Skip to main content

आवर्तन

आज पुन्हा पावसाचं येणं एखाद्या जुन्या पावसासारखंच वाटलं....आजही बाहेर पडणार्या पावसाचा आवाज तस्साच येतोय जसा पूर्वी यायचा..मला आजीकडे असतांनाचा पावसाळा आठवत नाही. महालातल्या घराला मोठे अंगण नव्हते तरीही आम्ही मुले हरदासांच्या अंगणात जाउन पाऊस बघायचो...हे नक्की आठवतं..घराच्या दारापुढे पावसाचे पाणी वाहत असतांना येणारे बुडबुडे अजुनही तस्सेच आहेत..त्यांचा वाहत जायचा ओघ ही तसाच...तोच थोडा कथ्था थोडा चॊकलेटी रंग पावसाच्या पाण्याचा...काही गोष्टी कधीच बदलत नाहीत..
-------------------------------------------------------------------------------------------------------------
आपल्या आजुबाजुला होणार्या गोष्टी नुसत्या एकेरी होत नसतात तर संपूर्ण आयुष्यात त्यांची आवर्तने होत असतात असं नवीन घरात आल्यापासुन असं वाटत आहे
शिफ़्ट झाल्यापासुन नव्या घराबद्दल लिहीणंच झालं नाही...लहानपणी हरदास काकुकडॆ डायनींग टेबल ला लागुन एक मोठ्ठी खिडकी होती..मोठ्ठी म्हणजे त्यावेळी माझ्या मानाने मोठी...मोठ्या, उभ्या गजांआडुन बाजुचं विश्व पाहण्यात मजा येत असे. त्यात मी अगदी मांडी घालुन बसायची..आणि काकूनी दिलेला आव्वा खायची..तशीच खिडकी आता या नव्या घराच्या पहील्या खोलीत आहे म्हणुन का कोण जाणे मला हे घर पाहताक्षणी आवडलं.
लहानपणी आजीच्या घरची विहीर, त्यावर लोंबकळणार्या जास्वंदाच्या फ़ांद्या...पिवळ्या फुलांचं झाड, गच्ची, कपडे धुण्याचा ओटा, भलंमोठं आंब्याचं झाड, तुळशी वृंदावन यासगळ्यावर माझा खुप जीव होता आणि अजुनही आहे...
आत्ताच्या नवीन घराच्या स्वयंपाकघरातही तेवढ्याच मोठ्या दोन खिडक्या आहेत. बाजुला मोठ्ठी गच्ची आणि कडेला जुन्या पध्दतीचा कपडे धुण्याचा ओटा आहे...गच्चीच्या कठड्यावरुन डोकावणारं पिवळ्या फुलांचं झाड तसंच आहे अगदी लहानपणीसारखं. बाजुलाच एक भव्य आम्रवृक्ष आणि खाली मोठ्या दरवाज्याच्या शेजारी एक छोटं आणि छान तुळशी वृंदावन आहे.
घरमालकांच्या पडवीत तुळशीला दिसेल असा कृष्णाचा फोटो आहे. आणि परसात एक आडाची जुनी विहीर..
हे सगळं पाहुन काहीच बदललं नाहीए असंच वाटलं...आपण ज्यांच्यावर जीव लावतो त्या वस्तु आपल्याला अश्याच आयुष्यातल्या कुठल्यातरी आवर्तनात भेटत असतात...याला अपवाद माणसांचा..एखाद्या आवर्तनात एखादं माणुस भेटलं आणि पुढे त्याची साथ सुटली की ती कदाचित नेहमीकरताच असते...आपणंच खुप प्रयत्न करतो शोधाशोधीचा..
-------------------------------------------------------------------------------------------------------------
परवा स्वप्नात आई दिसली...पूर्ण रात्रभर दिसत राहिली..थोड्यावेळासाठी या सगळ्या निर्जीव वस्तुंसारखी पुन्हा माझ्या आयुष्यात आई आलीए की काय असं वाटल..
सकाळी उठल्यावर अर्थातच लक्षात आलं की असं काही झालेलं नाहीए...
-------------------------------------------------------------------------------------------------------------
हे घर ही शेवटी भाड्याचंच, कधी ना कधीतरी सोडुन जावं लागणारंच तेव्हा या निर्जीव वस्तुंना सोडुन जातांना माझ्याइतकंच त्यांनाही दुःख होईल का? पुन्हा येतील या सगळया वस्तू माझ्या आयुष्यातल्या एखाद्या आवर्तनात माझ्या भॆटीसाठी?? प्रत्येक व्यक्तीकडुन अपेक्षा करण्याची माणसाची खोड तशी जुनीच पण मी तर चक्क निर्जीव वस्तुंकडुन अपेक्षा करायला लागली आहे...
माझंच मला काहीतरी करायला हवं ;)

