Skip to main content

सैलाब



१९९६ चा काळ होता तो. एकच टीव्ही चॅनेल तेव्हा तुफान प्रसिद्ध होतं ते म्हणजे झी टीव्ही. 

बऱ्याच मालिका हिट पण होत्या. माझ्या टीव्ही प्रेमाची सुरुवात झाली शांती या मालिकेने, स्वाभिमान आणि मग एखाद वर्षाने देख भाई देख. या मालिकांनी डेली सोप चं दुकान उघडलं होतं. मग झी वर तारा, बनेगी अपनी बात, हम पांच, आणि असे अनेक धारावाहिक सुरु झाले. वेळ पण लागोपाठ असायची, संध्याकाळी अभ्यास करून झाला की बस सुरु व्हायचे हे कार्यक्रम. थोडे मोठे झाल्यावर एक खूप साधी मालीका सुरु झाली सैलाब नावाची. रेणुका शहाणे, सचिन खेडेकर, प्राजक्ती देशमुख हे प्रमुख कलाकार, रोहिणी हट्टंगडी, निनाद कामत आणि बाकीचेही दर्जेदार कलाकार यात होते. साधी स्टोरी पण सगळ्यांचा अभिनय मात्र लाजवाब. प्रत्येक एपिसोड असा वाटायचा की अगदी बाजूलाच घडतंय सगळं. 

शिवानी आणि रोहित चं एकमेकांवरचे प्रेम, त्याला होणारा विरोध आणि पर्यायाने शिवानी चे लग्न अविनाश ( महेश ठाकूर) सोबत असा साधा प्लॉट होता. पण घेतलेली सेटिंग, प्रत्येक एपिसोड चे डायलॉग म्हणजे एकदम दिल खल्लास. 
रेणुका शहाणे, शिवानी च्या भूमिकेत छान वाटली पण सगळ्यात भावली ती प्राजक्ती देशमुख गायत्री च्या भूमिकेत. एके काळी शिवानीची असणारी घनिष्ट मैत्रीण गायत्रीचे रोहित सोबत लग्न होते. आणि सगळेच बदलते. रोहित आणि शिवानी काही वर्षांनी भेटतात आणि त्यांच्यात असलेला दुरावा त्यांच्यात एक ओढ निर्माण करतो. 

त्या ओढीने त्यांचे एकमेकांना भेटणे सुरु होते, हळूहळू ते एकमेकांना पुन्हा उलगडतात आणि त्यांच्या लक्षात येतं की आता ते एकमेकांच्या आयुष्यात रेलेव्हन्ट नाहीयेत. पण ते उलगडेपर्यंत चा प्रवास फार छान दाखवला आहे. आणि सगळ्या एपिसोड्स ला असलेली जगजीत सिंग च्या गझल्स ची साथ. 

सैलाब मधले काही सीन्स म्हणजे 
गायत्रीचे रोहित ला म्हणणे की "पता है रोहित, जो इन्सान एक दुसरे से प्यार करते है वो एक जैसा नही होता. एक इन्सान ज्यादा प्यार करता है और एक कम".  हा खूपच एपिक सीन आहे. एकदम लक्षात राहण्यासारखा. फारसा मेकअप नाही की खूप नेपथ्य नाही. दोघेही त्यांच्या घराच्या खिडकीत बसलेले दाखवले आहेत आणि परस्पर असा संवाद. आजकाल इतके शांत संवाद ऐकायला सुध्दा मिळत नाहीत असे मला वाटते. 

शिवानीचे रोहित ला म्हणणे " जब सामने से तूफ़ान आता हुआ दिख रहा हो तो कश्ती का रुख़ बदलना ही समझदारी है!" हा प्रसंग म्हणजे ह्या मालिकेचा माईलस्टोन असे म्हणता येईल. इथूनच रोहितच्या आयुष्यामध्ये खूप बदल घडून येतात. ज्या दिवशी शिवानी चे लग्न होते त्याच दिवशी त्याच्या वडिलांच्या निधनाची बातमी त्याला कळते,आणि एकाच दिवशी दोन लोक त्याच्या आयुष्यातून जातात. हे पुन्हा कधीतरी आठवताना रोहित म्हणतो " किसी इन्सान का जिंदगी से चले जाना ये अपने आप में एक बहोत बड़ी घटना है." 

