Skip to main content

मी हरवली आहे....



पूर्वीची सकाळ वेगळी असायची. प्रसन्नतेला आपल्या कवेत घेत दिवस सुरू करायचा तोच मुळी आपल्या शर्थीवर प्रत्येक क्षण जगण्याच्या ऊर्मीसकट. वाफाळलेल्या चहाचे घोट गैलरीत निवांत उभं राहून स्वतःच्याच सोबतीत घशात रिचवायचे. खूपच भूक लागली असेल तर भल्या मोठ्या बर्गर ला आपल्या तोंडाची वाट मोकळी करून द्यायची फारशी डाएट वगैरे ची भिती नं बाळगता.

सगळ्या गोष्टीची शोधाशोध करत तयारी करायची आणि १० मिनिटे रोज उशीराच कामावर जायचं, दुसऱ्या दिवशीही तेवढंच उशीरा जायचं हे ठरवून, अजिबात वाईट नं वाटू देता. कँटीनमध्ये मस्तं पैकी जेवण हादडून "आज मूड नही है" असं रोजच म्हणत कामाला उद्यावर टाकायचं आणि नेटवर एखादं गाणं शोधून डाउनलोड करायचं, ऐकण्याची तलब आली म्हणून.

दुपारी ४ च्या सुमारास प्यायचा एक फक्कड गरम चहा..तोवर ह्याच्याशी गप्पा मारायच्या, माझं काय चाललंय यापासून तो अगदी अनभिज्ञ. त्याने पाहिलेली मी ही अशीच एखाद्या ब्रेकमध्ये.

संध्याकाळी घेऊन फिरायचं कधी गप्प, कधी शांत तर कधी समुद्रासारखं मन....कधी कुठल्या मॉल मध्ये तर कधी निवांत बगिच्यात..आणि फोन करायचा त्याला तुझी आठवण येतेय म्हणून...अतिशय आर्त होऊन..पलीकडे अशीच आर्तता जाणवली की मात्र लगेच शांत व्हायचं..कातरवेळला अशी तगमग का जाणवते हे उमगलं असं वाटुन...

घरी परततांना आजुबाजुच्या इमारतीतील घरांमध्ये लागलेले दिवे पाहुन विचार करायचा आपलंही असं असेल कधी छोटंसं घर, दिवेलागणीला असेच लागतील त्यातही दिवे. तोवर आई बाबांकडॆ मनातल्या मनात एक फ़ेरफ़टका मारुन यायचा...आईला कवेत घेऊन एक गोड पापा द्यायचा..आणि बाबांना एक गाढ मिठी देऊन यायची..छकुशी थोड्याश्या गप्पा मारायच्या...हसत खिद्ळत साजरी करायची संध्याकाळ.

पुन्हा घरी परतायचं..रात्रीच्या आभाळाकडॆ बघत बघत...चंद्र,चांदण्यांच्या टोपलीला सोबत घेऊन.."चंद्र खुप छान दिसतोय आज नक्की बघ" असं त्याला सांगत सांगत.

रात्रीच्या पोटोबाची फोनवरंच सोय करायची आणि रुममेटसोबत गप्पांत झोकुन द्यायचं स्वतःला...जेवणासाठी ब्रेक घ्यायचा आणि गप्पा कंटिन्युड....

शनिवार रविवार फक्तं फिरायचं उगाचंच, सगळया दुकानांत फेरफटका मारत. एखादं पुस्तक विकत घ्यायचं पुढच्या आठवड्याची तयारी म्हणुन...आणि त्याचा रविवारी रात्रीच फडशा पाडायचा...

एखाद्या आइसक्रिम पार्लर मध्ये जाऊन आवडतं आइसक्रीम खायचं.. मैत्रिणींच्या गाडीवर बसून रस्त्याने जाता जाता त्याचा आस्वाद घ्यायचा....

लग्नं झाल्याला काल ९ महीने झाले हे जेव्हा लक्षात आलं तेव्हा जाणवलं की "तो" मिळाला खरा पण माझ्यातली "मी" मात्र हरवली आहे...

