवरणे कठीण जाते..
सुर ताल आता जख्ख म्हातारे झाले आहे त्याऐवजी कुठ्ल्या दुसर्या कार्यक्रमचे आयोजन का केले जात नाही? हे तर कळतच नाही..यांच्याकडे प्रतिभावंत लोकांची कमी आहे की नक्की काय प्रॉब्लेम आहे हे माहीती नाही...मुळात प्रेक्षकाची काय गरज आहे हे कुणालाही कळत नाही..
अरे जर स्टार प्लस चैनल वर रटाळ मालिका चालु आहेत तर मराठी चॅनल वाल्यांनो तुम्हीतरी तुमचा स्तर टिकवा...आणि प्रेक्षकांना काही तरी नवीन द्या..जुन्या दर्जेदार मालिका आठवल्या तर असं वाटतं की काळाच्या ओघात मराठी माणुस आपली प्रतिभा गमावुन बसलाय की काय?
अगदी मोजता येतील इतकेच चित्रपट...त्यातील सुमार गाणी..सगळे संगीत दिग्दर्शक कुठे गेलेत काय माहीती?...(सारेगमप मधे परिक्षक म्हणुन डोळा मारा)
महाराष्ट्रातील संगीत म्हणजे काहीच कुटुंबांची मक्तेदारी नव्हे हे लोकांना कधी कळणार कोण जाणे ..माझ्यामते सगळ्याच जुन्या नव्या गायकांनी या कलेला योग्य तोच न्याय दिला आहे...आणि जसा सकाळी उगवलेला सुर्य संध्याकाळी मावळतोच..तसेच कलाकाराचे आहे..
प्रत्यक्ष कलाकाराला त्याच्या कारकिर्दीबद्दल एवढे अप्रुप नसावे...आपणच सारे त्याचं भांडवल करतो असं मला वाटतं...जितके गाण्याचे कार्यक्रम आहेत तितके कवी सम्मेलनं, संगीत दिग्दर्शनाची प्रतियोगिता का असत नाही...प्रतिभेला चालना,मोठं व्यासपीठ कोण मिळवुन देणार? ही आजची गरज आहे...नाहीतर आपण आयुष्यभर "मराठी पाऊल पडते पुढे" आळवत बसु...आणि बाकीच्या प्रांतातील लोकं मात्र कित्येक पावलांनी मराठी माणसापेक्षा पुढे असतील..

Comments

  1. आजच एका ब्लॉग वर वाचलं की कार्तिकीला आता हिंदी सारेगमप मधे डायरेक्ट एंट्री मिळाली आहे. मी स्वतः तर टिव्ही कधिच पहात नाही. फक्त सुर ताल आणि सारेगमप मात्र पहातो.
    चांगली सुरुवात आहे. पुढिल लिखाणासाठी शुभेच्छा..

    ReplyDelete
  2. hiloo mai

    gone through the blog and found that u r well in wriing in marathi and pouring exactly what u fill or ur expression. it is rarely been seen in math people.

    why u h,ve discontinued chat on that day

    blog is good.

    bravo

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

दे नेवर रिअली केअर्ड अबाउट हिम!!

काल व्हिएच १ चेनेल वर सगळे विडिओज बघितले..आजवर मी त्याचे एक दोन विडिओज च पाहिले होते..जे काही त्याच्याबद्दल माहित होते ते फ़क्त वर्तमानपत्राद्वारे, बातम्यांद्वारे.. सगळे लोकं म्हणतायत त्याप्रमाणे माझी आणि ईंग्रजी गाण्यांची ओळख मायकल च्या गाण्यांनी नाही झाली..मी कदाचित खुप लहान होते जेव्हा त्याचे अल्बम्स रिलिज झाले...पण तो लक्षात राहीला त्याच्या मुंबईच्या वारी ने.. त्याला पाहण्यासाठी आलेल्या चाहत्यांची संख्या पाहुनच तो नक्कीच काहितरी स्पेशल असावा असे मात्र वाटुन गेले.. त्याचं "दे डोन्ट रिअली केअर अबाउट अस" गाणं मात्र लक्षात राहीलं.. काल पाहीलेलं एबीसी हे त्याने वयाच्या ११ व्या वर्षी गायलेलं गाणं तर केवळ अप्रतिम..वयाचं ११ वर्ष जेव्हा मुलं स्टेजवरही जायला घाबरतात, तिथे हा अगदी आरामात परफ़ोर्म करत होता...नाचत होता..अगदी लिलया गात होता... http://www.youtube.com/watch?v=MYx3BR2aJA4&feature=related त्याचं मी काल पाहिलेलं त्याचं प्रत्येक गाणं मला पुन्हा एकदा या कलाकराची नव्याने ओळख करुन देत गेलं.... "Man In The Mirror" : - I'm Gonna Make A Change, For Once In My Li...