Comments

  1. छान लिहिलस गं. आवर्तनाची कल्पना किती सुंदर आहे. खरोखरच आवर्तनाप्रमाणे, साथ सुटलेले आप्तजन परत आयुष्याच्या कुठल्यातरी वळणावर परत भेटलेत तर... डोक्यात असेच काहिसे भरकटणारे विचार सुरु होते. त्यात तुझी ही पोस्ट! अंतर्मुख केलस बघ.

    ReplyDelete
  2. अपेक्षा आणि उपेक्षा दोन्ही ही त्रासदायक असतात...
    रोहिणीच्या प्रतीक्रियेला अनुमोदन, आवर्तनाची कल्पना खरच सुंदर आहे.

    ReplyDelete
  3. आवर्तन , मी कधीच तुझ्याएवढा याबाबतीत विचार नाही केला पण आता केला आणि जाणवलं की आयुष्यात बरयाच गोष्टी अशा पुन्हा पुन्हा येत रहातात. मी दररोज सकाळी उठतो आणि पहिला मनात विचार येतो की कालचा दिवस गेला. आज एक नवीन दिवस. कालची दु:ख कालच संपली. तशीही दु:ख बेनामच असतात. कुठून येतात कुठे जातात माहीत नाही. आपण फक्त त्यांच्याबरोबर ते नेईन तसं धावायचं. पुन्हा एक नवीन दिवस. हे सारखं असंच लुप मध्ये आपल्या आयुष्यात येत रहातं, बरयाच प्रसंगाची सुद्धा आवर्तन घडतात आता ही मी किती कन्प्फूज आहे लिहीताना कदाचित ही सुद्धा स्टेज मी या अगोदर अनुभवलेली पुन्हा तेच घडतय जे या अगोदर घडलय कधीतरी...जाऊ देत, उद्याची सकाळ मला पुन्हा एकदा खूणावतेय

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

दे नेवर रिअली केअर्ड अबाउट हिम!!

काल व्हिएच १ चेनेल वर सगळे विडिओज बघितले..आजवर मी त्याचे एक दोन विडिओज च पाहिले होते..जे काही त्याच्याबद्दल माहित होते ते फ़क्त वर्तमानपत्राद्वारे, बातम्यांद्वारे.. सगळे लोकं म्हणतायत त्याप्रमाणे माझी आणि ईंग्रजी गाण्यांची ओळख मायकल च्या गाण्यांनी नाही झाली..मी कदाचित खुप लहान होते जेव्हा त्याचे अल्बम्स रिलिज झाले...पण तो लक्षात राहीला त्याच्या मुंबईच्या वारी ने.. त्याला पाहण्यासाठी आलेल्या चाहत्यांची संख्या पाहुनच तो नक्कीच काहितरी स्पेशल असावा असे मात्र वाटुन गेले.. त्याचं "दे डोन्ट रिअली केअर अबाउट अस" गाणं मात्र लक्षात राहीलं.. काल पाहीलेलं एबीसी हे त्याने वयाच्या ११ व्या वर्षी गायलेलं गाणं तर केवळ अप्रतिम..वयाचं ११ वर्ष जेव्हा मुलं स्टेजवरही जायला घाबरतात, तिथे हा अगदी आरामात परफ़ोर्म करत होता...नाचत होता..अगदी लिलया गात होता... http://www.youtube.com/watch?v=MYx3BR2aJA4&feature=related त्याचं मी काल पाहिलेलं त्याचं प्रत्येक गाणं मला पुन्हा एकदा या कलाकराची नव्याने ओळख करुन देत गेलं.... "Man In The Mirror" : - I'm Gonna Make A Change, For Once In My Li...

