Skip to main content

Posts

Showing posts from September, 2009

शबरीमलय!

विजयादशमीच्या आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा!! दक्षिण भारतात आल्यापासुन प्रत्येक चालीरीतींबद्दल दिसागणिक माझं निरीक्षण सुरु आहे अर्थात पहीलेही होतंच पण आता थोडं जास्तं..त्यानुसार इथल्या काही प्रचलित चालीरीतींबद्दल या आणि पुढील लेखांत लिहीणार आहे. १० दिवसांपूर्वी "इकडली स्वारी" शबरीमलय ला जाऊन आली. लग्नाआधी जेव्हा पहिल्यांदा शाम म्हणाला की मी शबरीमलय ला जाणार आहे तेव्हा मला तो एक्दम काळ्या वेष्टीत खुप सार्या माळा घातलेल्या अवतारात दिसला आणि मी घाबरुन लगेच त्याला नको जाउ असं म्हणाले. शबरीमला ला जाणारी मी पाहीलेली सगळीच पब्लिक काळ्या लुंग्या घालुन अनवणी पायानेच असायची..त्यांचा तो अवतार बघुन हे अय्यप्पा स्वामी म्हणजे काही सोपं प्रकरण नव्हे असं वाटायचं मला. पण शाम म्हणाला की काळे कपडे घालायची गरज नाही, भगव्या रंगाचं धोतर घालु शकतो आणि कार्यालयात जातांना नेहमीचे कपडॆ आणि अनवाणी न राहता बुट घालता येतॊ. कुठल्याही नेमात अश्या प्रकारे बदल माझ्यासाठी सुखावह होता. शबरीमलय ला सहसा समुहाने जातात. त्या समुहाच्या म्होरक्याला "गुरुस्वामी" असे म्हणतात. जे पहील्यांदा जातायत त्यांना &q

सामना…कर्करोगाशी(2)

टाटा मेमोरिअल मधे तर जणु काही जत्राच भरली होती..पहिल्या दिवशी आईला डे केअर मध्ये किमोथेरेपी घ्यायला सांगितली...तिला अजिबात सहन न झाल्याने चार दिवसांची लांब किमो सुरु केली..टाटा मेमोरिअल ही एक खुप मोठी संस्था आहे..कुठेतरी सगळेच सुन्न असल्यासारखे वाटतात तिथे...एक मात्र लक्षात आलं तिथे कॅंसर ची कुठलीच जात नाही...टाटाला सगळेच सारखे.. तिथे राहणे हा एक भयंकर अनुभव होता...आईजवळ हॉस्पिटल मध्ये फ़क्त एकच व्यक्ती राहु शकायची त्यामुळे आम्हाला बाहेर कुठेतरी लॉज बघणं आवश्यक होतं..परेल सारख्या ठिकाणी लॉज मिळणं कठीण..शेवटी आमच्या बजेटमधली रहायची जागा गवसली...आईची एक किमो झाल्यावर २ महिन्यानी पुन्हा मुंबईला यायला सांगितलं होतं..नागपुरला अजुन २ किमोथेरेपीच्या सायकल्स घेउन मग पुन्हा मुंबईला जायचं होतं..किमोथेरेपी ने तिच्या अन्ननलिकेभोवती असलेलं लेजन कमी व्हायला हवं होतं.. नागपुरला आल्यावर जरा हायसं वाटलं..हा तिच्यासोबत घालवलेला सुंदर काळ होता.. तिला हे माहित होतं की आता आपले केस जाणार आपण विचित्र दिसणार..पण सुदैवाने असं काही झालं नाहि..तिला त्रास व्हायचा खुप जेवतान्ना..मुग्धा मल नं लोणचं भात खाव वाटतो ग

