Skip to main content

शबरीमलय!

विजयादशमीच्या आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा!!

दक्षिण भारतात आल्यापासुन प्रत्येक चालीरीतींबद्दल दिसागणिक माझं निरीक्षण सुरु आहे अर्थात पहीलेही होतंच पण आता थोडं जास्तं..त्यानुसार इथल्या काही प्रचलित चालीरीतींबद्दल या आणि पुढील लेखांत लिहीणार आहे.

१० दिवसांपूर्वी "इकडली स्वारी" शबरीमलय ला जाऊन आली. लग्नाआधी जेव्हा पहिल्यांदा शाम म्हणाला की मी शबरीमलय ला जाणार आहे तेव्हा मला तो एक्दम काळ्या वेष्टीत खुप सार्या माळा घातलेल्या अवतारात दिसला आणि मी घाबरुन लगेच त्याला नको जाउ असं म्हणाले. शबरीमला ला जाणारी मी पाहीलेली सगळीच पब्लिक काळ्या लुंग्या घालुन अनवणी पायानेच असायची..त्यांचा तो अवतार बघुन हे अय्यप्पा स्वामी म्हणजे काही सोपं प्रकरण नव्हे असं वाटायचं मला.

पण शाम म्हणाला की काळे कपडे घालायची गरज नाही, भगव्या रंगाचं धोतर घालु शकतो आणि कार्यालयात जातांना नेहमीचे कपडॆ आणि अनवाणी न राहता बुट घालता येतॊ. कुठल्याही नेमात अश्या प्रकारे बदल माझ्यासाठी सुखावह होता.

शबरीमलय ला सहसा समुहाने जातात. त्या समुहाच्या म्होरक्याला "गुरुस्वामी" असे म्हणतात. जे पहील्यांदा जातायत त्यांना "कण्णीसामी" (छोटु स्वामी) म्हणतात. सलग तिसर्या वेळी जाणार्याला "मणिकंठन" असे म्हणतात. ज्या तारखेला जायचे ठरते त्या तारखेच्या १५ दिवस किंवा ४२ दिवस आधी गुरुस्वामी सगळ्या इतर स्वामींना रुद्राक्षाची माळ घालतात. त्या दिवसानंतर स्वामी लोकांनी ब्रम्हचर्याचे पालन करणे अपेक्षित असते. त्यांनी घरी शिजवलेलं शाकाहारी अन्नच खाल्लं पाहीजे असा नियम आहे. जी व्यक्ती स्वयंपाक करणार तिने अंघोळ करुनच स्वयंपाक करावा असे अभिप्रेत असते. याव्यतिरिक्त चटई टाकुन खाली झोपणे, कुणालाही वाईट नं बोलणे हे सगळे नियम पाळायचे असतात. याचा अर्थ सगळी उर्जा एकवटुन या यात्रेला प्रारंभ करायचा असतो.

दोन तर्हेच्या रस्त्यांनी शबरीमलय ला जाता येते. चिन्न पादै (छोटा रस्ता )आणि पेरीय पादै (लांब रस्ता). छोट्या रस्त्याने एका विशिष्ट जागेपासुन २ तासात मलय चढता येतो. मोठ्या रस्त्याने एका विशिष्ट जागेपासुन १२ तासात मलय चढता येतो. छोट्या रस्त्याने जातांना पंबा नावाच्या नदीत स्नान करुनच पुढे जाता येते. येथुन १० - ५० वर्षे वयाच्या स्त्रियांचा प्रवेश निषिध्द आहे. मोठ्या रस्त्याने येतांना एरिमेली ला उतरुन पुढे पंबा पर्यंत येऊन अंघोळ करुन पुढे जाता येते. चेन्नई हुन कोट्टायम ला ट्रेन नी जाऊन, पंबा पर्यंत गाडीने जाता येते. पंबाच्या पुढे मात्र कुठ्ल्याही वाहनानी जाता येत नाही. तिथुन पुढे किर्रर्र जंगल आहे. जंगलातल्या पायवाटा तुडवत "स्वामीये अय्यप्पो" चा गजर करत सगळ्यांना पादक्रमण करायचे असते. चेन्नईहुन जातांना इथल्या एका अय्यप्पा स्वामींच्या मंदिरात जाऊन किंवा घरी पुजा करुन घरी डोक्यावर "इरुमुडी" धारण करायची असते. इरुमुडी म्हणजे पिशवी. या पिशवीत घरातल्या प्रत्येकाने टाकलेले मुठ मुठ तांदुळ, मुरमुरे असतात. अय्यप्पा स्वामीच्या अभिषेका करीता एका नारळात १ वाटी तुप भरुन त्याला सील करुन इरुमुडीत ठेवतात. ही इरुमुडी डोक्यावर सतत ठेउनच हा प्रवास करायचा असतो.