अजुन एक वर्ष तुझ्याशिवाय ..

प्रिय आईस, २००९ संपायला अजुन १ दिवस बाकी आहे आणि सगळे विचारतायत कसं साजरा करणार? तू पण असंच म्हणायचीस..की अगं ३१ डिसेंबर कुठल्याही वर्षाला एकदाच येतो..तो त्या वर्षाचा शेवटचा दिवस म्हणुन त्या वर्षाला आनंदाने निरोप द्यायचा..पण १ जानेवारीला सकाळी लवकर उठुन दिवस साजरा करायचा..हम्म!! तुझं सांगणं नेहमीच पटायचं आणि आजही पटतं..मोठ्ठं झाल्यावर सुध्दा.. हे अजुन एक वर्ष तुझ्याशिवाय गेलं..म्हणजे तुझ्या जिवंत अस्तित्वाशिवाय.. तू पुढच्या प्रवासाला लागली असशीलच गं पण तरीपण मला तुझा वावर अजुनही जाणवतो अपवाद फ़क्तं मी दिवाळीत बेसनाचे लाडु केले तेव्हाचा...मला काहीच सांगितलं नाहीस आणि ते लाडु खुपच खराब झाले...थोड्या वेळ मीच घाबरले होते की का तू असल्याचं जाणवत नाहिए? पण नंतरचा प्रत्येक दिवस तुझ्या असण्याची हमी देतच होता... बरेच बदल झालेत यावर्षी...माझं लग्न झालं हा सगळ्यात मोठा बदल...लग्न झाल्यावर बाबांना आणि मला तुझ्या आठवणीने खुप भरुन आलं. छकु नेहमीसारखीच शांत होती..सगळ्यांनाच जाणवली तुझी कमतरता पण कुणी आम्हाला वाईट वाटेल म्हणुन बोलुन दाखवलं नाही..चंचल मावशीने "माय मरो मावशी जगो" ही म्हण स...

झोपीलागी जीवा....

आताशा पुन्हा मला "झोप" फारच आवडायला लागली आहे. आताशा "पुन्हा" म्हणण्याचे कारण हे की मला समज आल्यापासूनच मला झोप प्रचंड आवडते पण मध्ये जरा गडबड झाली होती. गेली चार वर्षे मी हवी तितकी झोपली नाही असं मला मनापासून वाटतं(तसं माझ्याव्यतिरिक्त माझ्या घरात कुणालाही वाटत नाही याची मला खात्री आहे ) ;) तीझोपेचा आई बाबांना आणि मलाही शोध लागला. त्यांच्यामते (माझ्यामते नाही) मी खूप झोपायचे. ८ ते ९ तास साधारण मनुष्याने झोपावे असं विज्ञान सांगतं हे आई बाबांना कोण सांगणार? त्यांच्यामते मला अभ्यासाचं, परीक्षेचं टेन्शनच नाही असं सिद्धं झालं होतं. आणि मला रोज मला हे काय होतंय? असं वाटायला लागलं. खरं पाहिलं तर असं कुठे लिहिलंय की दहावीच्या विद्यार्थ्यांनी कमी झोपावं?? पण हे बाबा रोज मला इतके रागावायचे की मी उठल्याक्षणी आपण आठ तासापेक्षा किती जास्त झोपलो हे मोजायची. :p , तिला कुठलं तरी टेन्शन आहे म्हणून ती जास्त झोपते" असं Doctor म्हणाले, त्यामुळे मला कुणीही फार झोपते असं म्हटलं की मी सरळ माझ्यावर असलेल्या अतीव ढोंगी टेन्शन ची आठवण करून देत असे. बाबांनी मात्र लगेच त्या Doctor ला मू...