रोहित परत मुंबईत आल्यावर त्याच्याकडे काम नसते, तो आजारी असतांना गायत्री त्याची आर्थिक मदत करते, आणि म्हणते "इंसानियत के नाते मैंने जो भी कुछ किया वो कोई भी करता". पण हळूहळू रोहित ला गायत्री हवीहवीशी वाटायला लागते. शिवानी नसल्यामुळे असे होतेय की खरंच रोहित चे गायत्री वर प्रेम आहे ह्या द्वंद्वात प्रेक्षक असतांनाच गायत्री घरच्यांशी भांडून रोहित शी लग्न करते.. आणि मग सुरु होतो रोहितचा यशस्वी प्रवास. जेव्हा रोहित ला बेस्ट डायरेक्टर चा अवार्ड मिळतो तेव्हा  आधीच तयार केलेलं नोट ऑफ थँक्स  म्हणतांना आवर्जून तो आवर्जून सांगतो की "आज मैं जो कुछ भी हु वो मेरी बीवी गायत्री के वजह से, जिसने मेरा कदम कदम पर साथ दिया" हे टीवी वर पाहून शिवानी ला वाईट वाटते आणि पश्चातापही होतो. पण वेळ निघून गेली असते. 

रोहित च्या  एक्स्ट्रा marital अफेयर ची खबर गायत्री ला लागताच तिचे एबॉर्शन होते आणि रोहित साठी गायत्री ने मोठ्या मेहनतीने आणि प्रेमाने बांधलेले घर कोसळायला लागते. त्यांच्यातला तणाव सचिन खेडेकर आणि प्राजक्ती देशमुख नी खूप छान दाखवला आहे. गायत्रीच्या घरी बाळ येणार हे ऐकल्यावर शिवानी थोडी डिस्टर्ब होते. ती म्हणतेही" इन सब चीजोंमे मैं अपना घर कभी बना ही नहीं पायी" पण लवकरच अविनाश ला शिवानी आणि रोहित च्या भेटींबद्दल कळते. हळूहळू हा तिढा सुटतो पण एक सैलाब येऊन गेल्यावर. 

अपनी मंजिल से कहां अपने सफर के हम है... 
रुख़ हवाओंका जिधर का है उधर के हम हैं | 

जगजीत सिंह आणि निदा फ़ाज़ली हे समीकरण एकदम फेमस झालं त्या काळात. 

बेनाम सा ये दर्द ठहर क्यों नहीं जाता 
जो बीत गया वो गुजर क्यों नहीं जाता 

वो एक ही चेहरा तो नहीं सारे जहाँ में
जो दूर है वो दिल से उतर क्यों नहीं जाता

जो बीत गया वो गुज़र क्यों नहीं जाता 

ही अजुन एक जगजीत सिंह ची ग़ज़ल आहे निदा फ़ाज़ली के शब्दों में.

९० एपिसोडस आणि सगळे एपिसोड्स एकदम Subtle.. खूप ड्रामा नाही.. 

माझ्या ब्लॉग ला या महिन्यात १० वर्षे पूर्ण होतायत त्याकरता माझ्या अतिशय आवडत्या  मालिकेची पोस्ट. :) 





Comments

Popular posts from this blog

दाक्षिणात्य संस्कृती - कोलम (रांगोळी)

दाक्षिणात्य संस्कृती - कोलम (रांगोळी) या पोस्ट मध्ये खाद्यसंस्कृती बद्दल नं सांगता रांगोळ्या आणि तामिळ नाडू यांच्या असलेल्या घट्ट नात्याबद्दल बोलूया. रांगोळी म्हणजे मला तरी एखाद्या स्त्री ची अभिव्यक्ती वाटते. रांगोळी काढणारा पुरुष जरी असेल तरी त्याच्या मनातल्या तरल भावना त्या रांगोळीत उतरतात. अर्थात नेहेमीच्या रोज काढल्या जाणाऱ्या रांगोळ्या म्हणजे गृहिणीची अभिव्यक्ती का हे मला नाही माहिती. पण अंगण झाडणे, सडा टाकणे, आणि रांगोळी काढणे  माझ्यासाठी एक थेरेपि आहे. आजकाल अपार्टमेंट आणि मोठाल्या इमारतींमुळे अंगण हा भागच नाहीसा झालाय घराचा, पण मागे आम्ही होतो त्या घरी मोठे अंगण होते. तामिळ नाडुत सगळ्या दारासमोर रांगोळी काढल्या जाते. अगदी अपार्टमेंट जरी असेल तरी अपार्टमेंट च्या मोठ्या दारासमोर रांगोळी काढली जातेच. इथल्या गल्ल्यांमध्ये समोरासमोरील घराच्या दारासमोर तर दोन्ही वेळेला रांगोळी काढल्या जाते. सकाळी ६. ०० ते ६.३० च्या दरम्यात सगळ्या स्त्रिया या कामात मग्न दिसतात. पहिले मला फार कुतूहल वाटे. एवढ्या सकाळी उठणे आणि पहिले काम म्हणजे रांगोळी. दिवस कसा  छान सुरु होत असेल असे वाटायचे. लग्न

