Skip to main content

संवाद....

आज काहीतरी वेगळं लिहावं म्हणतेय..
ह्म्म! काय वेगळं ?आज सकाळचा वेळ कसा मॆनेज केला? खायला काय केलं हेच ना?
नाही..वेगळं म्हणजे खुप वेगळं...एकदम फ़्रेश...मनाला खुप आनंद देणारं..
मग बाकी जे आत्ता करतेय्स ते आनंद देत नाही वाट्टं..
असं नाहिए गं..पण सगळं छान चाललं असतांना लागत असलेली चुटपूट फ़ार विचीत्र असते बघ..
तुला ना उगाच नसत्या गोष्टींबद्दल विचार करायची सवय आहे..
असंच म्हण हवं तर..पण त्या नसत्या गोष्टीच खुप महत्वाच्या आहेत असं वाटतंय मनापासुन..
चेक कर स्वतःला काहीतरी गडबड आहे नक्की..
हो आहे ना गडबड माझं मी पण समजण्याचे हेच सिम्प्टम्स आहेत कदाचित..
"मी पण" हे काय नवीन??
नवीन नाही जुनंच..पण नव्याने सुचलेलं..
काय नवीन काय जुनं? सगळं गुंडाळुन ठेवावं लागतं पोटभरीच्या भानगडीत..
खरंय गं तुझं मी पण असाच विचार करत होते..आणि बर्यापैकी जमतही होतं सगळं..
पण मग मध्येच काय ही नवी भानगड?..नव्याची जुन्याची..
अगदी घामाघुम झालं असतांना थंड हवेची झुळूक कशी वाटते..सुखदायी..तसेच वाटतायत मला माझे नवीन विचार..नवे..जगण्याला अर्थ देणारे..
आता अजुन काय अर्थ शोधायचाय? जे काही हवं होतं ते मिळालंय..
म्हणुन शोध संपला असं गृहीत धरलंस नं तू? तेच खरं तर चूक आहे...
शोध संपला असं नाही..पण आता संसाराच्या रगाड्यात वेळ्च नाहीए गं..
काढ मग वेळ..स्वतःसाठी..झोकून दे स्वतःत..स्वतःला. तेव्हा कुठलंही बंधन पाळू नकोस..कुठलंही नातं नं ठेवता..फ़क्तं मुग्धा हो..
हे असं केल्याने काय होईल..
मनावरचं मळभ दूर होईल..आणि तुझ्या रोजच्या गोष्टीतही तुला रस येईल..
मला नाही वाटत..
माझ्यावर विश्वास ठेव..अशी जादु होते आणि आपण अंतर्बाह्य बदलून जातो..
पण माझ्या बदलण्याने माझी मी स्वतः जोपासलेली नाती???
अजुन टिकतील..प्रश्न आहे तो तुझा दृष्टिकोन बदलण्याचा..
मी वाघाचं कातडं घालुन असं किती दिवस माझा बचाव करणारे?
उलट तू वाघ आहेस आणि तू त्या बोकडाचं कातडं घातलंयस..
काहीतरीच काय?
हो अगं माझ्या बोलण्याकडे नीट लक्ष दे..तू स्वतःला विसरलीएस..
हो ते तर आहेच..पण घरातले सगळे आनंदात आहेत..कदाचित मी सगळं विसरुन त्यांचं करतेय म्हणुन
असं नाहीए...त्यांना खरा आनंद कधी होईल माहीतीए? जेव्हा तू आनंदी राहशील..सगळं मनापासुन करशील..
आताही मनापासुनच करतेय ना?
हो का? मनापासुन करतेयस?
म्हणजे हो.....नाही कदाचित..
किती दिवस झालेत..मस्तंपैकी गाणी ऐकुन?
बरेच दिवस गं...
आणि छानपैकी एकट्यानेच फ़ेरफ़टका मारुन..?
झालेत बरेच दिवस..
हेच वरचे दोन प्रश्न स्वतःला विचारत रहायचे..उत्तर आपल्या आतूनच येतं..
काल मी एक गम्मत केली...
एकटीच निघाले फ़िरायला....खुप छान वाटत होतं.. फ़िरता फ़िरता माझी नजर एका मेहंदी वाल्याकडे गेली....त्याच्याकडुन मी मस्तं हातभर मेहेंदी काढुन घेतली..एवढं फ़्रेश वाटलं म्हणुन सांगू...
तुलाही खुप आवडते नं मेहंदी?
हो गं..खुप म्हणजे खुप..
मग आता काढायचा वेळ स्वतःसाठी..आणि मस्तं हातभर मेहंदी काढायची..रंगायचं मेहंदीच्या आणि स्वतःच्या रंगात... आत्मरंगात...

Comments

  1. आयुष्याचा खरा आनंद घ्यायचा असेल तर आत्मरंगात थोड रंगलच पाहिजे!!

