Skip to main content

स्वगत...!!

काही दिवस कसे सुन्न असतात. कशा कशात म्हणुन लक्ष लागत नाही. बरं वाटावं म्हणुन काम करायची केविलवाणी धडपड अजुनच त्रास देवुन जाते. ह्या सगळ्याचं कारण म्हणजे क्षुल्लक कारणावरुन आपल्याच व्यक्तीने हृदयावर उमटवलेले ओरखडे.
अश्याच वेळी मला "एकला चलो रे" कि काय म्हणतात ते आठवतं..आणि जगातलं अगाध तत्वद्न्यान मेंदुचे दरवाजे ठोठावायला लागतं. अगदी श्रीकृष्णापासुन सगळे आठवतात..हे सांगणारे की "एकटेच आला आहात जगात, जमवलेलं हे सगळं गोतावळ पुन्हा कधीतरी सोडुन जायचं आहेच पुढ्च्या वाटचालीसाठी" मग माझंच मला हसु येतं एवढा साक्षात्कार घडवायला मन दुखावलं गेलंच पाहिजे नाहितर आपल्याच धुन्दीत जगणार्‍या मज पामराला एवढी बुदधी होणे नाही..
मला तर हे जगच एक आभास आहे असं वाटतं कधी कधी..मग त्या आभासात दुखावणे काय किंवा सुखावणे काय? सगळे सारखेच..त्या आभासाची जाणीव मात्र अजुन झाली नाहीए..
जाणीव होण्याकरता त्याच्याशी समरुप व्हावं लागत असावं..जगातल्या सगळ्या संतांप्रमाणं..
आपण असाच प्रवास करायचा कधी हसत कधी रडत. आणि एकदिवस संपवायची आपली यात्रा कुणालाही "येतो हं मी" नं सांगता..निमूटपणे.मग कसले ओरखडॆ कसले हसु. सगळे सारखेच होऊन जात असावे. नदी जेव्हा तिच्यापेक्षा कितीतरी पटीने जास्तं मोठ्ठ्या सागराला मिळते तेव्हा कुठे सांगत बसते तिला वाटेतील पाषाणांमुळे झालेली दुखापत.
तिचा सागरापर्यंतचा प्रवास हेच तिचं जीवन आणि तिचं त्याच्याशी मीलन हाच मृत्यु...तिच्या पुढच्या वाटचालीची सुरुवात.
सारं जीवन हे त्याच एका मिलनासाठी..मग तिथे मनुष्याठायी असलेले सगळे भाव क्षणात विरघळुन जात असावेत.म्हणुनच मृत्यु साजरा करावा. सुटका म्हणुन नव्हे तर जल्लोष म्हणुन..जल्लोष करावा आत्म्याच्या जगद्व्यापी शक्तिशी होणार्‍या मीलनाचा..
अर्थात, हे सगळं उमगण्यासाठी मन मात्र दुखावलं गेलंच पाहिजे हे नक्की. मनोमन म्हणुनच मी मला कुठल्या नं कुठल्या कारणाने दुखावणार्‍यांचे आभार मानत असते. त्यांच्यामुळेच तर मला अनुभुती होते माझ्यातल्या मी ची...माझ्यातल्या जगद्व्यापी शक्तीच्या अंशाची..!!काही दिवस कसे सुन्न असतात. कशा कशात म्हणुन लक्ष लागत नाही. बरं वाटावं म्हणुन काम करायची केविलवाणी धडपड अजुनच त्रास देवुन जाते. ह्या सगळ्याचं कारण म्हणजे क्षुल्लक कारणावरुन आपल्याच व्यक्तीने हृदयावर उमटवलेले ओरखडे.
