Skip to main content

Valentine Moments



तिने त्याला पाहीलं अगदी पहील्यांदा, ओझरतंच. ..मळकीच टी शर्ट घातलेला आणि घामघुम झालेला तो..तिला आवडला? कळलं नाही तिला तिचंच...
क्लासमध्ये रोज उशीरानेच होणारी त्याची एंट्री..पण त्याच्या त्या उशीराच येण्याची वाट पाहणारी ती..तो दारात आल्या आल्या तिच्या काळजाचा ठोका चुकायचा...
शेवटच्या बेंचवर बसुन सिंसिअरली क्लास अटेंड करणा~यापैकी तो, ती आणि आणखी काही मुलं...त्याच्या रेखीव बोटांना त्याच्या नकळत न्याहाळणारी ती..हरवुन बसायची स्वतःला..
त्याच्या येण्याने तिच्या मनातला गुलमोहर बहरला होता, त्याच्यासोबतचा प्रत्येक क्षण आपण आयुष्यात अनेकानेक वेळा अनुभवावा असं तिला सारखं वाटायचं..पण हे नक्की का होतंय याचा मात्र तिला अजिबात पत्ता लागत नव्हता...
त्याचा सहवास तिच्यासाठी एक समृध्द करणारा अनुभव असायचा. आपली सगळी स्वप्न आपण याच्यासोबतंच पूर्ण करु शकु असा विश्वास तिला कोण जाणे कुठुन येत असे. 
एक अशीच संध्याकाळ, सुर्याने आपल्या सुंदर रंगाची उधळण करुन फुलवलेली, ती आपल्या घराच्या गैलरीत संतूरवर वाजवलेला राग यमन ऐकत होती. वाफ़ाळत्या चहाच्या घोटाबरोबर त्याची स्वप्ने पाहण्यात रंगून गेली होती. 
दारावरची बेल वाजली तशीच ती उठली आणि बघते तर काय..तो प्रत्यक्षात समोर. त्याचा तो मुग्ध करणारा एक नेहमीचाच सुवास, नुकतंच शावर घेउन आल्यासारखे त्याचे केस..आणि तीच आर्त नजर..ती त्याला बघतंच राहीली...
एव्हाना दिवेलागण झाली होती.."गच्चीवर जायचं थेट?" ह्या प्रश्नाने ती भानावर आली. एक तर त्याचा सहवास आणि कातरवेळ.ही वेळ तो असला तरी आणि नसला तरी नेहमीच जीवघेणी असते असा विचार तिच्या डोक्यात सुरु होता. दोघे खरंतर गच्चीवर नेहमी यायचे, गप्पा मारायचे आणि थोड्या वेळाने तो परस्पर घरी निघुन जात असे. पण आजची संध्याकाळ थोडी विचित्र होती असं तिला वाटत होतं. नेहमीच्या जागेवर बसायच्या आधी त्याने तिचा हात धरला आणि डोळ्यात डोळे घालुन म्हणाला " मला तू खुप आवडतेस" तिला क्षणभर सुचेनासं झालं. "मला ही तू खुप आवडतोस" असं नं म्हणता त्याच्या डोळ्यात अधाशासारखी पाहत राहीली..जणु तिला आज त्याच्याकडुन खुप काही ऐकायचं होतं...तसं च्या तसं जसं तिच्या मनात चाललं होतं.
आता तो नुसता तो राहिला नव्हता तिचा "सखा" झाला होता. 
रस्त्यावरच्या दिव्यांची रांग बघतांना तिचं मन "एक दिन दिल की राहों मे अपने लिये जल उठेंगे मोहब्बत के इतने दिये मैने सोचा नं था" ही ओळ गुणगुणत होतं..
_________________________________________________________________________________


