Skip to main content

दाक्षिणात्य खाद्य संस्कृती - पोंगल



जरा उशिराच का होईना, मकरसंक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. अख्खा महाराष्ट्र जिथे मकर संक्रमण आणि उत्तरायण अनुभवत असतो तिथे थोड्या दूरवर ;) म्हणजे आपल्या तामिळनाडूमध्ये कापण्या सुरु झाल्या असतात आणि पोंगल चा सण अगदी दिवाळीसारखा थाटामाटात साजरा केला जातो. उसाचे ढीग, ओल्या हळदीचे धांडे आणि शेतातून नुकताच आलेला भात यासगळ्यांनी मन आणि घर अगदी भरून जातं. पोंगल म्हणजे तामिळ लोकांची दिवाळी असे म्हणायला  हरकत नाही. दिवाळी हे लोक अगदी एकंच दिवस साजरा करतात. पण पोंगल मात्र ४ दिवसांचा असतो. भोगी , थई पोंगल, माटू पोंगल, काणूम पोंगल असे चार दिवस सगळीकडे सुट्टी असते, सगळे आपापल्या गावी जातात म्हणजे चेन्नई हुन. तर असा हा पोंगल. पोंगल हे खरेतर एका पदार्थाचे नाव आहे. पोंग म्हणजे उतू जाणे. उतू जाणे म्हणजे समृद्धीचे लक्षण मानले जाते आणि पोंगल करतांना वरचे फेसाळलेले पाणी उतू जाऊ देतात पोंगल च्या दिवशी आणि पोंगालो पोंगल असे म्हणतात. मार्गळी महिना संपून थई महिना सुरु झाला म्हणूनही पोंगल ला थई पोंगल असे म्हणतात. भोगी च्या दिवशी सकाळी भयंकर धूर होता आकाशात,  जुन्या वस्तू जाळून घर स्वच्छ केल्या जाते ह्या दिवशी  अगदी पहाटे ४ वाजता लहान मुले ढोल बडवत सगळ्यांना उठवत  रस्त्यावरून आपला ताफा घेऊन जातात. पोंगल च्या दिवशी लागणारे  सगळे सामान  भोगीच्या दिवशी बाजारात दिसू लागते.
आदल्या दिवशीच्या तयारी बद्दल तामिळ लोकांचे मला अतिशय कौतुक आहे. पोंगल च्या दिवशी मोठाल्या रांगोळ्या प्रत्येक दारासमोर काढल्या जातात ते ही आदल्या रात्रीच जेणेकरून सकाळी फ्रेश रांगोळी तयार. दुसऱ्या दिवशी त्यात पुन्हा वेळ घालवण्याची गरज नाही. अजून एक म्हणजे घरात देवासमोर काढल्या जाणारी रांगोळी तांदुळाच्या पिठाची असते, रात्रीच काढून ठेवली की ती सकाळपर्यंत फरशीवर वाळून तयार असते म्हणजे पुन्हा वेळ वाचला.  तामिळ लोकांचे  पहाटेच्या प्रहरावर अतिशय प्रेम आहे. सकाळी लवकर उठणे आणि कामे भराभर आटपणे यात त्यांचा हातखंडा आहे. पोंगल च्या दिवशी सकाळी ७ पर्यंत पूजा आटोपून ही मंडळी निवांत जेऊन सगळ्यांकडे आशिर्वादाला जाऊन पण १ वाजता वामकुक्षी ला घरी येऊ शकते. ज्यांना ऑफिस आहे ते पूजा, जेवण आटोपून अगदी ट्रेन पकडून सुध्दा ऑफिस ला जाऊ शकतात. वक्तशीरपणा आणि वेळेचा सदुपयोग ह्या दोन गोष्टी तामिळ लोकांकडून अगदी शिकण्यासारख्या आहेत.
पोंगल म्हणजे मुगाच्या डाळीची खिचडी हळद नं घालता. आता ती शिजवण्यासाठी वेगळ्या पद्धती आहेत. कालच्या पोंगल मध्ये मला उकळी आणायचीच होती म्हणून माझ्याकडे असलेल्या एका पितळेच्या कळशी ला ओली हळद बांधली, त्याला चंदनाचे बोट लावले, ओट्यावर रांगोळी काढली, हळद कुंकू वाहिले,मागे ऊस लावला, पूजा केली,आणि मग मध्ये पाणी घातले, भाजलेली मुगाची डाळ आणि तांदूळ वरून घातले. थोडी उकळी फुटली की खूप मोठ्या मनाने भरपूर गुळ घातला, ४ चमचे साजूक तूप घातले आणि शिजू दिले. शिजत असताना फेस येतो त्याला पाहून पोंगालो पोंगल असे म्हणतात. तशी समृद्धी नेहेमी असावी सगळ्यांकडे अशी प्रार्थना करतात.
वेन पोंगल म्हणजे खारा पोंगल, मुगाची हळद नं घालता  खिचडी करायची त्यात शिजतांना मीठ  टाकायचे, आणि शिजल्यावर, वरून  तुपाची, कढीपत्ता, हिंग, मिरे, किसलेले आले  घालून फोडणी घालायची, वरून छान तळलेले काजू पण घालता येतात. वेन पोंगल  सोबत सांबर आणि मेदुवडा हे कॉम्बिनेशन आहे.
पूजा करताना वेतलई ( विड्याची पाने ), पाककु (सुपारी), पु ( फुले), पळम ( केळी ) आणि नारळ यांचे फार महत्व आहे. दरवर्षी प्रमाणे याही वर्षी सगळे देवासमोर ठेऊन सगळ्यांकडे अशीच समृद्धी चिरंतन राहू दे अशी प्रार्थना केली आणि सगळ्यांनी शक्करई पोंगल चा फडशा पाडला.