Comments

  1. अजून दोघेच आहात....पुढे पुढे बघ आधि कशी होतीस तेच आठवणार नाही!!!! आठवलंच नाही म्हणजे ’हरवल्याचे’ दु:ख नाही!!! तेव्हा जे आपण असतो तेच खरे आपण असे वाटायला लागते....
    छान झालीये पोस्ट....

    ReplyDelete
  2. खुपच सुंदर झाली आहे पोस्ट

    -अजय

    ReplyDelete
  3. धन्यवाद तन्वी, अजय आणि हरेकॄष्ण जी...
    तन्वी हो ना..अजुन तर दोघेच आहोत..पुढे मज्जा येणार आहे..:)

    ReplyDelete
  4. तन्वी म्हणतेय ते खर गं बाई. दोघांत तिसरा आला ना की बघ कशी मजा येते ते :). छान झालीये पोस्ट. आहेस कुठे आणि? गायबच झालीस. भेट लवकर :).

    ReplyDelete
  5. मुग्धा दोघांत तिसरे आले की ते घरट्यातून उडेस्तोचे दिवस मंतरलेले असतात. आजचे तुझे दिवस पुन्हाही येणार आहेत( सध्या माझे आलेले आहेत...:( अगं १७ वर्षीच उडाला न शोमू-आजकाल सगळीच लेकरं लवकरच पळतात...) पण तेव्हांही दोघेच असाल पण चित्र एकदम वेगळे.मस्त मजा करून घे गं आज.पुढेही मज्जा आहेच पण.....:)
    पोस्ट मस्त.

    ReplyDelete
  6. thanks bhagyashree..khup moththaa palla gathayachaa aahe ajun... :)

    ReplyDelete
  7. :) kahi nahi re..ugachach kahitari watat asta...pratyek veli asa vatla aani break ghetla tar mag kathinach aahe..:)

    ReplyDelete
  8. Hey Mugdha, Kay chan lihtes tu.... khup avadala tuza blog... English madhe bhavna vyakt karne manala patla nahi ani marathi type karta yet nahi manhun asa lihit ahe... anand zala tuza blog vachun...


    ** FAN ***

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

दाक्षिणात्य संस्कृती - कोलम (रांगोळी)

दाक्षिणात्य संस्कृती - कोलम (रांगोळी) या पोस्ट मध्ये खाद्यसंस्कृती बद्दल नं सांगता रांगोळ्या आणि तामिळ नाडू यांच्या असलेल्या घट्ट नात्याबद्दल बोलूया. रांगोळी म्हणजे मला तरी एखाद्या स्त्री ची अभिव्यक्ती वाटते. रांगोळी काढणारा पुरुष जरी असेल तरी त्याच्या मनातल्या तरल भावना त्या रांगोळीत उतरतात. अर्थात नेहेमीच्या रोज काढल्या जाणाऱ्या रांगोळ्या म्हणजे गृहिणीची अभिव्यक्ती का हे मला नाही माहिती. पण अंगण झाडणे, सडा टाकणे, आणि रांगोळी काढणे  माझ्यासाठी एक थेरेपि आहे. आजकाल अपार्टमेंट आणि मोठाल्या इमारतींमुळे अंगण हा भागच नाहीसा झालाय घराचा, पण मागे आम्ही होतो त्या घरी मोठे अंगण होते. तामिळ नाडुत सगळ्या दारासमोर रांगोळी काढल्या जाते. अगदी अपार्टमेंट जरी असेल तरी अपार्टमेंट च्या मोठ्या दारासमोर रांगोळी काढली जातेच. इथल्या गल्ल्यांमध्ये समोरासमोरील घराच्या दारासमोर तर दोन्ही वेळेला रांगोळी काढल्या जाते. सकाळी ६. ०० ते ६.३० च्या दरम्यात सगळ्या स्त्रिया या कामात मग्न दिसतात. पहिले मला फार कुतूहल वाटे. एवढ्या सकाळी उठणे आणि पहिले काम म्हणजे रांगोळी. दिवस कसा  छान सुरु होत असेल असे वाटायचे. लग्न