सकाळपासुन तॊ कुठे आहे याचा पत्ता नाही..नेहमी सकाळी एकदातरी फोन करणारा तो आज कसा काय विसरला असं वाटुन ती अधिकच अस्वस्थ झाली.
रविवारची कामं आटपत तिने त्याचे विचार थोड्याबेळापुरता का होइना बाजुला सारायचा प्रयत्न केला. 
"तेरे आने की जब खबर मेहके, तेरी खुशबु से सारा घर महके" त्याचं येणं आणि तिचं हे गाणं मुद्दाम गुणगुणणं हे काही नवीन नव्हतं..आज अचानक हेच गाणं ओठी यावं याचं तिला आश्चर्यच वाटलं. चलो,
 आप नही तो आपकी याद में ये गाना ही सही म्हणत ती खुश झाली..
या रविवारी सगळे मित्र घरी येणार होते. या दिवसाची ती मनापासुन वाट पाहत होती. हळुहळु मित्र मंडळी जमा झाली..गप्पा रंगायला लागल्या..मग कुणीतरी पिझ्झा मागवला आणि पोटोबाही झाला....खुप दिवसांनी अशी दिलखुलास मैफ़ल रंगली होती....तिच्या एका मित्राने गिटार काढले आणि झाली गाणी सुरु...
आजकाल तिच्या प्रत्येक गाण्याला त्याच्यामुळे अर्थ प्राप्त झाला होता. तिचं एरवीचं काळं पांढरं (तिच्याच शब्दात ;) ) असणारं लाईफ़ तो असला आजुबाजुला की रंगीत दिसायला लागायचं..
तो जवळ नसला की लागणारी ओढ आता तिला विलक्षण जाणवायला लागली होती. एक एक गाणं तिच्या काळजाचा ठाव घेत होतं..
कुणाच्या लक्षात येऊ नये म्हणुन ती स्वतःला मैफ़िलीत झोकुन देण्याचा प्रयत्न करत होती..
"तुम्हारी आंखोमें हम सारी दुनिया भूल जाते है" ती म्हणायला लागली...त्याच्या डोळ्यांत साठवलेल्या तिच्या विश्वाला आठवून..नेहमीप्रमाणेच तिच्या गाण्याला सगळ्यांनी दाद दिली...पण दाद देणा~यांमध्ये तिचा सखा नव्हता..त्याचं तिला वाईट वाट्लं..
आजचा सोन्यासारखा रविवार..आणि त्याने एक फोनही करु नये..याची तिला प्रचंड चीड आली होती..तिच्या एकाही मित्रमैत्रिणीने त्याच्याबद्दल अजिबात उल्लेख नं केल्यानेही तिला वाईट वाटलं होतं..तिनेही मुद्दाम फोन करणं टाळलं..
संध्याकाळ झाली तशी तिने सगळय़ांसाठी चहा केला..रात्री सगळे सोबत जेउनच जाणार होते..त्यामुळे त्याला फोन करुन बोलवुन ही त्याच्या सोबत एकांतात बोलणं होणारंच नव्हतं. त्याला फोन नं केलेलाच बरा..असं तिला वाटलं..
कशी ही विचित्र ओढ, सगळे सोबत असतांनाही एकटं वाटणं, डोक्यात सारखं त्याच्याबद्दलचेच विचार असणं..आणि त्याचा एकही फोन नाही..कधीकधी तिला स्वतःचीच चीड यायची....तिला खुप हतबल वाटायचं.
दिवसभरचा थकवा आता जाणवायला लागला होता..रात्रीचे ११.४५ वाजले होते..सगळी मंडळी जेवुन खावुन घरी गेली..आता घरात फ़क्तं ती आणि तिची एक मैत्रिण..
तिने हातात डायरी घेतली लिहायला..आजचा दिवस तसा खरंच वेगळा होता. ..सगळे सोबत असल्यावर येणारी मजा तिने खुप दिवसांनी अनुभवली होती...एवढ्या दिवसांनंतर पहील्यांदाच त्याने तिला दिवस्भरात एकही फोन केला नाही..आणि तो भेटायला ही आला नाही..रुखरुख तर होतीच मनात पण ठिक आहे म्हणुन तिने उसासा टाकला.
तिच्या मैत्रिणीने तिला जबरदस्ती गैलरीत नेलं...बघते तर काय..खाली तो उभा होता....एवढ्यात तिचा फोन वाजला.."तुला काय वाटलं? मी विसरलो तुला? I cant live without seeing you".  ती हसली "वेडा आहेस तू" म्हणुन तिने फोन ठेवला...
सकाळपासुन लागलेली रुखरुख कधीच पळाली होती..

Comments

  1. was that end or ?????????

    ReplyDelete
  2. well mugdha it was a nice story.however once you eat chicken/NV.you dont like AMBAT VARAN-BHAT.all are bound to say PANCHAT ZALAY.
    :-)

    ReplyDelete
  3. @deepak: the title is "valentine moments" so..there are two discreet moments which i tried to describe..
    @ akshay: I m writing for my satisfaction...panchat aso va tikhat aso..kunala na aavadlyasahi kahi problem nahi..

    ReplyDelete
  4. हे क्षण मला आवडले...

    ReplyDelete
  5. tumhee 'regh'var comment dilit tyabaddal THANKS. Tumacha blog baghitala.

    ReplyDelete
  6. aaj tumche sarv lekh vachale.. khup chhan aahet..

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

दे नेवर रिअली केअर्ड अबाउट हिम!!