पोंगल साठी कळशी तयार 

 पूजेची तयारी 
मेदुवडा 

ओली हळद 

वडे पोंगल नैवेद्य 

मागच्या  वर्षीची कोलम (रांगोळी)








Comments

Popular posts from this blog

दाक्षिणात्य संस्कृती - कोलम (रांगोळी)

दाक्षिणात्य संस्कृती - कोलम (रांगोळी) या पोस्ट मध्ये खाद्यसंस्कृती बद्दल नं सांगता रांगोळ्या आणि तामिळ नाडू यांच्या असलेल्या घट्ट नात्याबद्दल बोलूया. रांगोळी म्हणजे मला तरी एखाद्या स्त्री ची अभिव्यक्ती वाटते. रांगोळी काढणारा पुरुष जरी असेल तरी त्याच्या मनातल्या तरल भावना त्या रांगोळीत उतरतात. अर्थात नेहेमीच्या रोज काढल्या जाणाऱ्या रांगोळ्या म्हणजे गृहिणीची अभिव्यक्ती का हे मला नाही माहिती. पण अंगण झाडणे, सडा टाकणे, आणि रांगोळी काढणे  माझ्यासाठी एक थेरेपि आहे. आजकाल अपार्टमेंट आणि मोठाल्या इमारतींमुळे अंगण हा भागच नाहीसा झालाय घराचा, पण मागे आम्ही होतो त्या घरी मोठे अंगण होते. तामिळ नाडुत सगळ्या दारासमोर रांगोळी काढल्या जाते. अगदी अपार्टमेंट जरी असेल तरी अपार्टमेंट च्या मोठ्या दारासमोर रांगोळी काढली जातेच. इथल्या गल्ल्यांमध्ये समोरासमोरील घराच्या दारासमोर तर दोन्ही वेळेला रांगोळी काढल्या जाते. सकाळी ६. ०० ते ६.३० च्या दरम्यात सगळ्या स्त्रिया या कामात मग्न दिसतात. पहिले मला फार कुतूहल वाटे. एवढ्या सकाळी उठणे आणि पहिले काम म्हणजे रांगोळी. दिवस कसा  छान सुरु होत असेल असे वाटायचे. लग्न

