Skip to main content

Valentine Moments



तिने त्याला पाहीलं अगदी पहील्यांदा, ओझरतंच. ..मळकीच टी शर्ट घातलेला आणि घामघुम झालेला तो..तिला आवडला? कळलं नाही तिला तिचंच...
क्लासमध्ये रोज उशीरानेच होणारी त्याची एंट्री..पण त्याच्या त्या उशीराच येण्याची वाट पाहणारी ती..तो दारात आल्या आल्या तिच्या काळजाचा ठोका चुकायचा...
शेवटच्या बेंचवर बसुन सिंसिअरली क्लास अटेंड करणा~यापैकी तो, ती आणि आणखी काही मुलं...त्याच्या रेखीव बोटांना त्याच्या नकळत न्याहाळणारी ती..हरवुन बसायची स्वतःला..
त्याच्या येण्याने तिच्या मनातला गुलमोहर बहरला होता, त्याच्यासोबतचा प्रत्येक क्षण आपण आयुष्यात अनेकानेक वेळा अनुभवावा असं तिला सारखं वाटायचं..पण हे नक्की का होतंय याचा मात्र तिला अजिबात पत्ता लागत नव्हता...
त्याचा सहवास तिच्यासाठी एक समृध्द करणारा अनुभव असायचा. आपली सगळी स्वप्न आपण याच्यासोबतंच पूर्ण करु शकु असा विश्वास तिला कोण जाणे कुठुन येत असे. 
एक अशीच संध्याकाळ, सुर्याने आपल्या सुंदर रंगाची उधळण करुन फुलवलेली, ती आपल्या घराच्या गैलरीत संतूरवर वाजवलेला राग यमन ऐकत होती. वाफ़ाळत्या चहाच्या घोटाबरोबर त्याची स्वप्ने पाहण्यात रंगून गेली होती. 
दारावरची बेल वाजली तशीच ती उठली आणि बघते तर काय..तो प्रत्यक्षात समोर. त्याचा तो मुग्ध करणारा एक नेहमीचाच सुवास, नुकतंच शावर घेउन आल्यासारखे त्याचे केस..आणि तीच आर्त नजर..ती त्याला बघतंच राहीली...
एव्हाना दिवेलागण झाली होती.."गच्चीवर जायचं थेट?" ह्या प्रश्नाने ती भानावर आली. एक तर त्याचा सहवास आणि कातरवेळ.ही वेळ तो असला तरी आणि नसला तरी नेहमीच जीवघेणी असते असा विचार तिच्या डोक्यात सुरु होता. दोघे खरंतर गच्चीवर नेहमी यायचे, गप्पा मारायचे आणि थोड्या वेळाने तो परस्पर घरी निघुन जात असे. पण आजची संध्याकाळ थोडी विचित्र होती असं तिला वाटत होतं. नेहमीच्या जागेवर बसायच्या आधी त्याने तिचा हात धरला आणि डोळ्यात डोळे घालुन म्हणाला " मला तू खुप आवडतेस" तिला क्षणभर सुचेनासं झालं. "मला ही तू खुप आवडतोस" असं नं म्हणता त्याच्या डोळ्यात अधाशासारखी पाहत राहीली..जणु तिला आज त्याच्याकडुन खुप काही ऐकायचं होतं...तसं च्या तसं जसं तिच्या मनात चाललं होतं.
आता तो नुसता तो राहिला नव्हता तिचा "सखा" झाला होता. 
रस्त्यावरच्या दिव्यांची रांग बघतांना तिचं मन "एक दिन दिल की राहों मे अपने लिये जल उठेंगे मोहब्बत के इतने दिये मैने सोचा नं था" ही ओळ गुणगुणत होतं..
_________________________________________________________________________________