दलपती - मणी रत्नम चा मास्टरपीस

तामिळ चित्रपटांमध्ये मी सगळ्यात पहिले पाहिलेला चित्रपट म्हणजे दलपती. तामिळ भाषा जरी क्लिष्ट वाटत असली तरी ती सर्वांगसुंदर भाषा आहे. आपण मराठी किंवा इतर भाषिक लोक नेहेमी दक्षिणेकडच्या ४ भाषांची सारख्या वाटतात म्हणून खिल्ली उडवत असतो पण ह्या चारही भाषा कन्नड, तमिळ, तेलगू आणि मल्याळम अतिशय समृद्ध आहेत. चारही भाषांची एक स्वतःची चित्रपट सृष्टी आहे हे महत्वाचे. बाहुबली हे एक उत्तम उदाहरण. बरेच हिंदी चित्रपट, मल्याळम आणि तामिळ चित्रपटांवरून प्रेरित असतात हे सांगणे नं लगे. तर असाच एक १९९०'स मध्ये तयार झालेला चित्रपट दलपती म्हणजे म्होरक्या किंवा प्रमुख किंवा सेनापती.  कर्ण आणि अर्जुन ह्या धर्तीवर आधारित असलेला हा चित्रपट त्याकाळी खूप गाजला होता. मामुटी, रजनीकांत आणि अरविंद स्वामी, शोभना आणि सगळे उत्तम कलाकार. इलैराजा यांचे संगीत आणि संतोष सिवन यांची सिनेमॅटोग्राफी. असे म्हणतात की मणी रत्नम चे सगळे चित्रपट सकाळी चित्रांकित करतात. त्यावेळी अतिशय सुंदर प्रकाश असतो आणि त्याचा पुरेपूर उपयोग ते प्रत्येक शॉट मध्ये करून घेतात. ह्या चित्रपटात ते प्रकर्षाने जाणवते.  मणी रत्नम चे सगळे

दाक्षिणात्य खाद्यसंस्कृती -दोसा

दोसा हा पदार्थ नं आवडणारा माणूस विरळा. माझी आणि दोस्याची ओळख आमच्या शाळेच्या आनंदमेळ्यात झाली होती. एक डोस्याचा स्टॉल होता तिथे, माझ्या बेस्ट फ्रेंड च्या काकी चा. मी नं खाताच गर्दी पाहून मला लक्षात आलं होतं तेव्हा कि काहीतरी स्पेशल आहे दोस्यात. हळूहळू जसे मोठे होत गेलो तसे आई बाबा बाहेर जेवायला घेऊन जायचे, मग खायचे काय तर डोसा, जगत नावाचे नागपूरला खूप प्रसिद्ध हॉटेल होते, अर्थात आता मॉल आणि मोठमोठ्या बिल्डींग्स असलेले नागपूर नव्हते तेव्हा उणीपुरी २ ते ३ फॅमिली रेस्टॉरंट्स. त्यात आर्य भवन एक आणि एक जगत. आई म्हणायची जी वस्तू आपण घरी जास्त करत नाही ती बाहेर खावी. म्हणून मोठ्ठा क्रिस्पि दोसा त्यात बटाट्याची भाजी, सोबत चटण्या. एकदम पोटभर व्हायचा तो मसाला डोसा. मी ९ वी, १० वी त असतांना आई घरीच डोसे करायची. पुढे कॉलेज मध्ये घेल्यावर वगैरे बाहेर खातांना डोसा हा पदार्थ बऱ्याचदा खाल्ल्या जायचा.  आता गेल्या १० वर्षांपासून चेन्नई मध्ये स्थायिक असल्याने, दोसा हा दाक्षिणात्य संस्कृतीचा किती अविभाज्य घटक आहे हे कळून आले. माझ्या घरी डोश्याचे पीठ नाही असा एकही दिवस जात नाही. जसे मराठी घरांत कणिक