Skip to main content

मी हरवली आहे....



पूर्वीची सकाळ वेगळी असायची. प्रसन्नतेला आपल्या कवेत घेत दिवस सुरू करायचा तोच मुळी आपल्या शर्थीवर प्रत्येक क्षण जगण्याच्या ऊर्मीसकट. वाफाळलेल्या चहाचे घोट गैलरीत निवांत उभं राहून स्वतःच्याच सोबतीत घशात रिचवायचे. खूपच भूक लागली असेल तर भल्या मोठ्या बर्गर ला आपल्या तोंडाची वाट मोकळी करून द्यायची फारशी डाएट वगैरे ची भिती नं बाळगता.

सगळ्या गोष्टीची शोधाशोध करत तयारी करायची आणि १० मिनिटे रोज उशीराच कामावर जायचं, दुसऱ्या दिवशीही तेवढंच उशीरा जायचं हे ठरवून, अजिबात वाईट नं वाटू देता. कँटीनमध्ये मस्तं पैकी जेवण हादडून "आज मूड नही है" असं रोजच म्हणत कामाला उद्यावर टाकायचं आणि नेटवर एखादं गाणं शोधून डाउनलोड करायचं, ऐकण्याची तलब आली म्हणून.

दुपारी ४ च्या सुमारास प्यायचा एक फक्कड गरम चहा..तोवर ह्याच्याशी गप्पा मारायच्या, माझं काय चाललंय यापासून तो अगदी अनभिज्ञ. त्याने पाहिलेली मी ही अशीच एखाद्या ब्रेकमध्ये.

संध्याकाळी घेऊन फिरायचं कधी गप्प, कधी शांत तर कधी समुद्रासारखं मन....कधी कुठल्या मॉल मध्ये तर कधी निवांत बगिच्यात..आणि फोन करायचा त्याला तुझी आठवण येतेय म्हणून...अतिशय आर्त होऊन..पलीकडे अशीच आर्तता जाणवली की मात्र लगेच शांत व्हायचं..कातरवेळला अशी तगमग का जाणवते हे उमगलं असं वाटुन...

घरी परततांना आजुबाजुच्या इमारतीतील घरांमध्ये लागलेले दिवे पाहुन विचार करायचा आपलंही असं असेल कधी छोटंसं घर, दिवेलागणीला असेच लागतील त्यातही दिवे. तोवर आई बाबांकडॆ मनातल्या मनात एक फ़ेरफ़टका मारुन यायचा...आईला कवेत घेऊन एक गोड पापा द्यायचा..आणि बाबांना एक गाढ मिठी देऊन यायची..छकुशी थोड्याश्या गप्पा मारायच्या...हसत खिद्ळत साजरी करायची संध्याकाळ.

पुन्हा घरी परतायचं..रात्रीच्या आभाळाकडॆ बघत बघत...चंद्र,चांदण्यांच्या टोपलीला सोबत घेऊन.."चंद्र खुप छान दिसतोय आज नक्की बघ" असं त्याला सांगत सांगत.

रात्रीच्या पोटोबाची फोनवरंच सोय करायची आणि रुममेटसोबत गप्पांत झोकुन द्यायचं स्वतःला...जेवणासाठी ब्रेक घ्यायचा आणि गप्पा कंटिन्युड....

शनिवार रविवार फक्तं फिरायचं उगाचंच, सगळया दुकानांत फेरफटका मारत. एखादं पुस्तक विकत घ्यायचं पुढच्या आठवड्याची तयारी म्हणुन...आणि त्याचा रविवारी रात्रीच फडशा पाडायचा...

एखाद्या आइसक्रिम पार्लर मध्ये जाऊन आवडतं आइसक्रीम खायचं.. मैत्रिणींच्या गाडीवर बसून रस्त्याने जाता जाता त्याचा आस्वाद घ्यायचा....

लग्नं झाल्याला काल ९ महीने झाले हे जेव्हा लक्षात आलं तेव्हा जाणवलं की "तो" मिळाला खरा पण माझ्यातली "मी" मात्र हरवली आहे...