सकाळपासुन तॊ कुठे आहे याचा पत्ता नाही..नेहमी सकाळी एकदातरी फोन करणारा तो आज कसा काय विसरला असं वाटुन ती अधिकच अस्वस्थ झाली.
रविवारची कामं आटपत तिने त्याचे विचार थोड्याबेळापुरता का होइना बाजुला सारायचा प्रयत्न केला. 
"तेरे आने की जब खबर मेहके, तेरी खुशबु से सारा घर महके" त्याचं येणं आणि तिचं हे गाणं मुद्दाम गुणगुणणं हे काही नवीन नव्हतं..आज अचानक हेच गाणं ओठी यावं याचं तिला आश्चर्यच वाटलं. चलो,
 आप नही तो आपकी याद में ये गाना ही सही म्हणत ती खुश झाली..
या रविवारी सगळे मित्र घरी येणार होते. या दिवसाची ती मनापासुन वाट पाहत होती. हळुहळु मित्र मंडळी जमा झाली..गप्पा रंगायला लागल्या..मग कुणीतरी पिझ्झा मागवला आणि पोटोबाही झाला....खुप दिवसांनी अशी दिलखुलास मैफ़ल रंगली होती....तिच्या एका मित्राने गिटार काढले आणि झाली गाणी सुरु...
आजकाल तिच्या प्रत्येक गाण्याला त्याच्यामुळे अर्थ प्राप्त झाला होता. तिचं एरवीचं काळं पांढरं (तिच्याच शब्दात ;) ) असणारं लाईफ़ तो असला आजुबाजुला की रंगीत दिसायला लागायचं..
तो जवळ नसला की लागणारी ओढ आता तिला विलक्षण जाणवायला लागली होती. एक एक गाणं तिच्या काळजाचा ठाव घेत होतं..
कुणाच्या लक्षात येऊ नये म्हणुन ती स्वतःला मैफ़िलीत झोकुन देण्याचा प्रयत्न करत होती..
"तुम्हारी आंखोमें हम सारी दुनिया भूल जाते है" ती म्हणायला लागली...त्याच्या डोळ्यांत साठवलेल्या तिच्या विश्वाला आठवून..नेहमीप्रमाणेच तिच्या गाण्याला सगळ्यांनी दाद दिली...पण दाद देणा~यांमध्ये तिचा सखा नव्हता..त्याचं तिला वाईट वाट्लं..
आजचा सोन्यासारखा रविवार..आणि त्याने एक फोनही करु नये..याची तिला प्रचंड चीड आली होती..तिच्या एकाही मित्रमैत्रिणीने त्याच्याबद्दल अजिबात उल्लेख नं केल्यानेही तिला वाईट वाटलं होतं..तिनेही मुद्दाम फोन करणं टाळलं..
संध्याकाळ झाली तशी तिने सगळय़ांसाठी चहा केला..रात्री सगळे सोबत जेउनच जाणार होते..त्यामुळे त्याला फोन करुन बोलवुन ही त्याच्या सोबत एकांतात बोलणं होणारंच नव्हतं. त्याला फोन नं केलेलाच बरा..असं तिला वाटलं..
कशी ही विचित्र ओढ, सगळे सोबत असतांनाही एकटं वाटणं, डोक्यात सारखं त्याच्याबद्दलचेच विचार असणं..आणि त्याचा एकही फोन नाही..कधीकधी तिला स्वतःचीच चीड यायची....तिला खुप हतबल वाटायचं.
दिवसभरचा थकवा आता जाणवायला लागला होता..रात्रीचे ११.४५ वाजले होते..सगळी मंडळी जेवुन खावुन घरी गेली..आता घरात फ़क्तं ती आणि तिची एक मैत्रिण..
तिने हातात डायरी घेतली लिहायला..आजचा दिवस तसा खरंच वेगळा होता. ..सगळे सोबत असल्यावर येणारी मजा तिने खुप दिवसांनी अनुभवली होती...एवढ्या दिवसांनंतर पहील्यांदाच त्याने तिला दिवस्भरात एकही फोन केला नाही..आणि तो भेटायला ही आला नाही..रुखरुख तर होतीच मनात पण ठिक आहे म्हणुन तिने उसासा टाकला.
तिच्या मैत्रिणीने तिला जबरदस्ती गैलरीत नेलं...बघते तर काय..खाली तो उभा होता....एवढ्यात तिचा फोन वाजला.."तुला काय वाटलं? मी विसरलो तुला? I cant live without seeing you".  ती हसली "वेडा आहेस तू" म्हणुन तिने फोन ठेवला...
सकाळपासुन लागलेली रुखरुख कधीच पळाली होती..

Comments

  1. was that end or ?????????

    ReplyDelete
  2. well mugdha it was a nice story.however once you eat chicken/NV.you dont like AMBAT VARAN-BHAT.all are bound to say PANCHAT ZALAY.
    :-)

    ReplyDelete
  3. @deepak: the title is "valentine moments" so..there are two discreet moments which i tried to describe..
    @ akshay: I m writing for my satisfaction...panchat aso va tikhat aso..kunala na aavadlyasahi kahi problem nahi..

    ReplyDelete
  4. हे क्षण मला आवडले...

    ReplyDelete
  5. tumhee 'regh'var comment dilit tyabaddal THANKS. Tumacha blog baghitala.

    ReplyDelete
  6. aaj tumche sarv lekh vachale.. khup chhan aahet..

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

दाक्षिणात्य संस्कृती - कोलम (रांगोळी)