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

दाक्षिणात्य संस्कृती - कोलम (रांगोळी)

दाक्षिणात्य संस्कृती - कोलम (रांगोळी) या पोस्ट मध्ये खाद्यसंस्कृती बद्दल नं सांगता रांगोळ्या आणि तामिळ नाडू यांच्या असलेल्या घट्ट नात्याबद्दल बोलूया. रांगोळी म्हणजे मला तरी एखाद्या स्त्री ची अभिव्यक्ती वाटते. रांगोळी काढणारा पुरुष जरी असेल तरी त्याच्या मनातल्या तरल भावना त्या रांगोळीत उतरतात. अर्थात नेहेमीच्या रोज काढल्या जाणाऱ्या रांगोळ्या म्हणजे गृहिणीची अभिव्यक्ती का हे मला नाही माहिती. पण अंगण झाडणे, सडा टाकणे, आणि रांगोळी काढणे  माझ्यासाठी एक थेरेपि आहे. आजकाल अपार्टमेंट आणि मोठाल्या इमारतींमुळे अंगण हा भागच नाहीसा झालाय घराचा, पण मागे आम्ही होतो त्या घरी मोठे अंगण होते. तामिळ नाडुत सगळ्या दारासमोर रांगोळी काढल्या जाते. अगदी अपार्टमेंट जरी असेल तरी अपार्टमेंट च्या मोठ्या दारासमोर रांगोळी काढली जातेच. इथल्या गल्ल्यांमध्ये समोरासमोरील घराच्या दारासमोर तर दोन्ही वेळेला रांगोळी काढल्या जाते. सकाळी ६. ०० ते ६.३० च्या दरम्यात सगळ्या स्त्रिया या कामात मग्न दिसतात. पहिले मला फार कुतूहल वाटे. एवढ्या सकाळी उठणे आणि पहिले काम म्हणजे रांगोळी. दिवस कसा  छान सुरु होत असेल असे वाटायचे. लग्न

दलपती - मणी रत्नम चा मास्टरपीस

तामिळ चित्रपटांमध्ये मी सगळ्यात पहिले पाहिलेला चित्रपट म्हणजे दलपती. तामिळ भाषा जरी क्लिष्ट वाटत असली तरी ती सर्वांगसुंदर भाषा आहे. आपण मराठी किंवा इतर भाषिक लोक नेहेमी दक्षिणेकडच्या ४ भाषांची सारख्या वाटतात म्हणून खिल्ली उडवत असतो पण ह्या चारही भाषा कन्नड, तमिळ, तेलगू आणि मल्याळम अतिशय समृद्ध आहेत. चारही भाषांची एक स्वतःची चित्रपट सृष्टी आहे हे महत्वाचे. बाहुबली हे एक उत्तम उदाहरण. बरेच हिंदी चित्रपट, मल्याळम आणि तामिळ चित्रपटांवरून प्रेरित असतात हे सांगणे नं लगे. तर असाच एक १९९०'स मध्ये तयार झालेला चित्रपट दलपती म्हणजे म्होरक्या किंवा प्रमुख किंवा सेनापती.  कर्ण आणि अर्जुन ह्या धर्तीवर आधारित असलेला हा चित्रपट त्याकाळी खूप गाजला होता. मामुटी, रजनीकांत आणि अरविंद स्वामी, शोभना आणि सगळे उत्तम कलाकार. इलैराजा यांचे संगीत आणि संतोष सिवन यांची सिनेमॅटोग्राफी. असे म्हणतात की मणी रत्नम चे सगळे चित्रपट सकाळी चित्रांकित करतात. त्यावेळी अतिशय सुंदर प्रकाश असतो आणि त्याचा पुरेपूर उपयोग ते प्रत्येक शॉट मध्ये करून घेतात. ह्या चित्रपटात ते प्रकर्षाने जाणवते.  मणी रत्नम चे सगळे

दाक्षिणात्य खाद्यसंस्कृती -दोसा

दोसा हा पदार्थ नं आवडणारा माणूस विरळा. माझी आणि दोस्याची ओळख आमच्या शाळेच्या आनंदमेळ्यात झाली होती. एक डोस्याचा स्टॉल होता तिथे, माझ्या बेस्ट फ्रेंड च्या काकी चा. मी नं खाताच गर्दी पाहून मला लक्षात आलं होतं तेव्हा कि काहीतरी स्पेशल आहे दोस्यात. हळूहळू जसे मोठे होत गेलो तसे आई बाबा बाहेर जेवायला घेऊन जायचे, मग खायचे काय तर डोसा, जगत नावाचे नागपूरला खूप प्रसिद्ध हॉटेल होते, अर्थात आता मॉल आणि मोठमोठ्या बिल्डींग्स असलेले नागपूर नव्हते तेव्हा उणीपुरी २ ते ३ फॅमिली रेस्टॉरंट्स. त्यात आर्य भवन एक आणि एक जगत. आई म्हणायची जी वस्तू आपण घरी जास्त करत नाही ती बाहेर खावी. म्हणून मोठ्ठा क्रिस्पि दोसा त्यात बटाट्याची भाजी, सोबत चटण्या. एकदम पोटभर व्हायचा तो मसाला डोसा. मी ९ वी, १० वी त असतांना आई घरीच डोसे करायची. पुढे कॉलेज मध्ये घेल्यावर वगैरे बाहेर खातांना डोसा हा पदार्थ बऱ्याचदा खाल्ल्या जायचा.  आता गेल्या १० वर्षांपासून चेन्नई मध्ये स्थायिक असल्याने, दोसा हा दाक्षिणात्य संस्कृतीचा किती अविभाज्य घटक आहे हे कळून आले. माझ्या घरी डोश्याचे पीठ नाही असा एकही दिवस जात नाही. जसे मराठी घरांत कणिक