अय्यप्पा स्वामींचं जिथे देऊळ आहे त्याला "सन्निधानम" असे म्हणतात. इथे पोचल्यावर देवळात जाण्यासाठी १८ सोन्याच्या पायर्या चढुन जावे लागते. या सोन्याच्या पायर्या चढल्यानंतर मंदीराच्या गाभार्यात प्रत्यक्ष मूर्ती दिसते. ही मुर्ती पंचधातूंची बनलेली असुन यावर तुपाचा अभिषेक केल्यावर ती अजुनच सुंदर दिसते असा प्रत्यक्षदर्शींचा अनुभव आहे.

आजकाल मोबाईल नेटवर्क मुळे जास्तं भिती राहिली नाही. पूर्वी "शबरीमलय" ला जातोय म्हंटलं की लोक घाबरायचे. आजही जिथे हे सगळे लोक वास्तव्य करतात तिथे रात्री फ़टाके लावल्या जातात, हिंस्त्र प्राण्यांपासुन बचाव म्हणुन..

परतल्यावर इरुमुडीतल्या तांदुळाचा "पोंगल" करुन देवाला नैवेद्य दाखवायचा असतो. मला हे सगळे पाहुन विदर्भात लोक महादेवाला जायचे आणि"महादेवाले जातो गा" म्हणुन सांगायचे तेच आठवलं. तेव्हाही लोकं महादेवाहुन परतले की मोठठा उत्सवच साजरा करीत असत. थोड्या फ़ार फ़रकाने प्रथा तीच.....दैवत आणि रुपं वेगवेगळी.. :)

पुढच्या लेखात अय्यप्पा स्वामींबद्दल थोडी माहिती टाकेन.

.

Comments

Popular posts from this blog

दे नेवर रिअली केअर्ड अबाउट हिम!!

काल व्हिएच १ चेनेल वर सगळे विडिओज बघितले..आजवर मी त्याचे एक दोन विडिओज च पाहिले होते..जे काही त्याच्याबद्दल माहित होते ते फ़क्त वर्तमानपत्राद्वारे, बातम्यांद्वारे.. सगळे लोकं म्हणतायत त्याप्रमाणे माझी आणि ईंग्रजी गाण्यांची ओळख मायकल च्या गाण्यांनी नाही झाली..मी कदाचित खुप लहान होते जेव्हा त्याचे अल्बम्स रिलिज झाले...पण तो लक्षात राहीला त्याच्या मुंबईच्या वारी ने.. त्याला पाहण्यासाठी आलेल्या चाहत्यांची संख्या पाहुनच तो नक्कीच काहितरी स्पेशल असावा असे मात्र वाटुन गेले.. त्याचं "दे डोन्ट रिअली केअर अबाउट अस" गाणं मात्र लक्षात राहीलं.. काल पाहीलेलं एबीसी हे त्याने वयाच्या ११ व्या वर्षी गायलेलं गाणं तर केवळ अप्रतिम..वयाचं ११ वर्ष जेव्हा मुलं स्टेजवरही जायला घाबरतात, तिथे हा अगदी आरामात परफ़ोर्म करत होता...नाचत होता..अगदी लिलया गात होता... http://www.youtube.com/watch?v=MYx3BR2aJA4&feature=related त्याचं मी काल पाहिलेलं त्याचं प्रत्येक गाणं मला पुन्हा एकदा या कलाकराची नव्याने ओळख करुन देत गेलं.... "Man In The Mirror" : - I'm Gonna Make A Change, For Once In My Li...

