Skip to main content

आज रामनवमी!

आज रामनवमी! प्रभू रामचंद्रांचा जन्मदिवस...
या दिवशी खुप छान वाटतं मला नेहमीच. नागपुरला तशी दोन राममंदिरं आहेत. एक रामनगरला आणि एक पोद्दारेश्वर मंदिर ..दोन्हीमंदिरांची शोभायात्रा म्हणजे उत्सुकतेची बाब असते दर राम नवमीला..
लहानपणी आजी मला दर रामनवमीला राम मंदिरात घेऊन जात असे.तिथली सुंदर संगमरवराची मूर्ती लहानपणीच मला खुप आवडायची. मुळात प्रत्येक देवी देवतेच्या मूर्ती पाहुन आपल्या मनात एक विशिष्ट भाव येतात. त्यानुसार मला रामाला पाहुन शांत, प्रसन्नच वाटायचं नेहमी...अश्या वयात जेव्हा शांत प्रसन्न या दोन शब्दांची माझी पुरेशी ओळखंही नव्हती.
पुढे मोठी झाल्यावर नागपूरची शोभायात्रा पहायला जाणे हा नित्याचाच कार्यक्रम असे. आई, बाबा मी आणि छकु सगळेच सोबत रामाच्या दर्शनाला जात असु. आई आपल्यासोबत फुलं, गाठी आणि गुलाल घ्यायची आणि देवाला वहायची...होळीपासुन एक गाठी रामनवमीसाठी आणि एक प्रभु रामचंद्रासाठी असं तिचं ठरलेलं असायचं.
राममंदिरात कितीही गर्दी असली तरी सगळ्यांना शांतपणे दर्शन व्हायचे आणि देवाच्या प्रसन्न मूर्तीला मनात घेऊन आम्ही घरी वापस यायचो..
रामटेकला गेल्यावर माझं आणि प्रभु रामचंद्राचं नातं एका अर्थाने दृढ झालं..नागपूर हुन रामटेकला जातांना थोड्या थोड्या अंतरावर मोठ्या मोठ्या पाट्या लावल्या आहेत..त्यावर समर्थ रामदासांचे मनाचे श्लोक लिहिले आहेत..महाराष्ट्राच्या सार्वजनिक बांधकाम विभागानेच ह्या पाट्या उभ्या केल्या आहेत. त्यावेळी नितीन गडकरी महाराष्ट्राचे सार्वजनिक बांधकाम मंत्री होते..हे श्लोक त्या पाट्यांवर लिहील्याबद्दल मी मनोमन त्यांचे खुप आभार मानायचे...
सुरुवातीला आई बाबांना सोडुन एकटं होस्टेल मध्ये रहायचं मला खुप जीवावर यायचं..मला खुप भिती वाटायची..बस मध्ये बसल्यावर माझं मन आईजवळ्च रहायचं..रामटेकच्या शिवेला गाडी पोचली की हे श्लोक वाचण्यात येत असत..त्यानेही मनावर एका वेगळया प्रकारचा संस्कार घडत असे..
"सामर्थ्य आहे चळवळीचे..जो जे करील तयाचे..परंतु तेथे भगवंताचे अधिष्टान पाहीजे"
हा श्लोक मात्र मला नेहमीसाठीच लक्षात राहीला..
रामटेकचं मंदिर भोसल्यांच्या काळातलं आहे.या राम मंदिरात फ़क्तं श्री राम आणि सीता आहेत..लक्ष्मणस्वामींचं मंदिर वेगळं आहे.. मला नेहमी वाटायचं की रामटेकचा राम गोरा राम असावा..पण प्रत्यक्षात तिथली मूर्ती काळ्या पाषाणाची आहे.
खरंतर कुठलीही मूर्ती ही माणसानेच घडवलेली असते. देवाची प्रत्येक प्रतिमाही आपण जशी इमैजिन करतो तशीच असते..विष्णुरुप थोडे मोहक, खट्याळ असे..शिवरुप हे भोळे, वेळप्रसंगी विनाशकारी असे..श्रीरामाचे रुप...अतिशय आदर्श मुलगा, पती, राजा असे..तर श्रीकृष्ण रुप मनाला भाबेल असे..हा कदाचित देवाच्या रुपांचा माणसाच्या स्वभावानुसार मी लावलेला निकष असावा पण मला हा मनाला पटतो..तो पटण्यामागे आजी आईने सांगितलेल्या गोष्टी आणि त्यासोबत ख~या जगाची करुन दिलेली ओळख नक्कीच आहे..
केवळ एक गोष्ट म्हणुन मला राम कृष्णांची ओळख करुन दिली असती त्यांनी तर मी ही एक गोष्ट आणि त्यातलं पात्र म्हणुन विसरुन गेले असते.. पण असं नं करता त्यांनी देवाच्या प्रत्येक रुपाशी असलेलं त्यांचं नातं आमच्यासमोर उभं केलं..ते नातं एका व्यक्तीचं देवतेशी असलेलं नातं नं राहता..खर्या जगातलं नातं झालं होतं हे मला आत्ता कळतंय..
आजीला प्रभू राम तिच्या मुलासारखे वाटायचे...ठुमक चलत रामचंद्र म्हणतांना तिचा छोट्या पायांनी चालत असलेला नातू तिला दिसायचा..मोठ्या रामचंद्रात तिला तिचा मोठा झालेला मुलगाच दिसत असावा..अजुनही त्यांच्या वाढदिवसाला स्पेशल भॆटिकरता ती नं चुकता मंदिरात जाते..
आई करता ते मर्यादापुरुषोत्तम होते....त्यांच्या जन्मासाठी आठवणीने गाठी ठेवतांना तिला नक्कीच ते तिच्या खोडकर मुलासारखे वाटत असावेत..
लहानपणी तिने मला शिकवलेला पहीला श्लोक
रामा तुझे कोमल नाम घेता
संतोष वाटे बहुपार चित्ता
बापा दयाळा मज भेट द्यावी
संसार चिंता अवघी हरावी
हा होता..सोपा आणि छान..
मग नंतर जसे जसे संदर्भ येत गेले तसं तसं तिने हिंदू मायथोलोजीतल्या प्रत्येक व्यक्तीची अशीच ओळख करुन दिली..प्रत्येक गोष्टीमागे ती कशासाठी आणी काय शिकवण मिळावी म्हणुन घडली हे तिने कटाक्षाने सांगितलं..
माझ्याकरता प्रभु श्रीराम म्हणजे एक मोठा ठेवा आहेत...आईने सांगितलेल्या गोष्टींची आठवण आणि माझ्या आयुष्यातल्या काही सोनेरी क्षणाची साठवण..
श्रीराम नवमीच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा...!!