दाक्षिणात्य संस्कृती - कोलम (रांगोळी) या पोस्ट मध्ये खाद्यसंस्कृती बद्दल नं सांगता रांगोळ्या आणि तामिळ नाडू यांच्या असलेल्या घट्ट नात्याबद्दल बोलूया. रांगोळी म्हणजे मला तरी एखाद्या स्त्री ची अभिव्यक्ती वाटते. रांगोळी काढणारा पुरुष जरी असेल तरी त्याच्या मनातल्या तरल भावना त्या रांगोळीत उतरतात. अर्थात नेहेमीच्या रोज काढल्या जाणाऱ्या रांगोळ्या म्हणजे गृहिणीची अभिव्यक्ती का हे मला नाही माहिती. पण अंगण झाडणे, सडा टाकणे, आणि रांगोळी काढणे  माझ्यासाठी एक थेरेपि आहे. आजकाल अपार्टमेंट आणि मोठाल्या इमारतींमुळे अंगण हा भागच नाहीसा झालाय घराचा, पण मागे आम्ही होतो त्या घरी मोठे अंगण होते. तामिळ नाडुत सगळ्या दारासमोर रांगोळी काढल्या जाते. अगदी अपार्टमेंट जरी असेल तरी अपार्टमेंट च्या मोठ्या दारासमोर रांगोळी काढली जातेच. इथल्या गल्ल्यांमध्ये समोरासमोरील घराच्या दारासमोर तर दोन्ही वेळेला रांगोळी काढल्या जाते. सकाळी ६. ०० ते ६.३० च्या दरम्यात सगळ्या स्त्रिया या कामात मग्न दिसतात. पहिले मला फार कुतूहल वाटे. एवढ्या सकाळी उठणे आणि पहिले काम म्हणजे रांगोळी. दिवस कसा  छान सुरु होत असेल असे वाटायचे. लग्न

दलपती - मणी रत्नम चा मास्टरपीस

तामिळ चित्रपटांमध्ये मी सगळ्यात पहिले पाहिलेला चित्रपट म्हणजे दलपती. तामिळ भाषा जरी क्लिष्ट वाटत असली तरी ती सर्वांगसुंदर भाषा आहे. आपण मराठी किंवा इतर भाषिक लोक नेहेमी दक्षिणेकडच्या ४ भाषांची सारख्या वाटतात म्हणून खिल्ली उडवत असतो पण ह्या चारही भाषा कन्नड, तमिळ, तेलगू आणि मल्याळम अतिशय समृद्ध आहेत. चारही भाषांची एक स्वतःची चित्रपट सृष्टी आहे हे महत्वाचे. बाहुबली हे एक उत्तम उदाहरण. बरेच हिंदी चित्रपट, मल्याळम आणि तामिळ चित्रपटांवरून प्रेरित असतात हे सांगणे नं लगे. तर असाच एक १९९०'स मध्ये तयार झालेला चित्रपट दलपती म्हणजे म्होरक्या किंवा प्रमुख किंवा सेनापती.  कर्ण आणि अर्जुन ह्या धर्तीवर आधारित असलेला हा चित्रपट त्याकाळी खूप गाजला होता. मामुटी, रजनीकांत आणि अरविंद स्वामी, शोभना आणि सगळे उत्तम कलाकार. इलैराजा यांचे संगीत आणि संतोष सिवन यांची सिनेमॅटोग्राफी. असे म्हणतात की मणी रत्नम चे सगळे चित्रपट सकाळी चित्रांकित करतात. त्यावेळी अतिशय सुंदर प्रकाश असतो आणि त्याचा पुरेपूर उपयोग ते प्रत्येक शॉट मध्ये करून घेतात. ह्या चित्रपटात ते प्रकर्षाने जाणवते.  मणी रत्नम चे सगळे

दाक्षिणात्य खाद्यसंस्कृती -दोसा

दोसा हा पदार्थ नं आवडणारा माणूस विरळा. माझी आणि दोस्याची ओळख आमच्या शाळेच्या आनंदमेळ्यात झाली होती. एक डोस्याचा स्टॉल होता तिथे, माझ्या बेस्ट फ्रेंड च्या काकी चा. मी नं खाताच गर्दी पाहून मला लक्षात आलं होतं तेव्हा कि काहीतरी स्पेशल आहे दोस्यात. हळूहळू जसे मोठे होत गेलो तसे आई बाबा बाहेर जेवायला घेऊन जायचे, मग खायचे काय तर डोसा, जगत नावाचे नागपूरला खूप प्रसिद्ध हॉटेल होते, अर्थात आता मॉल आणि मोठमोठ्या बिल्डींग्स असलेले नागपूर नव्हते तेव्हा उणीपुरी २ ते ३ फॅमिली रेस्टॉरंट्स. त्यात आर्य भवन एक आणि एक जगत. आई म्हणायची जी वस्तू आपण घरी जास्त करत नाही ती बाहेर खावी. म्हणून मोठ्ठा क्रिस्पि दोसा त्यात बटाट्याची भाजी, सोबत चटण्या. एकदम पोटभर व्हायचा तो मसाला डोसा. मी ९ वी, १० वी त असतांना आई घरीच डोसे करायची. पुढे कॉलेज मध्ये घेल्यावर वगैरे बाहेर खातांना डोसा हा पदार्थ बऱ्याचदा खाल्ल्या जायचा.  आता गेल्या १० वर्षांपासून चेन्नई मध्ये स्थायिक असल्याने, दोसा हा दाक्षिणात्य संस्कृतीचा किती अविभाज्य घटक आहे हे कळून आले. माझ्या घरी डोश्याचे पीठ नाही असा एकही दिवस जात नाही. जसे मराठी घरांत कणिक