दलपती - मणी रत्नम चा मास्टरपीस

तामिळ चित्रपटांमध्ये मी सगळ्यात पहिले पाहिलेला चित्रपट म्हणजे दलपती. तामिळ भाषा जरी क्लिष्ट वाटत असली तरी ती सर्वांगसुंदर भाषा आहे. आपण मराठी किंवा इतर भाषिक लोक नेहेमी दक्षिणेकडच्या ४ भाषांची सारख्या वाटतात म्हणून खिल्ली उडवत असतो पण ह्या चारही भाषा कन्नड, तमिळ, तेलगू आणि मल्याळम अतिशय समृद्ध आहेत. चारही भाषांची एक स्वतःची चित्रपट सृष्टी आहे हे महत्वाचे. बाहुबली हे एक उत्तम उदाहरण. बरेच हिंदी चित्रपट, मल्याळम आणि तामिळ चित्रपटांवरून प्रेरित असतात हे सांगणे नं लगे. तर असाच एक १९९०'स मध्ये तयार झालेला चित्रपट दलपती म्हणजे म्होरक्या किंवा प्रमुख किंवा सेनापती.  कर्ण आणि अर्जुन ह्या धर्तीवर आधारित असलेला हा चित्रपट त्याकाळी खूप गाजला होता. मामुटी, रजनीकांत आणि अरविंद स्वामी, शोभना आणि सगळे उत्तम कलाकार. इलैराजा यांचे संगीत आणि संतोष सिवन यांची सिनेमॅटोग्राफी. असे म्हणतात की मणी रत्नम चे सगळे चित्रपट सकाळी चित्रांकित करतात. त्यावेळी अतिशय सुंदर प्रकाश असतो आणि त्याचा पुरेपूर उपयोग ते प्रत्येक शॉट मध्ये करून घेतात. ह्या चित्रपटात ते प्रकर्षाने जाणवते.  मणी रत्नम चे सगळे

दाक्षिणात्य खाद्यसंस्कृती -दोसा

दोसा हा पदार्थ नं आवडणारा माणूस विरळा. माझी आणि दोस्याची ओळख आमच्या शाळेच्या आनंदमेळ्यात झाली होती. एक डोस्याचा स्टॉल होता तिथे, माझ्या बेस्ट फ्रेंड च्या काकी चा. मी नं खाताच गर्दी पाहून मला लक्षात आलं होतं तेव्हा कि काहीतरी स्पेशल आहे दोस्यात. हळूहळू जसे मोठे होत गेलो तसे आई बाबा बाहेर जेवायला घेऊन जायचे, मग खायचे काय तर डोसा, जगत नावाचे नागपूरला खूप प्रसिद्ध हॉटेल होते, अर्थात आता मॉल आणि मोठमोठ्या बिल्डींग्स असलेले नागपूर नव्हते तेव्हा उणीपुरी २ ते ३ फॅमिली रेस्टॉरंट्स. त्यात आर्य भवन एक आणि एक जगत. आई म्हणायची जी वस्तू आपण घरी जास्त करत नाही ती बाहेर खावी. म्हणून मोठ्ठा क्रिस्पि दोसा त्यात बटाट्याची भाजी, सोबत चटण्या. एकदम पोटभर व्हायचा तो मसाला डोसा. मी ९ वी, १० वी त असतांना आई घरीच डोसे करायची. पुढे कॉलेज मध्ये घेल्यावर वगैरे बाहेर खातांना डोसा हा पदार्थ बऱ्याचदा खाल्ल्या जायचा.  आता गेल्या १० वर्षांपासून चेन्नई मध्ये स्थायिक असल्याने, दोसा हा दाक्षिणात्य संस्कृतीचा किती अविभाज्य घटक आहे हे कळून आले. माझ्या घरी डोश्याचे पीठ नाही असा एकही दिवस जात नाही. जसे मराठी घरांत कणिक