Comments

  1. श्रीराम नवमीच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा...!!

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

दाक्षिणात्य संस्कृती - कोलम (रांगोळी)

दाक्षिणात्य संस्कृती - कोलम (रांगोळी) या पोस्ट मध्ये खाद्यसंस्कृती बद्दल नं सांगता रांगोळ्या आणि तामिळ नाडू यांच्या असलेल्या घट्ट नात्याबद्दल बोलूया. रांगोळी म्हणजे मला तरी एखाद्या स्त्री ची अभिव्यक्ती वाटते. रांगोळी काढणारा पुरुष जरी असेल तरी त्याच्या मनातल्या तरल भावना त्या रांगोळीत उतरतात. अर्थात नेहेमीच्या रोज काढल्या जाणाऱ्या रांगोळ्या म्हणजे गृहिणीची अभिव्यक्ती का हे मला नाही माहिती. पण अंगण झाडणे, सडा टाकणे, आणि रांगोळी काढणे  माझ्यासाठी एक थेरेपि आहे. आजकाल अपार्टमेंट आणि मोठाल्या इमारतींमुळे अंगण हा भागच नाहीसा झालाय घराचा, पण मागे आम्ही होतो त्या घरी मोठे अंगण होते. तामिळ नाडुत सगळ्या दारासमोर रांगोळी काढल्या जाते. अगदी अपार्टमेंट जरी असेल तरी अपार्टमेंट च्या मोठ्या दारासमोर रांगोळी काढली जातेच. इथल्या गल्ल्यांमध्ये समोरासमोरील घराच्या दारासमोर तर दोन्ही वेळेला रांगोळी काढल्या जाते. सकाळी ६. ०० ते ६.३० च्या दरम्यात सगळ्या स्त्रिया या कामात मग्न दिसतात. पहिले मला फार कुतूहल वाटे. एवढ्या सकाळी उठणे आणि पहिले काम म्हणजे रांगोळी. दिवस कसा  छान सुरु होत असेल असे वाटायचे. लग्न