Comments

  1. अजून दोघेच आहात....पुढे पुढे बघ आधि कशी होतीस तेच आठवणार नाही!!!! आठवलंच नाही म्हणजे ’हरवल्याचे’ दु:ख नाही!!! तेव्हा जे आपण असतो तेच खरे आपण असे वाटायला लागते....
    छान झालीये पोस्ट....

    ReplyDelete
  2. खुपच सुंदर झाली आहे पोस्ट

    -अजय

    ReplyDelete
  3. धन्यवाद तन्वी, अजय आणि हरेकॄष्ण जी...
    तन्वी हो ना..अजुन तर दोघेच आहोत..पुढे मज्जा येणार आहे..:)

    ReplyDelete
  4. तन्वी म्हणतेय ते खर गं बाई. दोघांत तिसरा आला ना की बघ कशी मजा येते ते :). छान झालीये पोस्ट. आहेस कुठे आणि? गायबच झालीस. भेट लवकर :).

    ReplyDelete
  5. मुग्धा दोघांत तिसरे आले की ते घरट्यातून उडेस्तोचे दिवस मंतरलेले असतात. आजचे तुझे दिवस पुन्हाही येणार आहेत( सध्या माझे आलेले आहेत...:( अगं १७ वर्षीच उडाला न शोमू-आजकाल सगळीच लेकरं लवकरच पळतात...) पण तेव्हांही दोघेच असाल पण चित्र एकदम वेगळे.मस्त मजा करून घे गं आज.पुढेही मज्जा आहेच पण.....:)
    पोस्ट मस्त.

    ReplyDelete
  6. thanks bhagyashree..khup moththaa palla gathayachaa aahe ajun... :)

    ReplyDelete
  7. :) kahi nahi re..ugachach kahitari watat asta...pratyek veli asa vatla aani break ghetla tar mag kathinach aahe..:)

    ReplyDelete
  8. Hey Mugdha, Kay chan lihtes tu.... khup avadala tuza blog... English madhe bhavna vyakt karne manala patla nahi ani marathi type karta yet nahi manhun asa lihit ahe... anand zala tuza blog vachun...


    ** FAN ***

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

दे नेवर रिअली केअर्ड अबाउट हिम!!

काल व्हिएच १ चेनेल वर सगळे विडिओज बघितले..आजवर मी त्याचे एक दोन विडिओज च पाहिले होते..जे काही त्याच्याबद्दल माहित होते ते फ़क्त वर्तमानपत्राद्वारे, बातम्यांद्वारे.. सगळे लोकं म्हणतायत त्याप्रमाणे माझी आणि ईंग्रजी गाण्यांची ओळख मायकल च्या गाण्यांनी नाही झाली..मी कदाचित खुप लहान होते जेव्हा त्याचे अल्बम्स रिलिज झाले...पण तो लक्षात राहीला त्याच्या मुंबईच्या वारी ने.. त्याला पाहण्यासाठी आलेल्या चाहत्यांची संख्या पाहुनच तो नक्कीच काहितरी स्पेशल असावा असे मात्र वाटुन गेले.. त्याचं "दे डोन्ट रिअली केअर अबाउट अस" गाणं मात्र लक्षात राहीलं.. काल पाहीलेलं एबीसी हे त्याने वयाच्या ११ व्या वर्षी गायलेलं गाणं तर केवळ अप्रतिम..वयाचं ११ वर्ष जेव्हा मुलं स्टेजवरही जायला घाबरतात, तिथे हा अगदी आरामात परफ़ोर्म करत होता...नाचत होता..अगदी लिलया गात होता... http://www.youtube.com/watch?v=MYx3BR2aJA4&feature=related त्याचं मी काल पाहिलेलं त्याचं प्रत्येक गाणं मला पुन्हा एकदा या कलाकराची नव्याने ओळख करुन देत गेलं.... "Man In The Mirror" : - I'm Gonna Make A Change, For Once In My Li...