अश्याच वेळी मला "एकला चलो रे" कि काय म्हणतात ते आठवतं..आणि जगातलं अगाध तत्वद्न्यान मेंदुचे दरवाजे ठोठावायला लागतं. अगदी श्रीकृष्णापासुन सगळे आठवतात..हे सांगणारे की "एकटेच आला आहात जगात, जमवलेलं हे सगळं गोतावळ पुन्हा कधीतरी सोडुन जायचं आहेच पुढ्च्या वाटचालीसाठी" मग माझंच मला हसु येतं एवढा साक्षात्कार घडवायला मन दुखावलं गेलंच पाहिजे नाहितर आपल्याच धुन्दीत जगणार्‍या मज पामराला एवढी बुदधी होणे नाही..
मला तर हे जगच एक आभास आहे असं वाटतं कधी कधी..मग त्या आभासात दुखावणे काय किंवा सुखावणे काय? सगळे सारखेच..त्या आभासाची जाणीव मात्र अजुन झाली नाहीए.
जाणीव होण्याकरता त्याच्याशी समरुप व्हावं लागत असावं..जगातल्या सगळ्या संतांप्रमाणं..
आपण असाच प्रवास करायचा कधी हसत कधी रडत. आणि एकदिवस संपवायची आपली यात्रा कुणालाही "येतो हं मी" नं सांगता..निमूटपणे.मग कसले ओरखडॆ कसले हसु. सगळे सारखेच होऊन जात असावे. नदी जेव्हा तिच्यापेक्षा कितीतरी पटीने जास्तं मोठ्ठ्या सागराला मिळते तेव्हा कुठे सांगत बसते तिला वाटेतील पाषाणांमुळे झालेली दुखापत.
तिचा सागरापर्यंतचा प्रवास हेच तिचं जीवन आणि तिचं त्याच्याशी मीलन हाच मृत्यु...तिच्या पुढच्या वाटचालीची सुरुवात.
सारं जीवन हे त्याच एका मिलनासाठी..मग तिथे मनुष्याठायी असलेले सगळे भाव क्षणात विरघळुन जात असावेत.म्हणुनच मृत्यु साजरा करावा. सुटका म्हणुन नव्हे तर जल्लोष म्हणुन..जल्लोष करावा आत्म्याच्या जगद्व्यापी शक्तिशी होणार्‍या मीलनाचा..
अर्थात, हे सगळं उमगण्यासाठी मन मात्र दुखावलं गेलंच पाहिजे हे नक्की. मनोमन म्हणुनच मी मला कुठल्या नं कुठल्या कारणाने दुखावणार्‍यांचे आभार मानत असते. त्यांच्यामुळेच तर मला अनुभुती होते माझ्यातल्या मी ची...माझ्यातल्या जगद्व्यापी शक्तीच्या अंशाची..!!
काही दिवस कसे सुन्न असतात. कशा कशात म्हणुन लक्ष लागत नाही. बरं वाटावं म्हणुन काम करायची केविलवाणी धडपड अजुनच त्रास देवुन जाते. ह्या सगळ्याचं कारण म्हणजे क्षुल्लक कारणावरुन आपल्याच व्यक्तीने हृदयावर उमटवलेले ओरखडे.

