Skip to main content

उसासे..


ढगाळ वातावरण हातात चहाचा गरम प्याला, आणि ऐकावं "मी मज हरपून बसले गं", दुस-या ओळीच्या शेवटी येणार्या "गं" वर एक लांब उसासा टाकावा..हा उसासा आपलं मन हरपून बसल्याच्या भावनेनं नाही तर आशाच्या कातील आवाजाने मनात उभ्या केलेल्या आपल्या नसलेल्या आणि गाणं म्हणता म्हणता तिच्या झालेल्या श्रीरंगाच्या आठवणीनं...
असे कितीतरी उसासे टाकायला लावणारे आणि आपलं अस्तित्व जाणवुन पुढे जाणारे क्षण या सगळ्याच प्रतिभावान व्यक्तींनी मोठ्या ताकदीने उभे केले आहेत...मग आशाचं "तरूण आहे रात्र अजुनी" गाणं असो..किंवा गुलजारची कुठलीही कविता..प्रत्येक कलाकृती देवत्व लाभल्यासारखी...ती कलाकृती त्याला निर्माण करणार्यांनी जेवढी जगली त्याहीपेक्षा अधिक त्या कलाकृतींनी तिचा आस्वाद घेणार्यांना जगवलं...प्रत्येक ओळीगणिक, प्रत्येक स्वरागणिक त्या सगळ्याच कलाकृतींनी हृदयाचा ठाव घेतला आणि उसासा टाकायला भाग पाडलं..
असे कित्येक उसासे..
"रातराणीच्या फ़ुलांचा..गंध तू लुटलास का रे?" म्हणतांनाचं आवाजातलं नेमकं मार्दव..आणि तेवढ्याच एका अनामिक आर्ततेनं म्हंटलेलं "सावन के कुछ मिठे मिठे पल रख्खे है".
ह्या सगळ्या ओळी जगली असेल नं आशा?
गुलजार-आशा-आरडी या त्रयींच्या संगमातून तयार झालेली गाणी म्हणजे अगदी अंत..त्यापुढे अक्षरशः काहीच नाही..मग  "आजकल पाव जमींपर नही पडते मेरे" चा अल्लडपणा असो किंवा "ज़िंदगी है...बेहने दो..प्यासी हू मै प्यासी रेहने दो" चा जिंदादिलपणा..."रातभर काजल जलें" ची एक बेचैनी असो...किंवा " आपकी बदमाशीयोंके  ये नये अंदाज है" म्हणतांनाचा खट्याळपणा...सगळंच सगळंच कसं...गगनाला भिडलेलं, उत्तुंग..मोठं...यासगळ्यावरही एकंच तोकडा उसासा टाकण्याशिवाय आम्हा पामरांकडे काही उपायच नाही..
एखाद्या शांत दुपारी..गुलजारचं एखादं पुस्तक उगाच हातात घ्यावं...उघडावं कुठलंही पान..आणि प्रत्येक पानातली प्रत्येक ओळ पुन्हा पुन्हा जगावी...त्याचा आवाज नं ऐकुनही ऐकल्याचा भास व्हावा..त्याच्या आवाजातला खर्ज पुन्हा पुन्हा अनुभवावा...आणि बस्स...एकच उसासा टाकावा...
"तुम्हारे हाथोंमे मैने अपनी लकीर देखी है सोना" म्हणणारी तुमच्यातली प्रेयसी असो...किंवा "छोटे थे..मा उपले थापा करती थी" वाचतांना उकीडवे बसुन आईला गोव-या थांपतांना  पाहिलेली लहानशी मुलगी असो...ह्या स्वतःच्या आयुष्यातल्या भूमिका पुन्हा पुन्हा जगायच्या आणि प्रत्येक उसास्याला एक महत्व प्राप्त करुन द्यायचं..नव्हे आभारंच मानायचे...गुलजारच्या निर्मितीवरची शब्दातीत प्रतिक्रिया केवळ एका उसास्याने व्यक्तं करता येते म्हणुन..
खरंतर कुठल्याही कलाकृतीच्या निर्मितीमागे निसर्ग ही एक प्रेरणा असु शकते..जो सगळ्यांसाठीच सारखा आहे..पण सुरेश भटांनी आपल्या कवितेत गुंफ़लेली रातराणी बाकी कुणालाही तितक्या प्रेमाने गुंफ़ता आली नाही, किबहुना माझ्या मनाला तेव्ढी भिडली नाही यातंच सगळंकाही आलं..ह्या सगळ्या  कलाकारांच्या ठायी असलेली प्रतिभा हेच ते आगळंवेगळं मिश्रण...मिडास टच...
ह्या सगळ्या कलाकृतींची अजुन एक खासियत म्हणजे तुमच्या मनस्थितीशी तिचं काही घेणंदेणं नसतं.....अजिबात नाही..
त्या सगळ्यांना फ़क्तं आपल्याला भरभरुन काहीतरी द्यायचं असतं...कधी उद्विग्न मनस्थितीत असतांना, ह्या कविता, ही गाणी, थोडक्यात हे एलिमेंट्स...चार शब्द सुचवुन जातील नाहीतर डोळ्यात अश्रुंचं एक मोठं तळं तरी करुन जातील..आनंदी असाल..तर आनंद द्विगुणित करतीलंच पण त्या आनंदातही अंतरंगात डोकावून पाय जमिनीवर ठेवण्यास मदत करतील..
कदाचित म्हणुनच गुलजार असो, आशा असो, आरडी असो..किंवा सुरेश भट असो...ह्यांसारख्या प्रतिभा पुन्हा बघणे नाही....पुन्हा जगणेच नाही

Comments

Popular posts from this blog

दाक्षिणात्य संस्कृती - कोलम (रांगोळी)