सामना...कर्करोगाशी

लिसा रे ला कँसर झाला आणि कँसर ला ग्लॅमर प्राप्त झालं.. :) आहे ही तो रोग तसा..रोगांचा राजा म्हणु शकतो आपण त्याला..हळुचकन कुठलीही चाहुल नं लागता येतो आणि आपली धांदल उडवतो.. आपल्या देशाच्या कॅंसरच्या इतिहासावर एकदा या निमित्त्याने नजर टाकुया..यावरुन लक्षात येईल की कुणालाही म्हणजे अगदी कुणालाही हा रोग होऊ शकतो..माझ्या माहितीप्रमाणे रामकृष्ण परमहंस, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, सिने सॄष्टीतल्या नरगिस दत्त यांसारख्या दिग्गजांना पण या रोगानेच पछाडले होते. माझ्या ओळखिच्या अगदी साळसूद, कुठल्याही प्रकारची वाईट सवय नसलेल्या व्यक्तींनाच या रोगाने ग्रासले होते. लहानपणी दारु पिणार्‍यांना, सिगारेट ओढणार्‍यांनाच कॅंसर होतो अशी माझी ठाम समजुत होती.. १ वर्षापासुन आईला काहीही खाल्लं की तिखट लागत असे..अगदी साधं वरण सुध्दा, तिचं वजन कमी व्हायला लागलं होतं, चिड्चीड वाढली होती...आम्हाला वाटायचं की उपास करते म्हणुन कदाचित वजन कमी होत असावं, आमचे फ़ॅमिली डॉक्ट्र म्हणायचे काही हरकत नाही हो वजन कमी असलं तरी..असंच एके दिवशी जेवता जेवता आईला प्रचंड उलटी झाली डॉ कडे गेले असता त्यांनी ताबडतोब एंडोस्कोपी करायला सांगितल

भुलाबाई आणि भुलोजी

:) बरेच दिवस झाले अनुदिनीकडे पाहुन..म्हणतात ना नव्याचे नऊ दिवस तसं काहीसं झालं असावं. लहानपणी नवीन फ़्रॉक, चप्पल, कंपॉस किंवा काहीही घेतलं तरी मला रात्रभर झोपेतही छान वाटत असे. तसंच काहीसं या अनुदिनीबाबतीत झालं. विषय शोधायला लागले मी आपोआप आणि उतरवत गेले जसं वाटेल तसं..काहीवेळा हातच्या कामाकडे दुर्लक्ष करुन, रविवार असाच वाया नं घालवता सकाळी उठुन अशी काहीशी माझ्याही अनुदिनी ची पाने भरली आणि त्याला योग्य ते प्रतिसादही मिळाले... एका नववधूची एका नव्या जागेत नव्या वातावरणात होणारी गम्मत..तिला तिच्या भाषेचं, तिच्या लोकांचं वाटणारं कौतुक, सणंवारं, माहेरची सतत येणारी आठवण हे सगळं भरभरुन मला इथे उतरवता आलं.. नुकतीच माहेरी जाऊन आले...माझी बर्‍याच दिवसाची इच्छा पूर्ण झाली...येतांना एकटीच आली कारण श्रीमंत आधीच परतले होते :) मग काय गाडीने जसा जसा वेग घेतला तशी तशी मी अंतर्मुख होऊ लागले.. आम्ही लहानपणी भुलाबाई बसवत असु..अजुनही विदर्भात कोजागिरीला भुलाबाई बसवतात..आणि वेगवेगळे पदार्थ प्रसादाकरिता बनवुन मोहल्ल्यातल्या पोरी गाणी म्हणतात..त्यादिवशी घरातल्या मोठ्या अपत्याला खास नविन ड्रेस दिल्या जातो. त्

रॅंडम थॉट्स...

कित्येक दिवसांपासुन मी काही लिहिलेलंच नाहीए. कितीदा माझ्या डोक्यात विषय आले..अगदी पॅराग्राफ चे पॅराग्राफ तयार झाले पण टायपता मात्र आले नाही... अनेक घडामोडी झाल्या काही अपेक्षित काही अनपेक्षित..आजकाल काहीही झालं ना की माझ्या मनात एक विचित्र प्रकारची भिती भरते..आता उद्यापासुन श्राध्द पक्षाचे दिवस सुरु होणार...आई म्हणायची हे दिवस चांगले नसतात. Science च्या दृष्टीने पण पावसाळयात पाण्यात होणारे बदल, हवामानात होणारे बदल यांमुळे थोडं सर्दी पडसं ताप हे सगळं येणारंच त्यामुळे मलाही आजकाल हे खरं वाटू लागलंय. बाबांची ५ दिवसापासुन तब्येत बरी नाही. नेहमी हसता खेळता माणुस असा तापाने हैराण असला की खरंच वाईट वाटतं..माझं लक्षंच नाहिए कशात परवापासुन...त्यांची तब्येत बरी नाहिए आणि मी इथुन काहीच करु शकत नाही हे फ़ीलींग खुप बेकार आहे..इथुन डायरेक्ट फ़्लाईट का नाही नागपुरसाठी हा प्रश्न मला नेहमीच पडतो. :( आज बाप्पा जाणार गावाला. इतके दिवस स्वाईन फ़्लु च्या भितीत घालवल्यावर बाप्पाचे आगमन खरंच खुप आनंददायी होते."थांबा हो अजुन थोडे दिवस" असं म्हणावं वाटतंय बाप्पाला. ६ व्या दिवशी मोदक केले,छान झाले असं