अजुन एक वर्ष तुझ्याशिवाय ..

प्रिय आईस, २००९ संपायला अजुन १ दिवस बाकी आहे आणि सगळे विचारतायत कसं साजरा करणार? तू पण असंच म्हणायचीस..की अगं ३१ डिसेंबर कुठल्याही वर्षाला एकदाच येतो..तो त्या वर्षाचा शेवटचा दिवस म्हणुन त्या वर्षाला आनंदाने निरोप द्यायचा..पण १ जानेवारीला सकाळी लवकर उठुन दिवस साजरा करायचा..हम्म!! तुझं सांगणं नेहमीच पटायचं आणि आजही पटतं..मोठ्ठं झाल्यावर सुध्दा.. हे अजुन एक वर्ष तुझ्याशिवाय गेलं..म्हणजे तुझ्या जिवंत अस्तित्वाशिवाय.. तू पुढच्या प्रवासाला लागली असशीलच गं पण तरीपण मला तुझा वावर अजुनही जाणवतो अपवाद फ़क्तं मी दिवाळीत बेसनाचे लाडु केले तेव्हाचा...मला काहीच सांगितलं नाहीस आणि ते लाडु खुपच खराब झाले...थोड्या वेळ मीच घाबरले होते की का तू असल्याचं जाणवत नाहिए? पण नंतरचा प्रत्येक दिवस तुझ्या असण्याची हमी देतच होता... बरेच बदल झालेत यावर्षी...माझं लग्न झालं हा सगळ्यात मोठा बदल...लग्न झाल्यावर बाबांना आणि मला तुझ्या आठवणीने खुप भरुन आलं. छकु नेहमीसारखीच शांत होती..सगळ्यांनाच जाणवली तुझी कमतरता पण कुणी आम्हाला वाईट वाटेल म्हणुन बोलुन दाखवलं नाही..चंचल मावशीने "माय मरो मावशी जगो" ही म्हण स...

इरुवर - तमिळ चित्रपटांचा मेरुमणी

तमिळ सिनेमा हा विषय मी ब्लॉगवर कधीच लिहिलेला नाही. आता १० वर्षे झालीत मद्रास मध्ये आणि बऱ्यापैकी तमिळ पण बोलता येतं, कळतं, म्हणून ठरवले की नेहेमी भाषांतर केलेल्या या नव्या जुन्या चित्रपटाबद्दल लिहावे. तामिळ ही खूप गोड़ आणि ओघवती भाषा आहे, अर्थात कुठल्याही भाषेसारखीच. पण या भाषेचा जन्म प्राकृत भाषेमुळे झाला. लिपी अतिशय सोपी असली तरी शब्द आणि त्याचे उच्चारण कठीण आहे. थोडे अजूनही कळत नाहीच ;) काही दिवसांपूर्वीच "इरुवर" चित्रपट पाहिला. इरुवर - म्हणजे दोघे - ऐश्वर्या चा पहिला चित्रपट म्हणून फेमस आहेच पण जयललिता, करुणानिधी आणि एमजीआर या तीन पूर्व मुख्यमंत्र्यांच्या आयुष्यावर बेतलेला हा चित्रपट. मणी रत्नम चं दिग्दर्शन, ए आर रहमान चं संगीत. अजून काय हवे? मल्याळी अभिनेता मोहनलाल ( एमजीआर), ऐश्वर्या राय ( एमजीआर ची पूर्व पत्नी आणि जयललिता ) च्या भूमिकेत, प्रकाश राज ( करुणानिधी ) च्या भूमिकेत, रेवती आणि तब्बू या करुणानिधींच्या पत्नी. १९५० मधले सेट्स आणि त्याच काळचा प्लॉट. संतोष सिवन ची सिनेमॅटोग्राफी अप्रतिम आहे. तेव्हा संतोष सिवन अतिशय नवखे असतील पण तरीही खूपच सुंदर चित...