अश्याच वेळी मला "एकला चलो रे" कि काय म्हणतात ते आठवतं..आणि जगातलं अगाध तत्वद्न्यान मेंदुचे दरवाजे ठोठावायला लागतं. अगदी श्रीकृष्णापासुन सगळे आठवतात..हे सांगणारे की "एकटेच आला आहात जगात, जमवलेलं हे सगळं गोतावळ पुन्हा कधीतरी सोडुन जायचं आहेच पुढ्च्या वाटचालीसाठी"

मग माझंच मला हसु येतं एवढा साक्षात्कार घडवायला मन दुखावलं गेलंच पाहिजे नाहितर आपल्याच धुन्दीत जगणार्‍या मज पामराला एवढी बुदधी होणे नाही..

मला तर हे जगच एक आभास आहे असं वाटतं कधी कधी..मग त्या आभासात दुखावणे काय किंवा सुखावणे काय? सगळे सारखेच..त्या आभासाची जाणीव मात्र अजुन झाली नाहीए..

जाणीव होण्याकरता त्याच्याशी समरुप व्हावं लागत असावं..जगातल्या सगळ्या संतांप्रमाणं..

आपण असाच प्रवास करायचा कधी हसत कधी रडत. आणि एकदिवस संपवायची आपली यात्रा कुणालाही "येतो हं मी" नं सांगता..निमूटपणे.मग कसले ओरखडॆ कसले हसु. सगळे सारखेच होऊन जात असावे. नदी जेव्हा तिच्यापेक्षा कितीतरी पटीने जास्तं मोठ्ठ्या सागराला मिळते तेव्हा कुठे सांगत बसते तिला वाटेतील पाषाणांमुळे झालेली दुखापत.

तिचा सागरापर्यंतचा प्रवास हेच तिचं जीवन आणि तिचं त्याच्याशी मीलन हाच मृत्यु...तिच्या पुढच्या वाटचालीची सुरुवात.

सारं जीवन हे त्याच एका मिलनासाठी..मग तिथे मनुष्याठायी असलेले सगळे भाव क्षणात विरघळुन जात असावेत.म्हणुनच मृत्यु साजरा करावा. सुटका म्हणुन नव्हे तर जल्लोष म्हणुन..जल्लोष करावा आत्म्याच्या जगद्व्यापी शक्तिशी होणार्‍या मीलनाचा..

अर्थात, हे सगळं उमगण्यासाठी मन मात्र दुखावलं गेलंच पाहिजे हे नक्की. मनोमन म्हणुनच मी मला कुठल्या नं कुठल्या कारणाने दुखावणार्‍यांचे आभार मानत असते. त्यांच्यामुळेच तर मला अनुभुती होते माझ्यातल्या मी ची...माझ्यातल्या जगद्व्यापी शक्तीच्या अंशाची..!!

Comments

  1. जैसे तिलमें तेल है,ज्यो चकमकमें आग,
    तेरा साई तुझमें है, तू जान सके तो जाग.

    एखाद्या टोचणीशिवाय ही अनुभूती येत नाही हेही खरच!

    ReplyDelete
  2. aavarjun reply dilat aani to hi itaka chhan tyabaddal khup khup aabhaar..!!
    ashich bhet det raha.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

दे नेवर रिअली केअर्ड अबाउट हिम!!

काल व्हिएच १ चेनेल वर सगळे विडिओज बघितले..आजवर मी त्याचे एक दोन विडिओज च पाहिले होते..जे काही त्याच्याबद्दल माहित होते ते फ़क्त वर्तमानपत्राद्वारे, बातम्यांद्वारे.. सगळे लोकं म्हणतायत त्याप्रमाणे माझी आणि ईंग्रजी गाण्यांची ओळख मायकल च्या गाण्यांनी नाही झाली..मी कदाचित खुप लहान होते जेव्हा त्याचे अल्बम्स रिलिज झाले...पण तो लक्षात राहीला त्याच्या मुंबईच्या वारी ने.. त्याला पाहण्यासाठी आलेल्या चाहत्यांची संख्या पाहुनच तो नक्कीच काहितरी स्पेशल असावा असे मात्र वाटुन गेले.. त्याचं "दे डोन्ट रिअली केअर अबाउट अस" गाणं मात्र लक्षात राहीलं.. काल पाहीलेलं एबीसी हे त्याने वयाच्या ११ व्या वर्षी गायलेलं गाणं तर केवळ अप्रतिम..वयाचं ११ वर्ष जेव्हा मुलं स्टेजवरही जायला घाबरतात, तिथे हा अगदी आरामात परफ़ोर्म करत होता...नाचत होता..अगदी लिलया गात होता... http://www.youtube.com/watch?v=MYx3BR2aJA4&feature=related त्याचं मी काल पाहिलेलं त्याचं प्रत्येक गाणं मला पुन्हा एकदा या कलाकराची नव्याने ओळख करुन देत गेलं.... "Man In The Mirror" : - I'm Gonna Make A Change, For Once In My Li...