दलपती - मणी रत्नम चा मास्टरपीस

तामिळ चित्रपटांमध्ये मी सगळ्यात पहिले पाहिलेला चित्रपट म्हणजे दलपती. तामिळ भाषा जरी क्लिष्ट वाटत असली तरी ती सर्वांगसुंदर भाषा आहे. आपण मराठी किंवा इतर भाषिक लोक नेहेमी दक्षिणेकडच्या ४ भाषांची सारख्या वाटतात म्हणून खिल्ली उडवत असतो पण ह्या चारही भाषा कन्नड, तमिळ, तेलगू आणि मल्याळम अतिशय समृद्ध आहेत. चारही भाषांची एक स्वतःची चित्रपट सृष्टी आहे हे महत्वाचे. बाहुबली हे एक उत्तम उदाहरण. बरेच हिंदी चित्रपट, मल्याळम आणि तामिळ चित्रपटांवरून प्रेरित असतात हे सांगणे नं लगे. तर असाच एक १९९०'स मध्ये तयार झालेला चित्रपट दलपती म्हणजे म्होरक्या किंवा प्रमुख किंवा सेनापती.  कर्ण आणि अर्जुन ह्या धर्तीवर आधारित असलेला हा चित्रपट त्याकाळी खूप गाजला होता. मामुटी, रजनीकांत आणि अरविंद स्वामी, शोभना आणि सगळे उत्तम कलाकार. इलैराजा यांचे संगीत आणि संतोष सिवन यांची सिनेमॅटोग्राफी. असे म्हणतात की मणी रत्नम चे सगळे चित्रपट सकाळी चित्रांकित करतात. त्यावेळी अतिशय सुंदर प्रकाश असतो आणि त्याचा पुरेपूर उपयोग ते प्रत्येक शॉट मध्ये करून घेतात. ह्या चित्रपटात ते प्रकर्षाने जाणवते.  मणी रत्नम चे सगळे

दाक्षिणात्य खाद्यसंस्कृती -दोसा

दोसा हा पदार्थ नं आवडणारा माणूस विरळा. माझी आणि दोस्याची ओळख आमच्या शाळेच्या आनंदमेळ्यात झाली होती. एक डोस्याचा स्टॉल होता तिथे, माझ्या बेस्ट फ्रेंड च्या काकी चा. मी नं खाताच गर्दी पाहून मला लक्षात आलं होतं तेव्हा कि काहीतरी स्पेशल आहे दोस्यात. हळूहळू जसे मोठे होत गेलो तसे आई बाबा बाहेर जेवायला घेऊन जायचे, मग खायचे काय तर डोसा, जगत नावाचे नागपूरला खूप प्रसिद्ध हॉटेल होते, अर्थात आता मॉल आणि मोठमोठ्या बिल्डींग्स असलेले नागपूर नव्हते तेव्हा उणीपुरी २ ते ३ फॅमिली रेस्टॉरंट्स. त्यात आर्य भवन एक आणि एक जगत. आई म्हणायची जी वस्तू आपण घरी जास्त करत नाही ती बाहेर खावी. म्हणून मोठ्ठा क्रिस्पि दोसा त्यात बटाट्याची भाजी, सोबत चटण्या. एकदम पोटभर व्हायचा तो मसाला डोसा. मी ९ वी, १० वी त असतांना आई घरीच डोसे करायची. पुढे कॉलेज मध्ये घेल्यावर वगैरे बाहेर खातांना डोसा हा पदार्थ बऱ्याचदा खाल्ल्या जायचा.  आता गेल्या १० वर्षांपासून चेन्नई मध्ये स्थायिक असल्याने, दोसा हा दाक्षिणात्य संस्कृतीचा किती अविभाज्य घटक आहे हे कळून आले. माझ्या घरी डोश्याचे पीठ नाही असा एकही दिवस जात नाही. जसे मराठी घरांत कणिक