दलपती - मणी रत्नम चा मास्टरपीस

तामिळ चित्रपटांमध्ये मी सगळ्यात पहिले पाहिलेला चित्रपट म्हणजे दलपती. तामिळ भाषा जरी क्लिष्ट वाटत असली तरी ती सर्वांगसुंदर भाषा आहे. आपण मराठी किंवा इतर भाषिक लोक नेहेमी दक्षिणेकडच्या ४ भाषांची सारख्या वाटतात म्हणून खिल्ली उडवत असतो पण ह्या चारही भाषा कन्नड, तमिळ, तेलगू आणि मल्याळम अतिशय समृद्ध आहेत. चारही भाषांची एक स्वतःची चित्रपट सृष्टी आहे हे महत्वाचे. बाहुबली हे एक उत्तम उदाहरण. बरेच हिंदी चित्रपट, मल्याळम आणि तामिळ चित्रपटांवरून प्रेरित असतात हे सांगणे नं लगे. तर असाच एक १९९०'स मध्ये तयार झालेला चित्रपट दलपती म्हणजे म्होरक्या किंवा प्रमुख किंवा सेनापती.  कर्ण आणि अर्जुन ह्या धर्तीवर आधारित असलेला हा चित्रपट त्याकाळी खूप गाजला होता. मामुटी, रजनीकांत आणि अरविंद स्वामी, शोभना आणि सगळे उत्तम कलाकार. इलैराजा यांचे संगीत आणि संतोष सिवन यांची सिनेमॅटोग्राफी. असे म्हणतात की मणी रत्नम चे सगळे चित्रपट सकाळी चित्रांकित करतात. त्यावेळी अतिशय सुंदर प्रकाश असतो आणि त्याचा पुरेपूर उपयोग ते प्रत्येक शॉट मध्ये करून घेतात. ह्या चित्रपटात ते प्रकर्षाने जाणवते.  मणी रत्नम चे सगळे

दाक्षिणात्य खाद्यसंस्कृती -दोसा

दोसा हा पदार्थ नं आवडणारा माणूस विरळा. माझी आणि दोस्याची ओळख आमच्या शाळेच्या आनंदमेळ्यात झाली होती. एक डोस्याचा स्टॉल होता तिथे, माझ्या बेस्ट फ्रेंड च्या काकी चा. मी नं खाताच गर्दी पाहून मला लक्षात आलं होतं तेव्हा कि काहीतरी स्पेशल आहे दोस्यात. हळूहळू जसे मोठे होत गेलो तसे आई बाबा बाहेर जेवायला घेऊन जायचे, मग खायचे काय तर डोसा, जगत नावाचे नागपूरला खूप प्रसिद्ध हॉटेल होते, अर्थात आता मॉल आणि मोठमोठ्या बिल्डींग्स असलेले नागपूर नव्हते तेव्हा उणीपुरी २ ते ३ फॅमिली रेस्टॉरंट्स. त्यात आर्य भवन एक आणि एक जगत. आई म्हणायची जी वस्तू आपण घरी जास्त करत नाही ती बाहेर खावी. म्हणून मोठ्ठा क्रिस्पि दोसा त्यात बटाट्याची भाजी, सोबत चटण्या. एकदम पोटभर व्हायचा तो मसाला डोसा. मी ९ वी, १० वी त असतांना आई घरीच डोसे करायची. पुढे कॉलेज मध्ये घेल्यावर वगैरे बाहेर खातांना डोसा हा पदार्थ बऱ्याचदा खाल्ल्या जायचा.  आता गेल्या १० वर्षांपासून चेन्नई मध्ये स्थायिक असल्याने, दोसा हा दाक्षिणात्य संस्कृतीचा किती अविभाज्य घटक आहे हे कळून आले. माझ्या घरी डोश्याचे पीठ नाही असा एकही दिवस जात नाही. जसे मराठी घरांत कणिक