अजुन एक वर्ष तुझ्याशिवाय ..

प्रिय आईस, २००९ संपायला अजुन १ दिवस बाकी आहे आणि सगळे विचारतायत कसं साजरा करणार? तू पण असंच म्हणायचीस..की अगं ३१ डिसेंबर कुठल्याही वर्षाला एकदाच येतो..तो त्या वर्षाचा शेवटचा दिवस म्हणुन त्या वर्षाला आनंदाने निरोप द्यायचा..पण १ जानेवारीला सकाळी लवकर उठुन दिवस साजरा करायचा..हम्म!! तुझं सांगणं नेहमीच पटायचं आणि आजही पटतं..मोठ्ठं झाल्यावर सुध्दा.. हे अजुन एक वर्ष तुझ्याशिवाय गेलं..म्हणजे तुझ्या जिवंत अस्तित्वाशिवाय.. तू पुढच्या प्रवासाला लागली असशीलच गं पण तरीपण मला तुझा वावर अजुनही जाणवतो अपवाद फ़क्तं मी दिवाळीत बेसनाचे लाडु केले तेव्हाचा...मला काहीच सांगितलं नाहीस आणि ते लाडु खुपच खराब झाले...थोड्या वेळ मीच घाबरले होते की का तू असल्याचं जाणवत नाहिए? पण नंतरचा प्रत्येक दिवस तुझ्या असण्याची हमी देतच होता... बरेच बदल झालेत यावर्षी...माझं लग्न झालं हा सगळ्यात मोठा बदल...लग्न झाल्यावर बाबांना आणि मला तुझ्या आठवणीने खुप भरुन आलं. छकु नेहमीसारखीच शांत होती..सगळ्यांनाच जाणवली तुझी कमतरता पण कुणी आम्हाला वाईट वाटेल म्हणुन बोलुन दाखवलं नाही..चंचल मावशीने "माय मरो मावशी जगो" ही म्हण स...

इरुवर - तमिळ चित्रपटांचा मेरुमणी

तमिळ सिनेमा हा विषय मी ब्लॉगवर कधीच लिहिलेला नाही. आता १० वर्षे झालीत मद्रास मध्ये आणि बऱ्यापैकी तमिळ पण बोलता येतं, कळतं, म्हणून ठरवले की नेहेमी भाषांतर केलेल्या या नव्या जुन्या चित्रपटाबद्दल लिहावे. तामिळ ही खूप गोड़ आणि ओघवती भाषा आहे, अर्थात कुठल्याही भाषेसारखीच. पण या भाषेचा जन्म प्राकृत भाषेमुळे झाला. लिपी अतिशय सोपी असली तरी शब्द आणि त्याचे उच्चारण कठीण आहे. थोडे अजूनही कळत नाहीच ;) काही दिवसांपूर्वीच "इरुवर" चित्रपट पाहिला. इरुवर - म्हणजे दोघे - ऐश्वर्या चा पहिला चित्रपट म्हणून फेमस आहेच पण जयललिता, करुणानिधी आणि एमजीआर या तीन पूर्व मुख्यमंत्र्यांच्या आयुष्यावर बेतलेला हा चित्रपट. मणी रत्नम चं दिग्दर्शन, ए आर रहमान चं संगीत. अजून काय हवे? मल्याळी अभिनेता मोहनलाल ( एमजीआर), ऐश्वर्या राय ( एमजीआर ची पूर्व पत्नी आणि जयललिता ) च्या भूमिकेत, प्रकाश राज ( करुणानिधी ) च्या भूमिकेत, रेवती आणि तब्बू या करुणानिधींच्या पत्नी. १९५० मधले सेट्स आणि त्याच काळचा प्लॉट. संतोष सिवन ची सिनेमॅटोग्राफी अप्रतिम आहे. तेव्हा संतोष सिवन अतिशय नवखे असतील पण तरीही खूपच सुंदर चित...