काल व्हिएच १ चेनेल वर सगळे विडिओज बघितले..आजवर मी त्याचे एक दोन विडिओज च पाहिले होते..जे काही त्याच्याबद्दल माहित होते ते फ़क्त वर्तमानपत्राद्वारे, बातम्यांद्वारे.. सगळे लोकं म्हणतायत त्याप्रमाणे माझी आणि ईंग्रजी गाण्यांची ओळख मायकल च्या गाण्यांनी नाही झाली..मी कदाचित खुप लहान होते जेव्हा त्याचे अल्बम्स रिलिज झाले...पण तो लक्षात राहीला त्याच्या मुंबईच्या वारी ने.. त्याला पाहण्यासाठी आलेल्या चाहत्यांची संख्या पाहुनच तो नक्कीच काहितरी स्पेशल असावा असे मात्र वाटुन गेले.. त्याचं "दे डोन्ट रिअली केअर अबाउट अस" गाणं मात्र लक्षात राहीलं.. काल पाहीलेलं एबीसी हे त्याने वयाच्या ११ व्या वर्षी गायलेलं गाणं तर केवळ अप्रतिम..वयाचं ११ वर्ष जेव्हा मुलं स्टेजवरही जायला घाबरतात, तिथे हा अगदी आरामात परफ़ोर्म करत होता...नाचत होता..अगदी लिलया गात होता... http://www.youtube.com/watch?v=MYx3BR2aJA4&feature=related त्याचं मी काल पाहिलेलं त्याचं प्रत्येक गाणं मला पुन्हा एकदा या कलाकराची नव्याने ओळख करुन देत गेलं.... "Man In The Mirror" : - I'm Gonna Make A Change, For Once In My Li...

अजुन एक वर्ष तुझ्याशिवाय ..

प्रिय आईस, २००९ संपायला अजुन १ दिवस बाकी आहे आणि सगळे विचारतायत कसं साजरा करणार? तू पण असंच म्हणायचीस..की अगं ३१ डिसेंबर कुठल्याही वर्षाला एकदाच येतो..तो त्या वर्षाचा शेवटचा दिवस म्हणुन त्या वर्षाला आनंदाने निरोप द्यायचा..पण १ जानेवारीला सकाळी लवकर उठुन दिवस साजरा करायचा..हम्म!! तुझं सांगणं नेहमीच पटायचं आणि आजही पटतं..मोठ्ठं झाल्यावर सुध्दा.. हे अजुन एक वर्ष तुझ्याशिवाय गेलं..म्हणजे तुझ्या जिवंत अस्तित्वाशिवाय.. तू पुढच्या प्रवासाला लागली असशीलच गं पण तरीपण मला तुझा वावर अजुनही जाणवतो अपवाद फ़क्तं मी दिवाळीत बेसनाचे लाडु केले तेव्हाचा...मला काहीच सांगितलं नाहीस आणि ते लाडु खुपच खराब झाले...थोड्या वेळ मीच घाबरले होते की का तू असल्याचं जाणवत नाहिए? पण नंतरचा प्रत्येक दिवस तुझ्या असण्याची हमी देतच होता... बरेच बदल झालेत यावर्षी...माझं लग्न झालं हा सगळ्यात मोठा बदल...लग्न झाल्यावर बाबांना आणि मला तुझ्या आठवणीने खुप भरुन आलं. छकु नेहमीसारखीच शांत होती..सगळ्यांनाच जाणवली तुझी कमतरता पण कुणी आम्हाला वाईट वाटेल म्हणुन बोलुन दाखवलं नाही..चंचल मावशीने "माय मरो मावशी जगो" ही म्हण स...

इरुवर - तमिळ चित्रपटांचा मेरुमणी

तमिळ सिनेमा हा विषय मी ब्लॉगवर कधीच लिहिलेला नाही. आता १० वर्षे झालीत मद्रास मध्ये आणि बऱ्यापैकी तमिळ पण बोलता येतं, कळतं, म्हणून ठरवले की नेहेमी भाषांतर केलेल्या या नव्या जुन्या चित्रपटाबद्दल लिहावे. तामिळ ही खूप गोड़ आणि ओघवती भाषा आहे, अर्थात कुठल्याही भाषेसारखीच. पण या भाषेचा जन्म प्राकृत भाषेमुळे झाला. लिपी अतिशय सोपी असली तरी शब्द आणि त्याचे उच्चारण कठीण आहे. थोडे अजूनही कळत नाहीच ;) काही दिवसांपूर्वीच "इरुवर" चित्रपट पाहिला. इरुवर - म्हणजे दोघे - ऐश्वर्या चा पहिला चित्रपट म्हणून फेमस आहेच पण जयललिता, करुणानिधी आणि एमजीआर या तीन पूर्व मुख्यमंत्र्यांच्या आयुष्यावर बेतलेला हा चित्रपट. मणी रत्नम चं दिग्दर्शन, ए आर रहमान चं संगीत. अजून काय हवे? मल्याळी अभिनेता मोहनलाल ( एमजीआर), ऐश्वर्या राय ( एमजीआर ची पूर्व पत्नी आणि जयललिता ) च्या भूमिकेत, प्रकाश राज ( करुणानिधी ) च्या भूमिकेत, रेवती आणि तब्बू या करुणानिधींच्या पत्नी. १९५० मधले सेट्स आणि त्याच काळचा प्लॉट. संतोष सिवन ची सिनेमॅटोग्राफी अप्रतिम आहे. तेव्हा संतोष सिवन अतिशय नवखे असतील पण तरीही खूपच सुंदर चित...