अजुन एक वर्ष तुझ्याशिवाय ..

प्रिय आईस, २००९ संपायला अजुन १ दिवस बाकी आहे आणि सगळे विचारतायत कसं साजरा करणार? तू पण असंच म्हणायचीस..की अगं ३१ डिसेंबर कुठल्याही वर्षाला एकदाच येतो..तो त्या वर्षाचा शेवटचा दिवस म्हणुन त्या वर्षाला आनंदाने निरोप द्यायचा..पण १ जानेवारीला सकाळी लवकर उठुन दिवस साजरा करायचा..हम्म!! तुझं सांगणं नेहमीच पटायचं आणि आजही पटतं..मोठ्ठं झाल्यावर सुध्दा.. हे अजुन एक वर्ष तुझ्याशिवाय गेलं..म्हणजे तुझ्या जिवंत अस्तित्वाशिवाय.. तू पुढच्या प्रवासाला लागली असशीलच गं पण तरीपण मला तुझा वावर अजुनही जाणवतो अपवाद फ़क्तं मी दिवाळीत बेसनाचे लाडु केले तेव्हाचा...मला काहीच सांगितलं नाहीस आणि ते लाडु खुपच खराब झाले...थोड्या वेळ मीच घाबरले होते की का तू असल्याचं जाणवत नाहिए? पण नंतरचा प्रत्येक दिवस तुझ्या असण्याची हमी देतच होता... बरेच बदल झालेत यावर्षी...माझं लग्न झालं हा सगळ्यात मोठा बदल...लग्न झाल्यावर बाबांना आणि मला तुझ्या आठवणीने खुप भरुन आलं. छकु नेहमीसारखीच शांत होती..सगळ्यांनाच जाणवली तुझी कमतरता पण कुणी आम्हाला वाईट वाटेल म्हणुन बोलुन दाखवलं नाही..चंचल मावशीने "माय मरो मावशी जगो" ही म्हण स...

इरुवर - तमिळ चित्रपटांचा मेरुमणी

तमिळ सिनेमा हा विषय मी ब्लॉगवर कधीच लिहिलेला नाही. आता १० वर्षे झालीत मद्रास मध्ये आणि बऱ्यापैकी तमिळ पण बोलता येतं, कळतं, म्हणून ठरवले की नेहेमी भाषांतर केलेल्या या नव्या जुन्या चित्रपटाबद्दल लिहावे. तामिळ ही खूप गोड़ आणि ओघवती भाषा आहे, अर्थात कुठल्याही भाषेसारखीच. पण या भाषेचा जन्म प्राकृत भाषेमुळे झाला. लिपी अतिशय सोपी असली तरी शब्द आणि त्याचे उच्चारण कठीण आहे. थोडे अजूनही कळत नाहीच ;) काही दिवसांपूर्वीच "इरुवर" चित्रपट पाहिला. इरुवर - म्हणजे दोघे - ऐश्वर्या चा पहिला चित्रपट म्हणून फेमस आहेच पण जयललिता, करुणानिधी आणि एमजीआर या तीन पूर्व मुख्यमंत्र्यांच्या आयुष्यावर बेतलेला हा चित्रपट. मणी रत्नम चं दिग्दर्शन, ए आर रहमान चं संगीत. अजून काय हवे? मल्याळी अभिनेता मोहनलाल ( एमजीआर), ऐश्वर्या राय ( एमजीआर ची पूर्व पत्नी आणि जयललिता ) च्या भूमिकेत, प्रकाश राज ( करुणानिधी ) च्या भूमिकेत, रेवती आणि तब्बू या करुणानिधींच्या पत्नी. १९५० मधले सेट्स आणि त्याच काळचा प्लॉट. संतोष सिवन ची सिनेमॅटोग्राफी अप्रतिम आहे. तेव्हा संतोष सिवन अतिशय नवखे असतील पण तरीही खूपच सुंदर चित...