दाक्षिणात्य संस्कृती - कोलम (रांगोळी) या पोस्ट मध्ये खाद्यसंस्कृती बद्दल नं सांगता रांगोळ्या आणि तामिळ नाडू यांच्या असलेल्या घट्ट नात्याबद्दल बोलूया. रांगोळी म्हणजे मला तरी एखाद्या स्त्री ची अभिव्यक्ती वाटते. रांगोळी काढणारा पुरुष जरी असेल तरी त्याच्या मनातल्या तरल भावना त्या रांगोळीत उतरतात. अर्थात नेहेमीच्या रोज काढल्या जाणाऱ्या रांगोळ्या म्हणजे गृहिणीची अभिव्यक्ती का हे मला नाही माहिती. पण अंगण झाडणे, सडा टाकणे, आणि रांगोळी काढणे  माझ्यासाठी एक थेरेपि आहे. आजकाल अपार्टमेंट आणि मोठाल्या इमारतींमुळे अंगण हा भागच नाहीसा झालाय घराचा, पण मागे आम्ही होतो त्या घरी मोठे अंगण होते. तामिळ नाडुत सगळ्या दारासमोर रांगोळी काढल्या जाते. अगदी अपार्टमेंट जरी असेल तरी अपार्टमेंट च्या मोठ्या दारासमोर रांगोळी काढली जातेच. इथल्या गल्ल्यांमध्ये समोरासमोरील घराच्या दारासमोर तर दोन्ही वेळेला रांगोळी काढल्या जाते. सकाळी ६. ०० ते ६.३० च्या दरम्यात सगळ्या स्त्रिया या कामात मग्न दिसतात. पहिले मला फार कुतूहल वाटे. एवढ्या सकाळी उठणे आणि पहिले काम म्हणजे रांगोळी. दिवस कसा  छान सुरु होत असेल असे वाटायचे. लग्न

दलपती - मणी रत्नम चा मास्टरपीस

तामिळ चित्रपटांमध्ये मी सगळ्यात पहिले पाहिलेला चित्रपट म्हणजे दलपती. तामिळ भाषा जरी क्लिष्ट वाटत असली तरी ती सर्वांगसुंदर भाषा आहे. आपण मराठी किंवा इतर भाषिक लोक नेहेमी दक्षिणेकडच्या ४ भाषांची सारख्या वाटतात म्हणून खिल्ली उडवत असतो पण ह्या चारही भाषा कन्नड, तमिळ, तेलगू आणि मल्याळम अतिशय समृद्ध आहेत. चारही भाषांची एक स्वतःची चित्रपट सृष्टी आहे हे महत्वाचे. बाहुबली हे एक उत्तम उदाहरण. बरेच हिंदी चित्रपट, मल्याळम आणि तामिळ चित्रपटांवरून प्रेरित असतात हे सांगणे नं लगे. तर असाच एक १९९०'स मध्ये तयार झालेला चित्रपट दलपती म्हणजे म्होरक्या किंवा प्रमुख किंवा सेनापती.  कर्ण आणि अर्जुन ह्या धर्तीवर आधारित असलेला हा चित्रपट त्याकाळी खूप गाजला होता. मामुटी, रजनीकांत आणि अरविंद स्वामी, शोभना आणि सगळे उत्तम कलाकार. इलैराजा यांचे संगीत आणि संतोष सिवन यांची सिनेमॅटोग्राफी. असे म्हणतात की मणी रत्नम चे सगळे चित्रपट सकाळी चित्रांकित करतात. त्यावेळी अतिशय सुंदर प्रकाश असतो आणि त्याचा पुरेपूर उपयोग ते प्रत्येक शॉट मध्ये करून घेतात. ह्या चित्रपटात ते प्रकर्षाने जाणवते.  मणी रत्नम चे सगळे

दाक्षिणात्य खाद्यसंस्कृती -दोसा

दोसा हा पदार्थ नं आवडणारा माणूस विरळा. माझी आणि दोस्याची ओळख आमच्या शाळेच्या आनंदमेळ्यात झाली होती. एक डोस्याचा स्टॉल होता तिथे, माझ्या बेस्ट फ्रेंड च्या काकी चा. मी नं खाताच गर्दी पाहून मला लक्षात आलं होतं तेव्हा कि काहीतरी स्पेशल आहे दोस्यात. हळूहळू जसे मोठे होत गेलो तसे आई बाबा बाहेर जेवायला घेऊन जायचे, मग खायचे काय तर डोसा, जगत नावाचे नागपूरला खूप प्रसिद्ध हॉटेल होते, अर्थात आता मॉल आणि मोठमोठ्या बिल्डींग्स असलेले नागपूर नव्हते तेव्हा उणीपुरी २ ते ३ फॅमिली रेस्टॉरंट्स. त्यात आर्य भवन एक आणि एक जगत. आई म्हणायची जी वस्तू आपण घरी जास्त करत नाही ती बाहेर खावी. म्हणून मोठ्ठा क्रिस्पि दोसा त्यात बटाट्याची भाजी, सोबत चटण्या. एकदम पोटभर व्हायचा तो मसाला डोसा. मी ९ वी, १० वी त असतांना आई घरीच डोसे करायची. पुढे कॉलेज मध्ये घेल्यावर वगैरे बाहेर खातांना डोसा हा पदार्थ बऱ्याचदा खाल्ल्या जायचा.  आता गेल्या १० वर्षांपासून चेन्नई मध्ये स्थायिक असल्याने, दोसा हा दाक्षिणात्य संस्कृतीचा किती अविभाज्य घटक आहे हे कळून आले. माझ्या घरी डोश्याचे पीठ नाही असा एकही दिवस जात नाही. जसे मराठी घरांत कणिक