अजुन एक वर्ष तुझ्याशिवाय ..

प्रिय आईस, २००९ संपायला अजुन १ दिवस बाकी आहे आणि सगळे विचारतायत कसं साजरा करणार? तू पण असंच म्हणायचीस..की अगं ३१ डिसेंबर कुठल्याही वर्षाला एकदाच येतो..तो त्या वर्षाचा शेवटचा दिवस म्हणुन त्या वर्षाला आनंदाने निरोप द्यायचा..पण १ जानेवारीला सकाळी लवकर उठुन दिवस साजरा करायचा..हम्म!! तुझं सांगणं नेहमीच पटायचं आणि आजही पटतं..मोठ्ठं झाल्यावर सुध्दा.. हे अजुन एक वर्ष तुझ्याशिवाय गेलं..म्हणजे तुझ्या जिवंत अस्तित्वाशिवाय.. तू पुढच्या प्रवासाला लागली असशीलच गं पण तरीपण मला तुझा वावर अजुनही जाणवतो अपवाद फ़क्तं मी दिवाळीत बेसनाचे लाडु केले तेव्हाचा...मला काहीच सांगितलं नाहीस आणि ते लाडु खुपच खराब झाले...थोड्या वेळ मीच घाबरले होते की का तू असल्याचं जाणवत नाहिए? पण नंतरचा प्रत्येक दिवस तुझ्या असण्याची हमी देतच होता... बरेच बदल झालेत यावर्षी...माझं लग्न झालं हा सगळ्यात मोठा बदल...लग्न झाल्यावर बाबांना आणि मला तुझ्या आठवणीने खुप भरुन आलं. छकु नेहमीसारखीच शांत होती..सगळ्यांनाच जाणवली तुझी कमतरता पण कुणी आम्हाला वाईट वाटेल म्हणुन बोलुन दाखवलं नाही..चंचल मावशीने "माय मरो मावशी जगो" ही म्हण स...

इरुवर - तमिळ चित्रपटांचा मेरुमणी

तमिळ सिनेमा हा विषय मी ब्लॉगवर कधीच लिहिलेला नाही. आता १० वर्षे झालीत मद्रास मध्ये आणि बऱ्यापैकी तमिळ पण बोलता येतं, कळतं, म्हणून ठरवले की नेहेमी भाषांतर केलेल्या या नव्या जुन्या चित्रपटाबद्दल लिहावे. तामिळ ही खूप गोड़ आणि ओघवती भाषा आहे, अर्थात कुठल्याही भाषेसारखीच. पण या भाषेचा जन्म प्राकृत भाषेमुळे झाला. लिपी अतिशय सोपी असली तरी शब्द आणि त्याचे उच्चारण कठीण आहे. थोडे अजूनही कळत नाहीच ;) काही दिवसांपूर्वीच "इरुवर" चित्रपट पाहिला. इरुवर - म्हणजे दोघे - ऐश्वर्या चा पहिला चित्रपट म्हणून फेमस आहेच पण जयललिता, करुणानिधी आणि एमजीआर या तीन पूर्व मुख्यमंत्र्यांच्या आयुष्यावर बेतलेला हा चित्रपट. मणी रत्नम चं दिग्दर्शन, ए आर रहमान चं संगीत. अजून काय हवे? मल्याळी अभिनेता मोहनलाल ( एमजीआर), ऐश्वर्या राय ( एमजीआर ची पूर्व पत्नी आणि जयललिता ) च्या भूमिकेत, प्रकाश राज ( करुणानिधी ) च्या भूमिकेत, रेवती आणि तब्बू या करुणानिधींच्या पत्नी. १९५० मधले सेट्स आणि त्याच काळचा प्लॉट. संतोष सिवन ची सिनेमॅटोग्राफी अप्रतिम आहे. तेव्हा संतोष सिवन अतिशय नवखे असतील पण तरीही खूपच सुंदर चित...